Skip to main content

लेख

शिलाहारांचा कोप्पेश्वर.......भाग -१

Published on शुक्रवार, 19/04/2013
खिद्रापूरचा कोप्पेश्वर: Simple, Free Image and File Hosting at MediaFire या दरवाजातून आत पाऊल टाका आणि हे बघा..........कोप्पेश्वरचे मंदीर. Simple, Free Image and File Hosting at MediaFire शिलाहार राजे दोन गोष्टींसाठी बरेच प्रसिद्ध होते एक म्हणजे त्यांनी त्या काळात

ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग तीन

लेखक लाल टोपी
Published on गुरुवार, 18/04/2013
ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग एक ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग दोन  स्फोटा नंतर अतिशय गोंधळाची परीस्थिती होती. अग्निशमनचे सर्व बंब, जवळपास सर्व यंत्रसामुग्री नष्ट झाली होती. त्याचवेळेस या स्फोटामुळे गोदीत, समुद्रात जहाजांवर, आजूबाजूच्या घरांना, झोपडपट्टीला सर्वत्र आगीने थैमान चालू होते.

ट्यारपी म्हणजे काय गुरूजी?

Published on सोमवार, 15/04/2013
शिष्य़ः प्रणाम गुरुजी गुरूः दीर्घायुषी हो वत्सा. तुझ्या मनात काही प्रश्न आहेत का? शिष्य़ः हो, पण ते आजच्या काळाविषयीचे आहेत. गुरूः हरकत नाही, पूर्वीच्या आचार्यांनी सांगितलेली बहुतेक मार्गदर्शक तत्वे आजसुध्दा उपयोगी पडतात. शिष्य़ः गुरूजी, मला असं विचारायचंय् की हे ट्यारपी म्हणजे काय असतं? आणि ते वाढवण्यासाठी काय करतात? गुरूः हा थोडा गहन प्रश्न आहे, मला थोडे एकाग्रचित्त होऊन विचार करू दे. ओम् ..... मंगलम् भगवान विष्णू ..... शिष्य़ः गुरूजी. गुरूः आठवलं, ऐक.

ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग दोन

लेखक लाल टोपी
Published on रवीवार, 14/04/2013
फोर्ट स्टिकिन १२ एप्रिलच्या पहाटेच्या सुमारास मुंबईला पोहोचली. मुंबई बंदराच्या जवळच या जहाजाने नांगर टाकला. सकाळी दहाच्या सुमारास या जहाजाला व्हिक्टोरीया बंदरापर्यंत घेऊन जाणारी बोट आली. यावेळी मुंबई बंदरावरील कोणालाही या बोटीत असणा-या धोकादायक अणि संहारक सामुग्री बाबत काहीही कल्पना नव्हती कारण विस्फोटक सामुग्री असणा-या जहाजांना लाल रंगाचा झेंडा बोटीवर फडकवणे आवश्यक असते त्यामुळे आजुबाजूच्या सर्वांनाच जहाजात धोकादायक माल आहे हे समजते मात्र युध्द काळात असा लाल बावटा फडकवत प्रवास करणे म्हणजे शत्रूला हल्ल्यासाठी आमंत्रण देण्यासारखे ठरले असते म्हणुन त्याकाळात ही अट शिथिल करण्यात आली होती.

अनसंग हीरो

Published on शनीवार, 13/04/2013
ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीम ने मागची २ दशक जागतिक क्रिकेट वर वर्चस्व गाजवल. प्रचंड गुणवत्ता, Never say die attitude, आणि मिळालेले कुशल कर्णधार यामुळे ऑस्ट्रेलिया ने इतर टीम्स ना तोंड वर काढण्याची संधी कधी दिलीच नाही. त्यामुळे मागच्या काही वर्षात ऑस्ट्रेलिया चे अनेक दिग्गज खेळाडू निवृत्त झाले आणि त्यांची जागा घेणारे नवीन खेळाडू तितके चांगले नसल्याने त्यांच्या साम्राज्यावरचा सूर्य मावळायाला लागला. परवा त्यांचा वेगवान गोलंदाज शॉन टेट म्हणाला की गिलेस्पी, हेडन, वॉर्न ह्यानी इतक्या लवकर निवृत्ती घ्यायला नको होती. ऑस्ट्रेलिया संघाच्या गळतीची अनेक विश्लेषण वाचली.

ग्रेट मुंबई पोर्ट एक्स्प्लोजन भाग एक

लेखक लाल टोपी
Published on शुक्रवार, 12/04/2013
१४ एप्रिल १९४४ या तारखेचे महत्व मुंबईच्या इतिहासात अनन्य साधारण आहे यात शंकाच नाही. जे महत्व पुण्याच्या इतिहासात १२ जुलै, १९६२ ला आहे ज्या दिवशी पानशेत धरण फुटल्याने जुन्या पुण्याचा चेहरा बदलला पण त्यावेळी शहरात असणा-या लोकांच्या मनात खोलवर आघात करून गेला असाच दिवस मुंबई ने अनुभवला १४ एप्रिल, १९४४ ला. हा दिवस अग्निशमन सुरक्षा दिन म्हणूनही पाळला जातो. काय होती ही दुर्घटना? पाहुया.. कॅप्टन ब्रेन्ली ओब्रेस्ट हा ब्रिटिश आर्मीचा आणि भारतीय सैन्याच्या दारुगोळा विभागाशी संलग्न असणारा अधिकारी दुपारच्या जेवणासाठी नुकताच आपल्या कुलाब्यातील घरी पोहोचला होता.

अंड्याचे फंडे ५ - शर्यत

लेखक साळसकर
Published on सोमवार, 08/04/2013
मुंबई लोकल ट्रेनने रोज प्रवास करणार्‍यांचा कधी कधी अंड्याला फार हेवा वाटतो तो याच करता की कान डोळे उघडे ठेवल्यास दुनियाभरचे अनुभव याच प्रवासात मिळतात. केवळ याच कारणा करीता अंड्या देखील बसचा प्रवास टाळून आधी ट्रेनला प्राधान्य देतो. कामानिमित्त वाशीला जाणे झाले होते. एकंदरीत ते शहर अंड्यासाठी नवीनच. तरीही अज्ञात प्रदेशात आल्यासारखे वाटावे असे काही नव्हते. वाशीहून सुटणारी ट्रेन पकडून कुर्ल्यापर्यंत यायचे अन तिथून ट्रेन बदलून दादरला, एवढे माहीत असणे पुरेसे असते मुंबईकरांना. बाकी सगळीकडे तीच तीच ट्रेन अन तेच तेच प्लॅटफॉर्म. अश्याच एका प्लॅटफॉर्मवर अंड्या पोहोचला तेव्हा ट्रेन नुकतीच लागत होती.

पुन्हा एक पी आय ए अपहरण

लेखक लाल टोपी
Published on सोमवार, 08/04/2013
पी आय ए- पी के ३२६ अपहरणाचे प्रकरण आपण काही दिवसांपुर्वी वाचले असेलच आज पुन्हा एकदा पाकिस्तानच्याच आणखी एका विमान अपहरणाची कथा पाहू. पुन्हा एकदा पाकिस्तानच्याच घटनेची चर्चा करण्याचे कारण ही घटना वेगळ्या परीस्थितीत घडते आहे आणि तीला अतिशय वेगळ्या प्रकाराने हाताळले गेले आहे. २५ मे, १९९८ रविवारची संध्याकाळ, सुमारे ५.३० वाजता गदर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पी.के. ५४४ या विमानाने कराचीच्या दिशेने उड्डाण केले. पुढील १० मिनिटांत या विमानीतील तीन अपहरणकर्त्यांनी विमानावर ताबा मिळवला आणि विमान नवी दिल्लीकडे घेऊन जाण्यास फर्मावले.

अ‍ॅन्ड्रॉईडः अडखळती पहिली पाऊले

Published on शुक्रवार, 05/04/2013
गूगल ने विकत घेतल्यानंतरही अ‍ॅन्ड्रॉईडचे मुख्य ध्येय तेच होते - एक असा प्लॅटफॉर्म जो कोणत्याही software इंजिनीअर ला मुक्तपणे त्याला हवा तसा वापरता येईल. त्यामागे अजून एक उद्देश हाही होता की अशी खुली बाजारपेठ उपलब्ध करून देऊन सेलफोन कंपन्यांची हुकुमशाही मोडीत काढणे. तो पर्यंत अमेरिकेत सेलफोन सेवादाते त्यांना हवे तसे फोन हँड्सेट निर्मात्यांकडून बनवून घेत होते. ह्याला कारण म्हणजे अमेरिकीतील कंत्राट पद्धत. तुम्ही तुमच्या सेवादात्याबरोबर २ वर्षे बांधिलकीच्या कंत्राटावर सही करायची आणि त्या बदल्यात तो सेवादाता तुम्हाला फुकट अथवा नगण्य किमतीत हँड्सेट देणार.

ओज-शंकराची कहाणी

Published on बुधवार, 03/04/2013
श्री. शंकर दिनकर उपाख्य भैयाजी काणे (जन्मः ६ डिसेंबर १९२४, वरवडे, रत्नागिरी – मृत्यूः २६ ऑक्टोंबर १९९९, कोल्हापूर) हे न्यू तुसॉम, जिल्हा उख्रूल, मणीपूर राज्य, भारत, ह्या त्यांच्या कर्मभूमीत, ओज-शंकर म्हणून ओळखले जातात. तिथे, पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठानतर्फे स्थापन करण्यात आलेल्या ओज-शंकर विद्यालयाच्या स्वरूपात, आज त्यांचे कार्य दिमाखाने उभे आहे. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या त्यांच्या जीवनव्यापी ध्यासाचे, आज एका मोठ्या चळवळीत रूपांतरण झालेले आहे. त्या त्यांच्या भरतभूस ललामभूत ठरलेल्या कार्याची ही कहाणी आहे. भैयाजींचे प्राथमिक शिक्षण पुण्यात आणि माध्यमिक शिक्षण सातार्‍यात झाले.