मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाई वैद्य तुम्ही सुध्दा ?

गॅरी शोमन · · जनातलं, मनातलं
"भारत माता की जय‘ जो म्हणेल, तोच या देशाचा नागरिक, अशी नवी व्याख्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्ष करू पाहत आहेत. मुस्लिमांना छळायचे, कोंडीत पकडायचे हे यामागचे त्यांचे कुटिल राजकारण आहे. ते आपण ओळखायला हवे. संविधानातील नागरिकत्वाची व्याख्या बदलून "भारत माता की जय‘ म्हणा, हे आपल्याकडे अनिवार्य झाले, तर आजवर ही घोषणा देत आलेला मी पुढे अखेरपर्यंत देणार नाही... ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य बोलत होते. मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या मुमताज शेख यांना वैद्य आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते "समाज प्रबोधन‘ पुरस्कार रविवारी समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. या वेळी वैद्य यांनी भाजप आणि संघावर कडाडून टीका केली. सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी, मंडळाचे अध्यक्ष प्रा. शमसुद्दीन तांबोळी, उपाध्यक्षा प्रा. सायरा मुलाणी, रुबिना पटेल, तमन्ना शेख उपस्थित होत्या. संदर्भ "http://www.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5525909934268008440&SectionId=10&SectionName=%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87&NewsDate=20160321&Provider=-%20%E0%A4%B8%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE&NewsTitle=%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF% भाई वैद्य साहेब मी समाजवादी मंडळींना मतभेद असतील तरी विचारवंत मानत होतो. पुण्यात काही मुस्लीम मंडळींनी चौकात येऊन औवैसी यांच्या विचाराचा निषेध केला. सर्वच मुस्लीम काही औवेसी च्या मताला बांधलेले नाहीत. आपल्याला रा स्व संघ जर चुकीचा वाटत असेल तर त्यावर टीका करायला मोकळीक आहे पण अस राष्ट्र्विरोधी कृत्याच समर्थन करुन टीका करु नका. हा पायंडा चांगला नाही. आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. जिथे जिथे मुस्लीम जास्त झाले तेथुन हिंदुंना पळवौन लावले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरचा हा इतिहास पुन्हा लिहीण्याची आवश्यकता नाही. आजही पाकिस्थानातुन हिंदु भारतात येत आहेत. काश्मिरमधला हिंदु संपला आहे. का आम्हाला आत्मीयता वाटेल ? तुम्ही घेतला असेल मक्ता आम्ही नाही. भारतात मुस्लीमांना भय वाटेल असे काही घडत नाही. या उलट जे नरसंहार काश्मीरमधे झालेत त्याची आठवण ठेवा. मुस्लीमांसमोर अनेक प्रश्न आहेत. त्यासाठी मुस्लीम सत्यशोधक समाज काम करतो आहे. तुम्ही संघाला शिव्या दिल्याने त्यात फरक पडणार नाही. भाई वैद्य साहेब. १) तुम्ही कधी ज्या मुस्लीम महिलेला तोंडी तलाक मिळालेला आहे त्यावर आवाज उठवलाय ? २) तुम्ही कधी मेहेर की रकम तलाक पिडीत महिलेच्या उपजिवीके इतकी असते का यावर विचार केलाय ? ३) तळपत्या उन्हात काळ्या बुरख्यात वावरणार्‍या महिलांना बुरख्या बद्दल काय वाटत हे जाणलय ? ४) सासर्‍याने केलेल्या बलात्काराला एका मुल्ला ने बलात्कारीत सुनेला तिच्या नवर्‍याने तलाक द्यावा व पुन्हा सासर्‍याने निकाह लावावा ही शिक्षा स्वतंत्र भारतात योग्य वाटते ? ५) या राज्यात मुलींचे प्रार्थ्मीक आणि माध्यमीक शिक्षण मोफत असताना मुस्लीम मुलींना मुळ प्रवाहात न आणणारे शिक्षण मदरश्यातुन दिले जाते यावर आपले काय मत आहे? यामुळे त्या नोकरी करु शकत नाहीत कारण मदरश्यात इंग्रजी भाषा, शास्त्र आणि गणित न शिकवता ( सर्व सामन्य पणे ) फक्त कुराण तालीम वर भर असतो. यामुळे तलाक पिडीत महीला ताठ मानेने जगु शकत नाहीत. त्यांना कोणी अमिर शोधुन त्याची तिसरी किंवा चवथी बिवी म्हणुन रहावे लागते. या पेक्षा जर भारत माता की जय चा आग्रह झालाच तर तो सौम्य असेल. तुम्ही संघद्वेशाने पछाडलेले मानसीक रोगी आहात. विचारवंत जर कोणी तुम्हाला यापुढे म्हणणार असेल तर ती मोठी चुक असेल. राष्ट्र प्रेम हा संस्कार असतो हे सुध्दा तुम्हाला राष्ट्र सेवा दलात शिकता आल नाही. भारत माता की जय म्हणल्याने राष्ट्र विरोधी कृत्य करताना एखादा क्षण विचार करावा इतकाच संस्कार या घोषणेत आहे. आज अनेक मुस्लीम तरुण देषविघातक कृत्ये करत आहेत त्याचा निषेध भाई तुम्ही कधी केलात का ? भाई वैद्य साहेब तुम्ही संघाच्या विचाराच्या लोकांच्या पाठींब्यावर महाराष्ट्राचे गृहमंत्रीपद कधी काळी उपभोगल आहे त्याची आठवण ठेवा. एकदा ह्याच स्टेजवर येऊन म्ह्णा मी शेण खाल्ल्ल मग द्या शिव्या हव्या तेव्हड्या संघ विचारांना.

वाचने 28971 वाचनखूण प्रतिक्रिया 118

नाना स्कॉच Wed, 03/23/2016 - 11:42
सामाजिक कार्यकर्ते विश्‍वंभर चौधरी
एकंदरित कार्यक्रम काय असेल ते कळले! :द बाकी, शांतपणे वाचुन मत देता येईल थोड्या वेळात. धन्यवाद

तर्राट जोकर Wed, 03/23/2016 - 11:56
या राज्यात मुलींचे प्रार्थ्मीक आणि माध्यमीक शिक्षण मोफत असताना मुस्लीम मुलींना मुळ प्रवाहात न आणणारे शिक्षण मदरश्यातुन दिले जाते यावर आपले काय मत आहे? यामुळे त्या नोकरी करु शकत नाहीत कारण मदरश्यात इंग्रजी भाषा, शास्त्र आणि गणित न शिकवता ( सर्व सामन्य पणे ) फक्त कुराण तालीम वर भर असतो. >> आकडेवारीसह विदा पाहिजे.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Wed, 03/23/2016 - 18:22
त जो साहेब खालील दुवा वाचून पहा.मुस्लीम मुलींची नव्हे तर सर्व मुस्लीम मुलांची स्थिती आहे. मुलींची स्थिती याहूनही वाईट आहे. तो जे एन यु मधील प्राध्यापकांनी लिहिलेला आहे म्हणजे तुम्हाला त्याला भगव्या रंगाची किनार आहे असे म्हणता येणार नाही.

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Wed, 03/23/2016 - 19:04
तुम्ही दिलेले दोन्ही दुवे वाचले. पण त्यात शोमन ह्यांनी लिहलेल्या विधानांच्या आधाराचा कुठलाही अधिकृत पुरावा मिळाला नाही. दोन्ही लेखात मोघम भाषा आहे. दोन्ही लेखांचा भर मदरश्यांच्या शिक्षनाच्या आधुनिकिकरणाचा आहे. ज्या रिपोर्टचा दाखला अर्शद आलम ह्यांनी दिलाय तो रिपोर्ट इथे http://mhrd.gov.in/sites/upload_files/mhrd/files/Standing%20Committee%20Report_0.pdf ह्या रिपोर्टनुसार शाळेत दाखल झालेल्या मुलांपैकी अंदाजे दहा टक्के मदरशात जातात. सचर कमिटीच्या रिपोर्टनुसार ते ३-४ टके आहे हे आधी दुसर्‍या धाग्यावर दिलेले. ह्या नव्या रिपोर्टनुसार सचर कमिटीने फक्त शासनमान्य मदरशांमधली मुले मोजली होती. ते एक असो. मुद्दा आहे शोमन ह्याम्च्या विधानाचा. ते मुस्लिम मुलींच्या शिक्षणाबद्दल सरसकटीकरण करणारे विधान करुन गैरसमजास हातभार लावत आहेत. वरच्या रिपोर्टनुसार अनेक ठिकाणी मुलांपेक्षा मुलींचे शाळांमधली उपस्थिती जास्त आहे. मुली शाळेतही जात आहे, शासकिय शिक्षण घेत आहेत, नोकर्‍याही करत आहेत. मी त्याची आकडेवारी दुसर्‍या एका धाग्यावर दिली आहे. आता प्रश्न एवढाच आहे. शोमन यांचे विधान सरसकट स्विकारायचे की अनेक शासकिय अहवालांमधे दिसणारी मुस्लिम मुलींची आकडेवारी साफ खोटी आहे असे मानायचे?

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Wed, 03/23/2016 - 19:42
The syllabus being taught here is the same old Darse Nizami syllabus that was prepared in the eighteenth century by renowned theologist Mulla Nizamudin Sihalwi, a contemporary of Shah Walilluah Muhaddis Dehlawi. The same syllabus is being followed by almost every big and small madrasa across the country despite the fact that more than 200 years have passed since it was introduced here. तुम्ही मुलगे आणी मुली यात शब्द छल करणे सोडून द्या. त्यांचा मूळ मुद्दा काय आहे तो लक्षात घ्या. समाजवाद्यांचा/ कम्युनिस्टांचा केवळ भाजप/ संघ याला विरोध एवढाच एककलमी कार्यक्रम आहे. मी दिलेले दुवे हे कॉंग्रेसच्या राज्यातीलच आहेत. आपल्याला दोनशे वर्षापूर्वीचा अभ्यासक्रम शिकवला तर काय होते? हा मुद्दा महत्त्वाचा आहे. कोणतेही सरकार आले आणी त्यानी मदरशाचा अभ्यासक्रम सुधारायचा म्हटला कि हे समाजवादी लोक मुसलमानांवर अन्याय म्हणून गळा काढतात. एकीकडे त्यांना मूळ प्रवाहात आणायला पाहिजे म्हणायचे. त्यांना नोकर्या मिळायला पाहिजेत म्हणायचे आणी शिक्षण दोन "शतके" जुने. मदरशात शिकलेल्या माणसाला लष्करात नोकरी दिली तर त्याला गधड इंग्रजी येत नाही धड हिंदी वाचता येत नाही आधुनिक शास्त्रे कशी शिकवायची? यावर हे समाजवादी लोक म्हणतीलच कि तालिबान किंवा आयसीस चे लोक अत्याधुनिक शास्त्रे चालवतातच की. अशा विचारसरणी असल्यावर काय बोलणार? त्यातून तुम्हाला फक्त "शोमन ह्यांनी लिहलेल्या विधानांच्या आधाराचा कुठलाही अधिकृत पुरावा" फक्त पाहिजे असेल तर मी हि चर्चा येथेच थांबवतो

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Wed, 03/23/2016 - 20:18
का बरे शब्दछल सोडुन द्यावा? शब्दछल करने इथल्याच काही सन्माननीय आयडींकडुन शिकलो आहे. किती मुली-मुलं कुठे जातात काय शिकतात ह्याचा विदा दिल्यानंतरही तुम्ही मदरशांचं घेउन बसलात तर कसे चालायचे? म्हणजे ९० मुले सामान्य शाळेत जातात, १० मुले मदरशात जातात तर ९० कडे साफ दुर्लक्ष करुन १० कडे बोट दाखवुन 'हे असलेच', "ह्यांच्यात सगळं असंच असतं" छाप पिंका टाकणे गैर आहे. तुम्ही आता शोमन ह्यांनी केलेल्या सरसकटीकरणाला थेट अनुमोदन देत आहात. आधीच्या धाग्यावर आपण सरसकटीकरनाविरुद्ध होतात ह्याची आठवण करुन देतो.

In reply to by तर्राट जोकर

विकास गुरुवार, 03/24/2016 - 03:54
माफ करा पण काही प्रश्न ... एका अल्पसंख्य धर्माच्या लोकांबद्दल काही बोलले की लगेच विदा लागतो. पण इतरांची बदनामी करताना विदा मागितला तर तो न देता वाट्टेल ती भाषा वापरून गप्प बसले तर चालते का? एका समुदायाने हिंसा केलेली असली - इतकी की जगभरचे विदाबिंदू घेऊन ती एका आलेखावर मांडली तरी त्यातून आलेख तयार होऊ शकेल. तरी देखील माझ्यासारख्याचे म्हणणे आहे की असे सरसकटीकरण करू नये कारण सगळ्याच माणसांना दोषी ठरवू नये म्हणून. तुमच्या सारखे तर लगेच तावातावाने पुढे येतात... पण जर इतर संघटनेच्या विरोधात एक पुरावा शाबित झालेला नसताना देखील (आणि हो बंदी आणायचा प्रयत्न करून पण ती उठवायला लागलेली असताना देखील) त्या संघटनेला आणि त्याच्याशी जो कोणी संबंधीत असेल अथवा समर्थक असेल त्या सर्वांना जणू गुन्हेगार आहे अशा पद्धतीने बोलले तर ते योग्य असते का? नसले तर मग असे कसे करता? का एकीकडे नियम / तत्वआणि दुसरीकडे नुसता जहरी द्वेष पसरायचे उद्योग?

In reply to by विकास

तर्राट जोकर गुरुवार, 03/24/2016 - 11:47
अहो तुम्ही ठरवले आहेच ना आम्ही पक्षपाती आहोत. मग काय उरले आता? आम्ही स्पष्ट भूमिका घेतो तरी की आम्ही संघविरोधक, भाजप विरोधक, भक्तविरोधक आहोत म्हणून. पण इथल्या काही निष्पक्ष आणि अभ्यासू म्हणवल्या जाणार्‍या सदस्यांना तुमचे हे प्रश्न विचारा ना? त्यांना अशी स्पष्ट भूमिका घ्यायला सांगा ना? उगा आपलं ताकाला जायचे आणि भांडे लपवायचे, वरुन आम्ही कीती विचारवंत, अभ्यासू, निष्पक्ष म्हणून मिरवायचे. दुसर्‍यांकडे बोट दाखवतांना आपण काय करतो हेही बघून घ्यावे. बाकी दहशतवादी कारवायांमधे मुस्लिम असतात ह्याला मी कधीही कुठेही नाकारले नाही. पण त्या सत्याचा आधार घेऊन इतर चांगल्या गोष्टी ज्यापद्धतीने दाबल्या जातात त्याला विरोध आहे. उदा. इथे व ओवेसीचा गळा ह्या धाग्यावर मदरशांचा उल्लेख झाला, चार बायका व मुले, त्यांचे फतवे ह्यांच्याबद्दल मी पुरावे दिले तर मान्य करण्याचा मोठेपणा इथे कोणीच दाखवला नाही. पण तेच मुद्दे घेऊन मुस्लिमांचे सरसकटीकरण करणारे, घृणा करणारे प्रतिसाद आले की त्याला हिरिरीने समर्थन मिळतांना दिसते. म्हणजे आतंकवादी, दंगे ह्यातून मुस्लिमांबद्दल तयार झालेली एकांगी प्रतिमा खरे आकडे पुढे आले तरी बदलायची नाहीच असे काहींनी ठरवले आहे. मग मला नावे ठेवण्याचा अधिकारही कोणाला मिळत नाही हेही लक्षात ठेवावे. रच्याकने, संघाबद्दल तर नंतर बोलणारच आहे. तो विषय एका प्रतिसादात मावण्यासारखा नाही. म्हणून तुम्हाला थांंबा म्हणत होतो, पण तुम्हाला उतावळेपणा सोडवला नाही. असो.

In reply to by श्रीगुरुजी

गरिब चिमणा Wed, 03/23/2016 - 17:12
भाई वैद्य, विश्वंभर चौधरी हे निधर्मी आणि पुरोगामी विचारवंत आहेत. त्यामुळे त्यांना गांभिर्याचे घेण्याची गरज नाही.>>>>>>>>> टीनपॉट अतुल भातकळकर किंवा गेलाबाजार राम माधव सारख्याला तुम्ही गांभिर्याने घेता ना, मग बास तर!

In reply to by श्री गावसेना प्रमुख

गरिब चिमणा Wed, 03/23/2016 - 20:22
ते तुम्हाला नाही माई साहेबांच्या मिस्टरांना म्हणताहेत
मी या आधीही सांगितले आहे , माझा माईसाहेब या आय्डीशी काहीही संबंध नाही.नानासाहेब कोण होते मला माहीत नाही,पण मला प्रत्येकवेळी नानासाहेब संबोधुन माईसाहेब कुरसुंदीकर या स्त्री आयडीची ऑन रेकॉर्ड बदनामी चालू आहे ते योग्य नाही.माई वयस्कर आहेत ,निदान त्यांच्या वयाचा मान ठेउन यापुढे त्यांचा कुणाशीही संबंध जोडून बदनामी करु नका.

In reply to by नाना स्कॉच

श्रीगुरुजी Wed, 03/23/2016 - 19:26
तुम्हाला नाही हो. माझा प्रतिसाद ग्रेटथिन्कर उपाख्य ग्रेटथिंकर उपाख्य नानासाहेब नेफळे उपाख्य फुलथ्रॉटल जिनिअस उपाख्य टॉपगिअर्ड फिलोसोफर उपाख्य काकासाहेब केंजळे उपाख्य माईसाहेब कुलसुंगीकर उपाख्य गरीब चिमणा उपाख्य .... या सदगृहस्थांना उद्देशून होता.

In reply to by श्रीगुरुजी

नाना स्कॉच Wed, 03/23/2016 - 19:43
मालक!!! ____/\____ ह्या घटोत्कची मायाजालापुढं आमची काय मिजास!! आम्ही एकुलते एक अन हेच आहोत! तेव्हा एक विनंती ह्यापुढे जमल्यास त्यांचा उल्लेख त्यांच्या 24001 महापद्म आयडी पैकी नाना सोडुन एखादा वापरुन करावा ही विनंती!! किमान नानासाहेब नेफळे चे नाने करून वापरा अशी लीं विनंती!! (धसका घेतलेला) नाना

In reply to by गरिब चिमणा

DEADPOOL गुरुवार, 03/24/2016 - 15:46
माई मोड़ ऑन निधर्मी म्हणजे हिंदू धर्मावर तोंडसुख घेणारे ना रे चिमणा? मनातल्या मनात- आमच्या ह्यांच्या दुआईडी मुळे अशी पंचायत होते! इच्छा नसताना अरे तूरे करून विचारावे लागते! माई मोड़ ऑफ

In reply to by गरिब चिमणा

महासंग्राम Fri, 03/25/2016 - 16:55
भाई वैद्य एकवेळ ठीक आहे हो विश्वंभर चौधरी कधी पासून विचारवंत झाले ??? भारीच इनोद करता कि चिमण राव तुम्ही

In reply to by नाना स्कॉच

तर्राट जोकर Wed, 03/23/2016 - 15:12
उने बोले तो चलता है भाईजान. हमबोले तो सरसकटीकरण? ब्रिगेड लगेच सरसावून प्रश्न विचारायला टपकते.

आनंदी गोपाळ Wed, 03/23/2016 - 13:32
एकदा ह्याच स्टेजवर येऊन म्ह्णा मी शेण खाल्ल्ल मग द्या शिव्या हव्या तेव्हड्या संघ विचारांना.
तुम्ही आग्रहच करत आहात, तर म्हणतो ब्वा. "गॅरी शोमन यांनी शेण खाल्लं." धन्यवाद!

कलंत्री Wed, 03/23/2016 - 15:26
वर्तमानपत्रातील / जालावरील अथवा माध्यमातील बातम्या संदर्भाला सोडुन लोकक्षोभ होईल या पद्धतीने पसरवल्या जातात. उत्तम उपाय म्हणजे त्या व्यक्तिचा भूतकाळ पहा आणि ठरवा.

ज्या मुस्लिम सत्यशोधक मंडळाच्या नावाखाली ह्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले होते, त्याच्या स्थापनेपासूनची पहिली मागणी समान नागरी कायदा अशी होती. भाई वैद्य असोत किंवा बाकीच्या समाजवादी नेत्यांनी चार दशकापुर्वी याच मागणीसाठी आटापिटा केलेला होता. पण १९८० नंतर संघाने वा भाजपाने समान नागरी कायद्याच्या मागणीचा पाठपुरावा सुरू केला आणि तात्काळ ती मागणी प्रतिगामी होऊन गेली हा उतारा भाऊ तोरसेकर ह्यांच्या ब्लॉग वरचा असून ह्यातील खरे खोटेपणा वैद्यच जाणो। फक्त संघाला विरोध हाच एक कलमी कार्यक्रम आहे ह्यांचा।

गॅरी शोमन Wed, 03/23/2016 - 16:21
मी सय्यद भाईंची मुलाखत पाहिली आहे. ते तोंडी तलाक/ मेहेर की रकम विरुध्द कडाडुन बोलतात. सत्यशोधक मंडळच हायजॅक केलेल दिसतय भाईजान लोकांनी.

नाना स्कॉच Wed, 03/23/2016 - 18:17
तावातावाने सगळे राजकाराणावर अन समाजावर काथ्या कूटत बसतात आज "शहीद दिवस आहे" सगळेच विसरले??? अरेरे असो!, माझ्यातर्फे तरी मी शहीद भगतसिंह , शहीद सुखदेव थापर अन शहीद शिवराम हरी राजगुरु ह्या तीन शहीदांना आदरांजली वाहतो ____/\____ .

विकास Wed, 03/23/2016 - 18:57
आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. हे सरसकटीकरण अमान्य आहे आहे आणि आक्षेपार्ह देखील आहे. असे सरसकटीकरण कुठल्याच गोष्टींचे, म्हणजे येथे मुस्लीमसमाजाबद्दल असेल पण इतर चर्चेत इतरांबद्दल देखील असते. जे काही या समाजाकडून चुकत गेले त्याला त्या समाजापेक्षा विशेष वागणूक मिळण्याची सवय कारणीभूत आहे असे मला वाटते. हे केवळ भारतातच नाही तर जगभर झालेले आहे. पण हा वेगळा चर्चेचा विषय आहे. मिपाच्या व्यक्तीस्वातंत्र्याचा यात फायदा घेतला जात आहे असे वाटते. तेच मोठ्या पातळीवर भारतात होत आहे. त्यामुळे केवळ धार्मिक तत्वावरच नाही तर कुठल्याही तत्वावर जर आपले लेखन हे सामाजिक फूट पाडण्यास आणि द्वेष तयार करण्यास जबाबदार होत असेल तर व्यक्तीस्वातंत्र्य गाजवायच्या आधी सर्वांनी दहादा विचार करावा असे वाटते. असो. इति लेखनसीमा.

आम्हाला नाही मुस्लीम लोकांबाबत आत्मीयता कारण ह्या सर्वसाधारण लोकांची विचारसरणी ही भारत या विशाल जनप्रवाहात सामील होण्याची नाही. भारतच कशाला युरोपात घुसलेले इसिस ग्रस्त निर्वासित छावण्या मध्ये कुराणाची पाने त्यांच्याच अफगाणी समाज बांधवाने फाडली म्हणून दंगल करतात ह्याला काय म्हणावं।आता काल झालेला स्फोटाची जबाबदारी इसिस ने घेतली आहे ,त्यांनी मागेही जाहीर केलं होत कि ह्या निर्वासितात आमचे लोक आहेत म्हणून तरीही सेकुलर यूरोपीय नेत्यांनी त्यांना पायबंद घेतला नाही, बांधावरचे संपन्न अरबी देश त्यांना आत घ्यायला नकार देतात,,आता अधून मधून दिवाळीच्या फटाक्यासारखा युरोपात आवाज येतच राहील,जोपर्यंत आधी धर्म मग बाकी सर्व अशा मानसिकतेचे लोक तिथे आहेत तोवर।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

गरिब चिमणा Wed, 03/23/2016 - 20:31
इसिस हे ईस्त्राईल आणि अमेरीकेचे पाप आहे ,त्याची फळे ते भोगत आहेत.यात उगाच कुणा धर्माला दोष देऊ नका.पवित्र कुराण ए शरीफ मानणारा सच्चा मुसलमान दहशतवादाचा निषेधच करतो. दहशतवादाला कोणताही धर्म नसतो हे त्रिकलाबाधीत सत्य आहे

In reply to by गरिब चिमणा

ट्रेड मार्क Wed, 03/23/2016 - 22:20
इसिस कुराण ए शरीफ मानत नाही का? तिथे भरती होणारे सगळे कुराण पढलेले असतात का नाही? समस्त दहशतवादी कुराणाचेच दाखले देऊन सगळी काळी कृत्ये करतात. कुठल्या मुसलमानाने कधी दहशतवादाचा विरोध केलाय ते सांगा, नुसता तोंडदेखला निषेध कोणीतरी कधीतरी करतो. हे लोक जो पर्यंत कमी संख्येत असतात तो पर्यंत अगदी सज्जन, गरीब, मनमिळाऊ असतात. जशी संख्या वाढेल तसे नखरे चालू होतात आणि मग दहशत. कोणाला सपोर्ट करतोय याचं भान ठेवा जरा. दहशतवादाला धर्म नसतो म्हणतात पण बहुतांशी सगळे दहशतवादी मुस्लिम का असतात?

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर Wed, 03/23/2016 - 22:33
कुठल्या मुसलमानाने कधी दहशतवादाचा विरोध केलाय ते सांगा, नुसता तोंडदेखला निषेध कोणीतरी कधीतरी करतो ओवेसीच्या धाग्यावर आताच शेअर केले होते. https://www.google.co.in/webhp?sourceid=chrome-instant&ion=1&espv=2&ie=UTF-8#q=++fatwa+against+isis http://www.independent.co.uk/news/world/asia/70000-indian-muslim-clerics-issue-fatwa-against-isis-the-taliban-al-qaida-and-other-terror-groups-a6768191.html https://en.wikipedia.org/wiki/List_of_fatwas#Fatwas_against_terrorism.2C_Al-Qaeda_and_ISIS आता ह्या विरोधाला तोंडदेखला म्हणून तुम्ही रद्दबातल करु शकता. हरकत नाही.

In reply to by तर्राट जोकर

ट्रेड मार्क गुरुवार, 03/24/2016 - 00:12
बातमीत कशी गोलमाल केलीये बघा. पहिल्या परिच्छेदात "Nearly 70,000 Indian Muslim clerics have signed a fatwa" असं म्हणलाय. मग नंतर हळूच "Around 70,000 clerics from across the world, who were part of the event, passed the fatwa.". एकूण १५ लाख लोकांनी निषेध केला म्हणतात. जर फक्त भारतातून मुस्लिम आले असतील तर भारतातील एकूण मुस्लिम संख्येपैकी 0.8720% मुस्लिमांनी आणि जर जगभरातून आले असतील तर जगातील एकूण मुस्लीमांपैकी 0.09375% मुस्लिमांनी निषेध केला. आधीचा विचार न करता नजीकच्या काळातलं बघितलं तर मुस्लिम दहशतवाद १९८० च्या दशकात वाढीस लागला. तेव्हाच विरोध दर्शवला असता तर एवढा वाढला नसता. दुर्दैवाने अजूनही तथाकथित पुरोगामी लोक या ना त्या मार्गाने पाठीशी घालत आहेत.

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर गुरुवार, 03/24/2016 - 12:03
अपेक्षित प्रतिसाद. आधी विचारायचे एकाने तरी विरोध केला का, उत्तर दिल्यावर सांख्यिकी मांडतायत. तुम्ही ठरवूनच टाकले आहे तर विदा-पुरावा तरी कशाला मागता? रच्याकने तुमच्याच सांख्यिकीचा फॉर्मुला वापरला तर संघस्वयंसेवक हिंदू लोकसंख्येच्या 0.18% आहेत. म्हणजे तथाकथित हिंदूराष्ट्राला सपोर्ट करणारे हिंदूंपैकी फक्त 0.18% आहेत. बाकीचे तथाकथित पुरोगामी आहेत. दुर्दैव आहे ब्वा तुमचे.

In reply to by तर्राट जोकर

ट्रेड मार्क गुरुवार, 03/24/2016 - 19:24
विरोध आणि निषेध यातला फरक तुम्हाला कळतोय का? मी एक तरी मुसलमान विरोध करतोय का विचारतोय आणि तुम्ही निषेधाचा सूर कोणी काढला ते सांगताय. हे म्हणजे पोर हाताबाहेर गेल्यावर बाप नुसता अरे नको रे असा वागू असं म्हणण्यासारखं आहे. एक तर पहिल्यापासून शिस्त लावायला पाहिजे होती ती लावली नाही आणि आता कान उपटायची वेळ पण निघून गेली तरी पोराला काही न करता नुसतं बाकीच्यांना सांगत बसलेत. तुम्ही सांख्यिकी मध्ये परत गडबड केलीत. आपण पाठींबा किती लोंकांचा आहे याबद्दल बोलतोय. संघाला किती लोकांचा पाठींबा आहे ती संख्या असेल तर सांगा. बादवे, तुम्ही या हाताबाहेर गेलेल्या पोराची एवढी का बाजू घेता याचं बाकी आम्हाला भारी कुतूहल आहे.

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर Fri, 03/25/2016 - 13:11
कोणत्या स्वरुपाचा विरोध आपणास अपेक्षित आहे आणि कुणाकडून ते स्पष्ट करावे. सांख्यिकीचा खेळ तुम्हीच मांडायला नको होता. कारण मुळात तो मला कधीच आवडत नाही. सांख्यिकीतून काहीच सिद्ध होत नसतं.

In reply to by तर्राट जोकर

श्रीरंग Fri, 03/25/2016 - 23:30
हो का? सांख्यिकीतून काहीच सिद्ध होत नसत, म्हणता? मग या धाग्यावर सर्वप्रथम तुम्हीच विदा का मागवलात तेही सांगा..

In reply to by श्रीरंग

तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 12:13
साहेब, मनमानी पद्धतीने मांडलेल्या सांख्यकितून काहीच सिद्ध होत नसतं असे म्हणायचे आहे. विदा आणि सांख्यिकी ही सरकारी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतर्फे असेल तर ती मान्य करण्यास हरकत नसावी. तिरपाग्डे लॉजिक लावून स्वतःच सोयिस्कर सांख्यिकी मांडणे ह्याला अर्थ नसतो.

In reply to by तर्राट जोकर

DEADPOOL गुरुवार, 03/24/2016 - 20:22
संघस्वयंसेवक हिंदू लोकसंख्येच्या 0.18% आहेत. >>>>>> परंतु संघाचीच विचारधारा असलेल्या भाजपच्या सदस्यांचा आकडा सांगाल का? आणि १२० कोटी जनतेपैकी निम्म्यापेक्षा जास्त जनतेने भाजपाला मतदान केले म्हणजे बघा ३० कोटी अल्पसंख्य सोडले तर ९० कोटीपैकी ६० कोटी हिंदूंची या विचारधारेला समर्थन आहे! शब्दांचे खेळ सोडा आता!

In reply to by DEADPOOL

तर्राट जोकर Fri, 03/25/2016 - 13:22
मनाला येईल ते मान्य करायचे तुम्हाला स्वातंत्र्य आहे. सत्य पाहायचे असेल तर लोकसभा निवडणुकीचे विश्लेषण जालावर उपलब्ध आहे. १. तुमच्या म्हणण्यानुसार अल्पसंख्यांकांनी भाजपाला वोट केले नाही. हे तुम्ही सिद्ध करु शकाल काय? २. १२० कोटी जनता मतदान करत नाही. ८१.४५ कोटी मतदार आहेत. त्यापैकी भाजपाला ३१ टक्के वोट मिळालेत. ३. भाजपाचा निवडणूकीचा जाहिरनामा देशाचा सर्वांगिण विकास ह्यावर आधारित होता. सबका साथ सबका विकास. असे स्लोगन होते. 'सबको लाथ सिर्फ हिंदूका विकास' असे नव्हते. ४. भाजपाला विजय मिळण्याचे कारण काँग्रेसचे भ्रष्टाचारी विश्वरुपदर्शन होते. त्यावर भाजपाने पुढे केलेला विकासाचा, प्रामाणीक सरकार देण्याचा मुद्दा होता. संघाची हिंदूराष्ट्र संकल्पना नाही. बाकी तुम्ही ही सांख्यिकी मांडून जर असे म्हणत असाल का बहुसंख्य हिंदूंनी हिंदूराष्ट्र साठी भाजपाला मतदान केले तर भाजपाचा निवडणूक जाहिरनामा ही धुळफेक होती, खरा अजेंडा हिंदुराष्ट्र हाच आहे. धन्यवाद.

In reply to by तर्राट जोकर

विकास गुरुवार, 03/24/2016 - 20:40
रच्याकने तुमच्याच सांख्यिकीचा फॉर्मुला वापरला तर संघस्वयंसेवक हिंदू लोकसंख्येच्या 0.18% आहेत. म्हणजे तथाकथित हिंदूराष्ट्राला सपोर्ट करणारे हिंदूंपैकी फक्त 0.18% आहेत. इतक्या अल्पसंख्य समुदायाच्या लोकांवर स्वतःला सेक्यूलर म्हणणारे लोकं हल्ले करून स्वतःची असहीष्णुता दाखवतात असे वाटते. त्याव्यतिरीक्त संख्या ०.१८% और गरळ (पक्षी: शाब्दीक खोटारडे हल्ले/बदनामी) १८०%* ये बहौत नाइन्साफी है! खरे की नाही? ;) का स्युडोसेक्यूलर आवाज ०.१८% पुढे पण तोकडा पडतोय? * १८०% म्हणजे थोडक्यात ०.१८% च्या कितीतरी पट अधिक इतकेच म्हणण्याच्या दृष्टीने वापरलेला आकडा आहे.

In reply to by तर्राट जोकर

lakhu risbud गुरुवार, 03/24/2016 - 10:36
तजो, मुस्लिम धर्माच्या संदर्भात विचार मंथन करण्या आधी तारेक फताह यांच्या मुलाखती वाचाव्या अशी नम्र विनंती. http://www.misalpav.com/comment/818966#comment-818966 http://www.misalpav.com/comment/818972#comment-818972

In reply to by ट्रेड मार्क

गरिब चिमणा गुरुवार, 03/24/2016 - 20:34
दहशतवादाला धर्म नसतो म्हणतात पण बहुतांशी सगळे दहशतवादी मुस्लिम का असतात?>>>>>> दहशतवादी पवित्र कुराण ए शरीफला मानत नाहीत, त्यामुळे रे मुस्लिम नाहीत,पवित्र कुराण मानवतावाद शिकवते .

In reply to by गरिब चिमणा

श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 03/24/2016 - 20:44
तुम्हाला सांगायला आले होते का कि आम्ही कुराण मानीत नाही।बरं नाही तर नाही मग जिहाद हा शब्द कोठून घेतला आहे त्यांनी ।

In reply to by श्री गावसेना प्रमुख

गरिब चिमणा गुरुवार, 03/24/2016 - 20:54
दहशतवादी कुराण मानतात हा निष्कर्ष कशावरुन काढलात? जिहाद या शब्दाचा ते गैरवापर करतात,मुस्लिमाण्ना बदनाम करण्यासाठी.

In reply to by गरिब चिमणा

ट्रेड मार्क गुरुवार, 03/24/2016 - 21:01
एक विकीपेडिया नामक संस्थळ आहे. त्यावर इसिस बद्दल माहिती विचारली तर खालील माहिती मिळते इसिस इस्लामीक फंडालीझम मानते आणि ते म्हणजे कुराण जसे आहे तसे घेऊन त्याप्रमाणे वागावे असे सांगते. म्हणजे काय तर जे इस्लाम आणि कुराण मानत नाहीत त्या सर्वांचा नाश करावा. जरा शोधून बघा नाही मिळालं तर मग मी URL देईन. तुम्ही असे कशाच्या जोरावर म्हणता की हे लोक कुराण मनात नाहीत? दुसरे काय मानतात मग? ही बदनामी कोण करत आहे? तुमच्या मते पवित्र कुराण मानणाऱ्यांनी या लोकांविरुद्ध काय पावले उचलली आहेत?

In reply to by ट्रेड मार्क

श्री गावसेना प्रमुख गुरुवार, 03/24/2016 - 21:12
तुमच्या मते पवित्र कुराण मानणाऱ्यांनी या लोकांविरुद्ध काय पावले उचलली आहेत? भारतीय उपखंडातील मुस्लिमांना( हे म्हणे कुराणा नुसार वागत नाही) आपले न म्हणणारे श्रीमंत अरबी मुस्लिम पैसा देतात त्यांना ।

In reply to by गरिब चिमणा

भंकस बाबा गुरुवार, 03/24/2016 - 23:08
तुमचे तर्क आपण एक वेळ बरोबर मानू, कुरआन दहशतवाद शिकवत नाही. मग या जगभरच्या जिहादी कारवाईमागे कसले खुळ आहे हो? अमेरिका आमच्यात भांडणे लावुन देते म्हणतात. स्वताची अककल नावाची काही वस्तु आहे की नाही? बाकी इसिस वाले थोड़े डोके बाळगुन आहेत हो! आत्तापर्यन्त केलेल्या इन कॅमेरा हत्याकांडात त्यांनी एकाही ज्यूला मारले नाही आहे. यांना काय ज्यू मिळाला नाही? करून बघा म्हणाव, इस्राईली असे हात धुवून मुस्लिमाच्या पाठी लागतील की इसिसच्या पाठीराख्या देशानाच् त्यांचा म्हणजे इसिसचा खात्मा करावा लागेल.

In reply to by भंकस बाबा

गरिब चिमणा गुरुवार, 03/24/2016 - 23:22
इसिसला बढावा देऊन मध्यपुर्वेतले वातावरण अस्थीर ठेवायचे आहे अमेरीकेला.जसा लादेनचा भस्मासूर अमेरीकेने उभा केला ,नंतर तो त्यांच्यावरच उलटला तसेच आताही होत आहे.मध्यपुर्वेतल्या तेलाचे राजकारन आहे सगळे .यात इस्लामला आणि पवित्र कुराण ए शरीफला दोष द्यायचे काहीच कारण नाही.

In reply to by गरिब चिमणा

अत्रुप्त आत्मा गुरुवार, 03/24/2016 - 23:47
@यात इस्लामला आणि पवित्र कुराण ए शरीफला दोष द्यायचे काहीच कारण नाही. >> बिगरमुस्लिम म्हणजे काफिर आणि त्याचे मृत्यू पश्चात स्थान - नरकाग्नी. हे कुराणात (अल्लाहने) वारंवार स्पष्ट केले आहे. असे का आहे? हे कळले तरी कळतं दहशतवाद कशात आह?,आणि तो कुणी सांगितला.

In reply to by गरिब चिमणा

श्रीगुरुजी Fri, 03/25/2016 - 14:23
Quran (8:15) - "O ye who believe! When ye meet those who disbelieve in battle, turn not your backs to them. (16)Whoso on that day turneth his back to them, unless maneuvering for battle or intent to join a company, he truly hath incurred wrath from Allah, and his habitation will be hell, a hapless journey's end." Quran (9:73) - "O Prophet! strive hard against the unbelievers and the hypocrites and be unyielding to them; and their abode is hell, and evil is the destination." Dehumanizing those who reject Islam, by reminding Muslims that unbelievers are merely firewood for Hell, makes it easier to justify slaughter. It also explains why today's devout Muslims have little regard for those outside the faith. Quran (48:17) - "There is no blame for the blind, nor is there blame for the lame, nor is there blame for the sick (that they go not forth to war). And whoso obeyeth Allah and His messenger, He will make him enter Gardens underneath which rivers flow; and whoso turneth back, him will He punish with a painful doom." Contemporary apologists sometimes claim that Jihad means 'spiritual struggle.' Is so, then why are the blind, lame and sick exempted? This verse also says that those who do not fight will suffer torment in hell. word used for 'hard' or 'ruthless' in this verse shares the same root as the word translated as 'painful' or severe' to describe Hell in over 25 other verses including 65:10, 40:46 and 50:26..

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Sat, 03/26/2016 - 17:40
मुस्लिमात बरेच पंथ आहेत. शिया, सुन्नी, अहमदी, बोहरी, यझदी इ. सुन्नींची संख्या अंदाजे ८०% आहे. यातल्या अहमदींना अमुस्लिम असे जाहीर केले गेले आहे. सुन्नी महंमद हाच शेवटचा प्रेषित मानतात तर शिया भविष्यात अजून एक प्रेषित येईल असे मानतात. महंमदाच्या मृत्युनंतर वारसदार कोण यातून वाद होऊन हे दोन पंथ निर्माण झाले व नंतर कर्बालामध्ये युद्ध होऊन महंमदाच्या मुलीचे पुत्र हसन व हुसेनला मारण्यात आले. त्याचे दु:ख म्हणून शिया मोहर्रम पाळून छाती बडवून शोक व्यक्त करतात. जगभरात ज्या देशात मुस्लिम बहुसंख्य आहेत तिथे सुन्नी शियांचे हत्याकांड करतात (उदा. पाकिस्तान, इराक). अजून एक वेगळा कोन आहे. लादेनच्या हस्तकांनी ९० च्या दशकात टांझेनिया व केनयात बॉम्बस्फोट घडवून २१२ जणांचा मृत्यु घडवून आणला होता. त्यात फक्त १२ अमेरिकन होते व उर्वरीत स्थानिक मुस्लिम होते. लादेनने बॉम्बस्फोटानंतर आनंद व्यक्त केल्यावर त्याच्या मुलाने हे निदर्शनास आणून दिले की त्यातले बहुसंख्य मुस्लिम होते. त्यावर लादेनची ही प्रतिक्रिया होती की ते मरावे अशी अल्लाचीच इच्छा होती. त्यामुळे त्याचे दु:ख नाही. पण १२ अमेरिकन मारले गेल्याचा अत्यांनद झालेला आहे. अशी मानसिकता असणारे इतरांना मारतामारता त्यात मुस्लिम मेले तरी दु:ख करीत नाहीत.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 17:53
म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा नाही हे सिद्ध होतंय. ज्याला कोणाला दुसर्‍याला मारायचे आहे तो कुरानाचा हवाला देउन दुसर्‍याला अमुस्लिम ठरवुन मारतो. ह्यात कुराणाचा नक्की काय दोष? ज्याला दुसर्‍याला मारायचे आहे त्याला कुठलेही कारण पुरते की? मारण्याचे कारण धार्मिक दिले की मारणार्‍याला उदात्त कर्म केले असे वाटते. मुस्लिम म्हणजे अल्लाह ला एकमेव देव मानणारा, पाच नमाज पढणारा, मोहमद पैगंबराला प्रेषित मानणारा, कुराण अल्लाहने सांगितले इतके जुजबी नियम पाळणारा असे आहे. बाकी हजार फाटे प्रत्येक धर्म-संप्रदायात असतात. मारण्याचे कारण कुराण आहे हे नक्की का? मला तसे वाटत नाही. कारण गीतेतही असे श्लोक आहेत ज्याचा आधार घेउन अमर्याद हिंसा करता येणे शक्य आहे. आपण सर्व करुन नामानिराळे राहून, भगवंताची अशीच इच्छा आहे असे बोलले की झाले. पण हिंदू लोक गीतेचा आधार घेऊन कत्लेआम करत नाहीत.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Sat, 03/26/2016 - 18:40
साहेब इस्लाम या शब्दाचा अर्थच "अल्लाच्या इच्छे"ला शरण( कोणताही प्रतिवाद न करता) जाणे. एकदा आपण शरण गेलात कि बुद्धीवादी चर्चा /प्रतिवाद हा अशक्यच आहे. म्हणूनच कुराण शरियत बद्दल न्यायालयीन किंवा इतर वाद संभवत नाहीत. संभवते फक्त त्या शब्दांचा अर्थ लावणे किंवा शाब्दिक कसरत. आणि हीच कसरत मौलवी करून त्यांना पाहिजे तो अर्थ काढत असतात. आणि आपल्याला पाहिजे तसे फतवे जाहीर करतात. मग तो फतवा आधुनिक काळात कितीही हास्यास्पद अन्यायकारी आणि भयानक असेल तरीही कारण तीच "अल्लाची इच्छा" आहे . उदा. सासर्याने सुनेवर बलात्कार केला तर ती स्त्री आता नवर्याची आई होते म्हणून तिने नवर्याला तलाक देऊन सासर्याशी निकाह केला पाहिजे.असा फतवा दारूल उलूम देवबंद या मोठ्या धार्मिक पाठ्शालेने काढला होता आणि संतापाची गोष्ट हि कि त्याला All India Muslim Personal Law Board ने पाठींबा दिला होता आणि मौलवी मुलायम सिंहानि त्याला पाठींबा दिला होता. यापेक्षा मुस्लिम लांगुलचालन काय असू शकते? https://en.wikipedia.org/wiki/Imrana_rape_casehttps://en.wikipedia.org/wiki/Imrana_rape_case हि केस मुळातूनच वाचा म्हणजे तुमच्या शंकांचे निरसन होऊ शकेल. हेच All India Muslim Personal Law Board आता सांगत आहे कि आमच्या वैयक्तिक कायद्यात सर्वोच्च न्यायालय ढवळा ढवळ करू शकत नाही. इतका घोर अन्याय एखाद्या स्त्रीवर होत असेल तर न्यायासन किंवा सरकारने गप्प बसावे काय?

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 19:15
गल्ली चुकलात का मालक? हा प्रतिसाद दुसर्‍या धाग्यावर द्यायचा होता का? कारण तुमच्या प्रतिसादातले एकही वाक्य माझ्या प्रतिसादाच्या मुद्द्याच्या आसपासही फिरकत नाही. मुद्दा आहे कुराणमधे अमुस्लिमांना मारण्याचे आदेश.

In reply to by तर्राट जोकर

सुबोध खरे Sat, 03/26/2016 - 20:01
गल्ली हीच आहे साहेब "कुराण अल्लाहने सांगितले इतके जुजबी नियम पाळणारा" हे आपलेच शब्द आहेत ना? नियम जुजबी नसून सर्व आयुष्य आणि समाजव्यापी आहेत आणि ते ठरवणारे अल्लाचे सेवक मौलवी आहेत त्यांचा शब्द म्हणजे अल्ला चा शब्द इस्लाम मध्ये जे आणि जसे सांगितले आहे तसेच्या तसे वागणे हे सर्व मुसलमानांचे आद्य कर्तव्य आहे आणि कुराण मध्ये काफिरांना देहदंड देणे हे सच्च्या मुसलमानाचे आद्य कर्तव्य आहे असे स्पष्ट लिहिलेले आहे. याची बुद्धीवादि चर्चा होऊ शकत नाही एवढेच मला म्हणायचे आहे. गीतेतील शब्द न पाळणारा हिंदू धर्मातून धर्मबाह्य होत नाही आणि त्याला देहदंडाची शिक्षा नाही भारतीय दंड विधान संहितेत पण तसे शरीया मध्ये आहे हा एक फार मोठा फरक आहे. हे जर तुम्हाला समजून घ्यायचेच नसेल तर वाद थांबवू.

In reply to by सुबोध खरे

तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 20:40
गल्ली हिच असेल तर. १. मौलवी जे शब्द (फतवे) काढतात ते शंभर टक्के इम्प्लिमेंट होत नाहीत. २. काफर म्हणजे कोण हे स्पष्ट असतांना मुस्लिम राष्ट्रांमधे अमुस्लिमांना जीवंतच ठेवायला नको. ३. कुराणातले शब्द किंवा मौलवींचे (अडचणीचे) फतवे न मानणारे मुस्लिम बहुसंख्येने आहेत. ते धर्मबाह्य झालेले दिसत नाहीत. ४. 'कुराणात दिले आहे काफरांना देहदंड द्या' असे मानणारे आणि शब्दशः फॉलो करणारे मुस्लिम असते तर हे मनुष्यजात केव्हाच संपली असती. तुम्ही जे म्हणताय ते वस्तुस्थितीशी म्याच होत नाही. ह्या किंवा कुठल्याच धाग्यावर कधीच शरियाचे समर्थन मी केलेले नाही हे लक्षात आणून देतो. भारतीय दंड विधान आणि शरिया यातला फरक मला समजुन सांगण्याची गरज तुम्हाला का पडली ह्याचा विचार करत आहे. समजुन घ्यायचे असेल तर हे समजून घ्या की प्रस्तुत चर्चेची प्रतिसाद-रांग बघता कुराणाचा हवाला देऊन होणार्‍या हत्या हा मुद्दा आहे. शरिया वा भादंवि नाही. तो वेगळा धागा आहे त्यावर माझे मत आधीच दिलेले आहे.

In reply to by तर्राट जोकर

भंकस बाबा Sat, 03/26/2016 - 21:19
1 सर्व फतवे इम्प्लीमेंट होत नाहीत, बरोबर गाढ़वासारखे कोणी रेकले तर त्याला कोणी गायन म्हणनार नाही. आता यातील गंमत पहा, एकहि मुस्लिम उठून बोलत नाही की हां फतवा शुद्ध गाढवपणा आहे. काही महिन्यापूर्वी दारुल उल देवबंदने फतवा जारी केला होता की मुस्लिम मुलींनी वा महिलांनी रिसेप्शनिस्टचे काम करु नए ते इस्लामच्या विरुद्ध आहे. किती जणांनी नोकर्या सोडल्या? शेवटी पोट नेहमी धर्माच्या पुढे येते. पण एकाही मुस्लिम महिलेने पुढे येऊन म्हटले नाही की हा निव्वळ गाढ़वपणा आहे. कारण याला म्हणजे फतव्याला जो विरोध करेल त्याला शिक्षा ठरलेली. आता असच काही आपण हिंदू वा इतर धर्माबद्दल घेऊ, बायकानि रान उठवले असते. माझ्यासारख्या लोकांनी या महिलांना पाठिंबा देखिल दिला असता. ते मंगेसराव व् गचि चे सोडून द्या. आणि यासाठी मला हिंदुत्ववादी संघटनाचा धमकिवजा इशारा देखिल आला नसता

In reply to by तर्राट जोकर

भंकस बाबा Sat, 03/26/2016 - 21:36
2 मुस्लिम राष्ट्र हे आता उघड करु शकत नाही कारण दुसऱ्या देशातील मुस्लिमाना हे फार भारी पडेल. तालिबानने बुद्धाच्या मूर्ति तोफा लावुन पाडल्या त्याचे पडसाद मियांमारसारख्या बौद्धिस्ट बहुसंख्य देशात कशा उमटत आहेत ते जग पहातच आहे. अहिंसा परमो धर्म मानणारा बौद्ध रोहिंग्याना ठोकताना आपली धर्माची मुळ शिकवण विसरत आहे. त्यामुळे संधि मिळताच हे मुस्लिम धर्मांध हत्याकांड घडवणार. पाकिस्तानात शियाना जसे मारले जाते याला काय जबाबदार पश्चिमी देश आहेत? शिवाय जो मुस्लिमातला एक मोठा वर्ग जो या हत्येचा विरोधी आहे तो देखिल इस्लामविरोधी बनेल

In reply to by तर्राट जोकर

भंकस बाबा Sat, 03/26/2016 - 21:45
3 मुळातच हां प्रश्न चुकीचा आहे कारण मुस्लिमात धर्मबाह्य ही संकल्पनाच् नाही आहे. प्रश्न आहे फतव्याला विरोध करण्याचा तो कोणी करत नाही. इस्लामच्या शिकवणीनुसार मुस्लिम स्त्रियानी अंगप्रदर्शन करता कामा नये. फ़िल्म इंडस्ट्रीत तर मुस्लिम मुलींची भरमार आहे मग का नाही मौलवी बोम्बा ठोकत की ह्या नट्या आता इस्लामच्या बाहेर आहेत?

In reply to by तर्राट जोकर

ट्रेड मार्क Mon, 03/28/2016 - 20:55
कुराण मध्ये लिहीलं असू दे वा नसू दे शेवटी मृत्युचं तांडव होतच आहे, बलात्कार, स्त्रियांना गुलाम म्हणून वागवणे होतच आहे. प्रश्न हा आहे की मुस्लिम समाज सुधारणा स्वीकारायला आणि करायला तयार आहे का? सर्व मुसलमान वाईट नसतात किंवा सर्व मुसलमानांना उगाच वाईट समजले जाते हे नुसते ओरडून काय उपयोग? ही (कु)प्रसिद्धी मिळवण्यासाठी ते स्वतःच कारणीभूत आहेत. बाकीच्या लोकांच्या मनातून ही भीती वा समाज घालवण्यासाठी समस्त मुस्लिम समाजाने काय केलं? या पुढे ही काय करणार आहेत? विमानात, बस वा ट्रेन मध्ये २-४ दाढी आणि टोपीवाले दिसले तर नकळत मनात शंकेची पाल चुकचुकतेच आणि हा प्रवास नीट पार पडू दे म्हणून देवाचा धावा सुद्धा होतो. हा लेख वाचण्यासारखा आहे मराठीत टायपायला वेळ नसल्याने काही भाग जसाच्या तसा देत आहे Is Islam a violent religion? The history of Islam is brutal. Prophet Mohammed was a religious leader but also a warlord who imposed his beliefs through military actions. As the military leader of Medina, he was fighting the leader of Mecca for ten years. The Quran contains at least 109 verses that call Muslims to war with nonbelievers for the sake of Islamic rule. “Fighting is prescribed to you” — Quran 2-216

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर Mon, 03/28/2016 - 23:25
विमानात, बस वा ट्रेन मध्ये २-४ दाढी आणि टोपीवाले दिसले तर नकळत मनात शंकेची पाल चुकचुकतेच आणि हा प्रवास नीट पार पडू दे म्हणून देवाचा धावा सुद्धा होतो. ह्यालाच इस्लामोफोबिया म्हणतात. बाकी, ब्रुसेल्स, पॅरिस, जर्मनी इत्यादी ठिकाणी हल्ले झाले की अशा लेखांचा पूर येतो. खाली लिन्कवर मागच्या वर्षीच्या आतंकवादी हल्ल्यांची लिस्ट आहे. प्रत्येक महिन्यात अल्मोस्ट प्रत्येक दिवशी आतंकवादी हल्ले झालेले आहेत. ह्यातले बहुसंख्य हल्ले हे मुस्लिमबहुल प्रांतांत, मुस्लिम जनतेवरच झाले आहेत. जर कुराण नॉन-बिलीवर्सना ठार करा असे म्हणत असेल तर बहुसंख्य हल्ल्यांमधे मरणारे बहुसंख्य मुस्लिमच का आहेत हे प्रश्न अशा लेखांमधे कधी दिसलेत का? https://en.wikipedia.org/wiki/List_of_terrorist_incidents,_2015 कुराण फक्त मारामारी करण्याचा आधार बनवला आहे. दादरी प्रकरणात व्यक्तिगत खुन्नस काढण्यासाठी जसं अखलाकच्या घरात गोमांस खाल्लं जातंय असा मंदिराच्या भोंग्यावरुन जाहिर करुन पद्धतशीरपणे गोमातेचा हवाला देऊन हत्या झाली. तसेच हे आहे. असे जीव घेणारे धर्मांध हे धर्मामुळे होतात की त्यांची मानसिकता मुळात तशी असते व फक्त ते त्याला नैतिक अधिष्ठान देण्यासाठी धर्माचा आधार घेतात हा खरा प्रश्न आहे.

In reply to by तर्राट जोकर

ट्रेड मार्क Tue, 03/29/2016 - 02:01
दहशतवादी हल्ल्याची तुलना दादरी बरोबर? दादरी आणि मूद्बिद्री ची तुलना करा. बाकी मुसलमान एकमेकांना मारोत नाहीतर काही पण करोत. पण त्याची झळ बाकीच्यांना कशाला? त्यांच्यात वेगवेगळे पंथ आहेत आणि त्यांच्या वेगवेगळ्या चालीरीती आहेत पण त्यासाठी हे लोक एकमेकांच्या जीवावर उठलेत. आता हिंदू धर्मामध्ये पण वेगवेगळे पंथ आहेत, वेगवेगळे देव आहेत, पूजन करायची वेगवेगळी पद्धत आहे. पण हिंदू एकमेकांचा या गोष्टी वरून जीव घेताना दिसत नाही. हिंदूंमध्ये एकमेकांना विरोध असेल, भांडणं असतील पण म्हणून दुसर्याच्या वस्तीवर बॉम्ब टाकून भ्याडासारखे हल्ले करत नाहीत. नेहमीप्रमाणे तुम्ही मूळ मुद्दा मिस केलातच. इस्लामोफोबिया होण्यासाठी कारणीभूत मुस्लिमच आहेत. ही भावना काही आपोआप आलेली नाही. मुस्लिमांनी केलेल्या कृती म्हणजे इतर धर्मियांवर, पंथीयांवर केलेले अत्याचार, क्रूरपणा त्याला कारणीभूत आहे. लगेच विदा मागू नका, कारण तुम्हीच तो वर दिलेला आहे. उलट आता मीच तुमच्याकडे विदा मागतो. या सारखी हिंदू लोकांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यांची यादी द्या. त्याची तुलना करा किती हल्ले झाले त्यात एकूण किती लोक मारले गेले याचा आलेख मांडा. हिंदू Vs मुस्लिम दहशतवादी हल्ल्यांची तुलना करा. मग आपण बोलू.

In reply to by ट्रेड मार्क

@उलट आता मीच तुमच्याकडे विदा मागतो. या सारखी हिंदू लोकांनी केलेल्या दहशतवादी हल्ल्यांची यादी द्या. त्याची तुलना करा किती हल्ले झाले त्यात एकूण किती लोक मारले गेले याचा आलेख मांडा. हिंदू Vs मुस्लिम दहशतवादी हल्ल्यांची तुलना करा. मग आपण बोलू. >> +++१११ . शिवाय मुस्लिमदेशातच हल्ले होत असतील(मुस्लिम मारले जात असतील)तर त्याला बव्हँशी कारणीभूत इस्लामच आहे. मारणारेही मुस्लिम,मारणारेहि मुस्लिम..हि परिस्थितीही कुराणानी करून ठेवलेली आहे. मारणाय्रानच हे नेहमी म्हणणं असतं कि मरणारे हे काफ़िरांसारखे वागतात..ते वर्तनांनी बिगर मुस्लिम झालेले होते..आम्ही मात्र ख्ररेखूर्रे मुस्लिम होतो..म्हणून आम्ही त्यांना मारलं. मग मागे राजकारण काहीही असो.

In reply to by ट्रेड मार्क

श्रीगुरुजी Tue, 03/29/2016 - 12:40
नेहमीप्रमाणे तुम्ही मूळ मुद्दा मिस केलातच. इस्लामोफोबिया होण्यासाठी कारणीभूत मुस्लिमच आहेत. ही भावना काही आपोआप आलेली नाही. मुस्लिमांनी केलेल्या कृती म्हणजे इतर धर्मियांवर, पंथीयांवर केलेले अत्याचार, क्रूरपणा त्याला कारणीभूत आहे.
संपूर्ण परिच्छेदाला +९९९९९९९.....

In reply to by ट्रेड मार्क

तर्राट जोकर Tue, 03/29/2016 - 14:59
इतरांवर केला जाणारा अत्याचार, क्रूरपणा हा पोथ्यांतून येतो की मुळात मानसिकताच तशी असते हा माझा नेहमीचा प्रश्न. ह्याला उत्तर असेल तर बोला. बाकी तो इस्लामोफोबिया तुमचा तुम्हाला लखलाभ. तुमच्या दुर्बिणी मुस्लिमांवरच फोकस असल्याने इतरत्र काय जळतं ह्याच्याशी कर्तव्य असण्याचं तुम्हाला काय पडलंय. मुस्लिमद्वेष्ट्यांचा आवडता मुद्दा तो एवढाच की मुस्लिमांनी इतर धर्मावर हल्ले केले, हिंदूंनी असे इतर धर्मांवर हल्ले केले नाहीत. हा मुद्दा मी कधीच अमान्य केला नाही, करत नाही किंवा करणार नाही. पण हा एकच एवढा मुद्दा. पुढे काय? हिंदूंच्याही क्रूरपणाच्या अनेक कृती आहेत. पण त्या धर्मातल्या धर्मात आहेत, जातीतल्या जातीत आहेत, वैयक्तिक आहेत. म्हणून क्वालिफाय केल्या जात नाहीत. खालील दुव्यावर गाजलेल्या घटना आहेत. अशाच प्रकारच्या घटना नेहमीच देशाच्या कानाकोपर्‍यात होत आहेत. प्रत्येक घटना देशपातळीवर गाजत नाही कारण प्रत्येक घटनेत राजकिय लाभ उठवण्याचे पोटेन्शियल नसते, अनेक घटना राजकिय ताकतीखाली दाबल्या जातात. https://en.wikipedia.org/wiki/Caste-related_violence_in_India मुळात हिंदूंच्या आणि मुस्लिमांच्या दहशतवादी हल्ल्यांच्या तुलनाच होणार नाही हे तुम्हीही जाणता आणि मीही. म्हणून तुम्ही तो मुद्दा पुढे करताय. अहो पण तो माझा मुद्दा नाहीच. बरेच लोक इथे माझा मुळ मुद्दा मिस करुन हिंदु-मुस्लिम रंग देण्याचा प्रयत्न करत आहेत. इतरांवर केला जाणारा अत्याचार, क्रूरपणा हा पोथ्यांतून येतो की मुळात मानसिकताच तशी असते हाच माझा मुद्दा. तो जगातल्या कोणत्याही राजवटी च्या, धर्माच्या, देशाच्या, इझमच्या प्रभावाशी लावा. प्रश्न तोच राहिल. मुस्लिमांवर ठेवलेलं बोट उचला म्हणजे सावलीखाली लपलेली इतर हत्याकांडं आणि क्रुरपणा, अत्याचारही दिसतील. जरा सवडीनं शांतपणे वाचावेत. खालच्या दुव्यात अत्याचारांच्या बाबतीत सर्वधर्मसमभाव आहे. https://en.wikipedia.org/wiki/List_of_genocides_by_death_toll https://en.wikipedia.org/wiki/List_of_events_named_massacres आणि हो, मी इतरांकडे बोट दाखवतोय म्हणजे मुस्लिम किती निरागस,बिच्चारे आहेत असा ठरवण्याचा हेतु नसतो. घोड्यासारखी झापडं लावून फक्त मुस्लिमच अत्याचार करतात हा सोयिस्कर पवित्रा लोकांनी सोडावा हा हेतु आहे. इथे तुम्ही चूक मी बरोबर असा खेळ खेळत बसण्यात मला रुची नाही. दृष्टीकोन संकुचित नको व्यापक असावा इतकीच माफक अपेक्षा आहे. संकुचित दृष्टिकोनाने घृणा वाढते. मग आपल्याच लोकांनी केलेले अत्याचार अजिबात चुकीचे वाटत नाहीत. आपणही क्रूर होतो पण आपल्याला कळत नाही. दादरीचे उदाहरण दिले की मुदबिंद्रीने काउंटर अटॅक करायचा ह्या विचारसरणीतून ते स्पष्ट होतं. माझ्यासाठी दादरीही सेम, मुद्बिंद्रीही सेम, मालदाही सेम, गोध्राही सेम आणि गुजरातही. मला अत्याचार आणि क्रुरपना करणारे यांच्यात धर्म, जातीच्या आधारावर फरक करता येत नाही. पण असे करणारे बघितले की चिंता वाटते. मुस्लिम तेवढे क्रूर आणि इतर सगळे शांततेचे भोक्ते, अगदी गांधीजींचे चेले असे जे वातावरण बनवले जाते ते चूक आहे एवढेच म्हणणे आहे. क्रूरता प्रत्येकाच्या ठायी असते, काही लोक शस्त्रांचा आधार घेतात, काही शब्दांचा, काहीजण योग्य वेळ येण्याची वाट बघत क्रुरपणा पाळत बसतात. प्रत्येकाचे दान त्याच्या त्याच्या झोळीत टाकले गेले पाहिजे. मला मुस्लिमप्रेमी समजणारांना माझी भुमिका समजली असेल अशी आशा आहे. अन्यथा असो. लेबलींग अदर्स इज न्यु फॅशन इन टाउन. :-)

In reply to by तर्राट जोकर

श्रीगुरुजी Sat, 03/26/2016 - 20:15
म्हणजे हा प्रॉब्लेम कुराणचा नाही हे सिद्ध होतंय. ज्याला कोणाला दुसर्‍याला मारायचे आहे तो कुरानाचा हवाला देउन दुसर्‍याला अमुस्लिम ठरवुन मारतो. ह्यात कुराणाचा नक्की काय दोष? ज्याला दुसर्‍याला मारायचे आहे त्याला कुठलेही कारण पुरते की? मारण्याचे कारण धार्मिक दिले की मारणार्‍याला उदात्त कर्म केले असे वाटते.
नाही सिद्ध होत. वर मी कुराणातील या संदर्भातील ३ श्लोक दिले आहेत. तसे अजून बरेच श्लोक आहेत.
मुस्लिम म्हणजे अल्लाह ला एकमेव देव मानणारा, पाच नमाज पढणारा, मोहमद पैगंबराला प्रेषित मानणारा, कुराण अल्लाहने सांगितले इतके जुजबी नियम पाळणारा असे आहे. बाकी हजार फाटे प्रत्येक धर्म-संप्रदायात असतात.
इथे थोडासा फरक आहे. सुन्नी मोहम्मद पैगंबराला अखेरचा प्रेषित मानतात व शिया अजून प्रेषित येतील असे मानतात. हा मुख्य फरक आहे. सुन्नी बहुसंख्य असल्याने ते शियांची हत्या करीत आहेत. पाकिस्तानात तर शियांना अमुस्लिम जाहीर करा अशीही मागणी होत असते.
मारण्याचे कारण कुराण आहे हे नक्की का? मला तसे वाटत नाही. कारण गीतेतही असे श्लोक आहेत ज्याचा आधार घेउन अमर्याद हिंसा करता येणे शक्य आहे. आपण सर्व करुन नामानिराळे राहून, भगवंताची अशीच इच्छा आहे असे बोलले की झाले. पण हिंदू लोक गीतेचा आधार घेऊन कत्लेआम करत नाहीत.
मुळात कुराणात इतरांना मारा असे म्हटले नसेलही किंवा ते श्लोक पूर्णपणे वेगळ्या संदर्भात लिहिले असतील. परंतु आपल्याला हवा तसा अर्थ लावून हत्या होतात.

In reply to by श्रीगुरुजी

तर्राट जोकर Sat, 03/26/2016 - 20:29
मुळात कुराणात इतरांना मारा असे म्हटले नसेलही किंवा ते श्लोक पूर्णपणे वेगळ्या संदर्भात लिहिले असतील. परंतु आपल्याला हवा तसा अर्थ लावून हत्या होतात. >> हेच म्हणायचे आहे. त्यामुळे 'त्यांच्या कुराणातच तसे लिहिले आहे' असा प्रचार करणे चुकीचे आहे. कारण ते अर्धसत्य आहे. कुराण ज्या काळात लिहिले गेले तेव्हा त्यांना हिंदू, क्रिस्चन असे काही म्हणायचे नसेल. जो पैगंबराच्या विरुद्द जाईल , त्यांचे म्हणणे (जे अल्लाहचे म्हणने मानले जाते) मानणार नाही त्याविरुद्ध युद्ध करा, त्यांना मारा कारण ते तुम्हाला मारणारच असा काही अर्थ असेल. तत्कालिन संस्कृती बघता तेव्हाचे संदर्भ तेव्हाच बघितलेले बरे. आताचे मुस्लिम हवा तसा अर्थ लावून हत्या करतात त्यात कुराणाचा संबंध नाही. ते फक्त त्याचा नैतिक ढाल म्हणून वापर करतात.

In reply to by श्रीगुरुजी

गरिब चिमणा Sat, 03/26/2016 - 20:53
नथुराम गोडसे या माथेफीरुने गीतेचा व वेदांतल्या तत्वज्ञानातचा आधार घेऊन गांधिजींचा खून केला असा आमचा आरोप आहे,करा प्रतीवाद चला.

In reply to by गरिब चिमणा

आनन्दा Mon, 04/04/2016 - 16:44
यावर जास्ती वाद घालत नाही, उगाच उदात्तीकरणाचा आरोप माथ्यावर येईल.. पण एकच नमूद करतो - त्याने गांधींना मारले, पण पिस्तुलात अजून गोळ्या असताना देखील अंदाधुंद गोळीबार करत सुटला नाही. असो.

In reply to by तर्राट जोकर

lakhu risbud Mon, 03/28/2016 - 13:37
तजो, मुस्लिम धर्माच्या संदर्भात विचार मंथन करण्या आधी तारेक फताह यांच्या मुलाखती वाचाव्या अशी नम्र विनंती. http://www.misalpav.com/comment/818966#comment-818966 http://www.misalpav.com/comment/818972#comment-818972