BANFF माऊंटन फिल्म फेस्टिवल (११ जुन २०१७ - पुणे)

लेखनविषय:
लेखनप्रकार
. नमस्कार मंडळी.. "BANFF माऊंटन फिल्म फेस्टिवल" बघण्याचा रविवारी योग आला. अचाट साहस आणि चिकाटीने पूर्ण केलेल्या १० वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमांवरील शॉर्ट फिल्म्स दाखवल्या गेल्या. आणखी फारसे वर्णन न करता सरळ फिल्म आणि त्यासंबंधी माहिती देतो. तसेच, या धाग्यामध्ये खूप व्हिडीओ द्यावे लागणार आहेत - धागा लोड होण्यास वेळ लागू शकतो.

'संगीतज्ञानी इळैयाराजा'

ते ट्रिनीटी कॉलेज ऑफ म्युझिक, लंडन चे सुवर्ण पदक विजेते आहेत. BBC ने घेतलेल्या सर्वेक्षणात ते भारतातील सर्वोत्कृष्ट संगीतकार ठरले.त्यांच्या 'दलपति' या सिनेमातलं 'रक्कम्मा कय्य थट्टू' हे जगातलं ૪ थ्या क्रमांकाचं सार्वकालीन पसंती दिलेलं गीत! ६००० पेक्षा अधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.१००० पेक्षा अधिक सिनेमांना त्यांनी संगीत दिलं.एस.जानकी,के.जे.येसुदास,चित्रा,एस पी बालसुब्रह्मण्यम् हे त्यांचे आवडते गायक.यांच्यासोबत सर्वाधिक गाणी त्यांनी संगीतबध्द केली.सर्वाधिक गाणी तमिळ भाषेत! तमिळ लोकसंगीत यांनी जागतिक पातळीवर नेलं.पारंपारीक तमिळ वाद्यांबरोबरच इलेक्ट्रॉनिक वाद्येही फार सुंदर पध्दती

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ७)

लेखनविषय:
लेखनप्रकार
आगमन संकल्पना समजायला थोडी गुंतागुंतीची आणि कठीण आहे . कारण आगमनात येणारा विचार एक असतो तर त्याला आपापल्या मगदुराप्रमाणे आणि स्वार्थबुद्धीने प्रतिसाद देणारे प्रस्थापित विचार अनेक असतात. त्यामुळे समाजातील वेगवेगळ्या घटकांकडून एकाच वेळी आगमनाचे स्वागत आणि विरोध चालू असतो. आणि हे सर्व प्रकारचे प्रतिसाद, त्यांच्यामागील कार्यकारणभाव समजून घेणे एका व्यक्तीच्या प्रज्ञेला सहजशक्य नसते. त्यातुलनेत निर्गमन संकल्पना समजायला थोडी सोपी आहे. कारण निर्गमन विचारांचे होत नाही तर व्यक्तीचे होते. त्यामुळे निर्गमनातील अनुभव हे व्यक्तिगत स्वरूपाचे असतात.

ऋग्वेदातील सुविचार

लेखनविषय:
लेखनप्रकार
आमची हि प्रस्तावना वाचलीच पाहीजे असे नाही. मेघश्याम पुंडलिक रेगे ((मे.पुं. रेगे) हे तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते. त्यांचे एक वाक्य आहे. "..जे पुस्तक आपण वाचलेले नसेल तरी आपण ते वाचलेले असणार अशी ज्याच्याविषयी आपली समजूत असते त्या पुस्तकाला अभिजात पुस्तकाचा (classic) दर्जा प्राप्त झालेला असतो असे म्हटले गेले आहे..." अशीच काहीशी स्थिती वेदांबाबतही होते का ? नुसताच उदो उदो किंवा नुसतीच टिका पण त्यात प्रत्यक्षात काय लिहिले आहे हे उघडून पहाणारे कमी आणि त्यातलाच मीही एक.

लट उलझी सुलझा जा बलमा

लेखनविषय:
लेखनप्रकार
लट उलझी सुलझा जा बलमा बरेच वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.पंडित भीमसेन यांचे गायन ऐकावयास गेलो होतो. त्यांनी सुरवात केली "चतुर, सुदरा बालमवा " . म्हटले "वा, हा चतुर बालम काय करतो ते कळले तर आपल्याला थोडे मार्गदर्शन होईल." पण कसले काय, तानांच्या जोरदार मार्‍यात पंडितजी काय म्हणत आहेत त्याचाच पत्ता लागेना.,बलमा राहिला बाजूलाच ! मग एकदा छॊटा गंधर्व यांची "न च सुंदरी करू कोपा" ची तबकडी ऐकत होतो. नारी मज बहु असती येथ पर्यंत गाडी ठीक चालली होती पण पुढे तानांच्या भेंडोळ्यात शब्दच कळेनात. पण आता ठरवले चतुर बलमा ची चीज शोधणे आपल्याला शक्य नाही पण नाट्यगीत तर मिळेलच की. मिळाले.

आधी नाकाने, मग जीभेने

लेखनविषय:
लेखनप्रकार
आधी नाकाने, मग जीभेने खाद्यपदार्थांची चव घेताना जीभ ह्या इंद्रियांच्या सिंहाचा वाटा असला तरी डोळे आणि नाक ह्यांचे देखील बरेच महत्व आहे. पुलं नि 'अपूर्वाई' मध्ये फ्रेंच जेवणाचे त्याच्या उत्कृष्ट प्रेझेंटेशन मुळे; 'आधी डोळ्यांनी, मग जीभेने' असे वर्णन केले आहे. भारतीय जेवणात देखील रंगसंगती आणि मांडणीचा विचार करून पान वाढण्याची फार पूर्वीपासूनची प्रथा आहे.

न किसी की ऒख का नूर हूं

लेखनविषय:
लेखनप्रकार
न किसी की ऒख का नूर हूं न किसी की ऒख का नूर हूं न किसी के दिल का करार हूं, जो किसी के काम न आ सके मै वो एक मुश्ते-गुबार हूं ---१. मेरा रंग रूप बिगड गया मेरा यार मुझसे बिछड गया जो चमन खिजॉ से उजड गया मै उसी की फस्ले बहार हूं ---२ पा-ए-फातहा कोई आये क्यो कोई चार फूल चढाये क्यो कोई आ के शम्मा जलाये क्यू (जफर अश्क कोई बहाये क्यु) मै तो बेकसी का मजार हूं ---३ मै नही हूं नग्मा-ए-जॉफिजा मुझेम सुन के कोई करेगा क्या मै बडे विरोग (विरॉन) की हूं सदा मै बडे दुखों की पुकार हूं ---४ न तो मै किसी का हबीब हूं न तो मै किसी का रकीब हूं जो बिगड गया वो नसीब हूं जो उजड गया वो दयार हूं ---५

ग्रीष्माच्या कविता....

लेखनविषय:
लेखनप्रकार
ग्रीष्माच्या कविता... तपता अंबर, तपती धरती, तपता रे जगती का कण-कण! त्रस्त विरल सूखे खेतों पर बरस रही है ज्वाला भारी, चक्रवात, लू गरम-गरम से झुलस रही है क्यारी-क्यारी, चमक रहा सविता के फैले प्रकाश से व्योम-अवनि-आँगन! डॉ. महेंद्र भटनागर... या जगातील आद्य कवि असे नक्की कुणाला म्हणता येईल देवच जाणे. पण ज्याने कोणी पहिली कविता लिहीली असेल त्याचे खरोखर प्रचंड उपकार मानले पाहिजेत. प्रसंग, घटना कितीही त्रासदायक असो तिचा दाह कमी करण्याची ताकद कवितेत आहे, असते. वरील कविताच पाहा ना. सरळ सरळ जर तापलेल्या रणरणत्या उन्हाने धरा तप्त झालेली आहे. शेते सुकून चालली आहेत.

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ६)

लेखनविषय:
लेखनप्रकार
आगमन निर्गमन आणि पुनरागमन ह्या तीन संकल्पना आपण कुठल्याही समाजाला किंवा असामान्य आणि सामान्य व्यक्तींच्या आयुष्याला लावून पाहू शकतो. जेव्हा समाज किंवा व्यक्ती आगमन, निर्गमन किंवा पुनरागमानापैकी कुठल्याही एका वादळात सापडतात तेव्हा त्या वादळाला त्यांनी ज्या प्रकारे तोंड दिले त्यावरून त्यांचा भविष्यकाळ ठरतो. आगमन म्हणजे आक्रमण नव्हे. आक्रमण ही एक लष्करी चाल आहे. याउलट आगमन म्हणजे प्रस्थापित मोठ्या लोकसमूहात आलेले नवीन विचार. हे नवीन विचार समूहांतर्गत घटकांकडून येऊ शकतात किंवा समूहबाह्य व्यक्तींकडूनदेखील येऊ शकतात.

आगमन, निर्गमन आणि पुनरागमन (भाग ५)

लेखनविषय:
लेखनप्रकार
भारतात इंग्रजांचे, मिशनऱ्यांचे, वसाहतवादाचे, भांडवलवादाचे आणि आधुनिक विज्ञानाचे आगमन जवळपास एकाच वेळी झाले. त्यावेळी भारतीय समाज कसा होता? परमार्थाच्या आवरणाखाली लपवलेला पण सदासर्वकाळ जागृत असलेला स्वार्थ; पुनर्जन्म संकल्पनेतुन स्वकेंद्री बनलेल्या व्यक्तींच्या छोट्या छोट्या वर्तुळांचा बनलेला समाज; जन्माधारीत जातीव्यवस्थेतून तयार झालेली शोषणमूलक समाजव्यवस्था; दैवतीकरण, बालविवाह, हुंडा व सतीप्रथा या सर्वांतून होणारे स्त्रीशोषण आणि कामसूत्राचा इतिहास असूनही लैंगिक संबंधांमध्ये असलेला चोरटेपणा; हे सर्व आपले पूर्वसंचित होते.
Subscribe to आस्वाद