Skip to main content

लेख

कहां गये वो लोग?--आजीबाई

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 02/07/2014 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
कहां गये वो लोग?--बाबूकाका आजीबाई, पिंटुला घेउन जरा सिद्धेश्वराच्या देवळात जाउन ये गं आजीबाई, भांडी पडलीयेत सकाळपासुन काल का नाही आलीस गे आजीबाई? येताना थोडी राख घेउन ये उद्या..संपलीये आणि नारळाचा काथ्यापण आण मिळाला तर पारावर जाउन भाजी आणतेस का आजच्यापुरती? तसं तर आजीबाई ही काही आमच्या घराचा सदस्य नव्हती. ती होती वाडेघरहुन आमच्या घरी कामाला येणारी मोलकरीण.पण ना तिच्या वागण्यातुन तसे कधी जाणवायचे ना आमच्या.मी तिला बघितली तेव्हापासुन ती म्हातारीच दिसायची.

कहां गये वो लोग?--बाबूकाका

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 02/07/2014 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी कहां गये वो लोग या नावाची मालिका काही वर्षांपूर्वी टी.व्ही. वर लागायची. अर्थात त्याचा विषय वेगळा होता पण शीर्षक मला आवडले म्हणुन ईथे वापरले आहे. लहानपणी आपल्या अवती भोवती अनेक माणसे वावरत असतात. काही जणांशी आपला थेट संबंध येतो किवा काही जण नुसतेच आपल्या त्या विश्वात एखाद्या गूढ गोष्टीप्रमाणे सामावलेले असतात.मग काळाच्या ओघात हळुहळु आपण मोठे होत जातो आणि आपले विश्व बदलत राहते.शाळा, शाळेतले मित्र, शिक्षक,क्लास व तिकडचे मित्र,खेळायचे सवंगडी नंतर कॉलेज, तिथले मित्रमैत्रिणी,ट्रेनचा प्रवास आणि त्यातले रोजचे भेटणारे लोक असे क्षितीज विस्तारत राहते आणि हे लहानपणचे लोक विस्मृतीत जातात.

दमलेल्या तुमची आमची कहाणी

लेखक वेल्लाभट यांनी रविवार, 29/06/2014 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात राहातो, सध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वष्रे तो परदेशात होता, त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गप्पांचा विषय नोकरी आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की, तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्या वेळी घरी येता येतं, शनिवार-रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो, इत्यादी.

वातव्याधी सामान्य आहार :-

लेखक बाबा पाटील यांनी शनिवार, 28/06/2014 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
वातव्याधी सामान्य आहार १)सकाळी ज्वारीची भाकरी किंवा गव्हाचा फुलका. २),दोडका ,कारले,घोसाळे,पडवळ,लाल माठ,भोपळा,पालक,शिमला मिर्च,कोहळा, काटेमाठ, राजगिरा,भेंडी,तांदुळचा.फ्लावर,कोबी,कोवळे वांगे फक्त ३)मुगाची डाळ,मुग तांदळाची खिचडी, ४)सफरचंद,मोसंबी,शहाळे,डाळिंब,अंजिर,बीट,सॅलड चालेल ५)गाइचे दुध,तुप, ताक दररोज घ्यावे. ६)उपिठ,शिरा भाजणीचे थालीपिठ,भरपुर साजुक तुप टाकुन ७)हुलग्याचे माडगे दररोज घ्यावे. ८)रात्री बाजरीची भाकरी खावी,त्यात १/४ च.स

महाभारताची वेगळी कथा...

लेखक माधुरी विनायक यांनी शुक्रवार, 27/06/2014 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
आज थोडं वेगळं लिहू का... माझं वाचन नियमीत सुरू असतं. मुख्यत्वे मराठी आणि बऱ्यापैकी इंग्रजी. शिवा ट्रायॉलॉजी वाचल्यानंतर पौराणीक साहित्य वाचायला आवडू लागलं. पुराणातल्या माहिती नसलेल्या अनेक गोष्टी जाणून घ्यायची ओढ लागली आणि हाती लागेल तसं बरंच काही वाचत गेले. अशीच एक कथा. फार कमी लोकांना माहिती असावी, म्हणून इथे लिहावी, असं वाटलं. ही गोष्ट आहे कौरव-पांडवांची. पंडुच्या मृत्युनंतर पाच पांडवांना घेऊन कुंती हस्तिनापुरात परतलेली. वनात जन्मलेले, लहानाचे मोठे होणारे पाचही पांडव जरासे दांडगटच. युधिष्ठीर त्यातल्या त्यात शांत, सौम्य. साधारण तसेच नकुल-सहदेव.

गर्भसंस्कार

लेखक बाबा पाटील यांनी सोमवार, 23/06/2014 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
गर्भसंस्कार “ संस्कारो हि गुणान्तराधानम् ॥ ” जन्मजात प्रकृतिनुसार आलेल्या गुणांमध्ये चिकित्सेद्वारे केलेल्या संस्कारामुळे अधिक चांगले गुण निर्माण करता येतात. संस्कार प्रकृतिस्थित गुणांमध्ये बदल घडवून आणतात. संस्कार म्हणजे तो बदल जो गुणांमध्ये अधिक उत्तम गुणांचे वर्धन किंवा परिवर्तन करतो. दैनंदिन आयुष्य अगदी व्यस्त असते.

घेई छन्द मकरंद - होमिओपॅथीचा भाग २ रा

लेखक डॉ. दत्ता फाटक यांनी बुधवार, 18/06/2014 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
. काली फॉस उर्वरीत भाग.आणखी काही औषधे मस्तिष्का संबंधीची याचं संदर्भातील विशेष +++++ ४ ) Aethusea-------- Fool”s Parsley या औषधाविषयी थोडंस डॉ. क्लार्क यांनी “डिक्शनरी ओफ़ प्रेकटीकल मटीरि-यल मेडीका मध्ये म्हटलं आहे, या औषधाचे दुसरे नाव एवढे सार्थ आहे की “”हे औषध मुर्खाचे”च आहे, परमेश्वराने मेंदूत अक्कल भरली तेंव्हा हा पाल्य गैरहजर असावा, कारण काहीं म्हणता कांहीही आकलन करण्याची, समजून धेण्याची पात्रताच या मुर्खाकडे नसते.

बीज अंकुरे अंकुरे (शेतातील बालपण)

लेखक जागु यांनी मंगळवार, 17/06/2014 15:51 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका शेतकरी कुटुंबातील मुलगी. माझे बालपण आमच्या शेताच्या सहवासात बागडण्यात गेले. आई-वडील दोघेही नोकरी सांभाळून शेती करायचे. माझी आई प्रार्थमिक शिक्षिका, वडील मुंबईत प्रीमियर कंपनीमध्ये नोकरीला होते. त्यांनी शेती सांभाळायची म्हणून कायम नाइट शिफ्ट केली. घरात माझा मोठा भाऊ व आजी असे आमचे कुटुंब होते. शेतकरी आणि शेत हे दोन्ही एकरूप झाले म्हणजे मोतीदार धान्याचे पीक शेतात डोलू लागते. आमच्या शेतात तांदळाचे पीक दरवर्षी रुबाबात मिरवत असे. मे महिन्याच्या दाहक उन्हात मातीची ढेपळं खडखडीत वाळून शेतातील जमिनीला भेगा पडल्याने आकाशाकडे पाण्याच्या आशेने 'आ' वासून पावसाच्या प्रतीक्षेत असतात.

घेई च्छन्द मकरंद -- होमिओपॅथीचा !! [भाग-१]

लेखक डॉ. दत्ता फाटक यांनी गुरुवार, 12/06/2014 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
आपलं शरीर हे मुख्यतः पाणी, सेंद्रीय पदार्थ तथा बारा निरींद्रीय क्षार युक्त असंख्य पिंडपेशींनी तयार झालेले आहे, निरींद्रीय क्षारांमुळे या पेशी तयार होत असतात, अन रक्ताभिसरणाने पोसल्या जातात, याशिवाय साखर, चरबी, पांडूर- Albumin, हे कर्बयुक्त सेंद्रीय पदार्थ असून चुना-Calcium, लोह-Iron, potashium, Natrum, Scical, हे ख-निज क्षार निरींद्रीय – कार्बन विरहित असतात.निरींद्रीय क्षारांचे प्रमाण अल्प असलं तरी अचेतन सेंद्रीय पदार्थापासून लक्षावधी विशिष्ठ पिंडपेशीसमुह निर्माण करत असतात. याचं कारणामुळे या बारा क्षारांना अनन्य साधारण महत्व आहे, त्याचाच अभ्यास करणें आहे.