मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

माहिती

आपले दुरावलेले बांधव - रोमा

भास्कर केन्डे ·
आजच ही बातमी झळकली अन पुन्हा एकदा रोमांवरील पूर्वी कधितरी केलेल्या वाचनातील आठवणी जाग्या झाल्या. देशोदेशांत लढाया-युद्धे झाली त्या त्या वेळी तिकडून भारतात स्थलांतरीत झालेल्या लोकांना कायमचा आश्रय मिळाला. भारतीयांनी जगातल्या जवळपास प्रत्येक मुख्य भागातल्या लोकांना आश्रीत म्हणून येथे आल्यावर आपल्यात सामावून घेतले. मात्र खूप कमी वेळा भारतातून जीव वाचवून लोकांना बाहेरच्या जगाचा आश्रय घ्यावा लागला. त्या अपवादांमधले विषेश लक्षात घेण्यासारखे हे रोमा.

ऑक्सिटॉसिन अलिंगनौषधी

मृदुला ·
लेखनप्रकार
नेहमीच्या उत्क्रांतीच्या बातम्या चाळताचाळता ऑक्सिटॉसिनविषयी वाचले. शास्त्राज्ञांनी असे शोधले आहे की माणसाला जेव्हा दुसर्‍या माणसाविषयी प्रेम, ममत्व वाटते तेव्हा पियुषिका ग्रंथीद्वारे ऑक्सिटॉसिन शरिरात सोडले जाते. या द्रव्यामुळे भावनिक धागे घट्ट होण्यास मदत होते. प्रयोगातून असेही सिद्ध झाले आहे की काही जातीच्या उंदरांत नर-मादी एकमेकांशी एकनिष्ठ राहतात ते ह्याच द्रव्याच्या प्रभावाने. माणसातील मर्यादित एकनिष्ठाही याच द्रव्यामुळे असावी असा कयास आहे.

भटकंती - पहीला स्टॉप - गुडगांव ! (गुरुगांव)

दशानन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
पुरातनकाळात पांडव व कौरव ह्यांना शिक्षण देणारे गुरु द्रोणाचार्य ह्यांना आपल्या उपजाविकेसाठी हे गाव दान दिले होते म्हणून ह्याचे नाव गुडगाव (गुरु गाव) ह्या गावात एक प्राचीन शितला माताचे मंदिर सोडले व गुरु द्रोणाचार्याचा एक पुतळा सोडला तर ह्या बद्दल काहीच पुरावा सापडत नाही, तसेच हा भाग नेहमीच युध्दाच्या सावली खालीच राहीला ते दिल्ली मुळे.. दिल्ली फक्त १८ किलोमिटर दुर. इतिहासाचे साक्ष देणारे असे काहीच बांधकाम आसपास दिसत नाही ते मोगलांच्या आक्रमणामुळे..

बिलावलशी दोस्ती! :)

विसोबा खेचर ·
लेखनविषय:
राम राम मंडळी, काही दिवसांपूर्वी मिपावर आम्ही आमचे मधुभाई हा लेख लिहिला होता. त्यात काही मंडळींनी मधुभाईंनी गायलेले काही ध्वनिमुद्रण असल्यास ते जालावर चढवावे असे आम्हाला सुचवले होते म्हणून मुद्दाम हा लेखनप्रपंच. परवा खूप दिवसांनी सवड मिळाली म्हणून आम्ही मधुबुवांच्या घरी गाण्याची तालीम घ्यायला गेलो होतो. "अरे ये ये!" असं नेहमीप्रमाणे मधुभाई हसतमुखाने म्हणाले. तिथे त्यांच्या अजून दोन शिष्या बसल्या होत्या. त्यांच्या गाण्याची तालीम सुरूच होणार होती तेवढ्यात आम्ही तिथे हजेरी लावली! "काय मग? आज वेळ मिळाला वाटतं?

पूर्वेच्या देवा तुझे 'सूर्य'देव नाव

सर्वसाक्षी ·
लेखनप्रकार
क्रांतिचे महात्म्य हेच की क्रांतिने रोमांचित झालेला एखादा सामान्य मनुष्य आपल्या ध्येयाने वेडा होऊन असा एखादा बेहोष क्षण जगतो की त्याचे सामान्यत्व त्याच्या नकळत गळुन पडते आणि त्याच्या तेजाने आसमंत दिपुन जातो. आपण कोण, आपले सामर्थ्य किती, आपली झेप कुठवर, आपला शत्रु किती प्रबळ, आपले ध्येय किती असाध्य याच यत्किंचितही विचार न करता ’मला माझ्या ध्येयाखातर काहीही दिव्य करावे लागले तरी मी ते साध्य करणारच’ हा ध्यास जे घेतात तेच लौकिकार्थाने अमर होतात.

इकडची तिकडची खादाडी, अर्थात, अन्न हे पूर्णब्रह्म..!

विसोबा खेचर ·
राम राम मिपाकरहो, आंतरजालावर उत्तमोत्तम पाककृतींचे आज अनेक ब्लॉग्ज उपलब्ध आहेत. तिथे मुशाफिरी करतांना विविध पाककृतींनी नटलेला, खाद्य संस्कृतीची सुंदर उधळण करणारा असा एखादा ब्लॉग सहजच दृष्टीस पडतो आणि डोळ्याचं पारणं फिटतं, जीव तृप्त होतो! हे सदर केवळ अश्या ब्लॉगांसाठीच!

राऊरकेला

SwanandSolanke ·
दिड वर्षांपूर्वी मला स्वप्नात देखिल वाटले नव्हते की, मी एम् टेक करण्यासाठी ओडिसा राज्यात जाईल. ज्या राज्याचा उल्लेख फक्त महानादीच्या पुरापूरता आणि रथ यात्रेपूरता येतो, त्याच राज्यात एक भारत सरकारच्या कायद्यानुसार राष्ट्रीय महत्वाचे इंजीनियरिंग महाविद्यालय आहे, राष्ट्रीय तंत्रद्न्यान संस्था, राऊरकेला , हे त्याचे नाव. असो, मी मिसल पावचा नुकताच सदस्य झालो, भटकंती हा माझ्या अनेक छंदान्पैकी एक, म्हणुन सुरुवात करतांना या राज्याचे सौंदर्य मी आपल्या समोर ठेवत आहे. ओडिसा राज्य जितके निसर्गसुन्दर तितकेच कमालीचे विरोधाभासी आहे.

महाराष्ट्रातिल गड किल्ले ! इत्यन्म्भुत माहिति

मानव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
महाराष्ट्रातिल गड किल्ले ! इथे बर्याच किल्ल्यान विषयि इत्यन्म्भुत माहिति देन्याचा प्रयत्न केला आहे ! आपल्या प्रतिक्रिया कळवा ,आणखिन अपडॅट लवकरच करनार आहे http://tush9890.blogspot.com/

संक्रांत कशासाठी

भास्कर केन्डे ·
संक्रांत म्हटलं की तीळ-गुळ, तिळाचे लाडू, तीळ लावलेल्या भाकरी, वाला-वांगी-पेरु-बोर वगैरे भाज्यांच्या रसरशीत व खमंग गावराण जेवणाचा अस्वाद, सुवासिनिंचे हळद-कुंकवाला एकमेकींकडे जाणे येणे, आवा लुटणे, नवीन सुगड्यात बोरे, चिंचा, उसाची कांडे भरुन त्यांची पुजा करणे, चिल्या-पिल्यांचे बोर न्हाण, पतंगांच्या भरार्‍या... ही सगळी लगबग डोळ्यासमोर येते. मला मात्र एक गोष्टीची गंमत वाटते. आजकालच्या संक्रांतीची भेटकार्डे व शुभेच्छापंत्रांत तिळ-गुळाचा भरपूर उधो-उधो होतो. पण त्यासारख्याच किंबहुना त्याही पेक्षा महत्वाच्या सांस्कृतीक गोष्टींकडे मात्र आपण पाहिजे तेवढे लक्ष देत नाही.