Skip to main content

माहिती

भाषा हरवली म्हणजे अस्तित्व हरवते ?

लेखक भोचक यांनी मंगळवार, 28/07/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न... प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही.

गुगल क्रोम - काय असेल ?

लेखक वाचक यांनी मंगळवार, 28/07/2009 01:48 या दिवशी प्रकाशित केले.
'क्रोम' गुगलनी 'क्रोम' ची घोषणा केली आणि एकच हलचल माजवली. कुणाला वाटले की हा हल्ला मायक्रोसॉफ्ट वर आहे त्यांच्या OS चा वाटा कमी करण्यासाठी तर कुणाला वाटले आता अ‍ॅप्लिकेशन्स नंतरची गुगलची ही नवी खेळी आहे data वर कब्जा करण्याची. गुगलने इतकी कमी माहिती (म्हणजे जवळ जवळ नाहीच) उपलब्ध केलेली आहे 'क्रोम' बद्दल की शंकाकुशंकांना नुसते उधाण आले आहे. प्रत्येक जण आपापल्या परीने तर्क लढवून काहीतरी विचार मांडतो आहे मग आम्ही तरी त्याला अपवाद कसे असणार ? :) गुगलने सांगितले की ही प्रणाली 'नेटबुक' म्हणजे कमी शक्तीच्या पण अत्यंत हलक्या आणि प्रामुख्याने प्रवासात वापरल्या जाणार्‍या वैयक्तिक संगणकांसाठी आहे.

मटाची सांगितिक दिवाळखोरी...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 27/07/2009 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या मटामध्ये स्वर्गीय भास्कर चांदावरकर यांच्याविषयी अग्रलेख आहे. मात्र त्यात त्यांच्या काही गाण्यांचा उल्लेख करतांना मटा संपादकांनी भावनेच्या भरात एक घोडचूक केली आहे.. सुरेश भट साहेबांचं 'उष:काल होता होता..' हे गाणं भास्कर चंदावरकरांचं आहे असा त्यात उल्लेख आहे. वास्तविक हे गाणं चंदावरकरांचं नसून पं हृदयनाथ मंगेशकरांचं आहे. विशेष गती नसलेल्या विषयात अग्रलेख लिहायला गेलं की असं होतं! मटाचा जाहीर निषेध.. आपला, (हृदयनाथप्रेमी) तात्या.

माय, मावशी नि माझी लेक!

लेखक भोचक यांनी शनिवार, 25/07/2009 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
जैसी हरळामाजी रत्नकिळा की रत्नांमजी हिरा निळा तैसी भाषांमाजी चोखळा भाषा मराठी फादर स्टिफन्स या आंग्ल माणसाने लिहिलेले मराठी भाषेचे वर्णन वाचून छाती अभिमानाने फुगली. तोच आमची साडेतीन वर्षाची लेक आली. तिच्या हातात बाहूली होती. तिला तिचे कपडे बदलायचे होते. तिने 'ऑर्डर' सोडली, बाबा, मला जरा बाहूलीचे कपडे 'निकलून' द्या ना ! क्षण दोन क्षण काय बोलली ते कळलंच नाही. मग मेंदूपर्यंत झण्णकन गेल्यासारखं काही तरी झालं. 'कपडे निकालके दे ना' या हिंदी वाक्यातल्या 'निकलके'चा लचका तोडून तिने मराठी वाक्याला जोडून माझ्यासमोर आदळला होता.

पुण्यात 'स्वाइन फ्लू' ची लागण -अधिक माहिती हवी

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 24/07/2009 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.loksatta.com/daily/20090724/pnv02.htm http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4814400.cms पुण्यात 'स्वाइन फ्लू' ची लागण झालेली आहे. निरागस बालके आजारी पडत आहेत. टि.व्ही. त या रोगावर काही उपचार उपलब्ध नाही असे पाहीले. खरे काय, खोटे काय? त्याची त्रिव्रता किती? अशा परिस्थितीत काय काळजी घ्यावी? जाणकार प्रबोघन करतील काय?

ईंधन देई नळावर राखावे आपले अवधान

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 23/07/2009 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्केमर : या धाग्यावर, आपण ओळखीचे असा नसा, आपण अवांतर प्रतिसाद देवू शकतात. माझी काहीच हरकत नाही. मला ईंधन देई नळावर आलेले अनूभव देत आहे. त्यात कसे काय अवधान राखले पाहिजे ते कळेल व त्या द्वारे आपण आपले द्रव्य (ईंधन व मुल्य) कसे वाचेल हे समजेल. मी एकदा ईंधन देई नळावर दोन चाकी वाहनात ईंधन भरावयास गेलो होतो. पाऊस चालू होता म्हणून काही वाहनांची रांग पण नव्हती. ईंधन देई नळावर वरती छत असल्याने पाऊस लागत नव्हता. माझ्या आधीच्या गड्याने ईंधन विकत घेतले. (ए भाऊ, ३० चे पेट्रोल टाक रे). त्यानंतर माझा क्रमांक होता, म्हणून मी ईंधन टाकीचे झाकण उघडे ठेवून गाडी नळापुढे उभी केली.

दोन दिवसांचा चांगला ट्रेक - वा़की -शेवत्या घाट - केळद - मढेघाट

लेखक दत्ता काळे यांनी बुधवार, 22/07/2009 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
दोस्तहो, हर्षद आनंदी ह्यांनी कलादालनमध्ये टाकलेले मढेघाटातले अप्रतिम फोटो बघून आणि त्या अनुषंगाने त्यांनी लिहिलेली माहिती आणि त्याला मिळालेले प्रतिसादातील प्रश्न वाचून मला मढेघाटाविषयी ल्याहावेसे वाटले, ते असे, एक म्हणजे शेवत्या घाट आणि मढे घाट हे दोन्हीही घाट वेगळे आहेत. केळदमधून को़कणात उतरायला तीन घाटवाटा आहेत. १. उपांड्याची नाळ, २. शेवत्या घाट आणि तिसरी ३. मढेघाट, पैकी मढेघाटाची वाट इतर दोन्ही घाटवाटांपेक्षा जास्त बरी आहे. उर्वरीत दोन वाटा त्यामानाने जरा अवघड आहेत. पण दोन्हीही घाटातला एक ऊत्तम ट्रेक होऊ शकतो.

सुर्यग्रहण २००९ - ताजी छायाचित्रे

लेखक पाषाणभेद यांनी बुधवार, 22/07/2009 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
खग्रास (पुर्ण) सुर्यग्रहण फक्त ३.४० मिनीट चालले. यानंतर सुमार १५० वर्षांनंतरच खग्रास (पुर्ण) सुर्यग्रहण भारतात होणार आहे. (चु.भू.दे.घे.) डिस्के. खालील छाया. बघतांना गॉगल वैग्रे लावावा. डोळ्यांना ईजा झाल्यास धागालेखक जबाबदार नाही. :B छाया. १ सुर्यग्रहण सुरु होतांना छाया. २ छाया.

भटकायला जाताय?

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 21/07/2009 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
चिंब पावसात शहराचा परिसर सोडून दूर कुठे तरी निसर्गाच्या सानिध्यात जावं. निसर्गाचे वैभव बघावं. दाट धुकं, निसरडी पायवाट, हिरवंगार रान आणि खळाळता प्रवाह हे सारं सारं बघण्याची... ह्याला स्पर्श करण्याची हौस सर्वांनाच असते. अश्या वेळ कुठे जावं हे आसपासच्या मित्रांना विचारलं जातं. मित्र भटकणारे असले तर उत्तमच. नाहीतर कधी तरी अपुरी माहिती आपल्याला मिळते. अश्या वेळी अशी भटकंती ठरवतांना आंतरजालावरील काही सुविधा आपल्याला फार उपयोगी पडू शकतात. त्यापैकी खाली काही देत आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे मार्ग आणि नकाशा. यासाठी दोन सुविधा खुप उत्तम आहेत.