Skip to main content

माहिती

"एक्स्पोर्ट सरप्लस"

प्रकाशित मुखपृष्ठ
"एक्स्पोर्ट सरप्लस" दहा-पंधरा वर्षांपूर्वी भारतात एकादा माल "एक्स्पोर्ट सरप्लस आहे" असे सांगणे म्हणजे अप्रत्य़क्षपणे त्या मालाच्या प्रतीबद्दल (qualityबद्दल) ग्वाही देण्याचाच एक भाग होता.


लेखनविषय:
लेखनप्रकार

एक वेगळे जग- सीमलेस ट्युब

प्रकाशित मुखपृष्ठ
बॉल-बेअरींग, बंदूकीच्या आणि तोफांच्या नळ्या, प्रत्येक दुचाकी/चारचाकीचे सांगाडे, बॉम्बशेल, अनेक आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भव्य इमारती आणि जमीनीतून कच्चे तेल काढण्यासाठी तयार केलेल्या विंधणविहीरींच्या केसिंगसाठी ज्या सीमलेस ट्यूब वापरल्या जातात त्या कशा तयार करतात ह्याची माहिती अगदी थोडक्यात येथे द्यावीशी वाटते. ६० च्या दशकात जमशेदपुरला आपल्या देशातील पहिला प्रकल्प ईटलीच्या तंत्रज्ञानांच्या मदतीने उभा राहिला.


लेखनविषय:
लेखनप्रकार

मिपाचे वैभव...

प्रकाशित मुखपृष्ठ
राम राम मिपाकरहो, हे मिपाचे वैभव! हे केवळ अन् केवळ तुम्हा सर्व मिपाकरांमुळेच शक्य आहे. मी सर्वांचा ऋणी आहे.. आपला, (कृतार्थ आणि कृतज्ञ) तात्या अभ्यंकर.


किराणा घराण्याचा संक्षिप्त इतिहास...

प्रकाशित मुखपृष्ठ
सप्रेम नमस्कार मंडळी.. आज आपण किराणा घराण्याचा थोडक्यात आढावा घेऊयात.. किराणा घराण्याचा इतिहास हा थोडासा विचित्र आणि थोडासा वादातीत आहे तरीही ते घराणं सर्वात जास्त लोकप्रिय आहे. असं सर्वसाधारण समज आहे की किराणा घराणं उस्ताद अब्दुल करीम खाँ साहेबांपासून सुरु होतं.पण ते काही खरं नव्हे. तर, अमिर खुस्त्रोचा शिष्य 'गोपाल नायक' किराणा घराण्याचा खरा आद्य पिता आहे. त्याच्यापासुन किराणा घराणं सुरु झालं. पुर्वी तो दुताई नावाच्या यमुनातीरी असलेल्या गावी रहात असे. पण त्याने यमुनेच्या पुरामुळे आपला मुक्काम मुझफ्फरनगर जिल्ह्यातील 'किराणा' ह्या गावी हलवला.


लेखनविषय:
लेखनप्रकार

... देवाचं घर !

प्रकाशित मुखपृष्ठ
माझा व देवाचा संबध तसा लहानपणापासून. माझी आई सांगते की मी लहान असताना देवघरातील गणपतीची छोटीशी सोन्याची मूर्तीच मला खेळायला हवी असे. उठता बसता माझ्याजवळ तीच मूर्ती. कोल्हापुरातील नागराज गल्लीमधला पीरबाबा असो की गावच्या दर्ग्याचा उरुस असो. मी तेथे हजर असे. कोल्हापुरातलं महालक्ष्मीचं मंदिर म्हणजे तर कोल्हापुरचं हृदय. माझं जवळजवळ सर्व लहानपण मंदिराच्या आजुबाजूलाच गेलं...बालवाडीपण मंदिराजवळच, पहिली ते सहावीपर्यंतची शाळापण जवळच. मंडळाचा गणपती असो किंवा पंचगंगेचा दीपोत्सव त्यांचा त्यांचा आनंद वेगळा होता. पण सगळंच त्या मंदिरापाशी एकवटलेलं होतं.


व्यर्थ न हो त्यांचे बलिदान....

प्रकाशित मुखपृष्ठ
उद्या २१ ऑक्टोबर - पोलिस स्मृति दिन! तसे त्यात नवे काहीच नाही. नेमीची येतो मग पावसाळाच्या धर्तीवर दरवर्षीच पोलिस स्मृति दिन येतो अन जातो. उद्या सकाळी परत देशभरातील सर्व जिल्हा पोलिस मुख्यालयांच्या (कवायत मैदानांमधे) परेड ग्राऊंडवर निवडक पोलिस अधिकारी कर्मचारी शिस्तबद्ध रांगात उभे रहातील अन संचलन करतील. बिगुलांमधुन निघालेले लास्ट पोस्टचे सुर वातावरण कुंद, शोकार्त करत तरळतील अन काही जणांचे/जणींचे डोळे पाणावतील, प्रियजनांच्या आठवणीनं हुंदके फुटतील. कुणीतरी खड्या पहाडी आवाजात या वर्षी कामगिरीवर असताना धारातिर्थी पडलेल्या वीरांची नावे वाचेल अन शोकशस्त्रचा आदेश खड्या आवाजात घुमेल.


लेखनविषय:

जिथे सागरा धरणी मिळते........

प्रकाशित मुखपृष्ठ
'व्हाय डोन्ट यू गो टू विजिट द सबमरिन?' डॉ. नवीनने विचारले. 'सबमरिन? मालदिव में सबमरिन है?' डॉ. अनिल. 'तिथे आहे.... ' डॉ. नविनने खिडकीतून बाहेर दाखवले.. समुद्रात दूर अंतरावर एक पांढरी बोट दिसत होती. इन्दिरा गांधी मेमोरियल हॉस्पिटलच्या कॅन्टीनमधून समुद्र फार देखणा दिसतो. मी मुंडके खाली वळवले आणि मुकाटपणे चहा पिऊ लागलो. मालदीवमध्ये चार महिने राहूनही इथे २०० फुटांवर पाण्यात एक सबमरिन आहे हे मला पहिल्यांदाच समजत होते! शनिवारचा दिवस म्हणजे मालदीवमधील सुट्टीचा दिवस. माझा मित्र डॉ. अनिल मगदूम भारतात परत जाणार असल्यामुळे मला भेटायला मालेमध्ये आला होता. तिथूनच तो कोचीला जाणार होता.


सहस्रचंद्रदर्शन

प्रकाशित मुखपृष्ठ
खरडवहीतल्या देवाणघेवाणीतून हा विषय निघाला. पूर्वी माझ्या ब्लॉगवर याबद्दल माहिती दिली होती. त्यामुळे नवीन काही न टाकता तीच माहिती इथे सर्वांच्या सोयीसाठी देत आहे - हिंदू संस्कृतीत जन्मदिवस साजरा करण्याची प्रथा फार जुनी आहे. सांस्कृतिक देवाणघेवाणीमुळे जन्मदिवस साजरा करण्याची पाश्चात्य पद्धतही भारतात आता चांगलीच रूढ झाली आहे. तरी, निदान काही जन्मदिवस आपल्या संस्कृतीप्रमाणे साजरे करावेत अशी विचारधाराही अस्तित्वात आहे व त्यातून एकसष्ठी, पंचाहत्तरी, सहस्रचंद्रदर्शन, इत्यादि सोहळे लोकप्रिय झालेत. संस्कृतीचं जतन करणे ही बाब निश्चितच स्तुत्य आहे.


लेखनविषय:
लेखनप्रकार

माहितीचा अधिकार चार वर्षे वयाचा होतोय

प्रकाशित मुखपृष्ठ
येत्या १२ ऑक्टोबरला माहितीच्या अधिकाराबाबतच्या कायद्याला चार वर्षे पुर्ण होत आहेत. भारतातील जनसामान्यांना हवी असलेली आवश्यक ती माहीती सहजपणे मिळण्याच्या अधिकार असावा व त्यायोगे प्रशासकीय यंत्रणेत पारदर्शकता यावी या मागणीसाठी अण्णा हजारे व अन्य काही समाजसेवक, नेते, विचारवंत, पत्रकार यांनी सातत्याने पाठपुरावा केल्याचे फलित म्हणून हा क्रांतिकारक कायदा २००५ साली अस्तित्वात आला.


लेखनविषय:
लेखनप्रकार