मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? [गायकवाड प्रकरण]

अत्रे · · काथ्याकूट
चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे (http://www.hindustantimes.com/india-news/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh-may-bring-privilege-motion-over-mp-ravindra-gaikwad-on-no-fly-list/story-5aYaUj9cwxRup9US7FiteL.html) माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?

वाचने 95679 वाचनखूण प्रतिक्रिया 592

लोनली प्लॅनेट Mon, 03/27/2017 - 11:51
या मूर्खाला कोणाही उस्मानाबाद करांचा अजिबात पाठिंबा नाही लोकसभा निवडणुकीच्या वेळी केवळ मोदींना पंतप्रधान करायचे म्हणून याला निवडून द्यावे लागले होते आणि हि याची पहिली आणि शेवटची टर्म. आणि काहीही झाले तरी नेत्यांचे चेले आणि त्या त्या पक्षाचे वेठबिगार बंद ची घोषणा करतातच, त्याला कोणीही भीक घालत नाही

In reply to by अत्रे

हे असे "मूर्ख" वगैरे विशेषणे वापरुन प्रतिसाद लिहिणे आणि त्यावर दुसऱ्या सभासदाने उघडपणे समाधान व्यक्त करणे इत्यादी मिपाच्या पॉलिसीजमधे मान्य आहे का?

In reply to by शार्दुल_हातोळकर

मोदक Mon, 03/27/2017 - 23:48
अहो इथे मुख्यमंत्र्यांनाही हरामखोर म्हटले गेले आहे. मग मूर्ख वगैरे एकदम सामान्य गोष्टी आहेत.

In reply to by मोदक

मला इथे लक्षात येताच मी संपादकांच्या निदर्शनास आणुन देण्याचा प्रयत्न केला. पण एकुणच चर्चा ही निकोपच व्हायला हवी. गलिच्छ भाषा वापरणे फार काही अवघड नसते. शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म हाताशी मिळाला म्हणजे काहीही मनाला येईल ते आक्षेपार्ह भाषेत लिहिण्याचा अधिकार लोकांना प्राप्त होत नाही!

In reply to by शार्दुल_हातोळकर

अत्रे Tue, 03/28/2017 - 05:19
भाषेबद्दल जो निर्णय सम्पादक घेतील तो योग्यच असेल. पण लोकांना चपलेने मारणाऱ्या खासदारांना शब्दांचा मार तरी नागरिक म्हणून देता यावा.

In reply to by अत्रे

खाली "अभ्या..." यांनी दिलेल्या प्रतिसादात ते प्रस्तुत संसद सदस्यांच्या मतदारसंघातीलच आहेत हे सांगितले आहे आणि त्यांची मते स्पष्ट नमूद केली आहेत. यावरुन ग्राउंड लेव्हल वर प्रस्तुत संसद सदस्यांबद्दल तिथल्या लोकांचे साधारण मत काय आहे हे प्रतित होते. याउलट इथे वर "लोनली प्लॅनेट" या आयडीने आक्षेपार्ह भाषेत मत नोंदवताच तुम्ही प्रस्तुत आयडीची व्यक्ती उस्मानाबाद मतदारसंघातील आहे किंवा नाही हे न विचारताच "धन्यवाद. ऐकुन बरे वाटले" असे मत नोंदवले. यावरुन हे स्पष्ट दिसते आहे की केवळ उस्मानाबादच्या लोकांचे मत जाणुन घेणे हा तुमचा निस्पृह हेतु नव्हता तर तुमच्या मनात या प्रकरणाबद्दल पुर्वग्रहदुषित एकांगी भूमिका होती. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही त्या विमान प्रकरणाचे प्रत्यक्ष साक्षीदार नसताना आणि अधिकृतरित्या नक्की चुक कोणाची होती/कोणी कोणास भडकवुन प्रकरण या थरास नेले हे कळालेले नसताना, गलिच्छ आणि आक्षेपार्ह भाषेतील प्रतिसादास सहमती दाखवुन मोकळे झालात. उद्या विमान कंपनीच्या लोकांनी चुकीचे वर्तन करुन संसद सदस्याला कठोर भूमिका घेण्यास भाग पाडल्याचे अधिकृतरित्या सिद्ध झाल्यास तुम्ही स्वतः इथे मिपावर आक्षेपार्ह भाषेबद्दल बिनशर्त माफी मागणार आहात काय? मिपाचा असा गैरवापर होणे अत्यंत चुकीचे आहे. अर्थात संपादक त्याबद्दल निर्णय घेतीलच!

In reply to by अत्रे

तुम्ही अत्यंत सोयिस्कररित्या मी वरच्या प्रतिसादात विचारलेल्या प्रश्नाला बगल देत आहात. त्यापेक्षा स्पष्ट उत्तर द्याल तर बरे होईल.

In reply to by शार्दुल_हातोळकर

अभ्या.. Tue, 03/28/2017 - 12:35
ते तर आहेच. असल्यांकडून माफीचीही नाही अन आभाराचीही अपेक्षा नाही. त्यांनी स्वतःच सांगितलेय. शाब्दिक राडा घालायसाठीच आहेत ते फक्त.

In reply to by शार्दुल_हातोळकर

अत्रे Tue, 03/28/2017 - 12:47
ओके, देतो तर उत्तर. १. अभ्या यांच्या प्रतिसादाला पण मी उत्तर दिले होते, तो प्रतिसाद दुर्लक्षित केला नाही (पुन्हा वाचा). आणि लोन्ली प्लॅनेट यांच्या प्रतिसादात त्यांची म्हटले होते कि "याला निवडून द्यावे लागले" - वाचून मला वाटले कि हे ही तिकडचेच असतील. आणि मला "हे पुन्हा निवडून येणार नाहीत" हे ऐकून आनंद झाला होता - नुसतं "मूर्ख" वाचून नाही. २.
उद्या विमान कंपनीच्या लोकांनी चुकीचे वर्तन करुन संसद सदस्याला कठोर भूमिका घेण्यास भाग पाडल्याचे अधिकृतरित्या सिद्ध झाल्यास तुम्ही स्वतः इथे मिपावर आक्षेपार्ह भाषेबद्दल बिनशर्त माफी मागणार आहात काय?
त्याचं कसंय.. मी हे मुळीच मनात नाही कि कोणी शिवीगाळ केली तरी आपल्याला शारीरिक मारहाण करण्याचा अधिकार नसतो. हे तुम्हाला मान्य आहे का - हो कि नाही - हे सांगा. आणि केली मारहाण तर माफी ही मागितलीच पाहिजे. हे तुम्हाला मान्य आहे का - हो कि नाही - हे सांगा. ३. समजा उद्या सिद्ध झाले कि एअर इंडिया वाल्यांनी त्यांना आधी शारीरिक मारहाण केली होती - तर मी स्वतःहून असे नमूद कारेन कि वृत्त माध्यमांनी पूर्ण चित्र दाखवले नाही. पण मी वापरलेले "चप्पलमार" वगैरे शब्द मग मी एअर इंडिया वाल्याना पण वापरेन - पण म्हणून गायकवाड यांना सूट देण्यात काहीच बरोबर नाही. माझा राग यावर आहे कि गायकवाड माफी न मागता नाक वर करून फुशारकी करतात.

In reply to by अत्रे

अत्रे Tue, 03/28/2017 - 12:53
टायपिंग मिस्टेक - "अधिकार असतो" - असे वाचा. थोडक्यात चप्पलमार माणसाला चप्पलमार म्हणण्याबद्दल माफी कसली मागायची? पण त्यांना शारीरिक मारहाण झाल्याचे सिद्ध झाल्यास एवढे मान्य कारेन की चूक एकट्याची नव्हती.

In reply to by अत्रे

अत्रे साहेब, माझा मुळ आक्षेप अयोग्य आणि एकेरी भाषेबद्दल होता हे मी अगदी स्पष्टपणे मांडलेले आहे. लोनली प्लॅनेट यांच्या प्रतिसादात तुम्हाला लोकनियुक्त संसद सदस्याबद्दलची एकेरी आणि अपमानास्पद भाषा आक्षेपार्ह वाटली नाही का? शिवाय खाली तुम्ही औरंगाबादचे आहात असे नमूद केले आहे आणि उस्मानाबादच्या लोकांना विचारताय म्हणजे तुम्हाला स्वतःला प्रस्तुत संसद सदस्यांच्या मतदारसंघाबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल तसेच लोकसंपर्काबद्दल अजिबात माहिती नाही हे स्पष्ट दिसते आहे. मग अशा स्थितीत तुम्ही लोनली प्लॅनेट यांच्या संपुर्ण प्रतिसादाशी उपलब्ध माहितीची कुठलीही पडताळणी न करता सहमत कसे काय झालात नव्हे उघड उघड आनंद व्यक्त कसा केलात? शिवाय तुम्ही म्हणताय की माफी न मागता एवढेच मान्य करेन की चुक एकट्याची नव्हती. अत्रे साहेब हे जगजाहीर आहे की टाळी कधी एका हाताने वाजत नसते. त्यासाठी असा स्वतंत्र धागा काढण्याची काही आवश्यकता नव्हती. शिवाय संबंधित आक्षेपार्ह प्रतिसादाला सहमती दर्शविणे म्हणजे त्या लोकसभा मतदारसंघातील त्यांना निवडुन देणाऱ्या १०-१२ लाख लोकांना तुम्ही नक्की काय समजत आहात? (जरा शोधुन पाहा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ उस्मानाबाद, सोलापुर आणि लातुर या तीन जिल्ह्यात विखुरलेला आहे, मग अशा ठिकाणी निवडुन येणे किती अवघड असेल ते)

In reply to by अत्रे

माझी मते स्पष्ट आहेत. मारहाण करणे हे कायद्याच्या दृष्टीकोनातुन चुकच. मी त्या गोष्टीचे कुठेही समर्थन केलेले नाही. पण तुम्ही या संपुर्ण प्रकाराची सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत नाही. शिवाय विमान कंपनीच्या लोकांच्या वर्तनाबद्दल तुम्ही तुमचे म्हणने मांडलेले नाही. या धाग्यावर देखील काही व्हिडिओ च्या लिंक्स दिल्या गेल्या आहेत तसेच काल मराठी न्युज चॅनेलवर पाहण्यात आले की विमान कंपनीच्या लोकांचे वर्तन कसे चुकीचे होते आणि त्यामुळेच ठिणगी पडुन संसद सदस्यांनी कठोर भुमिका घेतली. तुम्ही याबाबतीत updated नाही आहात काय? शिवाय संसद सदस्यांनी माफी मागावी की नाही हे माझ्या अखत्यारित नाही, तसेच तत्वतः माफी मागायला हवी की नाही ते मा. न्यायालयाच्या निकालानंतरच सामान्य माणसाला ठरविता येईल. पण तुमच्या उघड आणि अयोग्य भाषेच्या समर्थनाबद्दल माफी मागायची की नाही हे तुम्ही नक्कीच ठरवु शकता. शिवाय आपली चुक मान्य करुन माफी मागण्यात कमीपणा कसला? मला वाटते की तुमच्या प्रश्नांची मी अतिशय सुस्पष्ट उत्तरे दिली आहेत. आता माझी तुम्हाला विनंती आहे की मुळ अयोग्य भाषेचा मुद्दा सोडुन अधिकचे प्रतिप्रश्न उपस्थित करुन विषय भरकटवु नये.

In reply to by शार्दुल_हातोळकर

मोदक Tue, 03/28/2017 - 10:02
शिवाय मिपासारखा प्लॅटफॉर्म हाताशी मिळाला म्हणजे काहीही मनाला येईल ते आक्षेपार्ह भाषेत लिहिण्याचा अधिकार लोकांना प्राप्त होत नाही! हेच आणि असेच लोकांना नोटाबंदी झाल्यापासून सांगत आहे, पण पटतच नाही. बिन्धास्त खोटी माहिती देतात, चुकीच्या लॉजिकचे ट्रक फिरवतात, यांवर आपण उत्तरे दिली की मिपाकरांवर निखालस खोटी टीका करायची आणि ते ही उलटले की पळ काढणे आणि सोयीस्कर निवृत्ती स्वीकारणे आहेच.

In reply to by मोदक

ते ही उलटले की पळ काढणे आणि सोयीस्कर निवृत्ती स्वीकारणे आहेच.
ख्या ख्या ख्या हे लोकं ऑलिंपिक मधे प्लॅटिनम मेडल मिळवुन देतील एवढ्या पटकन पळतात बरं का रे. वरनं त्यांची एक्सक्युझेस ऐकणं रोचक प्रकार असतो. जनरली प्रत्येक गोष्टीमधलं आपल्यालाचं कळतं अशी वाटणारी माणसं ह्या क्याटेग्रीत बसतात (किंवा पळ काढतात). =))

In reply to by मोदक

अहो इथे मुख्यमंत्र्यांनाही हरामखोर म्हटले गेले आहे. मग मूर्ख वगैरे एकदम सामान्य गोष्टी आहेत.
माझ्याबद्दल बोलत असाल तर मी सर्व हिंदी मिडियावाल्यांना हरामखोर म्हटलं आहे,,,,,,,,बाकि कोणाबद्दल बोलत असाल तर i don't know.

अत्रे Mon, 03/27/2017 - 12:32
Shiv Sena MP Anandrao Adsul raises the issue of airlines banning his party MP Ravindra Gaikwad after the latter brutally thrashed an Air India staff. He also says actor Kapil Sharma too misbehaved with an airline staff earlier. But he was not banned. They why ban an MP?
लिंक वा! काय लॉजिक आहे! चोर तो चोर वर शिरजोर. यांना परत बालवाडीत पाठवायला पाहिजे. असली स्पष्टीकरणे तिथेच शोभतील. सामान्य लोकांपेक्षा खासदारांकडून कडून अधिक अपेक्षा करू नाही शकत का आपण?

In reply to by अत्रे

तुम्ही या प्रकरणाची नीट माहिती घ्यावी असे वाटते. खालील लिंक कामाला येते का ते बघा. ताज्या घडामोडी या धाग्यवर बरीच चर्चा झाली आहे ती पण वाचावी. http://www.loksatta.com/desh-videsh-news/raveendra-gaikwad-shivsena-mp-air-india-sukumar-air-hostess-1440530/ माध्यमे दाखवतात तेच खरे हेच मानून स्वतःची टोकाची मते मांडण्यात काय हशील? आणि उस्मानाबादमध्ये त्यांना आहेच पाठिंबा! उगाच मोदींसाठी त्यांना निवडून दिले वगैरे कारणे फोल ठरतात. २००९ च्या लोकसभेला मोदी नसताना, भाजपचा छुपा विरोध असताना आणि बार्शीसारखा मोठा भाग (जो काँग्रेस राष्ट्रवादीच्या पारड्यात पडणार होता) नवीन जोडला असताना देखील रवी गायकवाडांचा पराभव हा फक्त ६-७ हजाराच्या फरकाने झाला होता (पद्मसिंह पाटील आणि रवी गायकवाड दोघानांही ४ लाखांपेक्षा जास्त मते मिळाली होती). इथे कायद्याच्या दृष्टीने दोघेही चोर आहेत. तेव्हा चोर ते चोर वगैरे गैरलागू आहे. विमान कंपन्यांचा "नो फ्लाय" हा उद्दामपणा अजिबात खपवून घेतला जाऊ नये. कुठल्या कायद्याने नो फ्लाय लागू करण्यात आलाय? खासदारांना दाद लागू न देणाऱ्या कंपन्या सामान्य माणसांना काय दाद देणार?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

अत्रे Mon, 03/27/2017 - 15:16
धन्यवाद. लिंक वाचली. दोन प्रश्न १. गायकवाड यांनी चप्पल मारली कि नाही ? हो किंवा नाही मध्ये उत्तर द्या. (त्यांनी स्वतः काबुल केले आहे) २. विमान कंपन्यांचा "नो फ्लाय" हा उद्दामपणा अजिबात खपवून घेतला जाऊ नये. कुठल्या कायद्याने नो फ्लाय लागू करण्यात आलाय? याचे उत्तर खाली मिळेल
12:18 pm: Minister of Civil Aviation Ashok Gajpati Raju responds. "I just want to put things in right perspective. **Around November 2014, there was a lot of discussion on demeanor of the passengers. Any passenger whose demeanor is bad is stopped from travelling now**. An MP is also a passenger, we can't have unequal treatment to people of different classes, we need to keep safety in mind, can't compromise safety of airlines," says the Aviation Minister.
http://www.thehindu.com/news/national/live-updates-from-budget-session-in-lok-sabha-and-rajya-sabha/article17671359.एके समजा तुम्ही हॉटेल मध्ये जाऊन वेटर ला चपलेने बडवले तर हॉटेल ने का म्हणून तुम्हाला परत आत घ्यावे? कॉमन सेन्स ची गोष्ट आहे.

In reply to by अत्रे

गॅरी ट्रुमन Mon, 03/27/2017 - 15:28
An MP is also a passenger, we can't have unequal treatment to people of different classes
यापुढे जाऊन जर आमदार,खासदार,मंत्री अशा पदावर असलेल्या व्यक्तीने असा बेजबाबदारपणा केला तर त्याला त्याच बेजबाबदारपणासाठी सामान्य माणसाला असेल त्यापेक्षा अधिक कडक शिक्षा हवी असे मी म्हणेन. तुम्ही जर का लोकप्रतिनिधी असाल तर तुमच्या वर्तनातून लोकांपुढे आदर्श निर्माण केला पाहिजे.जर असे वर्तन लोकप्रतिनिधींचेच असेल तर ते कसे चालेल? बाकी जर का त्या कर्मचार्‍याने रवी गायकवाडांना 'तू एम.पी असशील तर तुझ्या घरचा. नियम म्हणजे नियम' असे म्हटले असेल तर तो कर्मचारी अभिनंदनास पात्र आहे. असल्या बेमुर्वत लोकप्रतिनिधींना चाप लावायचे धाडस दाखविणे ही साधी गोष्ट नाही. या पेंग्विनसेनेची आणि त्यांच्या समर्थकांची नेहमी मजा वाटते. एकीकडे सतत शिवाजी महाराजांचा घोषा लावायचा. पण त्याच शिवाजी महाराजांच्या मावळ्याने 'परवलीचा शब्द माहित नसेल तर तुम्ही प्रत्यक्ष शिवाजी महाराज जरी असलात तरी गडाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडणार नाही' असे म्हटले होते अशी गोष्ट आहे. म्हणजे कोणीही-- अगदी स्वतः स्वराज्याचे संस्थापक छत्रपतीही नियमावर नाहीत हा छत्रपतींचा आदर्श होता. त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून शिवसेनेचा एम.पी म्हणजे मानवजातीचे कल्याण करायला आकाशातून टपकला आहे अशी धारणा करून घेऊन वर उद्दामपणाचे समर्थन करायचे आणि त्याचवेळी त्याच शिवाजीमहाराजांच्या नावाचाही जप करायचा!! आणि यात काही विसंगती आहे हे पण त्यांच्या गावी नसते. मागे शिवसेनेच्या एका कार्यकर्त्याने असेच काहीतरी झाले म्हणून ट्रॅफिक पोलिसाला थोबडावला होता. तर या खासदाराने एअर इंडियाच्या कर्मचार्‍याला मारहाण केली आहे. सामान्य शिवसैनिक ते खासदार अशी प्रगती झाल्यावर कोणाला थोबडावायचे यातही प्रगती व्हायला नको का? उंचे लोग उंची पसंद!!

In reply to by गॅरी ट्रुमन

ट्रुमन साहेब, मुजोर नेते आणि मुजोर बाबू लोक याना चाप लावण्यासाठी कानाखाली मारली तर त्याला सहानुभूती मिळते हि परिस्थिती आली आहे हे खरे आहे. पण त्याचे असे सरसकटीकरण योग्य नाही. गायकवाड शांतपणे बोलत असताना सुकुमार यांच्याकडून काहीतरी वाक्य गेल्याचे ती हवाई सुंदरी म्हणते आहे. मी माझ्या माहितीनुसार अरेरावी करून तू एमपी असशील तर घरचा आणि मोदींकडे तक्रार करेन हे ते वाक्य असावे असे म्हटले होते. वास्तविक वेबवरलया काही प्रतिक्रियांमध्ये हा टर्निंग पॉईंट म्हणजे गायकवाडांना "आईवरून शिवी" असल्याचे ऐकले आहे. विडिओत ते ऐकूही येतेय असे काही लोकांचे म्हणणे आहे. मी तो व्हिडीओ पाहून काही माहिती मिळतेय का ते पाहायचा प्रयत्न करतो. पण मुद्दा हा आहे कि या प्रकरणातल्या गायकवाडांच्या बाजूच्या बऱ्याच गोष्टी ह्या सरळ सरळ दुर्लक्ष करण्यात येत आहेत त्याचे एकमेव कारण ते शिवसेनेचे आहेत हे भासते. चप्पल ने मारणे हा कायद्याने गुन्हा आहेच आणि त्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच आहे. ती प्रक्रिया हि कायद्याने दोन माणसातील भांडण ह्या प्रकारेच हाताळली जायला हवी. विरोधाला विरोध करायचा म्हणून काहीही उदाहरणे देऊन कसे चालेल? वर एक हॉटेलचे उदाहरण पहिले आपण. एका हॉटेल मध्ये जर तिथल्या वेटरने अपशब्द वापरले आणि त्यातून बाचाबाची झाली तर शहरातल्या सर्व हॉटेल्सनी आपल्यावर बंदी टाकावी? मोगलाई आहे का ही? कि सगळे राजकारणी म्हणजे गलिच्छ आणि समाजातील इतर घटक चांगले हे गृहीतच धरून चालायचे? नेत्यांच्या (एकुणात एकूण सगळ्या पक्षांच्या, एकही सोडून नाही) उद्दामपणाची हजारो उदाहरणे सांगता येतील आणि दररोज डोळ्यासमोर दिसतात. पण फक्त शिवसेनेचेच तसे आहे म्हणून त्यांना धारेवर धरण्यात काय अर्थ आहे? शिवाजी महाराजांचे नाव न घेणारा कुठला पक्ष आहे का आता? शिवाय नाव घेऊन ते छत्रपतींचा आदर्श पाळणारा आहे का कुठला पक्ष? त्या गोष्टी त्या त्या नेत्यांचं वैयक्तिक प्रकरण गृहीत धरून कायद्याने का सोडवलं जाऊ नये?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

अत्रे Mon, 03/27/2017 - 16:09
वास्तविक वेबवरलया काही प्रतिक्रियांमध्ये हा टर्निंग पॉईंट म्हणजे गायकवाडांना "आईवरून शिवी" असल्याचे ऐकले आहे. विडिओत ते ऐकूही येतेय असे काही लोकांचे म्हणणे आहे. .
याची लिंक देता का? फेसबुक वर वाचले का रेडिट? तुमचं (शिवसेना पॉईंट) म्हणणं थोडाफार पटतं. कारण त्यांची प्रतिमाच तशी झालेली आहे. शिवसेनेला खळ्ळखट्याक आणि राडा करण्याची हौस असते. यावेळी त्यांचे शिलेदार चांगले कायद्याच्या कचाट्यात अडकले, म्हणून मला (आणि माझ्यासाख्या शांतताप्रिय नागरिकाना ) पर्सनली फार आनंद झाला आहे हे मीही मान्य करतो.

In reply to by अत्रे

अभ्या.. Mon, 03/27/2017 - 16:15
शिवसेनेला खळ्ळखट्याक आणि राडा करण्याची हौस असते.
बोर्डावर ऑलरेडी एक धागा चालू असताना उस्मानाबादचे सेपरेट नाव घेऊन राडा करायच्या तुमच्या हौसेचे कारण कळले नाही अद्याप.

In reply to by अत्रे

अभ्या.. Mon, 03/27/2017 - 16:22
बरं बरं. मग चालूद्या काय होत नसंल तर. . बरं झालं च्यायला तुम्ही सांगितलं ते. लक्षच द्यायला नाय पायजे.. मायची किटकिट

In reply to by गणामास्तर

बॅटमॅन गुरुवार, 04/13/2017 - 00:09
नायतर काय भेंडी. नामांतर नामांतराच्या नावाने बोंबलणार्‍यांना म्हणा अगोदर उस्मानाबादचं धाराशिव करा. औरंगाबादेचं नंतर पाहता येईल. धाराशिव म्हणणारी लोकं अजून जिवंत आहेत. ते नाव रिस्टोअर केले तर उलट भारी होईल पण त्याला ग्लॅमर नाही ना. शिवसेनावाल्यांच्या डोक्यात हे शिरेल का?

In reply to by अत्रे

याची लिंक देता का? फेसबुक वर वाचले का रेडिट?
हे तुम्ही खोचकपणे विचारात नसाल असे गृहीत धरून उत्तर देतोय. मी काही एपपेरच्या खालच्या प्रतिक्रियांमध्ये आणि फेसबुकच्या कंमेंट्स मधेही वाचले. तूर्तास नक्की आठवत नाही कुठे ते पण म्हणूनच मी म्हणालो कि मी तो व्हिडीओ पाहून काही माहिती मिळतेय का ते पाहायचा प्रयत्न करतो. बाकी कायद्याचे कचाट्यात सापडले वगैरे केस चालून निकाल लागला तर तुमचा आनंद सार्थकी लागेल.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 16:23
गायकवाड शांतपणे बोलत असताना सुकुमार यांच्याकडून काहीतरी वाक्य गेल्याचे ती हवाई सुंदरी म्हणते आहे. हवाईसुंदरीची कहाणी फक्त लोकसत्ता व मटाच्या आंतरजाल आवृत्तीतच आहे. लोकसत्ताच्या छापील आवृत्तीत याचा उल्लेख नाही (मटाची छापील आवृत्ती वाचलेली नाही). मटा व लोकसत्ताचे शिवसेनाप्रेम सर्वश्रुत आहे. इतर वृत्तसंस्थांनी याची दखल घेतलेली नाही. दोन्ही ठिकाणी दिलेल्या बातमीत तफावत आहे. लोकसत्ताच्या बातमीत म्हटले आहे की गायकवाडांनी फक सँडल काढली होती. परंतु मटाच्या बातमीत म्हटले आहे की त्यांनी कर्मचार्‍याला सँडलने मारहाण करून विमानाच्या शिडीवरून ढकलून दिले होते. दोन्ही बातम्यात हवाईसुंदरीची ओळख लपविण्यात आली आहे. या प्रकरणात ओळख लपविण्याची अजिबात गरज नव्हती. तरीसुद्धा ओळख लपविण्यामागचा हेतू समजत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

कुंदन Mon, 03/27/2017 - 22:22
http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/i-dont-think-he-wanted-to-throw-sukumar-down-the-ladder-he-was-trying-to-build-pressure-on-senior-officials-air-hostess/articleshow/57842144.cms दोघेही आधी शांतपणे बोलत होते पण अचानकपणे काहीतरी खटका उडाला. सुकुमार यांच्या तोंडून कदाचित चुकीचे शब्द निघाले आणि गायकवाड यांचा संताप अनावर झाला.

In reply to by श्रीगुरुजी

एक अनसेन्सॉर्ड व्हिडिओ पाहिला तेव्हा गायकवाडांना उद्देशुन शिवीगाळही ऐकली आहे. जर शिवीगाळ ऐकुन किंवा परत परत तक्रारी करुन एअर इंडियाच्या लोकांनी हा प्रकार केला असेल तर लुंगीवाल्याला फोडला हेचं उत्तम. एअर इंडियाचा स्टाफ लोकांशी क्वचितचं नीट वागतो. बाकी विमानांमधल्या सुविधांबद्दल वेगळे सांगणे न लगे. अश्या परिस्थितीमधे जर का धडा शिकवण्यासाठी हे पाउल उचललं असेल तर उत्तम काम केलं गायकवाडांनी. मी शिवसैनिक अथवा शिवसेना भक्तं नाही.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

शंभर विडिओ दाखवा हो तुम्ही, काय फरक पडतो? स्वतःच्या तोंडाने फुशारक्या मारल्या ना गायकवाडांनी! मग आता परिस्थिती उलटी सिद्ध झाली तरी आम्ही मानणार नाही. बाकी ते ढिस्क्लेमर टाकल्याने काही होत नाही बरं!

In reply to by गुलाम

श्रीगुरुजी Wed, 03/29/2017 - 14:28
हा अग्रलेख ३-४ दिवसांपूर्वीच वाचला होता. स्पष्ट शब्दात टीका न करता घोळवून घोळवून गुळमुळीत शब्द वापरून अग्रलेख लिहिलेला आहे. गायकवाडांविरूद्ध प्रतिक्रिया देणार्‍यांना प्रतिक्रियाखोर असे संबोधले आहे. लोकसत्ता आणि मटा या दोन वृत्तपत्रांचे शिवसेनाप्रेम अगदी सहज लक्षात येते. ही दोन वृत्तपत्रे रोज "सामना"चे अग्रलेख आपल्या आंतरजाल आवृत्तीत छापून "सामना"ची फुकट प्रसिद्धी करत असतात. "सामना"चे अग्रलेख म्हणजे लोकमान्य टिळकांनी लिहिलेले "केसरी"तील अग्रलेख आहेत किंवा आचार्य अत्र्यांनी लिहिलेले परखड अग्रलेख आहेत अशी यांची समजूत झालेली दिसते. अगदी आजच्या लोकसत्तात सुद्धा तुमचे गुंड तुम्हीच सांभाळा; शिवसेनेचा योगी आदित्यनाथांवर निशाणा असा मथळा देऊन "सामना"च्या अग्रलेखात काय छापले आहे हे "लोकसत्ता"त प्रसिद्ध केले आहे. मटाने देखील सामनाचा अग्रलेख छापला आहे. बरं, ते नुसते "सामना"चे अग्रलेख छापून थांबत नाहीत, तर त्याबरोबर "उद्धव ठाकरेंचा मोदींना सणसणीत टोला", "शिवसेनेकडून भाजपला घरचा आहेर", "उद्धव ठाकरेंचा फडणविसांवर जबरदस्त प्रहार", "शिवसेनेचा भाजपवर निशाणा", "शिवसेनेच्या टीकेने भाजप घायाळ", "शिवसेनेचा खोचक सवाल, "उद्धव यांची टोलेबाजी", "शिवसेनेचा भाजपला रोकडा सवाल" असे कौतुकोद्गारही असतात. मराठी माध्यमात या दोन संस्थांनी गेल्या २-३ वर्षांपासून हा नवीनच विचित्र प्रकार सुरू केला आहे. या दोघांचे शिवसेनाप्रेम इतके अनावर झाले आहे की आपल्या प्रतिस्पर्ध्याची फुकट प्रसिद्धी करेपर्यंत यांची मजल गेली आहे. हे दोघे फक्त "सामना"चेच अग्रलेख पुनर्मुद्रीत करतात. "सकाळ", "लोकमत", "पुढारी" इ. वृत्तपत्रांकडे हे दुर्लक्ष करतात. कारण उघड आहे. शिवसेना हा यांच्या हृदयातील मृदु कोपरा आहे.

तिमा Mon, 03/27/2017 - 12:39
शिवसेना व भाजप हे सारखेच निर्लज्ज पक्ष आहेत. निर्ल्लज्ज्पणाच्या बाबतीत ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही पुढे गेले आहेत. ते चंद्रकांत पाटील (भाजप) म्हणत आहेत की नारायण राणे हे सर्वांना हवेहवेसे व्यक्तिमत्व आहे. समाजातला गाळच सगळा राजकीय पक्षांत गेलेला आहे. चांगली माणसे सापडणे, फार कठीण आहे.

In reply to by तिमा

मोदक Mon, 03/27/2017 - 14:41
ते चंद्रकांत पाटील (भाजप) म्हणत आहेत की नारायण राणे हे सर्वांना हवेहवेसे व्यक्तिमत्व आहे. काहीही.. भाजपाला राजकीय आत्महत्या करायची इतकी घाई का करत आहेत ते कळत नाही

In reply to by मोदक

श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 17:07
भाजप नारायण राणेंसारखा झगा स्वतःच्या गळ्यात बांधून घेईल असे वाटत नाही. नारायणे राणे मूळचे शिवसैनिक. शिवसेनेप्रमाणेच त्यांचं उपद्रवमूल्य प्रचंड आहे. अशा उपद्रवीला पक्षात घेऊन स्वत:च्या मार्गात खड्डा करण्याइतके फडणविस मूर्ख नाहीत. मोदी व फडणविस शतप्रतशत भाजप या विशिष्ट दिशेने काम करीत आहे. शिवसेनेची मुजोरी मोडून शिवसेनेला पूर्णपणे निष्प्रभ करून सोडायचे व शिवसेनेवरील किंवा इतर पक्षांवरील अवलंबित्व पूर्णपणे थांबवायचे हा त्यांचा अंतिम उद्देश आहे. परंतु चंद्रकांत पाटील, गडकरी, मुनगंटीवार इ. नेते मात्र इतर पक्षांशी जमवून घेण्याचा प्रयत्न करीत असतात. कधी गडकरी राज ठाकरेंना भेटतात, मुनगंटीवार मातोश्रीवर जाऊन कचकड्याचा वाघ भेट देतात, चंद्रकांत पाटील शिवसेनेशी जमवून घ्यायचा सल्ला देतात आणि नारायण राणेंना प्रमाणपत्र देतात. परंतु फडणविस मात्र यात न पडता पक्ष वाढविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

In reply to by श्रीगुरुजी

मोदक Mon, 03/27/2017 - 19:19
भाजप नारायण राणेंसारखा झगा स्वतःच्या गळ्यात बांधून घेईल असे वाटत नाही. मुंडेंना हलवतील असेही वाटले नव्हते.

In reply to by मोदक

श्रीगुरुजी Tue, 03/28/2017 - 15:38
चंद्रकांत पाटलांची सर्व वाक्ये न घेता फक्त एकच वाक्य घेऊन माध्यमे त्याचा कीस पाडत आहेत. चंद्रकांत पाटील असे म्हणाले होते की, "नारायण राणे शिवसेनेत परत जाणार अशा बातम्या येत आहेत. ते काँग्रेस सोडून भाजपत येणार अशाही बातम्या येत आहेत. परंतु, ते काँग्रेस अजिबात सोडणार नाहीत व ते काँग्रेसमध्येच राहतील असे काँग्रेसचे प्रवक्ते सांगत आहेत. एकंदरीत राणे हे सर्वांना हवेहवेसे वाटणारे व्यक्तिमत्व आहे.". यातील फक्त शेवटचे वाक्यच माध्यमांनी उचलले व राणेंना पक्षात घेण्यास भाजप उत्सुक आहे अशा कंड्या पिकवायला सुरूवात केली. जर त्याआधीची सर्व वाक्ये एकत्रित वाचली तर माध्यमांचा मूर्खपणा लक्षात येईल.

In reply to by श्रीगुरुजी

राणेंचा पक्ष सोडण्याचा कुठलाही विचार नसल्याचे निलेश राणेंनी आज स्पष्ट केले आहे. शिवाय माध्यमांनी हा खोडसाळपणा थांबवावा नाहीतर कायदेशीर कारवाई करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी Tue, 03/28/2017 - 20:54
इथे तर लिहिलंय की "काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री नारायण राणे दिल्ल्रीत दाखल झाल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांना पुन्हा वेग आला आहे. नारायण राणे यांनी मंगळवारी भाजप नेत्यांशी चर्चा केली असून असून केंद्रात काम करण्याची इच्छा दर्शवल्याची माहितीदेखील विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. ". राणेंना पक्षात घेणे हे भाजपसाठी आत्मघात करण्यासारखे ठरेल. राणे व त्यांचे दोन्ही चिरंजीव अत्यंत उपद्रवी, अत्यंत महत्त्वाकांशी व अत्यंत आक्रमक आहेत. मुख्यमंत्री होण्यासाठी राणे अत्यंत कासावीस झालेले आहेत. ते भाजपत आले तर ते पहिला सुरूंग फडणविसांच्या खुर्चीखाली लावतील.

अभ्या.. Mon, 03/27/2017 - 15:20
माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते.
तुम्हाला वाटत नसेल पण आहे. भरपूर आहे. सामान्यातून वर आलेलेच लोक आहेत हे. अरेरावीला अरेरावीनेच उत्तर दिलेले कळते अन अशा लढणार्‍या लोकांना सहानूभूतीच नव्हे तर फुल्ल पाठिंबा आहे. अन मोदी लाट बिट कै नै. लढाऊ वृत्तीने अन चांगल्या जनसंपर्काने निवडून आलेले हे लोक आहेत. राष्ट्रवादी अन कॉग्रेसच्या दडपशाही अन पैशाच्या राजकारणाला सेनेने अन सेनेच्याच पध्दतीने स्व. गोपीनाथरावांनी मराठवाड्यात लढा दिलेला आहे. त्या परंपरेतले आहेत. उस्मानाबाद मतदारसंघ हा मोठा आहे, त्यात सोलापूर जिल्ह्यातला बार्शी तालुका पण आहे. आता बार्शीतला सेनेचा आमदार व्हाया कॉग्रेस बीजेपी करत अस्ल्याने बार्शीतला थोडाफार विरोध वगळता सर्वत्र प्रा. रविसरांना फुल्ल पाठिंबा आहे.
मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे?
मी त्यांच्याच मतदरसंघातला आहे, आता हे सगळं सांगितल्यावरही तुम्ही विश्वास ठेवणार आहात काय? का परत माणुसकी, संस्कार वगैरे कॅसेट चालू होणारे? तसेच ऐकीव बातम्यावर विसंबून राह्यचे असेल तर बिन्धास्त चघळत बसा..

In reply to by अभ्या..

अत्रे Mon, 03/27/2017 - 15:29
धन्यवाद. मला फक्त लोकांची भूमिका जाणून घ्यायची होती. जी कि या वाक्यातून कळाली
अरेरावीला अरेरावीनेच उत्तर दिलेले कळते अन अशा लढणार्‍या लोकांना सहानूभूतीच नव्हे तर फुल्ल पाठिंबा आहे
अरेरावी करणे आणि मारहाण करणे यातला फरक लोकांना कळाला पाहिजे! आणि झाली चूक तर माफी मागा ना! वर उद्दाम मपणे जर ते म्हणू लागले कि मी अमुक - तमुक आहे, घाबरत नाही, तर मग शिक्षा झालीच पाहिजे (होय कि नाही?)
आता हे सगळं सांगितल्यावरही तुम्ही विश्वास ठेवणार आहात काय?
कशावर विश्वास ठेवायचा ते कळले नाही.

अत्रे Mon, 03/27/2017 - 15:22
“Is he a terrorist that he has been barred from flying by all airlines?” asks Shiv Sena district vice president Kamlakar Chavan
http://www.thehindu.com/news/national/shiv-sena-calls-for-osmanabad-bandh/article17671421.ece?homepage=true कोणी चप्पल ने मारहाण करत असेल तर त्याला दहशतवादी का म्हणू नये? कर्मचाऱ्यांना त्याची दहशतच वाटेल ना?

मराठी_माणूस Mon, 03/27/2017 - 15:32
मारहाण ही अयोग्य असली तरी कोणी त्या थराला का गेले ह्याची काही चौकशी वगैरे होणार की नाही ? त्या बद्दल काचीच समजले नाही . तसेच अजुन सगळे सत्य बाहेर यायच्या आधी बाकिच्या एअर लाइन्संनी असा परस्पर निर्णय कसा घेतला ?

In reply to by मराठी_माणूस

अत्रे Mon, 03/27/2017 - 15:41
कोणी त्या थराला का गेले ह्याची काही चौकशी वगैरे होणार की नाही ?
एखाद्याने बलात्कार केला तर तो का त्या थराला गेला याची लोक शहानिशा करतात का?
तसेच अजुन सगळे सत्य बाहेर यायच्या आधी बाकिच्या एअर लाइन्संनी असा परस्पर निर्णय कसा घेतला ?
त्यांनी (रवी "सर") व्हिडीओ मध्ये स्वत: कबुल केलाय, अजून काय पाहिजे? आणि एअर लाइन्संनी विचार करूनच निर्णय घेतला असेल ना, कर्मचाऱ्यावर कोणीही उठून चप्पल मारत असेल तर अशा मानसिक संतुलन ढळणाऱ्या माणसाला विमानात ठेवणे हि सुरक्षेच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाही. (at least until the case is closed)

विशुमित Mon, 03/27/2017 - 15:45
उस्मानाबादेतून कोणी आहे का इकडे? असे विचारून धागा लेखकाला गायकवाड प्रकरणावरून उस्मानाबादच्या लोकांची मानसिकता (मुजोर आहेत का वगैरे) जाणून घायची दिसतंय असे प्रतीत झाले. राच्याकने धागा लेखक पुण्याचे आहेत का? PMPL च्या कंडक्टरला पण चामड्याच्या बुटाने मारायची इच्छा होते पण आम्ही खासदार नाही आहोत ना, ते पण शिवसेनेचे..!!

In reply to by विशुमित

अत्रे Mon, 03/27/2017 - 15:55
असे विचारून धागा लेखकाला गायकवाड प्रकरणावरून उस्मानाबादच्या लोकांची मानसिकता (मुजोर आहेत का वगैरे) जाणून घायची दिसतंय असे प्रतीत झाले.
माफ करा. असा हेतू नव्हता. मला वाटत होते कि वृत्त माध्यमांनी उस्मानाबादला जाऊन त्यांना मत देणार्यला लोकांना प्रतिक्रिया विचारायला पाहिजे होती. सकाळी उठून सकाळ ची लोकल एडिशन चेक केली कुठेच काहीच बातमी नाही. म्हणून म्हटलं मिपा वर विचारावं. अनेकदा आपण मतदार नको त्या लोकांना निवडून देतो. अशा वेळी त्यांनी काही दुष्कर्म केले तर त्या बाबतीत त्यांच्या मतदारांची मते काय असतात हे जाणून घेणे आवश्यक आहे. कारण हेच लोक उद्या जाऊन अशाच लोकांना निवडून आणतील. मतदारांना विचार करायला लावणारे असे प्रश्न वृत्त माध्यमांनी डायरेक्ट विचारले पाहिजेत असे मला वाटते. उस्मानाबादच्या लोकांशी भांडायचे म्हणून धागा काढला नाही.
राच्याकने धागा लेखक पुण्याचे आहेत का?
हा हा, नाही मी औरंगाबादचा.
PMPL च्या कंडक्टरला पण चामड्याच्या बुटाने मारायची इच्छा होते पण आम्ही खासदार नाही आहोत ना, ते पण शिवसेनेचे..!!
लोल

श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 15:56
हे अगदी त्या दिवशी मोठ्या तोंडाने फुशारक्या मारत होते ही माझ्याकडे परतीचे ४ वाजताचे तिकीट आहे आणि मी ४ वाजता विमानातून जाणारच. बघतोच मला कोण अडवतो ते . . . पण जेव्हा प्रत्यक्ष प्रवासाची वेळ आली तेव्हा यांची तंतरली आणि गुपचूप आगगाडी पकडून घरी निघाले. आगगाडीत वार्ताहरांचा ससेमिरा टाळण्यासाठी मध्येच वापीला उतरून खाजगी मोटारीने मुंबईकडे रवाना झाले. मुंबईत आल्यानंतर यांचा फोन बंद आहे आणि हे लपून बसले आहेत. माध्यमांसमोर यायचं यांचं धाडस नाही. प्रत्यक्ष महाराष्ट्रात वाघाच्या काळज्याच्या शूर, स्वाभिमानी मावळ्यांना फडतूस वार्ताहरांच्या भीतिने लपून रहायला लागतंय यापेक्षा अजून दुर्दैव ते काय? कोठे गेला तो वाघाचा पंजा? कोठे गेली ती दशदिशा दणाणून सोडणारी वाघाची गगनभेदी डरकाळी? कोठे गेली यांची वाघनखे, भाले, तलवारी, बरच्या, भाले, दांडपट्टे, खंजीर? खरं तर यांनी एअर इंडियावाल्यांच्या पोटात वाघनखे खुपसून त्यांचा कोथळा बाहेर काढायला हवा होता. नंतर त्यांच्या छाताडावर नाचून त्यांचे हात कलम करून गर्दन मारून त्यांचं थडगं महाराष्ट्राच्या भूमीत बांधायला हवं होतं. हे सगळं करायचं सोडून हे लपून बसलेत.

गामा पैलवान Mon, 03/27/2017 - 17:22
अत्रे, एअर इंडिया ऐन वेळेस विमान बदलते आणि प्रवाशास तक्रारही नोंदवू देत नाही. हा मुद्दा देखील चर्चिला जावा. तसेच रवींद्र गायकवाड शांतपणे आपली बाजू समजावून सांगत असतांना त्यांना अरेरावीने उलट उत्तरं करणाऱ्या व्यवस्थापकांवर कसली कारवाई व्हायला हवी यावरही चर्चा व्हावी. आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

गापै, हाच मुद्दा सांगण्याचा प्रयत्न करतोय. एअर इंडियाला सहानुभूती आणि आधीपासूनच असलेला सगळं राग रवी गायकवाडांवर आणि पर्यायाने शिवसेनेवर काढणे पटत नाही.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

अभ्या.. Mon, 03/27/2017 - 18:00
एअर इंडियाला सहानुभूती आणि आधीपासूनच असलेला सगळं राग रवी गायकवाडांवर आणि पर्यायाने शिवसेनेवर काढणे पटत नाही.
परफेक्ट, अगदी हेच चाललंय सुरुवातीपासून. आणि मूळ प्रकरण काय झाले ते अजूनही पूर्ण्पणे क्लीअर नाही, आक्रमकपणे सरब्त्ती करणार्‍या वृत्तसंस्थांना दिलेल्या बाईटसवरुन अंदाधुंद अंदाज बांधत गेम करायचा प्रयत्न क्लीअरकट दिसतोय. ज्यापध्दतीने भाजपेयांकडून 'आमच्या सोबत गुमान राहा नाहीतर असे करण्यात येईल' अशी दडपशाही चाललीय त्यावरुन सेनेच्या राडेबाजीपेक्षा असली दडपशाही जास्त त्रासदायक होत राहणार हे निश्चित.

In reply to by अभ्या..

श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 20:35
>>> मूळ प्रकरण काय झाले ते अजूनही पूर्ण्पणे क्लीअर नाही, क्लिअर नसेल तर गायकवाडने क्यामेऱ्यासमोर ज्या फुशारक्या मारल्या, त्यावरच विसंबून राहून प्रतिक्रिया येणार. एकतर गायकवाडने नक्की काय घडले ते पुढे येउन सांगावे, नाहीतर त्याने ज्या फुशारक्या मारल्या त्या खऱ्या धरून त्यानुसारच प्रतिक्रिया येणार. परंतु गायकवाड लपून बसला आहे. त्यामुळेच त्याला व शिवसेनेला टीका ऐकून घेणे भाग आहे. मी यांव केलं, मी त्यांव केलं अशा बढाया मारायच्या, प्रतिक्रिया यायला लागल्या की घाबरून लपायचं आणि आमच्यावर आधी पासून असलेला राग काढला जातोय असा कांगावाही करायचा।

In reply to by श्रीगुरुजी

खासदारांनी फुशारक्या मारल्या हे तर उघड सत्य आहे. चप्पलने 25 वेळेला मारहाण झाली असेल अजिबात वाटत नाही. खासदारांची झालेली बदनामी हि मुख्यत्वे त्यांच्या बेजबाबदार फुशरक्यांमुळेच झाली आहे. पण म्हणून लगेच हि संधी आहे, घ्या उखळ पांढरे करून अशी अत्यंत अजेंडायुक्त भूमिका समर्थनीय असू शकते का? त्यांनी खरेच मारले कि नाही ह्याच्याशी काहीही देणे घेणे नाही, त्यांनी तसे म्हटले हेच महत्वाचे आहे आणि त्यांच्याविरुद्ध वापरण्यासारखे आहे.आणि कारण स्पष्ट आहे - ते शिवसेनेचे आहेत. उद्या त्यांनी खूप मोठा विकास केल्याच्या फुशारक्या मारल्या तर त्यावेळी त्या परिस्थती जाणून न घेता खऱ्या मानल्या नाही म्हणजे मिळवली. तरी बरं तो विडिओ आहे म्हणून नाहीतर उचलून फेकून दिलंच होतं असेच हे प्रकरण बाहेर आले असते. आणि खासदारांनी लपून बसावं कि गावभर फिरावं हा त्यांचा, त्यांच्या पक्षाच्या आदेशाचा आणि त्यांच्या वकिलांचा प्रश्न आहे. पण विरोधच करायचा असेल तर कुठलेही मुद्दे पुरतात. तो विडिओ शांतपणे पाहावा, कितीवेळा त्यात खासदारांना शिव्या देण्यात आल्या आहेत ते ऐकता येईल. इसको अंदरही मारते है, मुंह फोड देते है किसिको क्या पता चलेगा अशा आशयाची वाक्ये ऐकू येत आहेत. त्यांनी कुठल्याही कारणाने केलेली मारहाण हि निंदनियच आहे आणि शिवाय तो गुन्हाही आहे. कायदेशीर कारवाई पार पडेलच पण लगेच हि संधी सोडायची नाही म्हणून तुटून पडायचं, विमान कंपनीच्या गलथानपणाबद्दल, अरेरावीबद्दल, आणि अपमानास्पद वागणुकीबद्दल काहीही शब्द काढायचा नाही हे वागणं दुटप्पीपणाचं आणि खोट्या मुखवट्याचं आहे असे मला वाटते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

अभ्या.. Mon, 03/27/2017 - 21:27
इसको अंदरही मारते है, मुंह फोड देते है किसिको क्या पता चलेगा अशा आशयाची वाक्ये ऐकू येत आहेत.
आं तिज्यायला. असले भुरटे एअर इंड्यात असले तर मग लै भारी झाले हाणले ते. दिल्लीत हाणले असल्या मुजोरांना. लैच भारी.

In reply to by अभ्या..

http://zeenews.india.com/marathi/news/india/mp-ravi-gaikwad-and-air-india-video-clip-dialogue/३५८०८० घ्या तुमी बी बघून घ्या! हे समर्थक, भक्त, भाट शिक्के काही बोलण्याची सोयच ठेवत नाहीत! बेक्कार वाटतं हो!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 23:17
>>> पण म्हणून लगेच हि संधी आहे, घ्या उखळ पांढरे करून अशी अत्यंत अजेंडायुक्त भूमिका समर्थनीय असू शकते का? शिवसेना अशी संधी वारंवार देते. विरोधकांना अशी संधी मिळू नये असे वाटत असेल तर सेना नेत्यांनी इतरांविषयी गलिच्छ बरळणे व बढाया मारणे थांबवायला हवे. >>> त्यांनी खरेच मारले कि नाही ह्याच्याशी काहीही देणे घेणे नाही, त्यांनी तसे म्हटले हेच महत्वाचे आहे आणि त्यांच्याविरुद्ध वापरण्यासारखे आहे.आणि कारण स्पष्ट आहे - ते शिवसेनेचे आहेत. उद्या त्यांनी खूप मोठा विकास केल्याच्या फुशारक्या मारल्या तर त्यावेळी त्या परिस्थती जाणून न घेता खऱ्या मानल्या नाही म्हणजे मिळवली. शिवसेना आणि विकास या परस्परविरोधी गोष्टी आहेत. त्यामुळे त्यांच्या विकासाच्या फुशारक्यांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही. >>> तरी बरं तो विडिओ आहे म्हणून नाहीतर उचलून फेकून दिलंच होतं असेच हे प्रकरण बाहेर आले असते. आणि खासदारांनी लपून बसावं कि गावभर फिरावं हा त्यांचा, त्यांच्या पक्षाच्या आदेशाचा आणि त्यांच्या वकिलांचा प्रश्न आहे. पण विरोधच करायचा असेल तर कुठलेही मुद्दे पुरतात. त्यांच्या फुशारक्यांमुळेच हे प्रकरण पेटले. लपूनच बसायचं होतं तर 'बघू मला कोण अडवतो' असला पोकळ स्वाभिमान दाखविण्याची गरज नव्हती.

In reply to by श्रीगुरुजी

ओके. तुमची वैयक्तिक मते आहेत आणि त्याचा आदर आहे. पण त्याने परिस्थिती बदलत नाही. मोठ्या थाटात लावलेला नो फ्लाय कायम ठेवून दाखवावा नाहीतर लोक त्याला विमान कंपन्यांचा पोकळ स्वाभिमान म्हणायचे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 23:47
नो फ्लाय पुढील काही दिवसातच रद्द होईल असा अंदाज आहे. निदान एका फ्लाईटसाठी तरी खासदारावर बंदी आली हेही नसे थोडके. निदान भविष्यात तरी सेना नेते सभ्य वागतील अशी आशा आहे. अर्थात नो फ्लाय रद्द झाला तर हा शूर मावळ्यांचा विजय आहे अशा सेनेने बढाया मारल्या तर मात्र अवघड आहे.

In reply to by श्रीगुरुजी

बाकी काही असो, पण लोकनियुक्त संसद सदस्याबद्दल अशी एकेरी आणि आक्षेपार्ह भाषा मिपाच्या नियमात बसते का? (आणि तीही प्रकरणाची सखोल माहिती नसताना) जर बसत नसेल तर असे प्रतिसाद तात्काळ काढुन टाकणे हे संभाव्य वादविवाद टाळण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे !!

In reply to by शार्दुल_हातोळकर

अप्पा जोगळेकर Tue, 03/28/2017 - 14:11
पण लोकनियुक्त संसद सदस्याबद्दल अशी एकेरी आणि आक्षेपार्ह भाषा इथे कोणी शिवीगाळ केली आहे का ? रविंद्र गायकवाड हा दीड दमडीचा बिनडोक माणूस आहे. तो कोण आहे हे त्याचा मतदारसंघ सोडून आताआतापर्यंत कोणाला माहितसुद्धा नव्हते.

In reply to by अप्पा जोगळेकर

भारतात ५४५ लोकसभा सदस्य आहेत. तुम्हाला त्यापैकी किती लोकसभा सदस्यांची माहिती आहे? लोकसभा सदस्य त्यांच्या मतदारसंघात माहिती असले म्हणजे पुरेसे आहे. आणि या धाग्यावर वापरलेले "मूर्ख", "दीडदमडीचा", "बिनडोक", वगैरे तुमच्या दृष्टीकोनातून शिवीगाळ नसून भूषणावह शब्द आहेत काय? शिवाय मी माझा आक्षेप अयोग्य भाषेबद्दलच नोंदवला होता, तुम्ही त्याला सोयीस्कररित्या बगल देऊन पुन्हा अयोग्य भाषा वापरली. अत्यंत खेदाने असे म्हणावे लागत आहे की मांडायला योग्य आणि संतुलित मुद्दे नसतील तर भाषा गलिच्छपणाकडे वळते. पण त्याने वस्तुस्थिती बदलत नसते.

In reply to by शार्दुल_हातोळकर

विशुमित Wed, 03/29/2017 - 12:20
त्यांच्या भाषेच्या खजिन्यामध्ये " भिकारी " हा शब्द पण ऍड करा. जाम आवडतो त्यांना हा भूषणावह शब्द.

In reply to by गामा पैलवान

mayu4u Mon, 03/27/2017 - 18:38
... विमानात बिझनेस कल्लास नसल्याची पूर्वसूचना दिली होती, असे वाचल्याचे स्मरते. गायकवाड यांनी स्वत:च्या वागण्याचे समर्थन करण्या ऐवजी क्षमा मागायला हवी होती, असे माझे मत.

In reply to by mayu4u

गॅरी ट्रुमन Mon, 03/27/2017 - 19:44
गायकवाड यांनी स्वत:च्या वागण्याचे समर्थन करण्या ऐवजी क्षमा मागायला हवी होती, असे माझे मत.
क्षमा? छे छे भलतेच काहीतरी. शिवसेनेचा खासदार म्हणजे सद्गुणांचा पुतळा.त्याने काहीही केले तरी ते बरोबरच कसे असते, इतरांमुळेच ही वेळ कशी आली इत्यादी गोष्टी बोलायच्या असतात. आणि कोणाची बिशाद शिवसेनेच्या खासदाराच्या वर्तणुकीवर प्रश्नचिन्ह उभे करेल???? तसे प्रश्नचिन्ह उभे करणारा प्रत्येक माणूस भाजपेयीच असतो आणि फॅसिस्ट मोदींच्या राज्यात इतर सर्वांची दडपशाही कशी चालते ते दर्शविणारा असतो. काय म्हणता?

In reply to by गामा पैलवान

कुंदन Mon, 03/27/2017 - 22:41
याच न्यायाने सामान्य जनता जर रेल्वे बाबत वागु लागली तर अराजक माजायला वेळ लागेलसे वाटत नाही.

अत्रे Mon, 03/27/2017 - 19:49
http://maharashtratimes.indiatimes.com/india-news/sena-mp-ravindra-gaikwad-may-soon-fly-again-rules-may-change/articleshow/57857135.cms
नागरी उड्डाण मंत्री अशोक गजपती राजू, लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन आणि शिवसेनेचे खासदार यांच्यात सुमारे पाऊण तास झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.
अरेरे, या सभ्य वेशातील गुंडाला लोकसभेतून हाकलून देण्याचे सोडून हे लोक काय करत आहेत! एअर इंडिया वाल्यानी संपावर जावे.

अनुप ढेरे Mon, 03/27/2017 - 20:14
एका धाग्यावर भाजपा समर्थक फडणवीसांना नावं ठेवत आहेत चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल आणि दुसरीकडे शिवसेना समर्थक एका खासदाराने सरकारी कर्मचार्‍याला झोडपण्याचं समर्थन करत आहेत. भक्त कोणाला म्हणावं हे विचार करण्यासारखं आहे.

In reply to by अनुप ढेरे

गॅरी ट्रुमन Mon, 03/27/2017 - 20:23
भक्त कोणाला म्हणावं हे विचार करण्यासारखं आहे.
बहुतांश वेळी हेच बघायला मिळते. आणि शिवसेनेच्या त्या खासदाराच्या त्या कृत्याचे निर्लज्जपणे समर्थन करणारेच भाजप समर्थकांना मोदीभक्त म्हणतात हा अजून एक मोठा विनोद!! केजरूके गुलामच्या धर्तीवर नवा शब्द शोधून काढायला हवा आता :)

In reply to by गॅरी ट्रुमन

मला वैयक्तिकरित्या भक्त मंडळींपेक्षा अंध विरोधकांची जास्त कीव येते. दिसले मोदी, करा विरोध, दिसली शिवसेना, करा विरोध, दिसली काँग्रेस करा विरोध! मग सत्यता काय याच्याशी काहीही देणेघेणे नाही. जे गायकवाडांना शिव्या घालण्यात जराही वेळ दवडत नाहीयेत ते विमान कंपनीबाबत चकार शब्दही काढत नाहीयेत कसे याचे वैषम्य वाटते...असो!

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गॅरी ट्रुमन Mon, 03/27/2017 - 21:11
जे गायकवाडांना शिव्या घालण्यात जराही वेळ दवडत नाहीयेत ते विमान कंपनीबाबत चकार शब्दही काढत नाहीयेत कसे याचे वैषम्य वाटते...असो!
काही मुद्दे-- १. विमानकंपन्यांचा ढिसाळ कारभार वगैरे पेंग्विनसेना समर्थकांची पश्चातबुद्दी आहे. पेंग्विनसेनेच्या लहानमोठ्या पदाधिकार्‍यांनी याला ठोकला, त्याला थोबडावला अशा घटना गेल्या ५० वर्षात अनेकवेळा घडलेल्या आहेत. यावेळी असे थोबडावणारा खासदार असल्यामुळे आरडाओरडा बराच जास्त झाला. तेव्हा त्याचे काहीतरी रॅशनलायझेशन करायला म्हणून विमानकंपन्यांचा कारभार वगैरे गोष्टी आणल्या जात आहेत हे आम्हाला समजत नाही असे अजिबात नाही. २. बरं विमानकंपन्यांचा कारभार ढिसाळ होता/आहे हे मान्य केले तरी त्याविषयी पेंग्विनसेनेने यापूर्वी कधी आवाज उठवला होता असे फार कधी (किंवा कधीच) ऐकिवात आलेले नव्हते. मग विमानकंपन्यांचा कारभार ढिसाळ आहे त्याविषयी आवाज उठवला पाहिजे हे नेमके आता (संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे मधला च) आठवणे म्हणजे विलक्षणच योगायोग झाला. ३. समजा विमानकंपनीचा कारभार ढिसाळ असेल तरी अशा कारभाराविरूध्द नियमाप्रमाणे तक्रार करायचे मार्ग (तक्रारपुस्तिका वगैरे) असतात. गेलाबाजार ग्राहक न्यायालयाकडेही जाता येतेच. असे सामान्य माणसांनी करून चांगली घसघशीत नुकसानभरपाई पदरात पाडून घेतली आहे अशा बातम्या कधी पेपरात वाचल्या नाहीत का? एक खासदार म्हणून, एक लोकप्रतिनिधी म्हणून नियमांचे आणि कायद्याचे पावित्र्य जपायची जबाबदारी गायकवाडांवर जास्त होती. सामान्य माणसाचा अशाप्रसंगी तोल सुटणे समजू शकतो पण खासदाराकडून असे होणे अगदी पूर्ण अमान्य. लोकप्रतिनिधी म्हणून अधिक जबाबदारीचे वर्तन गायकवाडांकडून अपेक्षित होते. तसेच लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्याकडे याविरूध्द आवाज उठवायचे सामान्य माणसाकडे असतात त्यापेक्षा अधिक मार्गही उपलब्ध होते (लोकसभेत आवाज उठवणे वगैरे). त्या मार्गांचा वापर त्यांनी करणे नक्कीच अपेक्षित होते. जर खासदाराला "अशी" वागणूक मिळते तर सामान्य माणसाला कशी वागणूक मिळत असेल हा मुद्दा त्यांनी लोकसभेत मांडला असता तर त्याचा नक्कीच अधिक चांगला उपयोग झाला असता. लोकांचेही मोठे समर्थन त्यांना मिळाले असते. परत एकदा-- एक खासदार म्हणून असे जबाबदारीचे वर्तन त्यांनी करावे ही अपेक्षा सामान्य माणसापेक्षा कितीतरी जास्त. तुम्हाला कदाचित माहित नसेल पण १९८६ मध्ये काँग्रेसचे इंदूरचे खासदार प्रकाशचंद्र सेठी (आणीबाणीत मंत्रीपदे भूषवून बदनाम झालेले) यांनीही मुंबईला ट्रंक कॉल बराच वेळ मिळाला नव्हता म्हणून टेलिफोन एक्स्चेंजमध्ये जाऊन गोंधळ घातला होता. सेठींनी घातलेला गोंधळ अधिक मोठ्या प्रमाणावर होता (बरोबर बंदूक घेऊन जाणे, टेलिफोन एक्स्चेंजमध्ये नासधूस करणे वगैरे). पण १९८० च्या दशकात सरकारी टेलिफोन कंपनीचा कारभार २०१७ मध्ये विमान कंपन्यांच्या कारभारापेक्षा कित्येक पटींनी जास्त भोंगळ होता. तरीही सेठी आणि गायकवाड यांच्या कृत्याची पार्श्वभूमी आणि एकंदरीत स्वरूप सारखेच. आणि दोन कंपन्यांचा भोंगळ कारभार आणि त्याला दोन खासदारांचे उत्तर यांचे गुणोत्तर कदाचित सारखेच येईल!! जर प्रकाशचंद्र सेठींच्या कृत्याची देशभरातून निंदा झाली असेल तर गायकवाडांना वेगळी वागणूक द्यायचे अजिबात कारण नाही. ४. समजा विमानकंपनीचा कारभार ढिसाळ असेल, तसा अनुभव गायकवाडांना आला असेल तरी २०-२५ वेळा चपलेने मारणे ही त्या मानाने कित्येक पटींनी जास्त मोठी प्रतिक्रिया झाली नाही का? त्यातूनच कंपनीचा ढिसाळ कारभार हा मुद्दा मागे पडून गायकवाडांच्या कृत्यावरतीच सगळे लक्ष केंद्रित होणे अगदीच स्वाभाविक आहे.

In reply to by गॅरी ट्रुमन

प्रतिसाद वाचतोच आहे, पण तोपर्यंत तुम्ही मला पेंग्विनसेना समर्थक वगैरे समजत असाल तर... खेदाने नमूद करतो गैरसमज दूर करावा. तुम्हाला मागे कोणीतरी भक्त म्हटले होते तेव्हा तुम्हाला काय फीलिंग आली असेल ते जाणवले.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

गॅरी ट्रुमन Mon, 03/27/2017 - 21:21
पण तोपर्यंत तुम्ही मला पेंग्विनसेना समर्थक वगैरे समजत असाल तर... खेदाने नमूद करतो गैरसमज दूर करावा.
विमानकंपन्यांचा कारभार हा मुद्दा आणणारे तुम्ही एकटेच नाहीत. बाकी गैरसमज वगैरे अजिबात नाही. तरीही माझ्या प्रतिसादावरून मला तुम्ही पेंग्विनसेना समर्थक आहात असे म्हणायचे आहे असे वाटल्यास तसे नाही. त्याबद्दल दिलगिरी. प्रतिसादातच 'हे जनरल वक्तव्य करत आहे' असे लिहायला हवे होते.

In reply to by गॅरी ट्रुमन

श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 23:54
१९८4 मध्ये Hanover मधून मुंबईत येणाऱ्या एका विमानात तत्कालीन मंत्री रामराव आदिक यांनी शिवास रीगलच्या नशेत हवाईसुंदरीशी गैरवर्तन केल्याने त्यांना मंत्रीपद गमवावे लागले होते. अगदी मागील वर्षी मुंबई हून पुण्याला येताना कन्हैयाकुमारचे सहप्रवाशाशी किरकोळ भांडण झाल्यानंतर जेट ने दोन्ही प्रवाशांना बाहेर काढले होते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी Mon, 03/27/2017 - 23:00
>>> जे गायकवाडांना शिव्या घालण्यात जराही वेळ दवडत नाहीयेत ते विमान कंपनीबाबत चकार शब्दही काढत नाहीयेत कसे याचे वैषम्य वाटते...असो! या विशिष्ट प्रकरणात विमान कंपनीची नक्की काय चूक होती?

In reply to by श्रीगुरुजी

परत एकदा विनंती आहे, आपण याप्रकरणाची नीट माहिती घ्यावी. मी वरच एक दोन लिंका टाकल्या आहेत त्याही बघून घ्या.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

मोदक Mon, 03/27/2017 - 23:07
मला वैयक्तिकरित्या भक्त मंडळींपेक्षा अंध विरोधकांची जास्त कीव येते. दिसले मोदी, करा विरोध, दिसली शिवसेना, करा विरोध, दिसली काँग्रेस करा विरोध! मग सत्यता काय याच्याशी काहीही देणेघेणे नाही. मलाही पूर्वी कीव येत होती पण दुर्लक्ष केले की "उत्तरे नाहीत म्हणजे आंम्हीच बरोबर" आणि उत्तरे दिली की "बघा बघा हल्ले करत आहेत" अशी सोयीस्कर कोल्हेकुई ऐकून कंटाळा आला मग त्यांच्याच प्रतिसादपद्धतीनुसार प्रतिसाद द्यायला सुरूवात केली. आता अंधविरोधकांचे "सोयीस्कर निवृत्ती पर्व" सुरू आहे. :)

In reply to by अनुप ढेरे

अभ्या.. Mon, 03/27/2017 - 20:39
समर्थक्/भक्त वगैरे म्हणवून घ्यायची लाज नाही हो, पण भक्तीला भाटगिरी बनवून राजकारण आणि समाजकारण तज्ञ आणि तथाकथित उच्चशिक्षीत विचारजंती बुरख्यामागे दडवून दाखवली जाते त्याचे जास्त वाईट वाटते.

In reply to by अभ्या..

आणि वर असे लोक लिहिण्याच्या भरात भाषेची पातळी प्रचंड घसरुन एकेरी उल्लेख करण्यापर्यंत घसरली हे सुद्धा ध्यानात घेत नाहीत. ज्यांंना स्वतःच्या राहत्या मतदारसंघातील स्थितीचेदेखील काडीइतकेही ज्ञान नाही तेही बिनधास्त गलिच्छ आणि आक्षेपार्ह प्रतिक्रिया तज्ञाच्या थाटात लिहित असतात.....

In reply to by अनुप ढेरे

मोदक Mon, 03/27/2017 - 22:59
एका धाग्यावर भाजपा समर्थक फडणवीसांना नावं ठेवत आहेत चुकीचा निर्णय घेतल्याबद्दल आणि दुसरीकडे शिवसेना समर्थक एका खासदाराने सरकारी कर्मचार्‍याला झोडपण्याचं समर्थन करत आहेत. भक्त कोणाला म्हणावं हे विचार करण्यासारखं आहे. :)

यशोधरा Mon, 03/27/2017 - 20:43
बरं, नक्की काय झालं आहे हे कोणी वस्तुनिष्ठपणे सांगेल का? मारहाण करणे चुकीचे होते, असे मलाही वाटते. एअर इण्डियाच्या कर्मचार्‍याने चुकीची भाषा वापरली असेल ( असेल म्हणते कारण मला ठाऊक नाही, मी त्या बातम्या पाहिल्या नाहीत) तर तेही अत्यंत चुकीचे आहे पण हातापाईवर उतरण्यापेक्षा त्याची रीतसर तक्रार नोंदवता आली नसती का? एकदा लोकप्रतिनिधी म्हणून वावरायला लागल्यावर वागण्यामध्ये तोठे तारतम्य बाळगावयास नको का?

In reply to by यशोधरा

अत्रे Tue, 03/28/2017 - 13:18
बरं, नक्की काय झालं आहे हे कोणी वस्तुनिष्ठपणे सांगेल का?
The MP was flying from Pune to Delhi, and was entitled to free business class travel with our money, as all elected representatives are, but as Air India operated an aircraft which had no business class, Gaikwad had to travel economy — this, after the airline had explained it all to his political staff (read flunkeys who are at the service of our parliamentarians, again at our cost). After landing at Delhi, the MP refused to disembark and demanded an explanation. When the airline manager, a 60-year-old man, boarded the aircraft to explain to him why this had happened, Gaikwad slippered him.
सोर्स

In reply to by अत्रे

परत तेच होत आहे, स्वतःला आणि स्वतःच्या मताला योग्य वाटतील त्या बातम्या सांगायच्या, बाकीच्या सोडून द्यायच्या. यशोधारताई, खालील बातम्या दुसरी बाजू दाखवतात, जमल्यास ह्याही वाचा. http://www.loksatta.com/desh-videsh-news/raveendra-gaikwad-shivsena-mp-air-india-sukumar-air-hostess-1440530/ http://m.maharashtratimes.com/india-news/i-dont-think-he-wanted-to-throw-sukumar-down-the-ladder-he-was-trying-to-build-pressure-on-senior-officials-air-hostess/articleshow/57842144.cms https://youtu.be/gPQ55mRtTOA

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी Tue, 03/28/2017 - 15:24
पहिल्या दोन बातम्यांसंदर्भात मी इथे एक दीर्घ प्रतिसाद दिला आहे. एकंदरीत फक्त लोकसत्ता आणि मटामध्येच हवाईसुंदरीची ओळख लपवून हे वृत्त का आले व इतर माध्यमांकडे हवाईसुंदरीचे निवेदन का नाही हे एक गूढच आहे. तूनळीवरील वर दिलेली चित्रफीत सुद्धा अपूर्ण आहे. चित्रफीतीच्या सुरवातीला विमानाच्या दारात पुढच्या बाजूला एअर इंडियाचा कर्माचारी पाठमोरा दिसतोय. त्याच्या मागे गायकवाड महाशय आहेत. त्यांच्या आजूबाजूला दोन सुरक्षारक्षक दिसताहेत. एक हवाईसुंदरी "don't do that" असे दोन वेळा ओरडताना दिसते. गायकवाड महाशय त्या कर्मचार्‍याला खाली शिडीवरून खाली ढकलायचा प्रयत्न करीत होते असे मटामधील वृत्तातल्या अनामिक हवाईसुंदरीने सांगितले आहे. चित्रफितीचा हा भाग म्हणजे तेच ढकलण्याचे दृश्य असावे. "कितने बद्तमीज है ये लोग" असे कोणतरी म्हटल्याचे ऐकू येते. हे वाक्य सुरक्षारक्षकाचे आहे का गायकवाडांच्या तोंडातून आले आहे व ते नक्की कोणाला उद्देशून म्हटले आहे ते स्पष्ट नाही. या चित्रफितीच्या आधीची घटना, म्हणजे गायकवाड महाशय आसनात बसून राहिले होते व तिथूनच हे प्रकरण पेटायला सुरूवात झाली, या चित्रफितीत नाही. इथे कोण कोणाला धक्काबुक्की करीत आहे ते स्पष्ट नाही. परंतु जर गायकवाड महाशय त्या कर्मचार्‍याला विमानाच्या दारातून खाली ढकलून द्यायचा प्रयत्न करीत असतील तर त्यांना सुरक्षा रक्षकांनी अडविणे योग्यच आहे. तसे करणे म्हणजे धक्काबुक्की नव्हे. त्यामुळे एअर इंडियाच्या कर्मचार्‍यांनी गायकवाडांना अपशब्द वापरले, त्यांना धक्काबुक्की केली या दाव्यात अजिबात तथ्य वाटत नाही. भारतात एखाद्या नगरसेवकाला सुद्धा अपशब्द वापरण्याची, धक्काबुक्की करण्याची हिंमत सर्वसामान्य नागरिकात नसते. खासदाराच्या बाबतीत असे करणे तर दूरच राहिले.

In reply to by श्रीगुरुजी

अगदी तुम्हाला हवे तसे विश्लेषण केलेत श्रीगुरुजी विडीओचे! मी हे विश्लेषण प्रत्येक माणसाच्या सद्सद्विवेकबुद्धीवर सोडतो, ज्याला जे योग्य वाटेल ते खरे.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी Tue, 03/28/2017 - 15:43
काहीतरीच काय? चित्रफितीत जे दिसतंय तेच मी सांगितलंय. नक्की कोण कोणाला बद्तमीज म्हणतोय ते या चित्रफितीवरून सांगता येणे अशक्य आहे. त्यामुळे गायकवाडांनाचा कर्मचार्‍यांनी अपशब्द वापरले हा ठाम निष्कर्ष काढता येणार नाही. कदाचित उलटेही असू शकेल. त्या चित्रफितीत सगळेच एकमेकांना रेटारेटी करताहेत. त्यामुळे सुरक्षा रक्षकांनी गायकवाडांना धक्काबुक्की केली हा ठाम निष्कर्ष सुद्धा काढता येणार नाही. बाकी तुम्हाला चित्रफितीवरून माझ्यापेक्षा काही वेगळे समजले असेल तर ते सांगा.

In reply to by श्रीगुरुजी

आणखी काही लोकांचं मत येतंय का बघू, नाहीतर मी मला त्या विडिओत काय दिसतंय ते लिहितोच. तूर्तास जसा ठाम निष्कर्ष सुरक्षारक्षकांच्या धक्काबुक्कीबाबत काढता येत नाहीये तसा त्याच व्हिडिओवरून खासदारांनी ढकलले याबाबीतही काढायला नको, कसे?

समीर वैद्य Mon, 03/27/2017 - 21:20
विमानात business class नसताना देखील मला इकॉनॉमी क्लास मध्ये का बसवलं ह्या मुद्द्यावर अडून बसण्याची काय गरज होती गायकवाड साहेबांना? विमान कंपनीने तसे आगाऊ कळविले होते त्यांच्या कार्यालयास. त्याहून पुढचा मुद्दा म्हणजे खासदारांना business क्लास चे पास का दिले आहेत? खासदारांनी इकॉनॉमी क्लास ने प्रवास केला तर बिघडलं कुठे? फुकटचे पास मिळाले आहेत म्हणून हा माज आहे ह्या लोकांना. पदरचे पैसे घालून दिल्ली ला जाण्याची वेळ अली तर जातील का हे business क्लास नी दर वेळेला?

अत्रे Mon, 03/27/2017 - 21:38
The problem is all airlines have restricted him. The Constitution says people can go anywhere in the country. If there is one incident and all airlines ban him, it is wrong.”
यातले दुसरे वाक्य घेतल्याबद्दल सेनेला पारितोषिक दिले पाहिजे. http://m.hindustantimes.com/india-news/sena-demands-flying-ban-on-mp-lifted-but-govt-says-airlines-have-right-to-refuse/story-7VnNvKGD5gGygjSpiEmgEK.html

हल्ली त्या 'अँगर मॅनेजमेंट',स्ट्रेस मॅनेजमेंटच्या कोर्सेसच्या जाहिराती पेपरात येत असतात. उद्धवने तसे कोर्सेस त्याच्या नेत्यांसाठी बंधनकारक करावेत. निदान महाराष्ट्राबाहेर जायचे असेल तर तसे कोर्सेस केल्यावरच बाहेर पाठवावे असे ह्यांचे मत. बाकी तो कर्मचारी उगीच कारण नसताना खासदारासमोर बरळेल असे बिलकूल वाटत नाही. ते ही शिवसेनासारख्या टग्या पक्षाच्या नेत्यासमोर. २०१४ पासून सेनेची अवस्था 'सहन होत नाही व सांगताही येत नाही' अशी आहे. सत्तेत असलो तरी भाजपाच्या नेत्यांसमोर,सरकारसमोर मान झुकवणार नाही..हे अधून मधून मतदारांना दाखवावे लागणार..असा आधीच अंदाज होता. आता दिल्लीहून मुंबईत येणारी एयर इंडियाची विमाने उतरू दिली जाणार नाहीत.अशा 'ईशारा' उद्धव देइल ? की एयर इंडिया,ईंडिगोच्या ऑफिसमध्ये येऊन काही तरूण धुडगुस घालत काचा फोडून पळून जातील?

वरुण मोहिते Tue, 03/28/2017 - 00:17
पण आपण तक्रार पुस्तिका मागून पण जर मिळत नसेल तर ते हि चूक आहे . ह्यात बिसिनेस आणि इकॉनॉमी क्लास हा मुद्दा गौण आहे . मी पैसे भरलेत तर मलाच बोलायचं वरून मलाच सांगायचं मोदींना सांगेन ?? पीएम फुकट बसलेत का असं काही ऐकायला ??ह्याला मुजोरी म्हणतात . ते काही पोलीस कसे करतात तश्या टाईप ची अश्या लोकांना योग्य धडा शिकवणं आवश्यक असतं. व्यक्तिशः एअर इंडिया ला अशी वेळ आली ह्या बद्दल आनंद झालाय . त्याहून जास्त आनंद माहिती न घेता तोंडसुख घेणाऱ्यांसाठी झालाय . इतिहासातील आणि वर्तमान काळातील भाजप च्या चुका ह्यावरही एक धागा काढेन वेळ मिळाला कि . पण सगळ्यांनी नीट बोला हा तेव्हा ....

In reply to by वरुण मोहिते

राजाभाऊ Tue, 03/28/2017 - 02:52
आजकाल भाजपाची "दोनो हात घी में और सर कढाई में" अशी अवस्था आहे म्हणुन सेनेला जिथे-तिथे कोंडित पकडायची फॅशन आलेली आहे. गायकवाड हातघाईवर आले हे त्यांचं चुकलंच पण या प्रकरणात एयर इंडिया हि धुतल्या तांदळासारखी नाहि. बातम्यांवरुन असं समजतंय कि गायक्वाडांना बिझ क्लास्चा बोर्डिंग पास इशु झालेला होता. आता एयर इंडियाचा कारभार कसा चालतो याची कल्पना नाहि पण बोर्डिंग पासवर बिझ क्स्लासची सीट आहे म्हणजे विमानात बिझ क्लास असायला हवा. एयर इंडियाने आयत्या वेळेला विमान (ऑल कॅटल क्लास) बदललं का? गायकवाडांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या बाबतीत हा प्रकार यापुर्वि २-३दा झालेला आहे; यावर एयर इंडियाचं स्पष्टीकरण कोणी मागितलं काय? अशा प्रकारचं कॅट्ल क्लासला डाउनग्रेडिंग एयर इंडिया सगळ्या फर्स्ट्/बिझ क्लास पॅसेंजर्स्ना करते का?..

In reply to by राजाभाऊ

अमर विश्वास Tue, 03/28/2017 - 08:29
राजाभाऊ या विमानाला बिझिनेस क्लास नाही हे खासदार साहेबांच्या कार्यालयात दोन दोवास आधीच कळवले होते त्यामुळे ऐनवेळी बदलायचा प्रश्नच नाही सगळ्यात खटकणारी गोष्ट : खासदार साहेब स्वतः:चे हीन कृत्य पराक्रम म्हणुन सांगतात ... टीव्ही कॅमेऱ्यासमोर ...

In reply to by अमर विश्वास

....या विमानाला बिझिनेस क्लास नाही हे खासदार साहेबांच्या कार्यालयात दोन दिवस आधीच कळवले होते.... याबद्दल काही अधिकृत रेफरन्स देऊ शकाल का?

In reply to by वरुण मोहिते

मोदक Tue, 03/28/2017 - 09:57
भाजपाच्या चुका दाखवल्याने शिवसेनेच्या चुका क्षमायोग्य आहेत असे कांही तुम्हाला म्हणायचे आहे का..? शिवसेनेची चुक आहे ना..? मग समर्थन कशाला करत बसताय..? भाजपाने पण चुका केल्या, काँग्रेसने पण केल्या, डावे, समाजवादी वगैरे वगैरे.. बाकी लोकांच्या चुका दाखवून शिवसेनेच्या चुका कमी होणार आहेत का..? तुम्ही नक्की काय साध्य करणार..?

In reply to by वरुण मोहिते

श्रीगुरुजी Tue, 03/28/2017 - 15:01
पण आपण तक्रार पुस्तिका मागून पण जर मिळत नसेल तर ते हि चूक आहे या नवीन कहाणीतील काही परस्परविरोधी मुद्दे -
Asserting that Air India was trying to misguide everyone as to what actually caused the altercation onboard the aircraft, Shiv Sena MP Ravindra Gaikwad stated that he had never demanded a business class seat, but had instead requested a complaint book to address his grievance about ‘substandard service’. Issuing a fresh statement, the MP said that while travelling in the flight, he noticed “carelessness and substandard” service of Air India and requested for a complaint book, but despite his frequent requests he was not provided the complaint book, instead the staffer misbehaved with him.
एअर इंडिया लोकांना मिसगाईड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. दस्तुरखुद्द गायकवाडांनी अत्यंत अभिमानाने कॅमेर्‍यासमोर सांगितले आहे की मी सँडल काढून कर्मचार्‍याला २५ वेळा मारले . . . ऐकून घ्यायला मी भाजपचा खासदार नाही, मी शिवसेनेचा खासदार आहे . . . उशीरा दाढीमिश्या आल्यासारखे हे जे उशीरा शहाणपण सुचले आहे हे त्याच दिवशी सुचले असते त्यांच्यावर आज लपून रहायची वेळ आली नसती. दुसरा मुद्दा म्हणजे तक्रारपुस्तक मिळाले नाही म्हणून विमानातच बसून राहून इतरांचा खोळंबा करणे व नंतर कर्मचार्‍याला सँडलने मारहाण करून विमानाच्या शिडीवरून ढकलून द्यायचा प्रयत्न करणे व आपण तसे केले हे अत्यंत अभिमानाने सांगणे हे अत्यंत अयोग्य आहे. विमानात तक्रारपुस्तक मिळाले नसेल तर टर्मिनलवर येऊन तिथल्या एअर इंडियाच्या कार्यालयात जाऊन तक्रार नोंदविता आली असती. एखाद्या खासदाराच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्याएवढे धाडस एअर इंडियाच्या व्यवस्थापक किंवा कर्मचार्‍यांमध्ये असेल असे वाटत नाही. गायकवाडांच्या म्हणण्यानुसर त्यांना वाईट सेवा मिळाल्याबद्दल तक्रार करायची होती. त्यांना नक्की कोणती सेवा वाईट मिळाली याविषयी ते अजिबात बोललेले नाहीत. विमानात त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले होते का, त्यांना वाईट खानपान पुरविण्यात आले होते का, त्यांच्याशी विमानात कर्मचार्‍यांनी गैरवर्तणूक केली होती का, त्यांना खराब आसन देण्यात आले होते का इ. गोष्टींबद्दल ते काहीही बोललेले नाहीत. या सर्व गोष्टींचा खुलासा त्यांनी लगेचच केला असता तर ही वेळ आलीच नसती. त्यांनी कॅमेर्‍यासमोर आत्मप्रौढीने ज्या बढाया मारलेल्या आहेत त्यावरच विसंबून प्रतिक्रिया येणार.
“I was demanding proper facilities not the business class seat. But just to hide their carless attitude and cheating towards lakhs of Air India passengers, they tried to create a picture that I was continuously demanding for business class seat. This is completely baseless,” he said
. कोणत्या प्रॉपर सोयीसुविधा त्यांना दिल्या गेल्या नाहीत, त्यांची नक्की काय फसवणूक झाली इ. गोष्टींबद्दल ते अजूनही सांगत नाहीत.
Gaikwad on Friday submitted a complaint against Air India before the Delhi Police alleging that he was pushed and yelled on. In his complaint, Gaikwad, who allegedly manhandled Air India staffer, said he was made to travel by Air India on economy class even as he had business class ticket.
आपल्याला वाईट सेवा मिळाल्यामुळे आपल्याला तक्रार करायची होती असा त्यांचा दावा होता. परंतु आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असूनही आपल्याला इकॉनॉमी क्लासने प्रवास करायला लावला हीच त्यांचे खरे दुखणे दिसते. जनसामान्यांच्या बरोबर इकॉनॉमी क्लासमध्ये मांडीला मांडी लावून बसावे लागल्यामुळे त्यांचा पारा चढलेला दिसतो. एकीकडे म्हणतात आपल्याला वाईट सेवा मिळाली, परंतु नक्की कोणती सेवा वाईट होती त्याविषयी चकार शब्द नाही. तर दुसरीकडे सांगतात की आपल्याकडे बिझनेस क्लासचे तिकीट असूनही आपल्याला इकॉनॉमी क्लासने प्रवास करायला लावला. जर विमानात बिझनेस क्लासची आसने असूनसुद्धा त्यांना मुद्दाम इकॉनॉमीने जायला लावले असत तर त्यांची तक्रार रास्त होती. पण विमानात जर बिझनेस क्लासची आसनेच नसतील तर फक्त यांच्यासाठी इकॉनॉमी क्लासची ५-६ आसने काढून तिथे बिझनेस क्लासची आसने बसवायची होती का? जर त्या विशिष्ट विमानात बिझनेस क्लासच नव्हता त्यांनी त्या विमानाने प्रवास करणे टाळून ज्यात बिझनेस क्लासची व्यवस्था आहे अशा एखाद्या दुसर्‍या विमानातून प्रवास करायला हवा होता. तसे न करता त्यांनी इकॉनॉमीतून प्रवास पूर्ण केला आणि नंतर मला बिझनेस क्लास दिला नाही हो म्हणून कांगावा सुरू केला. एअर इंडीया कितीही वाईट कंपनी असली, त्यांना कितीही वाईट सेवा मिळाली असली तरी एका निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीने पायातील पादत्राणाने एका ६० वर्षीय कर्मचार्‍याला अनेकवेळा मारणे, त्याला शिडीवरून खाली ढकलून द्यायचा प्रयत्न करणे आणि नंतर आपल्या या घृणास्पद कृत्याबद्दल जराही खेद, खंत न बाळगता अभिमानाने आपल्या कृत्याची प्रौढी मारणे हे अत्यंत संतापजनक व तिरस्करणीय वर्तन आहे. त्यांनी जे केले तो गुन्हाच आहे व या अत्यंत उन्मत्त वर्तनाबद्दल त्यांना शिक्षा व्हायलाच हवी. विमानकंपन्यांनी त्यांच्यावर घातलेली बंदी समर्थनीय आहे.

In reply to by श्रीगुरुजी

परत परत लांबलचक प्रतिसादातून एकच गोष्ट प्रतीत करायची आहे, हे सगळं खासदार साहेब स्वतः म्हणाले. अहो तीच तर मेख आहे, खासदार साहेबांचं वक्तृत्व आधीच अमोघ आहे, वरून हिंदी आणि त्यात फुशारक्या! त्यांचं खरंतर चुकलंय तेच, डिंग्या हाकणे! आणि अर्थातच त्याचा फटका त्यांना बसलाच आहे पण म्हणून दुसरी बाजू बघायचीच नाहीये याला मी फारफार तर आकस म्हणू शकेन. थोडक्यात काय खासदारांनी स्वतःच्या तोंडाने असे केल्याचे नाकारले असते तरी फरक काहीच पडला नसता कारण विरोध आणि टीका करण्याचे पक्के ठरलेलेच असावे. पण आश्चर्य याचे वाटते कि शिवसेना अशा अनेक वॅलीड संधी नेहमी देत असते, मग हे ओढून ताणून विरोध कशाला बुआ?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी Tue, 03/28/2017 - 15:32
मग खासदार महाशयांनी स्वतःच दुसरी बाजू सांगावी. ती सांगताना हेही सांगावं की मी सँडलबिंडल मारलेली नव्हती व कर्मचार्‍याला ढकलूनही देत नव्हतो. मी रागाच्या भरात चुकून अतिशयोक्ती केली. एकीकडे म्हणतात मला वाईट सेवा मिळाली. पण नक्की कोणती सेवा वाईट होती याविषयी चकार शब्द नाही. त्यांनी एकच पालुपद लावलंय की माझ्याकडे बिझनेस क्लासचं तिकीट असताना मला इकॉनॉमीने प्रवास करायला लावला. याव्यतिरिक्त त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही आहे का? आपण कर्मचार्‍याला मारहाण केली हे आपली मर्दुमकी दाखविण्यासाठी एकदा स्वतःच्या तोंडाने सांगितल्यानंतर आता त्यांना काही दुसरे सांगायला तोंडच राहिलेले नाही, हीच खरी मेख आहे.

In reply to by श्रीगुरुजी

ते सांगतील कि त्यांना जेव्हा सांगायचं तेव्हा, आताच त्यांना फोडून काढण्याची का झाली असेल बरे?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

श्रीगुरुजी Tue, 03/28/2017 - 15:51
हरकत नाही. परंतु तोपर्यंत त्यांच्या आधीच्या विधानांवर विसंबूनच प्रतिक्रिया येत राहणार आणि इतर पक्ष व जनता त्यांना फोडून काढत राहणार आणि ते शिवसेनेला महागात जात आहे.

In reply to by वरुण मोहिते

श्रीगुरुजी Tue, 03/28/2017 - 15:07
इतिहासातील आणि वर्तमान काळातील भाजप च्या चुका ह्यावरही एक धागा काढेन वेळ मिळाला कि . पण सगळ्यांनी नीट बोला हा तेव्हा .... नक्की लिहा. धाग्याची वाट बघतो.

अत्रे Tue, 03/28/2017 - 08:48
बादवे मागे एकदा मला मुंबई एयरपोर्टवर वायफाय बद्दल तक्रार करायची होती. तेव्हा विमानतळावर विचारले असता त्यांनी मला एक कम्प्लेंट फॉर्म दिला होता (ज्यात मी माझा इ मेल हि दिला होता). आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही आठवड्यांनी मला त्याच्या कडून ऑफिशिअल रिप्लाय आला (माझ्या मेल वर). खा. गा. यांनी थोडा संयम राखून सामान्य नागरिकांप्रमाणे (जी काही त्यांची होती ती) तक्रार केली असती, तर त्यांनाही माझ्याप्रमाणे उत्तर मिळाले असते. पण कदाचित तसे करणे त्यांच्या इगो मध्ये बसत नसावे म्हणून सगळे रामायण झाले.

In reply to by अत्रे

मागे नारायण राणे ह्यांनी चेन्नई विमानतळावर असाच तमाशा केला होता. जेट एयरवेजच्या कर्मचार्याची बदली करायला लावली होती. तळागाळातून वर आलेल्या नेत्यांचे ईगो जरा मोठे असतात असे ह्यांचे मत. स्वतःची रॉबिन हूड छबी कायम ठेवायच्या नादात मग असे घडते.

तिमा Tue, 03/28/2017 - 11:13
कर्मचारी उद्दटपणे बोलला तर एक जबाबदार खासदार, त्याची रीतसर तक्रार करेल. त्याला शिक्षा होईपर्यंत पाठपुरावा करेल. पण कायदा हातात घेणार नाही. असो. या धाग्यावर मारहाणीला, हिंसाचाराला अप्रत्यक्ष समर्थन देणारी मंडळी पाहून, नुसते राजकीय पक्षांचेच नव्हे तर संपूर्ण समाजाचेच अधःपतन झाल्याचे जाणवते.

In reply to by तिमा

हाच हाच तर मुद्दा आहे. मारहाणीचे समर्थन देणारे, हिंसाचाराला समर्थन देणारे म्हणायचे आणि सोयीस्करपणे वस्तुस्थितीकड़े दुर्लक्ष करायचे! मुळात वरील कुठल्या प्रतिसादात कोणी समर्थन केलंय हे सरसकटीकरण न करता सांगाल काय? गायकवाड यांनी केलेली मारहाण हा गुन्हा आहे आणि तो कोर्टात सिद्ध व्हायला हवा. एवढ्या एकांगी वार्तांकनानंतर झी वाल्यानी शेवटी दुसरी बाजू दाखवण्याचा प्रयत्न तरी केला. शिवसेना खासदारांनी सुमित्रा महाजनांना सोपवलेल्या विडिओमध्ये गायकवाड यांनाच आधी धक्काबुक्की व शिव्या देण्यात आल्याचे दिसत आहे असे वाहिनीवर दाखविले गेले. बाकीच्या सो कॉल्ड कायद्यानेच चालणाऱ्या लोकांना हे सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचे आहे. खरतर मुखवटाधारी लोकांचे अधा:पतन झाले आहे असे दिसते. स्वतःच्या विचारांशीही लोकांना प्रामाणिक राहायला का आवडत नसेल बुआ?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

अनुप ढेरे Tue, 03/28/2017 - 13:48
वरील कुठल्या प्रतिसादात कोणी समर्थन केलंय हे सरसकटीकरण न करता सांगाल काय?
www.misalpav.com/comment/928987#comment-928987
जर शिवीगाळ ऐकुन किंवा परत परत तक्रारी करुन एअर इंडियाच्या लोकांनी हा प्रकार केला असेल तर लुंगीवाल्याला फोडला हेचं उत्तम.

In reply to by अनुप ढेरे

हां असं जिथल्या तिथं संपवावं, उगाच सरसकटीकरण कशाला? बाकी त्यांच्या वरच्या वाक्यातील पाहिलं अक्षर जर आहे आणि त्याला काही विशेष अर्थ असतो असे मला वाटते.

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

अभ्या.. Tue, 03/28/2017 - 15:40
हांगाश्शी, आमीपण हेच म्हणतो. . आता धागेवाले बाबू, धाग्याच्या गाभ्याकडे येऊ चप्पलमार खा. गायकवाड यांना विमानातून प्रवास करण्यास केलेल्या बंदीविरोधात शिवसेनेने उस्मानाबाद बंदाचा इशारा दिला आहे झाला, व्यवस्थित झाला. लोकांचा प्रचंड पाठिंबा आहे. माफी मागायची ओडून असले बंद करण्या इतपत त्यांची मजल जाते म्हणजे उस्मानाबादेतील लोकांमध्ये काही प्रमाणात तरी खा. गायकवाड यांच्या बद्दल सहानुभूती (!?) आहे असे वाटते. सहानूभूती नाही तर पाठिंबा प्रचंड आहे. माजुरडेपणाला असेच जागच्या जागी उत्तर द्यावे लागते. नंतर फक्त निरवानिरवी असते ह्या तत्त्वावर आमची श्रध्दा आहे. मिपा वर कोणी तिथून आहे काय? तिथल्या सामान्य लोकांचे म्हणणे काय आहे? सध्या तरी मी एकटाच आहे आणि माझ्या निवेदनाने तुम्हाला बरे वाटलेले नाहीये. राहता राह्यला परत निवडून यायचा भाग. ते आधीही आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. ह्यावेळी खासदारकीची निवडणूक त्यांची पहिली निवडणूक नव्हती अन येत्यावेळेस तर ते जब्बरदस्त मतांनी येणार. . आता कसं वाटतंय?

In reply to by हतोळकरांचा प्रसाद

अनुप ढेरे Tue, 03/28/2017 - 20:37
तुम्ही विचारलत की मारण्याचं समर्थन कुणी केलं? तुम्हाला व्यवस्थित तसा प्रतिसाद दाखवला. आता तुम्ही म्हणता की एअर इंडियाने अमुक केलं तर अर्थ वेगळा होतो. तुमचा नक्की मुद्दा काये? की एअर इंडियाने अमुक अमुक तिकिट दिलं नाही म्हणून फोडणं बरोबर? एखाद्या कायदे बनवणार्‍याने कायदा हातात घ्यावा हे दुर्दैवी आहे. त्याचं समर्थन अजूनच दुर्दैवी आहे.

अत्रे Tue, 03/28/2017 - 11:14
एअर इंडिया वाल्याना बॅन करण्याची सुबुद्धी का झाली याची माहिती इथे कळाली
Shiv Sena has had a strong presence in the Airport unions and not just Gaikwad but even लो level Sena functionaries have managed to get their way simply because they belonged to the party. “See many years ago the Sena had a strong presence in the Airport Unions. If anyone misbehaved with a Shiv Sena worker or functionary, we used to shut down not just the airline operations but the entire airport. I believe when Gaikwad beat up the Air India official he felt that nothing would happen to him as the Sena union would not let the Airline act against him,” said Kiran Pawaskar, an old Sena hand who headed party’s Bharatiya Kamgar Sena for a long while. Pawaskar has now switched sides and joined the NCP. He heads the All India Aviation Employees Association (AIAEA). “What Gaikwad did not know is that the Sena has almost a negligible presence in the Mumbai Airport now, which is why the airline has been able to debar him from flying. While his behaviour was reprehensible, no CMD would dare to debar a Sena functionary, that too an MP, earlier. The Sena would have never allowed it, ” he said.

धर्मराजमुटके Tue, 03/28/2017 - 11:28
आणि मिपावरची सगळ्यात मोठी गंमत काय आहे माहिती आहे काय ? एखाद्या धाग्यावरची पुर्ण चर्चा वाचायचीच गरज पडत नाही हल्ली. नुसता आयडी बघीतला की तो काय बोलणार आहे (म्हणजे कुणाची तळी उचलणार आहे) ते अगोदरच माहिती असते. त्यामुळे चर्चा वाचून आपल्या माहितीत नवीन भर पडते असे समजणे म्हणजे चुकीचा गैरसमज आहे. :) अपवाद क्षमस्व !

In reply to by धर्मराजमुटके

म्हणुनच म्हणतो चर्चा निकोप असावी आणि एकांगी व पुर्वग्रहदुषित नसावी. अन्यथा अशा प्रकारच्या चर्चांना काहीही अर्थ नाही.

अप्पा जोगळेकर Tue, 03/28/2017 - 14:04
खासदार गायकवाड साहेब जेंव्हा टाचा घासत रेल्वेने प्रवास करत वापीपर्यंत आले तेंव्हा खूपच मजा वाटली. खरे तर या मूर्ख, उद्दाम माणसाला रेल्वेबंदी सुद्धा झाली पाहिजे. बाकी लोक उगाच एअर इंडियाच्या नावे खडे फोडत असतात. चांगली सेवा देतात.

In reply to by अप्पा जोगळेकर

म्हणजे तुमचे असे म्हणने आहे का की रेल्वे म्हणजे नरक आहे आणि करोडो लोक दररोज टाचा घासत अशा नरकातुन प्रवास करतात? हा त्या करोडो लोकांचा अपमान नाही का?

In reply to by शार्दुल_हातोळकर

अप्पा जोगळेकर Tue, 03/28/2017 - 14:39
नाय नाय. माझे म्हणणे आहे की रेल्वे म्हणजे स्वर्ग आहे पण खासदार साहेबांना तो नरक वाटतो. त्यांनी स्वतःच तसे सांगितले मला.

In reply to by शार्दुल_हातोळकर

कुंदन Tue, 03/28/2017 - 14:48
करोडो लोक नाहित , पण लाखो तर नक्कीच करतात. एकदा मुंबईच्या लोकल प्रवासात अनुभव घेउन बघा अर्थात त्यामागची कारणे वेगळी असली तरी ५ वा अन ६ वा ट्रॅक सुरु व्हायला लागलेला वेळ जीवघेणा आहे

In reply to by अप्पा जोगळेकर

अत्रे Tue, 03/28/2017 - 14:35
खरे तर या मूर्ख, उद्दाम माणसाला रेल्वेबंदी सुद्धा झाली पाहिजे.
असेच म्हणतो एका ऑनलाइन लेखात खालचा पॅरा वाचून फार हसू आले -
One only hopes that the airlines which have blacklisted Gaikwad continue to do so, for at least a year, if not longer. And, as several twitterati have indulged in wishful thinking, if the Indian Railways bans him too, he will really have to put his chappals to the use they are actually meant for — walking!
:D :D

अत्रे Tue, 03/28/2017 - 14:33
http://www.misalpav.com/comment/929102#comment-929102 ची प्रतिक्रिया इथे देत आहे.
शिवाय संसद सदस्यांनी माफी मागावी की नाही हे माझ्या अखत्यारित नाही, तसेच तत्वतः माफी मागायला हवी की नाही ते मा. न्यायालयाच्या निकालानंतरच सामान्य माणसाला ठरविता येईल.
हेच तर आपले (समाजाचे) दुर्दैव. काही नागरिकांना थोडादेखील स्वाभिमान नाही कि कोणा खासदाराने सामान्य नागरिकाला मारहाण केल्यांनतर सुद्धा त्याने माफी मागावी कि नाही हे सांगता येत नाही!
या धाग्यावर देखील काही व्हिडिओ च्या लिंक्स दिल्या गेल्या आहेत
कुठे आहेत बरे? ctrl + f "youtube" nothing found! तुम्ही मला वृत्त माध्यमातले सोर्स देता का जरा?
अयोग्य भाषेच्या समर्थनाबद्दल
तुम्हाला वाटते एकेरी भाषा चुकीची आहे. मला नाही वाटत तसे. बेसिकली अशा (मारहाण करणाऱ्या) माणसाबद्दल आदर का म्हणून ठेवायचा? कोणत्यातरी निवडणुकीत जिंकला म्हणून? चप्पल मारणे सोडून त्याचे कर्तृत्व काय? तुम्हाला वाटते "मूर्ख" म्हणणे आक्षेपार्ह आहे. मला नाही वाटत आक्षेपार्ह. तुम्हाला वाटते कि मी धन्यवाद. ऐकून बरे वाटले. असे म्हणण्यात कसलेतरी समर्थन केले आहे. तुमचा निष्कर्ष चुकीचा आहे. धन्यवाद = प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद ऐकून बरे वाटले = जनता पुन्हा निवडून आणणार नाही हे ऐकून बरे वाटले

In reply to by अत्रे

श्रीगुरुजी Tue, 03/28/2017 - 15:05
तुम्हाला वाटते एकेरी भाषा चुकीची आहे. मला नाही वाटत तसे. बेसिकली अशा (मारहाण करणाऱ्या) माणसाबद्दल आदर का म्हणून ठेवायचा? कोणत्यातरी निवडणुकीत जिंकला म्हणून? चप्पल मारणे सोडून त्याचे कर्तृत्व काय? काही व्यक्तींबद्दल एकेरी उल्लेखच केला जातो. त्यांचे कर्तृत्वच इतके महान आहे की त्यांच्याबद्दल अहोजाहो असे वापरताच येत नाही. ते निवडून आले असले तरी त्यांचा आदरपूर्वक उल्लेख करणे अशक्य आहे. (उदा. लालू, आव्हाड, मणीशंकर अय्यर . . असे बरेच जण आहेत).

In reply to by अत्रे

तुम्ही माझ्या प्रतिसादासादाचा उल्लेख करुन लिहिले आहे की "काही नागरिकांना थोडा सुद्धा स्वाभिमान नाही", हा असा वैयक्तिक हल्ला करण्याचा अधिकार तुम्हाला कुणी दिला? संपादक मंडळी काय करत आहेत? आणि गलिच्छ भाषेचे तुम्ही बिनदिक्कत समर्थन करताय. अशी भाषा तुम्हालाच लखलाख होवो. तुमच्या लेखी व्हिडिओ फक्त youtube वरच असतात काय. वरच्या एका प्रतिसादात zeenews ची लिंक दिली आहे ती तुम्ही पाहिली नाही काय? तुमच्या सोयीसाठी एक लिंक खाली देतो आहे. http://zeenews.india.com/marathi/news/video/mobile-footage-of-the-air-india-incident/358194 शिवाय तुम्ही सरळसरळ तुमचे मुळचे म्हणने फिरवत आहात. वरच्या तुमच्या प्रतिसादात तुम्ही स्पष्ट म्हटले की, "आणि लोन्ली प्लॅनेट यांच्या प्रतिसादात त्यांची म्हटले होते कि "याला निवडून द्यावे लागले" - वाचून मला वाटले कि हे ही तिकडचेच असतील. आणि मला "हे पुन्हा निवडून येणार नाहीत" हे ऐकून आनंद झाला होता - नुसतं "मूर्ख" वाचून नाही." आता मला सांगा त्या गलिच्छ भाषेला तुमचे समर्थन नसताना तुम्हाला का आणि कसा आनंद झाला? शिवाय वरच्या प्रतिसादांमधे हे अतिशय स्पष्ट झाले आहे की तुम्हाला प्रस्तुत संसद सदस्यांच्या कर्तृत्वाबद्दल आणि मतदारसंघ, लोकसंपर्क वगैरेबाबत अजिबात माहिती नाही. मग तुम्हाला त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणे आणि चप्पल मारण्याव्यतिरिक्त कर्तृत्व काय विचारण्याचा अधिकार कुठुन मिळाला? मुळ मुद्दा आक्षेपार्ह भाषेचा होता, आणि तुमच्या म्हणण्यानुसार संबंधित गलिच्छ भाषा तुम्हाला चुकीची वाटत नाही. तरी कृपया चर्चा ही विषय सोडुन स्वाभिमान वगैरे वैयक्तिक बाबींवर नेऊ नये. असे झाल्यास साहजिकच आम्हाला तुमच्याशी चर्चा करण्यात अजिबात रस असणार नाही. बाकी मिपाकर सुज्ञ आहेतच.

In reply to by शार्दुल_हातोळकर

अत्रे Tue, 03/28/2017 - 15:45
माननीय महोदय, हे सगळे अधिकार मला घटनेने दिले आहेत. बाकी मलाही तुमच्याशी चर्चा करण्यात रस नाही. जय महाराष्ट्र :)

वरुण मोहिते Tue, 03/28/2017 - 15:05
टी. सी ना मारणारे ह्यांच्यावर रेल्वेबंदी झालीये का? सहज आठवलं म्हणून . समर्थन कुणाचेही करण्याचा हेतू नाही हे वरच बोलतोय मला फक्त जो सात्विक संताप उसळला आहे हे पाहून आश्चर्य वाटत आहे .

In reply to by वरुण मोहिते

मोदक गुरुवार, 03/30/2017 - 11:50
हिटलर आणि जोसेफ मेंगेलला शिक्षा झाली नाही म्हणून कसाब किंवा जक्कल सुतारच्या शिक्षेवर पण प्रश्न आहेत का?

वरुण मोहिते Tue, 03/28/2017 - 15:09
बोलल्यावर चटकन मा. अमित शहांचे नाव आठवले पण आम्ही कोणाचा एकेरी उल्लेख करत नाही ना हाच प्रॉब्लेम आहे. झालं तर झालं निषेध पण करतो पण मा. परिचारक यांचा पण एकेरी उल्लेख नाही करत . खूप नावं आठवत आहेत आता काय करावे बरे ??

गॅरी ट्रुमन Tue, 03/28/2017 - 16:00
एअर इंडियाने रवी गायकवाडांनी नव्याने काढलेले तिकिट रद्द केले आहे. एअर इंडियाचे खमकेपणा दाखविल्याबद्दल अभिनंदन. असल्या मुजोर लोकप्रतिनिधींना असेच वठणीवर आणले पाहिजे. समजतात काय लेकाचे स्वतःला.

In reply to by गॅरी ट्रुमन

नो फ्लाय मागे घेतला होता का? नसेल घेतला तर तिकीट रद्द केलं म्हणजे काय विशेष केलं, याची बातमी का व्हावी? जर विमान कंपनी खरी आहे तर कुठल्याही परिस्थितीत नो फ्लाय मागे घेता कामा नये, नाही का? बाकी असला खमकेपणा दाखवण्यासोबतच चांगली सेवा देण्याची बुद्दी विमान कंपन्यांना देरे महाराजा!