Skip to main content

माहिती

आंतरराष्ट्रीय बीयर दिवस

लेखक सुनील यांनी बुधवार, 05/08/2009 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज आंतरराष्ट्रीय बीयर दिवस आहे, हे मिपाकरांच्या ध्यानात आलेले दिसत नाही! असो, सध्या कार्यबाहुल्यामुळे वेळ नाही, परंतु सविस्तर लेखासाठी जागा राखून ठेवत आहे!!

मेघना माझी बहीण..

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 04/08/2009 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बर्‍याच दिवसांनी मेघना भेटली. खूप बरं वाटलं. मेघना एरंडे. माझी एक मैत्रिण, माझी एक बहीण! नात्यातलीच. मी मेघनाला तिच्या अगदी लहानपणापासून पाहतो आहे, ओळखतो आहे. अतिशय गुणी मुलगी. अभिनयाचा गुण अगदी उत्तम. उपजतच! मेघनाला सत्यदेव दुबे आणि विद्या पटवर्धन यांच्याकडून अभिनयाचं बाळकडू मिळालं, त्यांच्याकडे शिकायला मिळालं. नाटकांसोबतच एकीकडे शाळा, महाविद्यालयीन शिक्षणही सुरू होतं. लहानपणापासून अनेक नाटकांतून तिनं कामं केली.

लट उलझी सुलझा जा बालमा ...

लेखक बामनाचं पोर यांनी मंगळवार, 04/08/2009 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
तात्यांनी दर्शनी पानावर यु-ट्युब वरच्या त्याच्यांच सदस्यत्वात अपलोड केलेल्या तेलगु गाण्याची माहिती दिली. सहज उत्सुकता म्हणुन तात्यांनी अजुन काय यु-ट्युबवर ठेवले आहे पाहीले तर " बिहाग " रागातली " लट उलझी .. " ही तात्यांनी गायलेली अफाट लोकप्रिय बंदिश सापडली... क्या बात है..!! मग काय आजच्या दिवसाचे तरी खाद्य मिळाले मेंदुला.. बिहाग हा एक शृंगारीक राग.. तो फार दिवसांनी घरी परततोय.. "ती आतुरतेने वाट पाहात असेल" लवकर पोहचावे म्हणून तो आडमार्गाने जाणारी पायवाट पकडतो.. झाडी-झुडपातून जाणारी वाट.. मधे एक छोटासा ओढा लागतो.. अन तो थबकतोच . कारण पलीकडे ती उभी आहे..

फिलिपाईन्सच्या दिवंगत माजी राष्ट्राध्यक्षा श्रीमती कोरी अक्वीनो यांची हृद्य आठवण

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 03/08/2009 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
फिलिपाईन्सच्या दिवंगत माजी राष्ट्राध्यक्षा श्रीमती कोराझॉन ("कोरी") अक्वीनो यांच्या कांहीं हृद्य आठवणी
दोन दिवसापूर्वी, १ ऑगस्ट रोजी, फिलिपाईन्सच्या माजी राष्ट्राध्यक्षा श्रीमती कोराझॉन ("कोरी") अक्वीनो काळाच्या पडद्याआड गेल्या. २६ फेब्रुवारी १९८६ रोजी "लोकक्रांती"द्वारा (People Power) हुकुमशहा मार्कोस यांना चारी मुंड्या चित करून त्या राष्ट्राध्यक्षपदी निवडून आल्याचे जाहीर करण्यात आले. त्या आधी मार्कोस यांनी अनेक कॢप्त्या लढवून निवडणूक "चोरण्या"चा प्रयत्न केला, पण तो लोकांनी हाणून पाडला.

सुधारणा कशा कराव्या?

लेखक अजय भागवत यांनी रविवार, 02/08/2009 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
आधी ज्यात सुधारणा करायची आहे त्या परिस्तितीतील परस्पर व अपरस्परसंबंध तपासावे लागतात. जसे, जगामध्ये कोट्यवधी माणसं व घटक आहेत आणि ह्यामुळे ह्या दोघांतील परस्पर संबंधसुद्धा अनंत असतील. ढोबळतेने ह्या संबंधांचे दोन विभाग करता येतील- परस्परसंबंधीत व असंबंधीत. परस्परसंबंधीत घट्कांमध्ये एखादा उद्देश असु शकतो व त्याचा तर्क लावता येऊ शकतो- उदा- १. कारण आणि परिणाम: आगीचे कारण सिगारेटचे थोटूक होते २. विरोध: आग आणि पाणी ३. साधर्म्य: लाकडी आणि लोखंडी फडताळ ४. घनिष्टता: टेबल आणि खूर्ची चटकन आठवण्यासाठी ह्याचा संबंध लावून बघा: (क्रम मुद्दाम बदलला आहे) १. भावंडं २. पति आणि पत्नी ३. मित्र ४.

चहाची पाने आणि वाफप्रक्रीया

लेखक अजय भागवत यांनी शनिवार, 01/08/2009 00:00 या दिवशी प्रकाशित केले.
चहाच्या पानापासुन चहा पावडर करेपर्यंत ज्या अनेक क्रिया-रीतींतुन चहाचे पान जाते त्यावर एक ग्रंथ लिहीता येईल. ह्या रीतींमुळेच चहाचे अगणित प्रकार, चवी, वास, रंग, तयार झाले. ह्या सर्व उत्पादन पद्धती अर्थातच एकदम विकसित झाल्या नाहीत व अनेक डोकेबाज माणसांनी त्यात अनेक आवश्यक बदल घडवून आणले आहेत. अशीच एक छोटीशी गोष्ट. पुर्वी तोडून वाळवलेल्या चहाच्या पानांवर वाफेचा फवारा मारला जाई. वाफेतील उष्णते व आर्द्रतेमुळे, सुरुवातीची अतिशय कडक झालेली चहांची पाने मऊ होऊन त्यात ऑक्सिडेशनची प्रक्रिया सुरु होई. ह्यानंतर पुन्हा ऑक्सिडेशनची प्रक्रिया ठराविक काळानंतर थांबवण्यासाठी ती पाने वाळवली जाई.

जिद्द - मराठी माणसांची

लेखक प्रसन्न केसकर यांनी शुक्रवार, 31/07/2009 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
* मराठी माणुस सहसा स्थितिप्रिय असतो, त्याला धोके घ्यायला आवडत नाही. * छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येक मराठी माणसाचे श्रद्धास्थान, स्फूर्तीस्थान असते पण प्रत्येक मराठी मानुस शिवाजी जन्माला यावा पण तो दुसर्‍याच्या घरात असा विचार करतो. * मराठी माणसाकडे धन नसल्यामुळे त्याच्या कतॄत्वाची परिसीमा म्हणजे सरकारी नोकरीत उच्चपद मिळवणे किंवा काबाडकष्ट करुन नावापुढे शेट, अण्णा, सिंग, भैय्या इत्यादी प्रत्यय लावणार्‍यांचे व्यवसाय उर्जितावस्थेत आणुन स्वतःची कमाई शक्य तेव्हढी वाढवणे. * एकुणच स्वतःचा व्यवसाय करणे हे मराठी माणसाचे काम नोहे. असे अनेक समज मराठी लोकांबाबत मराठी लोकांमधे तसेच इतरांमधे

भाषा हरवली म्हणजे अस्तित्व हरवते ?

लेखक भोचक यांनी मंगळवार, 28/07/2009 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर भारतीयांच्या आक्रमणापुढे माघार घेत चालेला मराठी माणूस आणि त्याची भाषा आणि संस्कृती हा विषय गेल्या अनेक दिवसांपासून अनेकांच्या चिंतेचा, चिंतनाचा बनला आहे. अनेकांचे ते राजकीय हत्यार बनले आहे आणि अनेकांची दुखरी नस. शिवाय व्यक्तिगतरित्या प्रत्येकाचा या विषयाकडे पाहण्याचा आपापला चष्माही आहे. भाषा हरवली म्हणजे अस्तित्वच हरवते, असाही मुद्दा उच्चरवात मांडला जातोय. याच अनुषंगाने इथे इंदूरमध्ये रहात असल्याने मला काही आढळलं हे मांडण्याचा हा प्रयत्न... प्रामुख्याने होळकर काळापासून मराठी वर्ग इथे आहे हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यानंतरही महाराष्ट्रातून या भागात होणारे स्थलांतर थांबलेले नाही.