लेखनप्रकार
आधी ज्यात सुधारणा करायची आहे त्या परिस्तितीतील परस्पर व अपरस्परसंबंध तपासावे लागतात. जसे, जगामध्ये कोट्यवधी माणसं व घटक आहेत आणि ह्यामुळे ह्या दोघांतील परस्पर संबंधसुद्धा अनंत असतील. ढोबळतेने ह्या संबंधांचे दोन विभाग करता येतील- परस्परसंबंधीत व असंबंधीत.
परस्परसंबंधीत घट्कांमध्ये एखादा उद्देश असु शकतो व त्याचा तर्क लावता येऊ शकतो- उदा-
१. कारण आणि परिणाम: आगीचे कारण सिगारेटचे थोटूक होते
२. विरोध: आग आणि पाणी
३. साधर्म्य: लाकडी आणि लोखंडी फडताळ
४. घनिष्टता: टेबल आणि खूर्ची
चटकन आठवण्यासाठी ह्याचा संबंध लावून बघा: (क्रम मुद्दाम बदलला आहे)
१. भावंडं
२. पति आणि पत्नी
३. मित्र
४. पालक आणि मुलं
हे परस्परसंबंध लक्षात ठेवले तर ज्याची मिमांसा करायची आहे अशा घटकांची चिकित्सा करता येते. काही प्रश्न स्वतःला विचारता येतात:
१. ह्या घटकांवर काय परिणाम करत आहे?
२. विरोधी बाबी/मुद्दे काय आहेत?
३. कशात साधर्म्य दिसत आहे?
४. काही गोष्टी नेहमीच एकदम प्रकट होत आहेत का?
अशा प्रकारचे विचारचक्र आपल्याला मदत करु शकते.
ज्यात बदल करायचे आहेत ती आपल्याला दिसणारी वस्तुस्थिती ही एकतर ठळकपणे जाणवते अथवा खूप वरवरची/कल्पित दिसत असते.
ठळकपणे जाणवणारी घटना आपल्याला आपल्या चेतनांद्रीयांनी अनुभवता येते- वास, चव, ऐकणे, स्पर्श आणि पाहून. कल्पित किंवा (असेही म्हणता येईल- मनोमन पाहीलेल्या) घटना आणि ठळकपणे जाणवणाऱ्या घटना ह्यात काय परस्परसंबंध लावता येतील हे समजणे पुढची पायरी असते. अर्थातच ह्या कल्पित असणाऱ्या घटकांचा ठळक दिसणार्या घटकांशी संबंध लावणे फार अवघड असते.
परिणामत: जेव्हा आपल्याला सुधारणा करायची असते तेव्हा नुसत्या ठळकपणे जाणवणाऱ्या घटकांच्याही पुढे गेल्याशिवाय ती साधता येत नाही- ती सुधारणा वरवरची होऊ शकते. त्यासाठी त्या न दिसणाऱ्या, न जाणवणाऱ्या कल्पित अशा घटकांचा सतत पाठपुरावा करणे आवश्यक असते. बघा प्रयत्न करुन! (परवा मी लिहिलेल्या "चहा व वाफप्रक्रीया" ह्यातील त्या डोकेबाज माणसाने सुधारणा घडवण्यासाठी अशाच मार्गाचा वापर केला.)
[आधारीत]
मिसळपाव
गृहपाठ
In reply to गृहपाठ by धनंजय
चाचणीने तर