सुरेखाच्या घरी पोचलो.टिपिकल कोकणातले घर.बाहेर अंगणात मांडव टाकलेला.गडग्याला लागून गावठी गुलाबाची लाल आणि गुलाबी झाडे,तगर ,अनंत, तीन चार रंगाच्या कण्हेरी,तीन चार रंगाच्या जास्वंदी,अबोली,मोगरा,मधुमालती,सदाफुली अशी फुलझाडे आणि चिकू, जाम,आंबे,पेरू, जांभूळ,आणि नारळ अशी फळझाडे होती त्यामुळे अंगणात गारवा.खुर्च्या टाकलेल्या होत्या.आम्ही तिथेच बसलो तिला सगळी कथा सांगितली. “असा वैताग आणला आहे ग मेल्याने.भिकारीच जसा.काहीना काही घेतल्याशिवाय रहात नाही.”सुरेखा संतापाने बोलली.