Skip to main content

लेख

'साप्ताहिक प्राजक्त' विचार धन - १. शास्त्रार्थ वाद

शुक्रवार, 25/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, नुकतेच 'साप्ताहिक प्राजक्त' वाचनात आले. एप्रिल १४ च्या अंकातील काही भाग सादर करून काहींना विचार व्यक्त करायला विनंती करत आहे. 'श्री शंकराचार्य - चरित्र व स्तोत्रे ' या लेखात म्हटले आहे, "श्री शंकराचार्य व मंडनमिश्र यांच्यात शास्त्रार्थ वाद करायला सुरवातीला प्रतिज्ञा झाल्या. त्या प्रतिज्ञेत आचार्यांच्या मते ईश्वरन सर्व नियामक तर मंडनमिश्रांचे मते फळ देणारे ते कर्मच होय.

आज कुछ तुफानी करते है…

लेखक बोबो
सोमवार, 21/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
------------------------------------------------- म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हणतात ते कदाचित खरं असावं. माणसं कधी कधी काही विचित्रच हट्ट करतात. निदान आबांच्या वागण्यावरून तरी मला तसं वाटलं खरं . परवाचाच अनुभव घ्या ना. आबा - म्हणजे दूरच्या नात्यातले आजोबा आमच्याकडे राहायला होते. ते नुसते रहात होते तिथपर्यंत ठीक होतं. एरव्ही त्यांचं वागणं नॉर्मल होतं, पण नंतर एके दिवशी मला जाणवलं त्यांना काहीतरी बोलावंसं वाटतंय. त्यांच्या मनात काही तरी आहे असं मला वाटलं.

गडीमाणस

लेखक मालविका
रविवार, 20/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आमच घर कोकणात असल्याने घरचा मुख्य व्यवसाय हा शेती होता . भातशेती आणि आंबा हेच उत्पन्नाचे मुख्य साधन . त्यामुळे साहजिक घरात गडी माणसांची ये जा असायची . हि मानस घरचाच एक अविभाज्य घटक बनलेली होती असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही . आमच्यकडे "गुण्यादादा"नावाचा एक गडी होता. खर तर वयाने तो माझ्या बाबांपेक्षा सुद्धा १० १२ वर्ष मोठा असेल पण सगळेच त्याला गुण्यादादा म्हणायचे . मी ऐकलय त्याप्रमाणे त्याच्या वयाच्या ८ व्या वर्षपासून तो आमच्याकडे कामाला होता . अत्यंत विश्वासू आणि तेवढाच घरचा हक्काचा असा गुण्यादादा . शेतावर काम करून रंग अगदी काळपट झालेला. मध्यम पण काटक अंगकाठी .

ब्रूक्स-भगत रिपोर्ट- १९६२ चे चीन-भारत युध्ध

मंगळवार, 15/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
ऑक्टोबर १९६२ साली चीनच्या युध्धात खरा॑ब रीत्या पराजित झाल्या नंतर भारताच्या संरक्षण खात्याने पराजयाच्या कारणांची तपास करण्यासाठी एक विस्तृत रिपोर्ट तैयार करायचं ठरवलं. १९६२ च्या जालंधरच्या ११व्या कॉरच्या कमांडींग ऑफीसर लेफ्टनन्ट-जनरल हेन्डरसन ब्रूक्सला हे काम सोपवीण्यात आलं. त्याने ब्रिगेडीयर पी.एस. भगत यांच्या सहयोगाने विश्लेषणात्मक रिपोर्ट तैयार करून जुलाइ १९६३ला संरक्षण खात्याला सुप्रत केला. ब्रूक्स-भगत रिपोर्ट तत्कालिन सरकारची झोप उडवीणारा होता. युध्धासाठी भारताच्या अपूरत्या तैयारीचे असंख्य दृष्टांत त्यात होते.

बडोदा येथे "मी राज्य करण्यासाठी आलो आहे"

बुधवार, 09/04/2014 या दिवशी प्रकाशित केले.
फर्जंद ए खास ए दौलत ए इंग्लीशिया, श्रीमंत महाराजा सर, सेना खास खेल शमशेर बहादूर महाराजा गायकवाड बडोदेकर अशी पदवी धरण करणारे महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड (तिसरे), जन्मनाव श्रीमंत गोपाळराव गायकवाड, (मार्च १०, इ.स. १८६३ - फेब्रुवारी ६, इ.स. १९३९) हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानाचे अधिपती होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.

माझं कोकणातलं गांव :- भाग-५ (मामाचा गांव माझं आजोळ)

सोमवार, 31/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
माझं कोकणातलं गांव :- भाग-४ मागील भागात>> मग गाडी बदलुन आजोळी जाण्यासाठी त्याच्याबरोबर पुढचा प्रवासाला आरंभ होत असे..... तिथुन पुढे >>> दापोलीच्या ए.स्टी. स्टँडवर उतरलं की दुपारच्या जेवणाला मावशीकडे ( आईची सख्खी मोठी बहीण जी खुद्द दापोलीलाच राहते) जायचं कारण संध्याकाळी ४.०० वाजे पर्यंत गावात जायला ए.स्टी खेरीज दुसरे साधनच त्याकाळी नव्हते. मग जरुरी पुरते सामान घेवुन बाकीचे इथे ठेवुन आम्ही सगळेजण पुन्हा ३.३० वा. परत स्टॅन्ड वर येत असु.

नरेन्द्र (मोदी) वर्सीस नरेन्द्र (रावत)

सोमवार, 24/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
भाजपाच्या तीसर्या यादीत नरेन्द्रमोदी वडोदराहून नीवडणूक लढणार हे निश्चित झाल्यावर वडोदरा शहर-जिल्ल्याची लोकं खूपच एक्साइट आहेत. अमदावाद, वडोदरा, राजकोट, सुरत आणी गांधीनगर अशा पाच जागे वरचे भाजपा कार्यकर मोदींची मागणी करुन त्यांना प्रचंड बहुमतांने विजयी करुन देण्याची खात्री पटवून देत होते. पण शेवट फाइनल शिक्का वडोदरावर लागला. कदांचीत मोदींच्या डाव्या हाताच्या पहिल्या दोन बोटांचा तो प्रताप असावा. स्वतःच्या प्रत्येक रेलीत मोदी डाव्या हाताचे दोन बोटं वी च्या शप मधे उचलून वी फॉर वीकटरी असं म्हणत उजव्या हाताने लोकांचं अभिवादन करत असतात.

सुखाची चाहूल... आगमन ... अवर्णनीय !

सोमवार, 24/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटच्या सोनोग्राफीला एक एप्रिल तारीख दिली गेली तेव्हा आमच्याकडचे सारेच त्या तारखेला न झाले तरच बरे असे म्हणत होते. कारण काय, तर एप्रिल फूलच्या दिवशीच झाले तर नशिबी आयुष्यभराची चिडवाचिडवी. मी मात्र या उलट मताचा. एखाद्या स्पेशल दिवशी होतेय तर चांगलेच की, चिडवाचिडवी एंजॉय करायची की झाले. पण होणारे मूल मात्र नशीबात याही पेक्षा स्पेशल दिवस घेऊन येणार आहे याची कल्पना मात्र तेव्हा आम्हा कोणालाच नव्हती. तब्बल दोनेक आठवडे आधी म्हणजे अठरा मार्चलाच दुपारी बाराच्या सुमारास फोन खणखणला. पाणी कमी झालेय, बाळाची हालचाल मंदावली आहे, आज संध्याकाळीच अ‍ॅडमिट व्हायला सांगितले आहे.

मदतीचा हात हवाय…….

शनिवार, 22/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! हे पत्र आपल्याला पाठवण्याचे कारण, आजवर या न त्या कारणाने आपला डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्प- हेमलकसा, ता. भामरागड, जि. गडचिरोलीशी’ आपला संबंध आला असावा. आपण कदाचित प्रकल्पाला भेट अथवा देणगी दिली असेल, सौ. साधनाताई आमटे, डॉ. प्रकाश आमटे किंवा श्री. विलास मनोहर यांचे एखादे पुस्तक निश्चितच आपल्या वाचनात आले असेल. तसे नसतानाही आपल्याला अनवधानाने हे पत्र मिळाल्यास दिलगिरी व्यक्त करून या पत्रामागचे प्रयोजन स्पष्ट करते. ज्येष्ठ समाजसेवक श्री. बाबा आमटे प्रस्थापित आणि डॉ. प्रकाश आमटे संचलित हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या स्थापनेला आज 40 वर्षे पूर्ण झाली आहेत.

सत्ययुग कधी येणार...?

शुक्रवार, 21/03/2014 या दिवशी प्रकाशित केले.
चहुकोर वेगवेगळे अत्याचार, दुराचार, भ्रष्टाचाराच्या बातम्या आपण ऐकतो.बहुतांश लोकं म्हणत असतात की कधी एकदाचा हा कलीयुग संपतो आणी सत्ययुग येतो. आपल्या प्रत्येकाच्या मनात पण कधीतरी हा विचार आलाच असणार. आपण पृथ्वीच्या प्रलयाच्या बर्‍याचशा भविष्यवाण्या ऐकल्या. त्या पोकळ असल्याचा अनुभवही केला. या विषयाचे बरेचशे चित्रपट बघीतले.'२०१२' तर जणूकाही पढे आपल्याशी काय घडणार' ह्याची भीती दाखवणारंच चित्रपट होतं. तर कधी होतोय या पृथ्वीचा विनाश..! कधी येणार हा सत्ययुग...! नोस्ट्राडमस ची भविष्यवाणी सन ३७९७ चं वर्ष पृथ्वीचा आयुष्याचं शेवटचं वर्ष असण्याचं दाखवत आहे.