Skip to main content

आस्वाद

भव्य दिव्य व्यक्तींच्या भेटीसाठी पुणश्च सस्णेह आवताण !!!

Published on 09/09/2015 - 14:20 प्रकाशित मुखपृष्ठ
http://www.misalpav.com/node/32522 तर आता पर्यंत समस्त मिपाकरांणा समजलेच असेल की पुण्यणगरीत भव्य आणी दिव्य कट्टा आयोजित करणेत आला आहे. मिपाच्या दैदिप्यमाण परंपरेचीपाइक होत हा दुसरा धागा काढला आहे. सगळ्यांणी आवर्जुण सहकुटुंब येणेचे करावे ही कळकळीची / आग्रहाची विणंती. कट्ट्याला उपस्थित राहुण कट्ट्याची शोभा वाढवावी आणी मिपाधर्म पाळावा/ वाढवावा. :) स्थळ - पुण्यणगरीमधील पाताळेश्वर लेणी तारिख.

याद्या 45476

मुंबई, काव्य आणि ललित साहित्यातील, 'ये है बम्बई मेरी जान'

Published on 08/09/2015 - 15:00 प्रकाशित मुखपृष्ठ
काव्य आणि ललित साहित्यातील मुंबई हा मराठी विकिपीडियावर ज्ञानकोशीय लेखाचा विषय असू शकतो; पण चर्चा पानावरील चर्चेचा विषय असू शकत नाही. अशा चर्चांना वाव देण्याचे काम मिसळपाव सारख्या मराठी संस्थळांचे.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 8667

या पाच गोष्टी कायम कराव्यात

Published on 08/09/2015 - 14:12 प्रकाशित मुखपृष्ठ
1. आपले वाहन नेहमी रस्त्याच्या डाव्या बाजूने चालवावे. उजव्या बाजूने चालविल्यास डाव्या-उजव्यातला फरक आपल्याला कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन आपले हसे होईल. 2. चौकात आल्यावर लाल रंगाचा वाहतूक दिशादर्शक दिवा दिसल्यास तो विझेपर्यंत आणि हिरवा दिवा लागेपर्यंत थांबावे. न थांबता पुढे गेल्यास आपल्याला लाल-हिरव्या रंगातला फरक कळत नाही अशी लोकांची समजूत होऊन लोक आपली टर उडवतील. 3. नियमांचा उल्लंघन करून वाहन चालविण्यामुळे पोलिसमामाने दंड केल्यास आपली फजिती कोणाला सांगू नये कारण सगळे आपली चेष्टा करून आपल्यावर हसतील. 4.

याद्या 5048

Silence used to grow around him....

Published on 07/09/2015 - 13:06 प्रकाशित मुखपृष्ठ
1 कवी रायनर मारीया रिल्के ची पहीली भेट झाली कवी ग्रेस यांच्या ललित लेखनाच्या वाचनांतुन. तेव्हापासुन त्याच आकर्षण वाटु लागलं, त्याच्या काही कविता मिळवुन वाचल्या पण पहिल्या वाचनातुन काहीच गवसलं नाही, सर्व डोक्यावरुन गेलं.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 4419

सच्चे वरण

Published on 06/09/2015 - 13:06 प्रकाशित मुखपृष्ठ
सच्चे वरण ह्याचा अर्थ ’mageireména fakés / kalós fakés’ (ग्रीक शब्द) ", "gut Linsen (जर्मन शब्द)", "bien lentilles (फ्रेंच शब्द)" म्हणजेच "चांगले शिजलेले एकजीव झालेले वरण" असा होतो. प्रत्येक व्यक्तीला जेवणाची सुरवात चांगल्या वरणभाताने आणि शेवट चांगल्या ताकभाताने व्हावा असे वाटते. परंतु ते आपल्या हातात नसते. ’सच्चे वरण हवे’ असे अंथरूणाला खिळलेल्या आजारी व्यक्तीने सांगितले तरी घरातल्यांना ते पटत नाही. अंथरूणाला खिळलेल्या वृद्ध व रूग्णांना सच्चे वरण देणे अवघड असते. नवरा किंवा बायको असली तर त्यातल्या त्यात चांगले.

याद्या 8669

नात्यातले लुकडे जाडे

Published on 03/09/2015 - 20:45 प्रकाशित मुखपृष्ठ
कोणत्याही नात्यामध्ये दोघांपैकी जो वजनाने मोठा असतो त्याचेकडून सतत डाएटिंगची आणि जास्त कामाची अपेक्षा केली जाते. केवळ वजनाने मोठा आहे म्हणून सगळ्यांचे त्याला ऎकून घ्यावे लागते व खाण्यापिण्याला आणि आरामाला मुरड घालावी लागते. पण हाच जाड्या असलेला व्यक्ती जेव्हा लुकड्याला एखादा उपदेश करतो, दोष दाखवतो, आज्ञा करतो तेव्हा मात्र लुकडा जर त्याचे ऎकत नसेल आणि जाड्याला योग्य तो मान मिळत नसेल तर मात्र त्या नात्याला एकतर्फी नाते म्हणता येईल.

याद्या 6159

अजब महाभारत

Published on 29/08/2015 - 23:57 प्रकाशित मुखपृष्ठ
मित्रहो, सध्या मिपावर महाभारताविषयी पुन्हा एकदा चर्चा घडून येत आहे. मी गेल्या दोन-तीन वर्षात महाभारतावर जे (सचित्र) लेख लिहिले, त्यांचे दुवे (विशेषतः मिपाच्या नवीन सदस्यांसाठी) देतो आहे. 'अजब महाभारत' हे शीर्षक माझ्या लेखात मांडल्या गेलेल्या आगळ्या-वेगळ्या दृष्टीकोनाला अनुलक्षून दिले आहे. वाचा आणि सांगा तुम्हाला काय वाटले ते. १. कुणी घडवून आणले 'महाभारत'? (महाभारत भाग १) २. मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २) ३.

याद्या 13886

क्रीडायुद्धस्य कथा - दहा सेकंदांचं युद्ध

Published on 29/08/2015 - 14:07 प्रकाशित मुखपृष्ठ
"तुला माहित्ये .... सगळे नऊच्या नऊ ग्रह जर एका लायनित आले ना..... त्या दिवशी पृथ्वी खतम होऊन जाणार!" आमचे ८ वर्षांचे ज्येष्ठ मित्रवर्य आम्हा ६ वर्षाच्या पोरांना सांगायचे. ते ऐकून जी टरकली होती म्हणता....त्यानंतरचे बरेच दिवस आकाशाकडे बघून सगळ्या ग्रह तार्यांची पोझिशन तपासण्यात गेले होते. जाम टेन्शन आलं होतं तेव्हा. तेव्हाच्या प्रदुषणविरहित आकाशात नेहमी दिसणारे गुरू, शनी, मंगळ वगैरे एकमेकांपासून हातभर अंतर ठेऊन आहेत बघितलं की हायसं वाटायचं. पल्याड शुक्र, बुध आणि न दिसणारे राहू केतू काही का गोंधळ घालेनात. जोपर्यंत ही नऊ लोकं एकत्र येत नाहीत तो पर्यंत प्रॉब्लेम इल्ले.
लेखनविषय:

याद्या 22709

महाभारताचे जीवन सार: (भाग २)

Published on 26/08/2015 - 11:46 प्रकाशित मुखपृष्ठ
अर्धसत्य आणि सत्याचे प्रकटीकरण: आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.

याद्या 2923

महाभारताचे जीवन सार: (भाग १)

Published on 24/08/2015 - 11:53 प्रकाशित मुखपृष्ठ
महाभारतात संपूर्ण जीवनाचे सार सामावले आहे. महाभारत कथा जीवनाच्या प्रत्येक विषय आणि अंगाला स्पर्श करते. मी एकेक करून ते आपल्यापुढे मांडत आहे, अर्थात जसे मला ते जाणवले किंवा समजले तसे! - निमिष सोनार - पुणे (sonar.nimish@gmail.com) #महाभारताचे_जीवन_सार: (भाग १) सतत एखाद्या व्यक्तीचा पक्ष घेणे किंवा त्यांची बाजू (चूक असली तरी) आयुष्यभर घेत राहणे याचे दुष्परिणाम चांगलेच आपल्या लक्षात येतात. अधर्म दिसत असूनही भीष्माने आयुष्यभर कौरवांची बाजू घेतली किंबहुना त्याला घ्यावी लागली, भलेही मनातून त्याला पांडव चांगले वाटत होते.

याद्या 3377