मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

महिलादिन

कर्नलतपस्वी ·
हे वेगवेगळे दिन थोतांड वाटतात, पटत नाही, जर प्रकृती पुरुष एकमेकांना पुरक मग एकाचाच उदोउदो का। माणसाने माणसा सारखे वागावे एवढीच अपेक्षा महिलादिन दाखवण्याचे दात वेगळे जगण्याची ऱीत आगळी जागतीक महिलादिनी मोजा किती आसवं गळली किती चढल्या बोहल्यावरी किती ठरल्या हुंडाबळी असल्या कसल्या रितीभाती कधी तुडवे पायतळी तर कधी घेई डोईवरी सारे दिवस थोतांड उद्दमींचे कुभांड तुबंडी भरण्यासाठी एक दिवसांचे खोटे पण नको दिन नको सण रावा माणसागत सारे नको उत्सव दिनांचा मला माझी जागा द्यारे...... ८-३-२०२१

तप्तमुद्रा

अनन्त्_यात्री ·
जेव्हा निर्मम कठोर आसमंतात दाटले तेव्हा अनाहत आत खोलवर निनादले अनाघ्रात अदृृष्टाची जाणवली रूणझुण स्पर्श,गंध,रस, रंग एक झाले कल्लोळून आकलनाच्या कवेत आले-आलेसे वाटले अज्ञेयाच्या धुक्यामध्ये नकळत वितळले जाणिवेची नेणीवेशी जेव्हा थेट भेट झाली जुन्या जखमेच्या जागी तप्तमुद्रा उमटली

शायरी..

अत्रुप्त आत्मा ·

प्रचेतस 12/12/2020 - 10:50
क्या बात है अत्रुप्तजी आत्मा, किती सहज सुंदर लिहिलंत.
पाना फुलांवरूनी, फिरतो कधी जरासा? शायरीचा मम मनाला, यत्किंचित गन्ध नाही!
एखाद्या भ्रमराला जसा पानाफुलांवर फिरुन फिरुनही जसा शायरीचा गंध येत नाही तद्वतच फुलापानांच्या रांगोळीत प्राविण्य मिळवलेल्या कवीला शायरीचा गंध नाही हे मोठ्या खुबीने उलगडून दाखविले आहे.
शब्दांवरी जरासा, आहे लोभ मनाचा सहसा तसा तयांना, मी हात लावत नाही!
इथं तर खुद्द कवीने आपल्याला कमीपणा घेतलेला आहे. वास्तविक कवीची शब्दांवर प्रचंड हुकूमत आहे. कवी सहज बोलतानाही गद्याचे पद्य करत असतो तरीही कवी शब्दांवर लोभ असूनही त्यांचा वापर करत नाही असे विनयाने म्हणत आहे. : :
भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही? ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही!
कवी म्हणतोय मी शायरीला भेटेन मात्र कधी, कसा ते ठाऊक नाही, म्हणजेच त्यालाही शायरी सुचेल पण कधी, कशी ते ठावकी नाही. माझी वाट तर कवितेची आहेच पण (शायरी ही काव्यातच अंतर्भूत असूनही) शायरीच्या वाटेला कवी क्वचितच जाईल हे कवीने मोठ्या तरलतेने येथे उलगडून दाखवले आहे.

प्रचेतस 12/12/2020 - 10:50
क्या बात है अत्रुप्तजी आत्मा, किती सहज सुंदर लिहिलंत.
पाना फुलांवरूनी, फिरतो कधी जरासा? शायरीचा मम मनाला, यत्किंचित गन्ध नाही!
एखाद्या भ्रमराला जसा पानाफुलांवर फिरुन फिरुनही जसा शायरीचा गंध येत नाही तद्वतच फुलापानांच्या रांगोळीत प्राविण्य मिळवलेल्या कवीला शायरीचा गंध नाही हे मोठ्या खुबीने उलगडून दाखविले आहे.
शब्दांवरी जरासा, आहे लोभ मनाचा सहसा तसा तयांना, मी हात लावत नाही!
इथं तर खुद्द कवीने आपल्याला कमीपणा घेतलेला आहे. वास्तविक कवीची शब्दांवर प्रचंड हुकूमत आहे. कवी सहज बोलतानाही गद्याचे पद्य करत असतो तरीही कवी शब्दांवर लोभ असूनही त्यांचा वापर करत नाही असे विनयाने म्हणत आहे. : :
भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही? ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही!
कवी म्हणतोय मी शायरीला भेटेन मात्र कधी, कसा ते ठाऊक नाही, म्हणजेच त्यालाही शायरी सुचेल पण कधी, कशी ते ठावकी नाही. माझी वाट तर कवितेची आहेच पण (शायरी ही काव्यातच अंतर्भूत असूनही) शायरीच्या वाटेला कवी क्वचितच जाईल हे कवीने मोठ्या तरलतेने येथे उलगडून दाखवले आहे.
पाना फुलांवरूनी, फिरतो कधी जरासा? शायरीचा मम मनाला, यत्किंचित गन्ध नाही! शब्दांवरी जरासा, आहे लोभ मनाचा सहसा तसा तयांना, मी हात लावत नाही! अर्थास प्राप्त होता,शब्दास जाग यावी ऐश्या प्रभावितेची,मी साक्ष मागत नाही! मी सहजतेचा प्रवासी,असतो तिच्याचपाशी रचनेत हाव रचितेची ,अशीही मनात नाही! जावे तिच्या कुशीशी,घेऊन ऊब यावे सहजता माऊली ही, असते मनात माझी! भेटेन मात्र आता, पुन्हा कधी? कसाही? ही वाट मात्र माझी,नेहमीचीच नाही! अतृप्त... ०====०====०====०====०====०====०====

आठवण

Prajakta Sarwade ·
परडीत काढुन ठेवला मोगरा तरी हातास सुगंध तसाच राही कितीतरी वेळ तसचं तुला स्मरुन लिहलं मी काही तरी शब्दास सुगंध तुझाच राही कितीतरी वेळ -प्राजक्ता

पान खाता खाता आठवतं काहीबाही..

प्राची अश्विनी ·

Bhakti 10/08/2020 - 15:21
क्या बात!! पान खाता खाता आठवतं असंच काहीबाही.. विड्याचा रंग काही उगाचच चढत नाही.. भारीच !!

सत्यजित... 10/08/2020 - 22:27
एवढं सहज सोप्पं लिहिणं! माझी आज्जीही पान खात असे.तिच्यासोबत घालवलेलं माझं बालपण भर्रकन डोळ्यासमोर येवून तरळत राहिलं.

Jayant Naik 13/08/2020 - 11:26
प्रसंग आणि व्यक्ती समोर उभे करायची ताकद तुमच्या लेखणीत आहे. मस्त .

Bhakti 10/08/2020 - 15:21
क्या बात!! पान खाता खाता आठवतं असंच काहीबाही.. विड्याचा रंग काही उगाचच चढत नाही.. भारीच !!

सत्यजित... 10/08/2020 - 22:27
एवढं सहज सोप्पं लिहिणं! माझी आज्जीही पान खात असे.तिच्यासोबत घालवलेलं माझं बालपण भर्रकन डोळ्यासमोर येवून तरळत राहिलं.

Jayant Naik 13/08/2020 - 11:26
प्रसंग आणि व्यक्ती समोर उभे करायची ताकद तुमच्या लेखणीत आहे. मस्त .
पान खाता खाता आठवतं काहीबाही.. हिरव्या कंच पानाचा देठ नखंलताना आज्जी म्हणायची, "स्वस्ताई होती तेव्हा... दोन रुपयांना हेss पोतंभर तांदूळ. ओंजळीनं घ्यायचो तपेल्यात... वाटी वगैरे नाही आत्तासारखं.." पान मांडीवर पसरायची, सुरकतलेल्या हातात अडकित्ता घ्यायची, "चोर पकडले जायचे, शिक्षा व्हायच्या... आत्तासारखं नाही." चंचीतली सुपारी आडकित्त्यावर अलवार कातरायची ती.. पानावर चुन्याचं अल्लद बोट लागायचं, त्यावर कात सुपारी मांडत म्हणायची, "इंग्रज गेले आणि सगळी शिस्त गेली. शिस्त गेली तशी स्वस्ताई गेली." पानाची घडी करून ती तोंडांत सारून ती पुढे सांगायची, "पूर्वी पानात केशर घालायचे मी.

सुशांत

अनन्त्_यात्री ·
नव्हते जेव्हा पाहत कुणिही ... रडलो होतो झगमगताना पायतळीच्या अंधारी... तगमगलो होतो बेमालुमसा प्रतिमेमागे... दडलो होतो उजेड नाकारून अंधारा... भिडलो होतो श्रेयस प्रेयस तुंबळात.. सापडलो होतो रुजताना उन्मळलो... का मी किडलो होतो?

ती अन् पाऊस..

मन्या ऽ ·

गणेशा 19/05/2020 - 08:40
आता वाट पाहते आहे ती येत्या आषाढसरींची अगदी आभाळासारखंच तिच मनही भरुन आलंय आता गरज आहे फक्त एकदा धो-धो कोसळण्याची! +101 वाचत आहे... लिहीत रहा...

गणेशा 19/05/2020 - 08:40
आता वाट पाहते आहे ती येत्या आषाढसरींची अगदी आभाळासारखंच तिच मनही भरुन आलंय आता गरज आहे फक्त एकदा धो-धो कोसळण्याची! +101 वाचत आहे... लिहीत रहा...
ती अन् पाऊस.. खूप दिवस झाले आता पावसात चिंब चिंब भिजून भरलेलं सावळ ते आभाळ नजरेत सामावणारी ती भिजावं का थोडतरी? ह्या येत्या पावसात चिंब चिंब घेऊ न्हाऊन असा विचार करणारी ती गेले कित्येक दिवस दिवस? छे!