Skip to main content

लेख

ठहरने को बोला है

लेखक स्वीट टॉकर यांनी शुक्रवार, 08/07/2016 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
साधारण पंचाऐंशी सालच्या आसपासची गोष्ट. सुट्टी संपवून मी बोटीवर निघालो होतो. बोट हॉन्गकॉन्गला होती. मुंबई विमानतळावर मी चेक-इन करताना माझ्या सामानाचं स्कॅनिंग झाल्यावर मला बाजूला बोलावून घेण्यात आलं. मला हे असं बोलावणं अजिबात नवीन नव्हतं. माझ्या पाठीला ऐंशी साली दुखापत झाली होती तेव्हांपासून मी रोज काही विशिष्ट व्यायाम करायचो ज्याच्यासाठी दोन्ही घोट्यांभोवती वजनाच्या पिशव्या व्हेल्क्रोच्या पट्ट्यांनी लावायचो. या पिशव्यांमध्ये पोलादाच्या अगदी छोट्या छोट्या शेकडो चकत्या होत्या. दोन तीन मि.मि. व्यासाच्या. या चकत्यांचं सिक्यूरिटीला नेहमीच कुतूहल असायचं.

एक मृत्युपत्र: पल दो पल का शायर, काही गोष्टी आणि "जान्हवीची आई"!

लेखक मार्गी यांनी शुक्रवार, 08/07/2016 10:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! हे एक प्रत्यक्षात लिहिलेलं पत्र आहे. एका काकाच्या मृत्युनंतर तीन महिन्यांनी त्याच्या आई- पत्नी (माझी आजी- मावशी) आणि मुलींना (माझ्या बहिणींना) लिहिलेलं. ह्यामधला आशय आपल्या सर्वांसोबत- आपल्या प्रत्येकासोबत शेअर करावासा वाटला म्हणून फक्त नावं बदलून हे पत्र आहे तसं इथे देतोय. थोडं मोठं आहे, पण शेअर करावं असं वाटलं. खूप खूप धन्यवाद. || ॐ || दि. २७ एप्रिल २०१६ ती. आजी, ती. मावशी आणि मिताली- प्राजक्ता! तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. अगदी सविस्तर आणि मनमोकळेपणाने बोलायचं आहे. तुम्हांला माहितीच आहे की मी किती अबोल आहे! त्यामुळे समोरासमोर बोलताना मला कंठ फुटत नाही.

मोसाद - भाग १२

लेखक बोका-ए-आझम यांनी सोमवार, 04/07/2016 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
मोसाद - भाग ११ मोसाद - भाग १२ १५ नोव्हेंबर १९७१. वेळ – रात्री साधारण १० वाजता. भूमध्य समुद्रात वादळ चालू होतं. मुसळधार पाउस पडत होता आणि एक इझरेली मिसाईल बोट अगदी धीम्या गतीने सीरियन किनाऱ्याच्या दिशेने चालली होती. आंतरराष्ट्रीय सीमारेषा ओलांडून बोट सीरियन हद्दीत शिरली. त्याच्याआधी बोटीवरचे सगळे दिवे मालवले गेले. सीरियाच्या लाताकिया बंदराला वळसा घालून बोट पुढे गेली आणि उत्तरेकडे वळली.

रत्नागिरी कट्टा.....

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 04/07/2016 17:14 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस बराच व्यस्त होतो आणि शेती विकत घ्यायला किती प्रयास पडतात ह्याचा अनुभव पण घेत होतो.वडीलोपार्जित शेती नसल्याने त्रास जरा जास्तच होत होता. शोधा-शोध करत असतांनाच आमच्या एका ओळखीच्या मित्राकडून देवरूखला एका जणाला शेती विकायची आहे, असा निरोप मिळाला.आता देवरूखला जायचेच आहे तर बसणीला पण जावून येवू म्हणून मग रत्नागिरीत मुक्काम करायचे ठरवले.साहजिकच आमच्या शिरस्त्याप्रमाणे, रत्नागिरीत कुणी अहे का?

शागिर्द

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 03/07/2016 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
शागिर्द ---------- कथा ( काल्पनीक ) दुरवर बघावे तिकडे विस्तीर्ण वाळवंट पसरले होते . दिवस वर सरकू लागला तशी उन्हाची तलखीही वाढत चालली होती . सुर्य वाळुला अक्षरशः भाजुन काढत होता . वाळुमधुन उष्ण वाफा निघत होत्या . अशा वाढत्या उन्हात त्या वाळवंटामधुन एक घोडा संथपणे चालत होता . घोडयाच्या पाठिमागे एक चार चाके असणारी लाकडी पेटी बांधलेली होती . घोडयाच्या मागे मागे त्या पेटीचाही प्रवास चालु होता . त्या पेटीमध्ये घोड्याचा मालक पहुडलेला होता . उन्हाचा त्रास नको आणी तोंडावर माशा घोंघावू नयेत म्हणुन त्याने आपला चेहरा हॅटने झाकलेला होता .

द रेड ट्रँगल

लेखक बोलघेवडा यांनी शुक्रवार, 01/07/2016 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार, दु. ४:३४ आजची सभा बनारस मधल्या त्या विस्तीर्ण मैदानात होती. मैदानाकडे जाणारे सर्व रस्ते माळा आणि तोरणे लावून सुशोभित करण्यात आले होते. व्यासपीठावर साहेबांची भव्य प्रतिमा उभारण्यात आली होती. तुडुंब गर्दी. लोकांना पाय ठेवायला जागा नव्हती. लाउडस्पीकरवरून होणाऱ्या घोषणा आणि जयजयकाराने सर्व मैदान अगदी दणाणून गेलं होतं. हा प्रचंड जनसमुदाय म्हणजे कार्यकर्ते किंवा भाडोत्री गर्दी नव्हती तर “लोकांमध्ये राहून लोकांसाठी काम करणारा नेता” अशी ख्याती असलेल्या ह्या लाडक्या नेत्याचे भाषण ऐकण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी लोकं उस्फुर्तपणे लांबून आले होते.

सांस्कृतिक महाराष्ट्र

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/07/2016 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे महाराष्ट्रात इसवी सन पूर्व 230 ते इसवी सन 225 पर्यंत सातवाहनांचे राज्य होते. त्यांनीच महाराष्ट्राची स्थापना केल्याचे ऐतिहासिक दाखले मिळतात. याच काळात साक्षरता संस्कृती व कला या क्षेत्रात चांगली प्रगती केल्याचे पुरातत्व पुरावे मिळतात. शैक्षणिक, धार्मिक व कलेच्या क्षेत्रात महाराष्ट्राची प्रगती झाली. अजिंठा येथील लेणी प्रसिध्द आहेच. वाकाटक राजवटीनंतर काही काळ कलाचुरी घराण्याचे राज्य होते. नंतर चालुक्य, राष्ट्रकुट आणि यादव व शिलाहारांचे राज्य होते. काही काळ बहामणी साम्राज्य सुध्दा. छत्रपती शिवाजींकडून एकसंध महाराष्ट्राचा उदय झाला.

लॉजिक-जिम-लॉजिक

लेखक माझीही शॅम्पेन यांनी रविवार, 26/06/2016 15:29 या दिवशी प्रकाशित केले.
लॉजिक-जिम-लॉजिक प्रस्तावना : लेखाचं नाव वाचून फार अपेक्षा ठेवू नका , तुम्हालाही अशी नग मंडळी कुठेना कुठे दिसतील जमल्यास त्यांचं वर्णन इथे करू शकता , बरेच दिवसांनी बोर्डावर पदार्पण करतोय सांभाळून घ्या -------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आम्रविकेत ४ वर्ष जीवाची अमेरिका करताना आरोग्या कडे अर्थात पूर्ण दुर्लक्ष झाले , कार ते कार्पेट प्रवास , चालणं कमीत कमी किंवा नाहिच पार्किंग लॉट सर्वात जवळ पार्किंग साठी कसरत , वीकांताला मजबूत पार्ट्या , बटाटा , चीज आणि अमेरिका जागतिक मेलटिंग प