परवा मला माझा एक जुना मित्र भेटला. तो परदेशात राहातो, सध्या इथे भारतात आला होता. गेली अनेक वष्रे तो परदेशात होता, त्यामुळे अर्थातच तिथल्या अनेक गोष्टी त्याला सांगायच्या होत्या आणि मला त्या ऐकायच्या होत्या. असाच गप्पांचा विषय नोकरी आणि तिथली माणसं, तिथलं वातावरण, संस्कृती, या बाबींकडे वळला. साधारणपणे आपलं हेच मत असतं की, तिथे म्हणजे परदेशात आरामाचं आयुष्य असतं, वेळच्या वेळी घरी येता येतं, शनिवार-रविवार फिरायला जाता येतं, भरपूर वेळ मिळतो, इत्यादी. परंतु त्याच्याकडून जे ऐकायला मिळालं ते विचलित करणारं होतं.
नोकरी कशी आहे, असं विचारलं असता नाखूश दिसलेला तो म्हणाला की, ‘खूप काम आहे रे! वैताग येतो. वेळेचा पत्ता नसतो. रात्री-रात्रीपर्यंत ऑफिसात बसून कामं करायला लागतात आणि पर्सनल लाइफ असं वाटतंच नाही काही. शनिवारीसुद्धा अनेकदा जावं लागतं. कठीण झालंय सगळं. पैसे देतात म्हणून फक्त करायचं सहन.’ मी न राहवून प्रश्न केला, ‘तू फॉरेनमधेच राहतोस ना?’ ‘हो अर्थात!’ तो म्हणाला. ‘कारण तू हे जे सगळं सांगतोयस ती आणि तशी परिस्थिती इकडे आहे भारतात!’ मी म्हणालो. ‘एके काळी असेल. आता आपल्याच लोकांनी बाहेर जाऊन आपल्या इथलं घाणेरडं कल्चर तिथे पसरवलंय, त्यामुळे देश असो की परदेश, घरोघरी मातीच्या चुली’.
‘कमाल आहे!’ असं म्हणत असतानाच मी भारतात राहणा-या आणि नोक-या करणा-या लोकांशी झालेल्या चर्चा, त्यांचे किस्से आठवायला लागलो. ‘आनेका टाइम फिक्स है जानेका नही’, ‘गद्दी-चद्दर लेकेही ऑफिस जाते है’, ‘ऑफिस खाली होने के बाद अच्छा काम होता है’, ‘वर्क हार्ड पार्टी हार्डर’ अशी अनेक वचनं मला आठवली. या उक्त्या गमतीत किंवा उपहासाने घेतल्या जात असल्या तरीही त्या शब्दश: ख-या आहेत. मुळात नोकरी आणि गुलामगिरी यातील फरक फार थोडासा उरला आहे आता.
स्पर्धा वाढली. चढाओढ वाढली. त्यामुळे कंपन्यांना आपली उत्पादनं जास्तीत जास्त विकण्याची अपरिहार्यता आली. त्यातून कर्मचा-यांना अवास्तव टारगेट्स आली. पैसे वाचवण्यासाठी माणसं कमी केली गेली आणि एकेक माणूस दोघा-तिघांचं काम करू लागला. लोकसंख्येमुळे नोक-या सहज मिळेनाशा होत्याच, त्यात काम नाही केलं तर आहे ती नोकरी जाण्याची पाळी येईल या भीतीने आणि पैशाच्या भुकेपोटी माणूस ढोरासारखं काम करू लागला. याचा त्रास सगळ्यांनाच होत असावा, असं गृहीत धरलं तरी त्याला फारशी वाचा फोडली गेली नाही. त्याला कारण मानवी प्रवृत्तीच झाली. अमूक एकाने विरोध केला तर तो वाईट ठरेल, त्याचबरोबर आपण न बोलता काम केलं तर पुढे आपल्यालाच जास्त पैसे मिळतील, या लाचार आशेवर आणि विचारहीन ईर्ष्येपोटी माणसं आपल्या दिवसातला अध्र्याहून जास्त वेळ नोकरीला देऊ लागली आणि हळूहळू ही संस्कृती बनत गेली.
कुणी तरी एकदा असं म्हणालेलं मला आठवतं की, ‘मी सहा वाजता वेळेवर ऑफिसमधून निघालो की, ‘हाफ डे जा रहा है क्या? घर जा के क्या करने का है तेरे को?’ असं विचारतो माझा बॉस.’ मला प्रश्न पडतो की हे असं म्हणणा-यांना घरं नसतात का? बायको, मुलं, मित्र, नातेवाईक नसतात का? पैसे मिळवतात पण ते खर्च कधी करतात? आवडी निवडी, छंद ही माणसं कधी जोपासतात? की जोपासतच नाहीत? आणि यांना जर या कशातही स्वारस्य नसेल तर ते दुस-याला आपल्या पंगतीत का बसवतात? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे न आवडूनही लोक हे सहन का करतात? मला खरंच कीव करावीशी वाटते या ‘घर जा के क्या करने का है’वाल्यांची.
हे चित्र बदललं पाहिजे. कारण यामुळे अनेक दृश्यादृश्य समस्या माणसांच्या मागे लागत आहेत, ज्या कठीण आहेत. स्ट्रेस, टेन्शन, अनेक आजार हे सगळं या अतिरिक्त कामामुळे होतं. जर व्यक्तीला आठ, नऊ तास ठरलेलं काम करून उरलेला वेळ स्वत:साठी मिळाला नाही तर त्याचं पर्यवसान स्ट्रेस आणि टेन्शनमध्ये होतं. कुठे तरी या बदलाची सुरुवात झाली पाहिजे आणि त्याला सर्वाची जोड मिळाली पाहिजे. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या ज्यांचा लोकांना विसर पडलाय. फेसबुकवर आणि व्हॉट्सॅप्पवर ‘गेले ते दिवस’ आणि ‘बेस्ट डेज ऑफ लाइफ’ सारखे मेसेज पाठवण्यापुरत्या त्या गोष्टी मर्यादित राहायचं काही कारण नाही. ‘दमलेला बाबा’ आणि तत्सम गाण्यांवर केवळ हळवं होण्यापेक्षा ‘कारण नसताना मी जास्त वेळ ऑफिसात थांबणार नाही’ असं ठामपणे ऑफिसात सांगितलं तर जास्त बरं नाही का? एकाने नाही तर प्रत्येकाने हे केलं तर कदाचित ही क्रांती होईल आणि मग अजूनही अनेक परदेशांत असलेली ‘नाइन टू फाइव्ह’ची आदर्श संस्कृती आपल्याकडेही रुजेल.
माझा हा लेख प्रहार वृत्तपत्रात २९-६-१४ रोजी प्रकाशित झाला त्याचा हा दुवा. http://prahaar.in/collag/225913
नोकरी कशी आहे, असं विचारलं असता नाखूश दिसलेला तो म्हणाला की, ‘खूप काम आहे रे! वैताग येतो. वेळेचा पत्ता नसतो. रात्री-रात्रीपर्यंत ऑफिसात बसून कामं करायला लागतात आणि पर्सनल लाइफ असं वाटतंच नाही काही. शनिवारीसुद्धा अनेकदा जावं लागतं. कठीण झालंय सगळं. पैसे देतात म्हणून फक्त करायचं सहन.’ मी न राहवून प्रश्न केला, ‘तू फॉरेनमधेच राहतोस ना?’ ‘हो अर्थात!’ तो म्हणाला. ‘कारण तू हे जे सगळं सांगतोयस ती आणि तशी परिस्थिती इकडे आहे भारतात!’ मी म्हणालो. ‘एके काळी असेल. आता आपल्याच लोकांनी बाहेर जाऊन आपल्या इथलं घाणेरडं कल्चर तिथे पसरवलंय, त्यामुळे देश असो की परदेश, घरोघरी मातीच्या चुली’.
‘कमाल आहे!’ असं म्हणत असतानाच मी भारतात राहणा-या आणि नोक-या करणा-या लोकांशी झालेल्या चर्चा, त्यांचे किस्से आठवायला लागलो. ‘आनेका टाइम फिक्स है जानेका नही’, ‘गद्दी-चद्दर लेकेही ऑफिस जाते है’, ‘ऑफिस खाली होने के बाद अच्छा काम होता है’, ‘वर्क हार्ड पार्टी हार्डर’ अशी अनेक वचनं मला आठवली. या उक्त्या गमतीत किंवा उपहासाने घेतल्या जात असल्या तरीही त्या शब्दश: ख-या आहेत. मुळात नोकरी आणि गुलामगिरी यातील फरक फार थोडासा उरला आहे आता.
स्पर्धा वाढली. चढाओढ वाढली. त्यामुळे कंपन्यांना आपली उत्पादनं जास्तीत जास्त विकण्याची अपरिहार्यता आली. त्यातून कर्मचा-यांना अवास्तव टारगेट्स आली. पैसे वाचवण्यासाठी माणसं कमी केली गेली आणि एकेक माणूस दोघा-तिघांचं काम करू लागला. लोकसंख्येमुळे नोक-या सहज मिळेनाशा होत्याच, त्यात काम नाही केलं तर आहे ती नोकरी जाण्याची पाळी येईल या भीतीने आणि पैशाच्या भुकेपोटी माणूस ढोरासारखं काम करू लागला. याचा त्रास सगळ्यांनाच होत असावा, असं गृहीत धरलं तरी त्याला फारशी वाचा फोडली गेली नाही. त्याला कारण मानवी प्रवृत्तीच झाली. अमूक एकाने विरोध केला तर तो वाईट ठरेल, त्याचबरोबर आपण न बोलता काम केलं तर पुढे आपल्यालाच जास्त पैसे मिळतील, या लाचार आशेवर आणि विचारहीन ईर्ष्येपोटी माणसं आपल्या दिवसातला अध्र्याहून जास्त वेळ नोकरीला देऊ लागली आणि हळूहळू ही संस्कृती बनत गेली.
कुणी तरी एकदा असं म्हणालेलं मला आठवतं की, ‘मी सहा वाजता वेळेवर ऑफिसमधून निघालो की, ‘हाफ डे जा रहा है क्या? घर जा के क्या करने का है तेरे को?’ असं विचारतो माझा बॉस.’ मला प्रश्न पडतो की हे असं म्हणणा-यांना घरं नसतात का? बायको, मुलं, मित्र, नातेवाईक नसतात का? पैसे मिळवतात पण ते खर्च कधी करतात? आवडी निवडी, छंद ही माणसं कधी जोपासतात? की जोपासतच नाहीत? आणि यांना जर या कशातही स्वारस्य नसेल तर ते दुस-याला आपल्या पंगतीत का बसवतात? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे न आवडूनही लोक हे सहन का करतात? मला खरंच कीव करावीशी वाटते या ‘घर जा के क्या करने का है’वाल्यांची.
हे चित्र बदललं पाहिजे. कारण यामुळे अनेक दृश्यादृश्य समस्या माणसांच्या मागे लागत आहेत, ज्या कठीण आहेत. स्ट्रेस, टेन्शन, अनेक आजार हे सगळं या अतिरिक्त कामामुळे होतं. जर व्यक्तीला आठ, नऊ तास ठरलेलं काम करून उरलेला वेळ स्वत:साठी मिळाला नाही तर त्याचं पर्यवसान स्ट्रेस आणि टेन्शनमध्ये होतं. कुठे तरी या बदलाची सुरुवात झाली पाहिजे आणि त्याला सर्वाची जोड मिळाली पाहिजे. अनेक गोष्टी आहेत करण्यासारख्या ज्यांचा लोकांना विसर पडलाय. फेसबुकवर आणि व्हॉट्सॅप्पवर ‘गेले ते दिवस’ आणि ‘बेस्ट डेज ऑफ लाइफ’ सारखे मेसेज पाठवण्यापुरत्या त्या गोष्टी मर्यादित राहायचं काही कारण नाही. ‘दमलेला बाबा’ आणि तत्सम गाण्यांवर केवळ हळवं होण्यापेक्षा ‘कारण नसताना मी जास्त वेळ ऑफिसात थांबणार नाही’ असं ठामपणे ऑफिसात सांगितलं तर जास्त बरं नाही का? एकाने नाही तर प्रत्येकाने हे केलं तर कदाचित ही क्रांती होईल आणि मग अजूनही अनेक परदेशांत असलेली ‘नाइन टू फाइव्ह’ची आदर्श संस्कृती आपल्याकडेही रुजेल.
माझा हा लेख प्रहार वृत्तपत्रात २९-६-१४ रोजी प्रकाशित झाला त्याचा हा दुवा. http://prahaar.in/collag/225913
वाचने
21028
प्रतिक्रिया
125
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखन पटलेय. यात न पटण्यासारखे
तुम्ही यावर काय उपाय काढलाय
In reply to लेखन पटलेय. यात न पटण्यासारखे by रेवती
अगदी बरोबर वेल्ला. आपलं काम
In reply to तुम्ही यावर काय उपाय काढलाय by वेल्लाभट
कचेरीतील राजकारणं....
In reply to अगदी बरोबर वेल्ला. आपलं काम by यशोधरा
आमच्याच कंपनीत ..? ऑ...?
In reply to कचेरीतील राजकारणं.... by प्रभाकर पेठकर
उत्तम लेख !
In reply to तुम्ही यावर काय उपाय काढलाय by वेल्लाभट
खूप कमी कंपन्या आहेत जिथे हि
जीवन असे आहे ...असायला पाहिजे
लेख आवडला. थोडासा याच धर्तीचा Self-inflected त्रास ....
हे स्वतःवरच अवलंबून असते.
तुमच्या कामाच्या ठीकाणी
In reply to हे स्वतःवरच अवलंबून असते. by यशोधरा
तुमच्या कंपनीत टाकतात? नियम,
In reply to तुमच्या कामाच्या ठीकाणी by धन्या
अशा खुप कंपन्या माहीती आहेत
In reply to तुमच्या कंपनीत टाकतात? नियम, by यशोधरा
आपणच ह्या सवयी लावतो धन्या.
In reply to अशा खुप कंपन्या माहीती आहेत by धन्या
असो.
In reply to आपणच ह्या सवयी लावतो धन्या. by यशोधरा
वोक्के
In reply to असो. by धन्या
मी फ्रेशरची असतानाची गोष्ट.
In reply to असो. by धन्या
त्याच्याकडे स्वतःच्या कामाचे
In reply to मी फ्रेशरची असतानाची गोष्ट. by धन्या
यशोधरा ताई
In reply to त्याच्याकडे स्वतःच्या कामाचे by यशोधरा
डॉ.साहेब, आजवर मी देशी,
In reply to यशोधरा ताई by सुबोध खरे
नाही...
In reply to डॉ.साहेब, आजवर मी देशी, by यशोधरा
+१
In reply to नाही... by ब़जरबट्टू
रिसेशनच्या काळात कंपनी
In reply to नाही... by ब़जरबट्टू
जेव्हा तेव्हा
In reply to रिसेशनच्या काळात कंपनी by यशोधरा
छे छे. एका महिन्याची नोटिस
In reply to डॉ.साहेब, आजवर मी देशी, by यशोधरा
सर्रास शक्य आहे.
In reply to छे छे. एका महिन्याची नोटिस by मृत्युन्जय
होय नोटीसही देऊ शकते.
In reply to छे छे. एका महिन्याची नोटिस by मृत्युन्जय
पण येथे....
In reply to होय नोटीसही देऊ शकते. by यशोधरा
बजरबट्टु, त्यातही मन मानेल
In reply to पण येथे.... by ब़जरबट्टू
यशोतै, बहुतांशी आयटी कंपन्या
In reply to बजरबट्टु, त्यातही मन मानेल by यशोधरा
ओके धन्या
In reply to यशोतै, बहुतांशी आयटी कंपन्या by धन्या
यशोधरा तै.. बहुतेक आयटी
In reply to होय नोटीसही देऊ शकते. by यशोधरा
पण असे इतक्या सहजासहजी कोणाला
In reply to डॉ.साहेब, आजवर मी देशी, by यशोधरा
पण असे इतक्या सहजासहजी कोणाला विनाकारणाचे काढता येत नाही-१. अगदी क्षुल्लक कारणांवरुन हाकलले जाते. विदेशी बद्दल माहित नाही. पण देशी (पुण्यातल्या) कंपनीत घडलेली गोष्ट- माझ्या कंपनीची पार्टी चालू होती. कॉंट्रॅक्टवरचे सगळे इंजीनीयर पण होते. त्यातल्या एकाने, माझ्या बॉसच्या खांद्यावर हात ठेवत त्याला अजुन थोडी 'घ्यायचा' आग्रह केला. ब्बास. दुसर्या दिवशी त्याला त्याच्या कंपनीने काढून टाकले. तो कॉंट्रॅक्टवर असल्याने माझ्या कंपनीचा काहीच रोल नव्हता.त्यात काय यवढं उचकायला झालं?
In reply to पण असे इतक्या सहजासहजी कोणाला by यसवायजी
तेच तर. काहीही कारणं चालतात
In reply to त्यात काय यवढं उचकायला झालं? by आदूबाळ
ओरिगिनल मार्कशीट ठेवून घेणे
In reply to तेच तर. काहीही कारणं चालतात by यसवायजी
अशा २ कंपन्या माहीती आहेत.
In reply to ओरिगिनल मार्कशीट ठेवून घेणे by बॅटमॅन
ह्या
In reply to ओरिगिनल मार्कशीट ठेवून घेणे by बॅटमॅन
@यशोधरा
In reply to डॉ.साहेब, आजवर मी देशी, by यशोधरा
नाही, फक्त सरकारी नोकरीतच
In reply to @यशोधरा by सुबोध खरे
उद्यापासून येण्याची गरज नाही
In reply to यशोधरा ताई by सुबोध खरे
चांगलं लिहिलंय
डेरिंग पाहिजे ठरवून नोकरी
In reply to चांगलं लिहिलंय by पैसा
धन्यवाद!
In reply to डेरिंग पाहिजे ठरवून नोकरी by खटपट्या
आजकाल तुझी परवानगी न घेताच
In reply to चांगलं लिहिलंय by पैसा
:)
In reply to आजकाल तुझी परवानगी न घेताच by रेवती
प्रतिसादांबद्दल आभार्स. आहेत
वेल्लाभटांनो .... शेम टू शेम
तरुण, लग्न न झालेल्या
आज परिस्थिती अशी आहे कि
>>>>मी इतकाच वेळ काम करेन अशी
In reply to आज परिस्थिती अशी आहे कि by सुबोध खरे
थोडासा असहमत
In reply to >>>>मी इतकाच वेळ काम करेन अशी by प्रभाकर पेठकर
पेठकर साहेब
In reply to >>>>मी इतकाच वेळ काम करेन अशी by प्रभाकर पेठकर
पुन्हा असहमत.
In reply to पेठकर साहेब by सुबोध खरे
नेहमीप्रमाणे
In reply to आज परिस्थिती अशी आहे कि by सुबोध खरे
जवळ्जवळ सर्व प्रतिसादाशी सहमत
In reply to आज परिस्थिती अशी आहे कि by सुबोध खरे
हे फारच खास
In reply to जवळ्जवळ सर्व प्रतिसादाशी सहमत by रेवती
मला एक कळत नाहिये....
एक फरक आहे पाटील आणि तो असा
In reply to मला एक कळत नाहिये.... by बाबा पाटील
पर्फेक्ट... अगदी सहमत.
In reply to एक फरक आहे पाटील आणि तो असा by मृत्युन्जय
काही बेसिक गोष्टी....
छान लेख
याचं कारण
हा प्रतिसाद ...
In reply to याचं कारण by चौकटराजा
हाहा!
In reply to हा प्रतिसाद ... by चौकटराजा
सध्यातरी
सहमत आहे. काम करायला मजा येत
In reply to सध्यातरी by प्रसाद गोडबोले
ऑफिसातील काम
आयटी बद्दल तरी मी सांगु शकतो.
आय्टी चा अजुन एक फायदा म्हणजे
In reply to आयटी बद्दल तरी मी सांगु शकतो. by प्रसाद१९७१