Skip to main content

लेख

वांग मराठवाडी... आता परीक्षा सरकारची!

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 22/07/2013 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण वर्षभरापूर्वी वांग मराठवाडी धरणग्रस्तांच्या संघर्षाबद्दल लिहिले होते. त्या नंतर बरंच काही घडून गेलं आहे. आणि अजूनही काही ना काही घडत आहे. गेल्या वर्षभरात बर्‍याच मित्रमैत्रिणींनी, हितचिंतकांनी नेहमीच या बाबतीत चौकशी केली, 'आता काय परिस्थिती आहे?' अशी विचारणा केली. म्हणून, हा स्टेटस अपडेट... मूळ लेखन, 'आंदोलन शाश्वत विकासासाठी' या मासिकाच्या जुलै'२०१३ च्या अंकात प्रसिद्ध झाले असून, ते सुनिती सु. र. यांनी लिहिले आहे. त्यांच्या पूर्वपरवानगीने व त्यात काही भर घालून, ते येथे देत आहे.

संवेदना

लेखक सार्थबोध यांनी सोमवार, 22/07/2013 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
रोजच्याप्रमाणे कामावरून घरी जात होतो, दुकानातून काही घेण्याकरिता थांबलो, पुन्हा गाडी चालवत निघणार; तेंव्हा रस्त्यात कडेला एक कुत्रा विव्हळताना दिसला, बहुदा पायावरून गाडी गेली असावी, लोक पहात होते, मला फार वाईट वाटले, त्याला काही बिस्किटे टाकली. गडबड नेहमीची पाचवीला पुजलेली, घरी गेलो. काही केल्या तडफडणारा कुत्रा डोळ्यासमोरून जाईना. आवरून झोपायला गेलो, पुन्हा तेच विचार! काय वेदना होत असतील त्याला?, त्याचे सोबती? ते तरी काय मदत करणार? त्याचे खायचे काय? मला असले फार विचित्र प्रश्न पडू लागले, उत्तरे मिळत नव्हती मी कूस बदलून काही फरक पडत नव्हता.

लोकमान्य टिळक आणि दासबोध

लेखक दासबोध.कॊम यांनी गुरुवार, 18/07/2013 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्यांचे नाम आणि काम माहिती नाही असा मनुष्य भारतात तरी सापडणार नाही. लोकमान्यांनी आपल्या असामान्य बुद्धीमत्तेच्या जोरावर अफ़गाणिस्तान ते ब्रह्मदेश असा विस्तारलेला उभा भारतवर्ष नुसता ढवळून काढला होता! “स्वराज्य” मिळविण्यासाठी त्यांनी इंग्रजांच्या थोबाडावरच फ़ोडलेली घनगंभीर डरकाळी तर समस्त साम्राज्यवाद्यांचा थरकाप उडविणारी ठरली! अशा या लोकमान्यांच्या अंतरंगात डोकावून पाहता आले तर काय भाग्य ठरेल ते!

चूल माझी सखी

लेखक जागु यांनी गुरुवार, 18/07/2013 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
कळायला लागल्यापासूनच माझ्या भातुकलीचा श्रीगणेशा व्हायचा तो चूल मांडूनच. तीन दगड त्रिकोणी मांडले की झाली चूल. भातुकली खेळताना चुलीसाठी शिंपल्या किंवा खुबड्या वापरायचे. त्या आकाराने सारख्या असल्याने भांडी व्यवस्थित बसायची. मग त्यात छोट्या काड्या लाकडे म्हणून टाकायच्या आणि त्यावर खेळण्यातली भांडी ठेवून खोटे-खोटे जेवण शिजवायचे. लहान असल्यापासून मी आमच्या घरी चूल पाहिली आहे. पूर्वी गावी सगळ्यांच्याच घरी चुली असायच्या. आमच्या घरी गॅस होता तरीपण वेळ लागणारे पदार्थ शिजवण्यासाठी तसेच रोजचे अंघोळीचे पाणी तापविण्यासाठी आई-आजी चूल पेटवायच्या. आधी आमची मातीची चूल होती.

काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग २

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 16/07/2013 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग १ काव्ही-कॉफी-काव्हीकाने-कॉफीखाना-कॉफी हाऊस.............भाग २ अ‍ॅबिसिनिया.......

सेव्हन हॅबिट्स सारांश (भाग - २ अंतिम)

लेखक सुधीर यांनी मंगळवार, 16/07/2013 08:55 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १
व्यक्तिगत आयुष्यात प्रगती कडे नेण्यार्‍या सवयी कुठल्या हे आपण पहिल्या भागात पाहिले. या भागात आपण सामाजिक यश काय ते पाहू. व्यक्तिगत यश हे सर्वप्रथम येते त्यानंतरच मग सामाजिक यश! सामाजिक यशाशी निगडित असलेल्या पुढल्या सवयी ह्यात पुस्तकाचा खरा आत्मा आहे. या पुस्तकानंतर काही शब्द जनमानसात प्रचलित झाले. जसे विन-विन, पी-पिसी वर्क, पॅराडाईम शिफ्ट वगैरे. पुढल्या तीन सवयींची ओळख करून देण्याअगोदर काही संकल्पना समजवून घेऊ आणि मग उरलेल्या सवयी पाहू.

सेव्हन हॅबिट्स सारांश (भाग - १)

लेखक सुधीर यांनी सोमवार, 15/07/2013 19:04 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकाच्या दुकानात सेल्फ-हेल्प नावाचं एक दालन असतं, त्याच्या वाट्याला जाण्याचं फारसं काही कारण नव्हतं. केवळ कुतूहल म्हणून मी नुकतीच प्रकाशित झालेली काही पुस्तकं वाचायचा प्रयत्न केला. पण का कुणास ठाऊक ज्ञानामृत का बोधामृताबरोबर झोपेचा डोसही फ्री मिळतो की काय असा प्रश्न पडायचा. म्हणजे नुकतीच पूर्ण झोप झाली आहे, चहा पाण्याचा कार्यक्रमही आटपलाय आणि यातल्या काही पुस्तकांपैकी एखादं हाती घेतली की हमखास अर्ध्या तासात डुलकी लागते. बरं त्यातून फारसं काही हाती गवसतं असही नाही आणि गवसलं तरी प्रत्यक्षात अमलात आणलं जातं का, हाही एक प्रश्न असतो.

केस

लेखक drsunilahirrao यांनी शनिवार, 13/07/2013 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
' केस ' 10 April 2013 तारखेला 11:58 AM वाजता डोक्यावरचे केस हा प्रत्येकाच्या व्यक्तीमत्वाचा महत्वाचा भाग असतो. काही लोक निव्वळ केसांमुळे ओळखले जातात आणि प्रसिद्ध होतात. काही निव्वळ केस नाहीत म्हणून ओळखले जातात. अनेक सेलिब्रिटींचे केस हीच त्यांची ओळख असते. उदा. बच्चन, अनुपम खेर वगैरे. एपीजे अब्दुल कलाम आणि तत्सम महान लोक यांचा आपण इथे अपवाद करुयात. कारण हे लोक त्यांच्या कर्तृत्वाने जेवढे ओळखले जातात, तेवढेच त्यांच्या केसांमुळे ! समजा अनुपम खेर यांच्या डोक्यावर शोले चित्रपटातील बच्चनच्या केसांचे रोपण केल्यास कसे वाटेल ?