भाई वैद्य तुम्ही सुध्दा ?
"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते.
मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना वैद्य आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते "समाज प्रबोधन‘ पुरस्कार रविवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. या वेळी वैद्य यांनी भाजप आणि संघावर कडाडून टीका केली. सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, उपाध्यक्षा प्रा. सायरा मुलाणी, रुबिना पटेल, तमन्ना शेख उपस्थित होत्या.
संदर्भ "http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5525909934268008440&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20160321&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%
भाई वैद्य साहेब मी समाजवादी मंडळींना मतभेद असतील तरी विचारवंत मानत होतो. पुण्यात काही मुस्लीम मंडळींनी चौकात येऊन औवैसी यांच्या विचाराचा निषेध केला. सर्वच मुस्लीम काही औवेसी च्या मताला बांधलेले नाहीत.
आपल्याला रा स्व संघ जर चुकीचा वाटत असेल तर त्यावर टीका करायला मोकळीक आहे पण अस राष्ट्र्विरोधी कृत्याच समर्थन करुन टीका करु नका. हा पायंडा चांगला नाही.
आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. जिथे जिथे मुस्लीम जास्त झाले तेथुन हिंदुंना पळवौन लावले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा इतिहास पुन्हा लिहीण्याची आवश्यकता नाही. आजही पाकिस्थानातुन हिंदु भारतात येत आहेत. काश्मिरमधला हिंदु संपला आहे. का आम्हाला आत्मीयता वाटेल ? तुम्ही घेतला असेल मक्ता आम्ही नाही.
भारतात मुस्लीमांना भय वाटेल असे काही घडत नाही. या उलट जे नरसंहार काश्मीरमधे झालेत त्याची आठवण ठेवा.
मुस्लीमांसमोर अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी मुस्लीम सत्यशोधक समाज काम करतो आहे. तुम्ही संघाला शिव्या दिल्याने त्यात फरक पडणार नाही.
भाई वैद्य साहेब.
१) तुम्ही कधी ज्या मुस्लीम महिलेला तोंडी तलाक मिळालेला आहे त्यावर आवाज उठवलाय ?
२) तुम्ही कधी मेहेर की रकम तलाक पिडीत महिलेच्या उपजिवीके इतकी असते का यावर विचार केलाय ?
३) तळपत्या उन्हात काळ्या बुरख्यात वावरणार्या महिलांना बुरख्या बद्दल काय वाटत हे जाणलय ?
४) सासर्याने केलेल्या बलात्काराला एका मुल्ला ने बलात्कारीत सुनेला तिच्या नवर्याने तलाक द्यावा व पुन्हा सासर्याने निकाह लावावा ही शिक्षा स्वतंत्र भारतात योग्य वाटते ?
५) या राज्यात मुलींचे प्रार्थ्मीक आणि माध्यमीक शिक्षण मोफत असताना मुस्लीम मुलींना मुळ प्रवाहात न आणणारे शिक्षण मदरश्यातुन दिले जाते यावर आपले काय मत आहे? यामुळे त्या नोकरी करु शकत नाहीत कारण मदरश्यात इंग्रजी भाषा, शास्त्र आणि गणित न शिकवता ( सर्व सामन्य पणे ) फक्त कुराण तालीम वर भर असतो.
यामुळे तलाक पिडीत महीला ताठ मानेने जगु शकत नाहीत. त्यांना कोणी अमिर शोधुन त्याची तिसरी किंवा चवथी बिवी म्हणुन रहावे लागते.
या पेक्षा जर भारत माता की जय चा आग्रह झालाच तर तो सौम्य असेल.
तुम्ही संघद्वेशाने पछाडलेले मानसीक रोगी आहात. विचारवंत जर कोणी तुम्हाला यापुढे म्हणणार असेल तर ती मोठी चुक असेल.
राष्ट्र प्रेम हा संस्कार असतो हे सुध्दा तुम्हाला राष्ट्र सेवा दलात शिकता आल नाही. भारत माता की जय म्हणल्याने राष्ट्र विरोधी कृत्य करताना एखादा क्षण विचार करावा इतकाच संस्कार या घोषणेत आहे.
आज अनेक मुस्लीम तरुण देषविघातक कृत्ये करत आहेत त्याचा निषेध भाई तुम्ही कधी केलात का ?
भाई वैद्य साहेब तुम्ही संघाच्या विचाराच्या लोकांच्या पाठींब्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद कधी काळी उपभोगल आहे त्याची आठवण ठेवा. एकदा ह्याच स्टेजवर येऊन म्ह्णा मी शेण खाल्ल्ल मग द्या शिव्या हव्या तेव्हड्या संघ विचारांना.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
साहेब, मनमानी पद्धतीने
संघस्वयंसेवक हिंदू
मनाला येईल ते मान्य करायचे
:)
मुस्लिम धर्माच्या संदर्भात विचार मंथन करण्या आधी
दहशतवादाला धर्म नसतो म्हणतात
तुम्हाला सांगायला आले होते का
दहशतवादी कुराण मानतात हा
थोडी माहिती
तुमच्या मते पवित्र कुराण
मग ते नमाजी हि नसतील.
मोठा प्रश्न चिमणा,
इसिसला बढावा देऊन
@यात इस्लामला आणि पवित्र
कुराण ए शरीफ मध्ये असे लिहले
Quran (8:15) - "O ye who
कुठे गेले नानासाहेब नेफळे?
ते काफिर बद्दल आहे ना? मग
मुस्लिमात बरेच पंथ आहेत. शिया
म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा
साहेब
गल्ली चुकलात का मालक? हा
गल्ली हीच आहे साहेब
गल्ली हिच असेल तर.
हे घ्या, तजो
हे घ्या, तजो
हे घ्या, तजो
रिझल्ट महत्वाचा
विमानात, बस वा ट्रेन मध्ये २
कशाची तुलना कशाशी करताय?
@उलट आता मीच तुमच्याकडे विदा
नेहमीप्रमाणे तुम्ही मूळ
इतरांवर केला जाणारा अत्याचार,
कुराण ए शरीफ आणि शरीयाबद्दल
सदर विषयाची पोहोच आणि पातळीच
म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा
मुळात कुराणात इतरांना मारा
नथुराम गोडसे या माथेफीरुने
यावर जास्ती वाद घालत नाही,
तजो, मुस्लिम धर्माच्या संदर्भात विचार मंथन
चिमणा भाऊ,
@दहशतवादी पवित्र कुराण ए
तजो येतील लगेच पुरावा द्यायला
तीव्र असहमत
गरीब चिमणा जी इसिस हे इस्राईल
इसिस हे ईस्त्राईल आणि
मुस्लिम व्हा,आणि सू-रक्षित
ग. चि. जी भारताला इजराइल च
लेख पटला. पण हे जे कोणी भाइ
http://www.muslimsatyashodhak