मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती

हत्या !!!

दशानन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
खुप दिवस झाले मनात एक कथा रेंगाळात होती ती आता शब्दातून बाहेर पडत आहे, बघा कशी वाटते ती . * "फोन कुणी केला होता ? "- पोलिस अधिकाराने विचारले, " साहेब मी केला होता, ह्यांचा शेजारी आहे मी, रोज सकाळी हे जॉगिंगला येतात पण आज आले नाही म्हणून मी सहज विचारायला आलो तर दार उघडे होते व हे सोफ्यावर..

कंपूबाजी

घाटावरचे भट ·
पूर्वसूचना : हे लिखाण केवळ ह. घेण्याकरिता असून त्यातून कोणतेही गर्भित अर्थ किंवा संदर्भ काढण्यात आल्यास (आणि पर्यायाने सदर व्यक्तीचे ब्लड प्रेशर वाढल्यास) त्याची जबाबदारी संपूर्णपणे तसे अर्थ किंवा संदर्भ काढणार्‍या व्यक्तीवर राहील.

भटकंती ४ था स्टॉप - नैनीताल

दशानन ·
नैनीताल, वाह ! हा एकच शब्द तोंडातून बाहेर पडतो जेव्हा आपण नैनीताल च्या पहाडी वर पोहचतो, सरोवरांचे शहर नावाने जग प्रसिध्द असलेले हे शहर नैनीताल, भारतात व जगात सर्वांत सुंदर हिल स्टेशन म्हणून ख्याती असलेले छोटे.. पण निसर्गाने मुक्त पणे उधळणं केलेले शहर.

एक निवेदन..

आणिबाणीचा शासनकर्ता ·
लेखनप्रकार
राम राम मिपाकरहो, अलिकडेच मिसळपाव डॉट कॉम (मिपा) च्या मालकांना, मिपाच्या संपादक मंडळाला जाब विचारणारे काही धागे पाहंण्यात आले. ते आम्ही अर्थातच रद्द केले आहेत. त्याच अनुषंगाने आम्ही हे निवेदन पुन्हा एकवार देत आहोत. निवेदन - (कृपया सर्वांनी नोंद घ्यावी) १) मिपा या संकेतस्थळावर लिहिला जाणारा कुठलाही मजकूर अप्रकाशित करण्याचे/रद्द करण्याचे पूर्णाधिकार मिपाचे मालक, मिपाचे संपादक मंडळ यांचेकडे आहेत.

दी कॅट इन दी हॅट - अर्थात टोपीवाले मांजर

चित्रा ·
लेखनप्रकार
डॉ. सूस - आजचे गूगलचे मुखपृष्ठ पाहिले तेव्हा लक्षात आले की आज डॉ. सूस यांचा वाढदिवस. आज असते, तर ते १०५ वर्षांचे झाले असते. डॉ. सूस हे त्यांचे खरे नाव नव्हे, खरे नाव थिओडोर गीजल. सूस हे त्यांच्या आईचे लग्नापूर्वीचे आडनाव (तसेच त्यांचे मधले नाव) त्यांनी लहान मुलांच्या गोष्टी लिहीताना टोपणनाव म्हणून लावले. डॉ. सूस यांच्या पुस्तकांशी माझी तोंडओळख इथे अमेरिकेत आले तेव्हा पुस्तकांच्या दुकानांच्या शेल्फांवरच्या त्यांच्या एकदोन पुस्तकांमुळे झाली.

आनंदाची बातमी..! :)

विसोबा खेचर ·
एक निवेदन... कळवण्यास अत्यंत आनंद होतो आहे की मिपावर शुद्धलेखन विषयक लेखांवरील, चर्चांवरील बंदी आता उठवण्यात आली असून मिपावर एक शुद्धीचिकित्सक विभाग सुरू करण्यात आला आहे.. :) माननीय मिपाकर सतिशराव हे या विभागाचे प्रमूख असतील व तात्या त्यांच्या हाताखाली त्या विभागातील एक दुय्यम क्लार्क म्हणून काम पाहील! :) सतिशरावांनी प्राणिपात कोटि कोट आणि मोकलाया दाहि दिश्या या दोन कविता मिपावर लिहून तात्याच्या कानफटात मारली आहे आणि शुद्धलेखन विषयक झणझणीत अंजन समस्त मिपाकरांच्या डोळ्यात घातले आहे.

भटकंती तिसरा स्टॉप - दिल्ली -११०००६

दशानन ·
लेखनविषय:
दिल्ली पीनकोड ६ भाग असेलही असा, पण बाकी दिल्लीत तो असा बेटासारखा राहू शकेल का? - मनिष ह्यांचा एक प्रतिसाद. हे वाचल्यावर मनात आलं की चला जरा मिपा करांना दिल्ली-६ ची सफर घडवू या.

ग्वाल्हेरी मराठीचा लहेजा

भोचक ·
माझ्याच कार्यालयात काम करणार्‍या ग्वाल्हेरच्या अरूंधती आमडेकर या मराठी मुलीने लिहिलेला हा लेख. दिल्लीला जवळजवळ खेटलेल्या ग्वाल्हेरमध्ये मराठी कोणत्या रूपात नांदतेय ते आपल्याला कळेल. भाषाचा संपूर्ण लहेजा तिथलाच आहे. फक्त वाक्यरचना वाचण्यास सोपी जावी म्हणून तेवढी संपादीत केलीय. बाकी शब्द वगैरे तेच ठेवलेत. 'अरे, यार दादा तूने आज फि‍र मेरा पेन ले लि‍या. आई देख ना इसको. बाबा आपके लि‍ए चाय बनाऊ? माझं एवढं बोलण झालं की बाबांचा चेहरा बघायसारखा असतो. "हुम्म, हे काय चालू ए अरुंधती‍ तुझं. कि‍ती वेळा सांगायचं की‍ घरात तरी मराठीत बोलत जा. आता कॉलेज झालं ना तुझं.

अमराठी भाषिकांनाहि प्रेरणा देणारे शिवराय !!! 1

सुभाष ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
अमराठी भाषिकांनाहि प्रेरणा देणारे शिवराय !!! छत्रपति शिवाजी महाराजांचे कार्य,शौर्य,राजनिती,मुत्सद्दीपणा हे सर्व केवळ महाराष्ट्राच्या चौकटीमध्ये बंदिस्त रहाणे शक्यच नाही.महाराजांचे स्वराज्याचे उद्दीष्ट,त्यामागची भुमिका,येथे एतद्देशियांचे समतेचे ,ममतेचे, सुखाचे हिंदवी स्वराज्य निर्माण व्हावे ही तो प्रभुचीच इच्छा हे महाराजांचे मनोगत महाराष्ट्राबाहेरचे विचारवंतानाहि उमगले होते,आहे.शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नेते नव्हते तर ते सर्व भारताचे आदर्श राष्ट्रपुरुष होते अशी भावना भारतीय विचारवंत अन प्रतिभावंत यांच्या मनात शिवकालात अन नंतरहि निर्माण झाली होती अन आजही ती कायम आहे.म्हणुनच मराठी बरोब

उपेक्षित सावरकर

भोचक ·
सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले. सावरकरांना समजून घेण्यात आपण कमी पडलो आणि त्यांचं मोठेपण इतरांपर्यंत पोहचविण्यातही आपल्याला अपयश आलं.