प्रिय कॅटरिना,
सर्वप्रथम म्हणजे तू सुरेख दिसतेस आणि माझ्यासारख्या बर्याच जणाना तुझं रुपडं आवडतं हे आवर्जून सांगतो. ते असो.
परवा बाकी बेटा (तुला बेटा म्हणू का? आता मी चाळीशी पार केली आहे त्यामुळे तेच मला शोभून दिसेल!) :) कुठल्याश्या वृत्तवहिनीशी बोलताना तू स्वत: जन्माने अर्धी एशियन व अर्धी युरोपियन आहेस हे तू अगदी बिनदिक्कत सांगितलंस. शिवाय त्यात काही लपवण्यासारखं नाही हेही मनमोकळेपणाने सांगितलंस. पण हे बोलताना उदाहरण म्हणून तू राहूल गांधीचं नाव घेतलंस ती मात्र एक मज्जाच केलीस. त्याकरता सर्वप्रथम तुझं मनापासून अभिनंदन..! :)
राहूल गांधीही जन्माने अर्धाच भारतीय आहे हे सत्यही तू अगदी निरागसपणे सांगितलंस त्याबद्दल तुझं खूप कौतुक वाटलं. परंतु जे लाचार काँग्रेसवाले भारताचा भावी पंतप्रधान म्हणून ज्याच्याकडे पाहात आहेत त्याच्याच जन्माला आणि पर्यायाने पंचाला तू हात घातलास, ही गोष्ट कुणा चाणाक्षाने तुझ्या लक्षात आणून दिली असावी; :) आणि भलतीच भानगड नको म्हणून तू राहूलबाबत केलेल्या विधानावर नंतर माफी मागून मोकळीही झालीस..!
पण मला सांग बेटा, तू काय चुकीचं बोललं होतीस? राहूलची माय जन्माने भारतीय नसून इटालियन आहे त्यामुळे राहूलही पूर्णत: भारतीय नाही हे सत्य आहे. मग तुला माफी मागायची गरज काय? झाला असता की जरा मस्तपैकी गह्जब! :)
आणि बेटा, उद्या तशीच जर वेळ आली असती तर आम्ही सारे भारतीय तुझ्या पाठीशी होतोच की..! :)
असो..
यातून मला वैयक्तिकरित्या इतकंच सांगायचं आहे की ज्या व्यक्ति आणि त्यांचे आईवडील हे जन्माने पूर्णत: भारतीय असतील त्याच व्यक्तिंना भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान, लोकसभा अध्यक्ष, लोकसभा विरोधीपक्ष नेता आणि तीनही सैन्यातील प्रमूखपद इत्यादी पदे भुषवता येतील..!
सबब, बेटा कॅट, तुला विनंती की तुझं विधान मागे घेऊ नकोस आणि त्याकरता कुणाची माफी वगैरेही मागू नकोस...
बाकी कसं चाल्लय बेटा? कुणाशी नव्याने काही सूतबीत जमवलंस की नाही?! :)
तुझा,
तात्या.
प्रतिक्रिया
21 Jul 2011 - 3:49 pm | सुनील
आपल्या भक्तीला सलाम
अहो भक्ती कसली? मी तर हे म्हणतोय की, गांधी आडनाव हेच क्वालिफिकेशन नाही.
नै का?
(पण इतरच युवराज-युवराज म्हणून र्हायलेत!!!)
21 Jul 2011 - 3:58 pm | परिकथेतील राजकुमार
गांधी घराण्यातील व्यक्तिशीवाय आणि काँग्रेस पक्षाशिवाय ह्या देशाचे राज्य कोणीही चालवु शकत नाही हे सत्य तुम्ही लोकं कधी स्विकारणार आहात ?
21 Jul 2011 - 4:04 pm | सोत्रि
'आम आदमी'ने ते सत्य केव्हाच स्विकारले आहे, म्हनूनच तर तो त्यांना परत परत सत्तेवर निवडून देतो आहे.
मिपावरील जनता बहुतांशी 'हुच्चभ्रु जमातीत' मोडत असल्यामुळॆ ते सत्य त्यांना स्विकारणे कदाचित जड जात असावे ;)
- (आम आदमी) सोकाजी
21 Jul 2011 - 4:05 pm | परिकथेतील राजकुमार
सहमत आहे मालक.
अहो कोल्ह्याला द्राक्षे आंबट...
21 Jul 2011 - 4:11 pm | गणपा
ओ सोकाजी काय खुळ्यागत हतं गफ्फा हाणुन र्हायले तुम्ही.
वाईच दोनं नवे गल्लास भरा बर.
पर्या येणार असेल तर एक वाढवा.
21 Jul 2011 - 4:15 pm | सोत्रि
गणपा,
कसला योगायोग आहे, हाच प्रश्न मी पराला आत्ताच व्यनीत केला आणि तुमचा हा प्रतिसाद.
परा, आता बसलेच पाहिजे रे :P
- (योगा'योगी') सोकाजी
22 Jul 2011 - 12:57 pm | धिन्गाना
हुच्च पणा करणारे ते हुच्चभ्रु
22 Jul 2011 - 12:57 pm | धिन्गाना
हुच्च पणा करणारे ते हुच्चभ्रु
22 Jul 2011 - 12:57 pm | धिन्गाना
हुच्च पणा करणारे ते हुच्चभ्रु
21 Jul 2011 - 4:04 pm | सुनील
मी दिलेल्या यादीतील नावे पुन्हा वाचून पहा. सगळे काँग्रेसचे / गांधी घराण्यातील थोडेच आहेत?
निवडून आलेले पक्ष ठरवतील कोण पंतप्रधान होणार ते!
पुढच्या निवडणूकीत भाजपप्रणित NDA बहुमतात आली तर त्यांनी ठरवावे कुणी पंतप्रधान व्हायचे ते! जर UPA आली तर राहुल गांधी होण्याची शक्यता जरा जास्त आहे इतकेच (होईलच असे नाही).
21 Jul 2011 - 4:20 pm | प्यारे१
पराच्या प्रतिक्रियेवर आपण 'तिरके तिरके' चालतोय. गांधी घराण्याचं असणं हे क्वालिफिकेशन पुरेसं आहे असं तो म्हणाला. त्यावर तुमची गांधी घराणे सोडूनच्या नावांची यादी आली. मी ही यादी 'का' आणि 'कशी' आली ते सांगण्याचा प्रयत्न केला.
आपला मुद्दा 'गांधी घराण्यात जन्म घेणं हे क्वालिफिकेशन पंतप्रधान होण्यासाठी पुरेसं आहे का' हा आहे. याचं उत्तर हो असंच आहे.
इंदिरा गांधी अथवा राजीव गांधी या दोघांकडे देखील पहिल्यांदा पंतप्रधान बनताना या पात्रतेचंच भक्कम पाठबळ मुख्यत्वे होतं किंवा ते गांधी होते (पक्षी: इंदिराबाई नेहरुंच्या आणि राजीव इंदिराबाईंचा वारसदार) म्हणूनच पंतप्रधान बनू शकले असे आणि असेच उत्तर आहे.
अवांतर :आपण दिवसात किती वेळा आँ करता?
21 Jul 2011 - 3:37 pm | नितिन थत्ते
१. मोरारजी देसाई हे आणीबाणीनंतर इंदिरा गांधींचा पराभव झाल्यावर पंतप्रधान झाले.
२. शास्त्री आणि मोरारजी यांना गांधी घराण्याचा शब्द झेलणार्यांच्या यादीत टाकल्यामुळे अतीव दु:ख झाले.
३. चरणसिंग आनि गुलझारीलाल नंदा ही नावे राहिली आहेत.
21 Jul 2011 - 3:41 pm | रणजित चितळे
आहे
21 Jul 2011 - 3:56 pm | प्यारे१
चुकीबद्दल दिलगीर आणि दुरुस्तीबद्दल आभारी आहे.
बाकी आम्ही तपशीलापेक्षा तत्वावर भर देण्याचा प्रयत्न करणे इष्ट समजतो.
कोण कधी पंतप्रधान झाले आणि त्यावेळची परिस्थिती काय होती या मुद्द्याकडे जास्त लक्ष देऊ या.
मोरारजी हे जनता पार्टीचे नेते म्हणून पंतप्रधान झाले असतील तर साहजिकच जनतेचा कौल काँग्रेसविरोधी असा होता हे स्पष्ट होते. तीच बाब चरणसिंग यांची.
शास्त्रीजी नेहरुंच्या शब्दाबाहेर असतील (इथे गांधी घराणे नेहरुंपासून सुरु झाले असे म्हटले तर आपला काही आक्षेप असेल असे वाटत नाही) असे वाटणारे काही प्रसंग आपल्याला ठाऊक आहेत काय? गुलझारीलाल नंदा हे देखील त्याकाळचे. इंदिरा बाईंनी तेव्हा धुरा हाती घेतली नव्हती म्हणून हे शक्य झाले असेल काय?
21 Jul 2011 - 4:33 pm | नितिन थत्ते
मी फक्त चुकीची माहिती सुधारली.
बाकी चालू द्या. हा धागा नेहरू गांधी घराणे या रुळावर गेला असला तरी मला धागा काढण्याचा उद्देश "वेगळाच" वाटला होता. :P
22 Jul 2011 - 11:12 am | चिंतामणी
Jawaharlal Nehru - 15 August 1947 – 27 May 1964
Indira Gandhi - 24 January 1966 - 24 March 1977
14 January 1980 - 31 October 1984
Rajiv Gandhi - 31 October 1984 - 2 December 1989
Lal Bahadur Shastri- 9 June 1964 - 11 January 1966
Morarji Desai- 24 March- 28 July 1979
Charan Singh - 28 July 1979 - 14 January 1980
V. P. Singh - 2 December 1989- 10 November 1990
Chandra Shekhar - 10 November 1990 - 21 June 1991
Narasimha Rao- 21 June 1996 - 16 May 1996
Atal Bihari Vajpayee- 16 May 1996 - 1 June 1996
19 March 1998- 22 May 2004
H. D. Deve Gowda - 1 June 1996 - 21 April 1997
Inder Kumar Gujral 21 April 1997- 19 March 1998
पहील्या तिघांचा एकुण कालावधी आणि इतर सर्वांचा एकुण कालावधी एकदा तुलना करून बघा बॉ.
शास्त्रीजी आणि नरसींह राव जरी गांधी घराण्याचे नसले तरी ते कॉग्रेसचेच आहेत हे सुद्धा लक्षात घ्यावे.
मा. मनमोहन सिंगबद्द्ल न बोललेले बरे.
22 Jul 2011 - 11:31 am | सुनील
शास्त्रीजी आणि नरसींह राव जरी गांधी घराण्याचे नसले तरी ते कॉग्रेसचेच आहेत हे सुद्धा लक्षात घ्यावे.
चर्चा "गांधी" आडनावाबद्दलच सुरू आहे. सबब, मुद्दा अमान्य.
मा. मनमोहन सिंगबद्द्ल न बोललेले बरे.
स्पष्टीकरण वरीलप्रमाणेच.
थोडक्यात, १९८९ नंतर जवळपास २२ वर्षे "गांधी" आडनावाची व्यक्ती पंतप्रधानपदावर नसूनदेखिल, काँग्रेसविरोधकांना "गांधी" आडनावाची एवढी दहशत आहे, हे बघून गंमत वाटली, एवढेच निरीक्षण नोंदवू इच्छितो!
चालू द्या!!
22 Jul 2011 - 11:56 am | सहज
थोडक्यात, १९८९ नंतर जवळपास २२ वर्षे "गांधी" आडनावाची व्यक्ती पंतप्रधानपदावर नसूनदेखिल, काँग्रेसविरोधकांना "गांधी" आडनावाची एवढी दहशत आहे, हे बघून गंमत वाटली, एवढेच निरीक्षण नोंदवू इच्छितो!
मुख्य म्हणजे जर असे आक्षेप नोंदवणार्यांचे वय जर का (२२+१६ =) ३८ वर्षापेक्षा कमी असेल तर हे नक्कीच म्हणजे जाणुन बुजून कोणीतरी घेतलेल्या बौद्धिकांचे फलीत वाटते.
----------------------------------------
आणि म्हणे फक्त अतिरेक्यांचेच ब्रेनवॉश झाले असते!
22 Jul 2011 - 11:58 am | चिंतामणी
नेहरू गांघी असे एकत्रीतच.
आणि हो. १९८९ नंतर खुर्चीत नसले म्हणून काय झाले. हाय कमांड म्हणजे सर्वेसर्वा कोण आहे?
U.P.A. CHAIR PERSON म्ह्णून काय भाव कमी आहे का??? परदेशी पाहुणे आले की राष्ट्रपती, पंतप्रधान यांचे बरोबर त्यांचीसुद्धा भेट घेतात.
सरचिटणीसांचा भाव अनेक मंत्र्यांपेक्षा जास्तच आहे. (किंबहुना पंतप्रधानसुद्धा झाकोळले जातात.)
बाकी चालू द्या.
22 Jul 2011 - 12:02 pm | मृत्युन्जय
मा. मनमोहन सिंगबद्द्ल न बोललेले बरे.
मनमोहन सिंग सोनियाच्या इशार्यावर चालत आहेत म्हणुन त्यांच्याबद्दल न बोललले बरे असे तुमच्या म्हणण्याचा सूर दिसतोय. मी म्हणतो असेना का तसे. पण तरीही ते गांधी नसताना त्यांच्या गळ्यात पंतप्रधानपदाची माळ पडली हे तुम्ही कसे काय अमान्य करु शकता? गांधी घराण्याच्या असामान्य त्यागात या पंतप्रधानपदाच्या त्यागामुळे अजुन एका गोष्टीची भर पडली आहे हे कळाल्यामुळे तुम्हा कोंग्रेसविरोधकांची जळते आहे हे कळते आहे बरका आम्हाला.
आणि गांधी घराण्याचा शिक्का पंतप्रधानपदासाठी पुरेसा आहे म्हणता. तर मग तुमचे वरुण गांधी आणि मनेका गांधी का अजुन पंतप्रधान झाले नाहीत ते सांगा की जरा?
शिवाय इथल्या सर्व लोकांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी के जेव्हा जेव्हा गांधी - नेहरुंचे सरकार सत्तेवर होते तेव्हा तेव्हा भारताच्या प्रगतीचा आलेख उंचावता होता. बाकीच्यांनी भारताला पार गाळात घातले.
22 Jul 2011 - 1:03 pm | धिन्गाना
काय बोलता राव्, सुशमा स्वराजनि गोटा करायचि धमकि दिलि नसति तर बाइच गादिवर बसलि असति.
22 Jul 2011 - 1:15 pm | नितिन थत्ते
वाचून हसून हसून लोळलो..............
22 Jul 2011 - 1:55 pm | रणजित चितळे
सुब्रमण्यम स्वामींच्या संकेत स्थळावरुन
The President reportedly had communicated to Ms. Gandhi on the afternoon of May 17, 2004, that if she insisted on being invited to form the government, he would want first to clarify, on a reference to the Supreme Court, whether in view of this proviso her appointment as PM could be successfully challenged in the court.
It is fair to assume that this report of the President’s decision is correct, since the President had before him my petition dated May 15, 2004 [see Annexure-3] making just that point--- that Ms. Gandhi’s citizenship is conditional, and in particular she cannot be the PM legally.
The President had also given me an appointment at 12.45 PM on May 17, 2004 to explain my submissions in person, which I did. I also told him that I would challenge such a unconstitutional appointment in the Supreme Court just as I had in 2001 when Ms Jayalalitha was illegally sworn in as Chief Minister by the Tamil Nadu Governor.
पुढे वाचा, असे मनमोहन सिंह पंतप्रधान बनले. नाहीतर बाई गेल्याच होत्या बनायला.
22 Jul 2011 - 2:00 pm | सुनील
Submitted by रणजित चितळे on Fri, 22/07/2011 - 13:55.
साहेब, जेवल्यावर इनो घेतलात की नाही?
22 Jul 2011 - 6:37 pm | रणजित चितळे
बर आता गप्प बसतो आपल्या साठी
22 Jul 2011 - 2:24 pm | नितिन थत्ते
>>The President reportedly had communicated to Ms. Gandhi on the afternoon of May 17, 2004, that if she insisted on being invited to form the government, he would want first to clarify, on a reference to the Supreme Court, whether in view of this proviso her appointment as PM could be successfully challenged in the court.
सुब्रम्हण्यम स्वामींचे म्हणणे काही असो. कलाम यांचे सचीव पी एम नायर यांनी आपल्या पुस्तकात कलाम यांनी सोनिया गांधींची पंतप्रधान म्हणून नेमणुक करणारे पत्र तयार ठेवले होते असे म्हटले आहे.
तरी असल्या कंड्या पुनःपुन्हा पिकवल्या जातात.
25 Jul 2011 - 9:33 am | सुधीर काळे
ज्या बाईच्या पक्षाने निवडणूक लढवायच्या निर्णयापासून स्वतःला 'भावी पंतप्रधानपदाची उमेदवार' असे घोषित केले होते, 'UPA' तर्फे स्वतःच्या उमेदवारीवर तसा शिक्काही मारून घेतला होता, तिने अचानक घूमजाव का करावे?
मग अचानक त्यांचा 'आतला आवाज' कां बोलका झाला? याचे समाधानकारक उत्तरही त्यांनी दिलेले नाहीं. द्यायला हवे. "माझ्या स्वप्नात देव आला आणि त्याने मला असे सांगितले" असे जर कुणी म्हणू लागला/लागली तर कसा विश्वास ठेवायचा?
P M Nair यांनी जर त्या पत्राची फोटोकॉपी दिली असेल तर त्यावर विश्वास ठेवता येईल. अशी प्रत त्यांच्या पुस्तकात आहे काय याचा खुलासा केल्यास बरे होईल.
कलाम यांनीही याबद्दल कांहीं टिप्पणी केल्याचे वाचनात नाहीं. केली असल्यास ती लिंक द्यावी.
25 Jul 2011 - 1:34 pm | नितिन थत्ते
त्यांनी १९९८/९९ मध्ये वाजपेयींवरील अविस्वास ठराव मंजूर झाल्यावर पंतप्रधानपदासाठी दावा सांगितला होता. तेव्हा २७२ खासदारांच्या पाठिंब्याची पत्रे त्या सादर करू शकल्या नाहीत. त्याचे कारण त्या परदेशी असल्याने खासदारांना त्या पंतप्रधान म्हणुन नको असल्याची चर्चा तेव्हा झाली होती. त्यामुळे २७२ खासदारांचा पाठीबा त्यांच्या नावाला मिळू शकतो हे सिद्ध करणे त्यांच्यासाठी आवश्यक बनले होते. "त्यांना पंतप्रधान होण्यापासून कुठल्याही कारणाने कोणीही (राष्ट्रपती कलाम सुद्धा) रोखू शकत नाही" एवढे सिद्ध करेपर्यंत त्यांनी आपला दावा चालू ठेवला. तेवढे सिद्ध झाल्यावर त्यांनी माघार घेतली असावी.
अर्थात हे सर्व जर तर आहे. पण नायर यांनी आपल्या पुस्तकात असे म्हटले असेल तर मानायला काय हरकत आहे. पत्राची फोटोकॉपी पुस्तकात लावणे हा नायर यांच्या सेवाशर्तींचा भंग होणार नाही? की एखादी गोष्ट मानायची नाही असे मनाने ठरवल्यावर कैच्याकै मागणी/अपेक्षा करायची?
http://articles.timesofindia.indiatimes.com/2004-05-17/india/28332151_1_...
http://www.indiatraveltimes.com/news/news2004/may04/may1704_news2.html
http://www.asiantribune.com/news/2004/05/18/sonia-gandhi-meets-indian-pr...
कलाम यांनी यावर कोणतीही टिपण्णी केलेली नाही. ते त्यांच्या राष्ट्रपतीपदाला शोभेसेच आहे. परंतु कलाम यांनी नकार दिला वगैरे गोष्टींच्या फोटोकॉपीज/रेकॉर्डिंग कुठे मिळाल्या तर द्याव्यात. अन्यथा त्या अफवा आहेत असेच म्हणावे लागेल.
[सोनिया गांधींनी "त्याग" वगैरे केल्याचा माझा दावा नाही त्यामुळे त्याविषयाची चर्चा माझ्याशी करू नये].
(अवांतर : न्यूक्लिअर डिसेप्शन या पुस्तकात दिलेल्या माहितीपैकी किती माहितीसाठी फोटोकॉप्या लावलेल्या आहेत?)
26 Jul 2011 - 5:12 pm | सुधीर काळे
P M Nair यांच्या प्रमाणिकपणावर माझा पूर्ण विश्वास नाहीं इतकेच. व कलाम यांनी सोनियाताईना नकार दिल्याचे स्वामीनी आरोप करण्या आधीपासून वाचले आहे.
26 Jul 2011 - 5:25 pm | नितिन थत्ते
>>P M Nair यांच्या प्रमाणिकपणावर माझा पूर्ण विश्वास नाहीं इतकेच
का बुवा? काही आधार?
28 Jul 2011 - 3:52 pm | सुधीर काळे
कारण जिथे डॉ कलाम औचित्य दाखवून शांत राहिले तिथे त्यांच्या स्वीय सचीवाने असे लिहावे तेही "चार चंद टुकडोंके लिये" हेच चूक आहे. म्हणूनच माझा त्यांच्या प्रामाणिकपणावर विश्वास नाहीं. त्याशियाव्य जो उतारा तू इथे उधृत केलेला आहेस तो वाचल्यावर डॉ. कलाम हे एक "कठपुतळी बाहुली" आहेत अशी प्रतिमा डोळ्यासमोर येते आणि ते नक्कीच एक कठपुतळी बाहुली नाहींत. तसे असते तर त्यांना दुसर्यांदा नक्कीच संधी दिली गेली असती! एक वेळ ते कायदेपंडितांकडून कायदेशीर सल्ला विचारतील पण आपल्या स्वीय सचिवाच्या शब्दानुसार नाचणारे नक्कीच नाहींत. "सोनियाजी आल्यावर त्यांच्या हातात हे पत्र द्या आणि त्यांचे अभिनंदन करा" अशा अर्थहीन सल्ल्याची तर त्यांना नक्कीच गरज नाहीं.
इथे उधृत केलेला उतारा वाचल्यावर नायरना "मोजून माराव्या पैजारा" असेच मनात आले.
जास्त काय लिहू? बहुदा 'कुणीतरी' नायरना खरीदले असावे! डॉ. कलाम यांचा मोठेपणा हाच कीं इतके चिथावणारे वर्णन वाचूनही डॉ. कलाम शांत राहिले.
28 Jul 2011 - 4:16 pm | नितिन थत्ते
>>डॉ. कलाम यांचा मोठेपणा हाच कीं इतके चिथावणारे वर्णन वाचूनही डॉ. कलाम शांत राहिले.
१. ते वर्णन खरे आहे म्हणूनही कलाम शांत राहिले असू शकतील. [कलाम यांनी ते वर्णन लिहिण्यास परवानगीही दिली असू शकेल].
२. सुब्रम्हण्यम स्वामींच्या दाव्यापेक्षा हे अधिक विश्वासार्ह कारण नायर हे त्या घडामोडींच्या सर्वात जवळचे (कलाम, सोनिया, ममोसिंग यांच्यानंतर) आहेत.
३. कलामांनी कोणालाच न सांगितलेली गोष्ट सुब्रम्हण्यम स्वामी म्हणतात म्हणून खरी मानावी का?
अवांतर: आपल्याला न पटणारे लिहिणारा 'खरीदलेला' असे असेल तर सुधीर काळे यांना कोणी 'खरीदले' याचा विचार करतो आहे.
28 Jul 2011 - 9:58 pm | सुधीर काळे
(१) सुब्रमण्यम स्वामींनी लिहिल्या आधीपासून हे मी ऐकलेले आहे.
(२) या विषयावर माझे एक पत्रही या घटनेनंतर प्रसिद्ध झालेले होते (मला वाटते गोव्याच्या Navhind Times मध्ये). सापडले तर ते मी इथे डकवेन. (Sonia is a proverbial 'tease' असे शीर्षक होते.) बरीच वर्षे झाली, म्हणून आश्वासन देत नाहीं, पण ९९ टक्के माझ्या scrap book मध्ये सापडेल आणि सापडले तर मी नक्की इथे डकवेन. त्या पत्राला वाचकांचाही प्रतिसाद आला होता.
(३) नायर यांच्याबद्दल माझे अद्यापही हेच मत आहे. त्यांनी लिहिलेला मजकूर कलामना अगदीच फिट बसणारा नाहीं म्हणून त्यांचे लिखाण विश्वसनीय वाटत नाहीं. म्हणून स्वामींचे बरोबर आहे असेही नाहीं (स्वामीही तसे ’वाह्यात’च आहेत). पण मी या घटनेबद्दल इतरत्रही कुठे तरी वाचले होते. कुठे ते आता आठवत नाहीं. खूप वर्षे झाली.
(४) जसे तुला अद्याप जसे कुणी खरीदलेले नाहीं (असे मला वाटते) तसेच मलाही (अद्याप तरी) कुणी खरीदलेले नाहीं (असे तुला वाटो)!
(५) दुर्दैवाने तू दिलेल्या लिंक्सपैकी एकही उघडली नाहीं.
[अवांतर: प्रत्येक वेळी तू व्यक्तिश: हल्ला का करतोस? आधी 'न्यूक्लियर डिसेप्शन'वर आणि आता माझ्या विकाऊपणावर! 'नायर विकाऊ असतील' असे मी म्हटल्यावर तू 'स्वामी विकाऊ आहेत' असे न म्हणता 'सुधीर काळ्यां'वर का घसरलास? तशी हरकत नाहीं पण करमणूक होते खरी]
28 Jul 2011 - 10:22 pm | नितिन थत्ते
१. प्रथम नायर यांच्या पुस्तकासंबंधी बातमीचा दुवा दिल्यावर आपण पुस्तकात "कलाम यांनी तयार ठेवलेल्या पत्राची" फोटो कॉपी लावली आहे का असे विचारलेत. त्यावर अश्या फोटोकॉप्या लावल्या जात नसतात असे दाखवण्यासाठी म्हणून न्यूक्लिअर डिसेप्शनमध्ये किती फोटो कॉप्या लावल्या आहेत असे मी विचारले. हा प्रश्न सुधीर काळ्यांसाठी नव्हता तर मूळ ज्याने पुस्तक लिहिले आहे त्याने लावल्या आहेत का हे जाणण्यासाठी होता.
२. इतर संबंधित व्यक्ती (स्वतः कलाम) खुलासा करत नसतील तर घटनेच्या सर्वात जवळ असलेल्याचे म्हणणे (घटनेपासून दूर असलेल्यापेक्षा) अधिक विश्वासार्ह असे मी म्हटल्यावर आपण (नायर यांचे म्हणणे मान्य करायचे नाही असे ठरवले असल्यामुळे) नायर विकले गेले असतील असा काहीही आगापीछा/आधार नसलेले विधान केले.
आता तुम्ही स्वामींनी म्हणायच्या आधी "ऐकले होते" असे म्हणत आहात. याचा काही संदर्भ देता आल्यास पहावा.
28 Jul 2011 - 10:29 pm | पंगा
आता बास!!!
(दोघांनाही.)
28 Jul 2011 - 10:43 pm | श्रावण मोडक
चक्क पंगाशेठ तुम्ही? हे पाणी ओतण्याचे काम कधीपासून सुरू केलेत? ;)
29 Jul 2011 - 12:05 am | पंगा
काय आहे, की प्रतिसादाचे चौकोन लहानलहान होत चालले होते. म्हटले हे असेच चालू राहिले, तर एकच उभी लांबच लांब रेघ होईल. म्हणून म्हटले आवरते घ्या.
(नाहीतर आम्ही कुठले सार्वजनिक टिकाणी तेही दुसर्यांच्या कृत्यावर पाणी टाकायला? ;))
(खवत किंवा दुसरा धागा काढून चालू ठेवायला आपली काहीच हरकत नाही.)
29 Jul 2011 - 11:08 am | श्रावण मोडक
काय दिवस आलेत! च्यायला, पंगाशेठशी पूर्ण सहमत असं म्हणावं लागतंय आता. ;)
29 Jul 2011 - 11:28 am | सुधीर काळे
पंगा वगैरेंच्या मताला मान देऊन हा माझा शेवटचा प्रतिसाद.
मूळ 'न्यूक्लियर डिसेप्शन' हे पुस्तक ४६० पानावर संपते. त्यानंतरच्या ४०-५० पानांवर पुस्तकातील प्रत्येक विधानाचा source दिलेला आहे-कांही प्रत्यक्ष Interviews, कांहीं ठिकाणी प्रसिद्ध लि़खाण वगैरे. मी भाषांतर करताना त्यांचा उल्लेख केला नाहीं कारण मी त्यात involved नव्हतो. पण लेखकांनी त्यांचा संदर्भ दिलेला आहे. हवा असल्यास 'व्यनि'द्वारा पाठवू शकतो.
ते असो पण हा माझा या विषयावरचा शेवटचा प्रतिसाद. माझे प्रसिद्ध झालेले पत्र सापडल्यासही तुला व्यनि द्वाराच पाठवेन.
22 Jul 2011 - 1:59 pm | वपाडाव
जिवाची भिती ही मनुष्य जातीतील प्रत्येक जीवाला असतेच ना.....
त्यात गांधी पन आलेच की....
"सिर सलामत तो पगडी पचास" ही उक्ती ऐकली नाय का तुम्ही.....
फक्त यावेळी "सिर सलामत तो पगडी है पास" म्हणुन एम. एम. सिंग पंतप्रधान झाल्येत.
- मरणाला घाबरणारा
वपाडाव
21 Jul 2011 - 3:07 pm | रणजित चितळे
वेळेच्या आधी व नशिबा पेक्षा जास्त काही मिळत नाही. राहूल बाशिंग बांधून बसलाय खरा पण का कोण जाणे मला वाटते तो कधी बनणार नाही.
21 Jul 2011 - 9:22 pm | मितभाषी
आयला हे मिपाचे युवराज 'चिच्चांच्या' युवराजवर लैच पेटलेत. काय खरं नाही आता.
भावश्या..
21 Jul 2011 - 2:53 pm | मनराव
लेख आवडला.........
पन एकच खटकल.........निदान त्या कॅट चा मोतीबिन्दू झालेला फोटू सोडून दुसरा कोणता तरी चांगला लावायचा........
21 Jul 2011 - 3:19 pm | गणपा
=)) =))
फुटलो ना.
सालं पब्लीकची नजर काय तेज अस्तेय.
22 Jul 2011 - 2:43 pm | धमाल मुलगा
तो काचबिंदू आहे रे.
अवांतरः ह्या वयात जे पहायचं ते पहात नाही, आणि पोरींच्या डोळ्यातले मोतीबिंदू कसले पाहता रे?
-आफ्रिकेतला काका.
22 Jul 2011 - 3:46 pm | वपाडाव
म्हणजे धम्या, तुला असं म्हणायचं आहे का ?
की जे बिंदु पाहायचे ते सोडुन भलतेच काय पाहता.....
अरे पोरांनो डोळं नका पाहु, डोळं फाडुन पहा..
21 Jul 2011 - 3:20 pm | अजातशत्रु
स्वत: जन्माने अर्धी एशियन व अर्धी युरोपियन कॅटरिना चालते,
पण अर्धा? भारतिय राहुल चालत नाहि,
कॅटरिना प्रिय, राहुल अप्रिय
वा वा वा....
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत,
;
;
;
;
;
;
;
;;
;
;
;
;;
बाकि चालु द्या..
{भारतिय नागरिक}
21 Jul 2011 - 3:29 pm | गणपा
फक्त चार (अर्ध्या मुर्ध्या) ओळींचा तो प्रतिसाद, पांढर्या रंगातली विरामचिन्हे टाकुन टाकुन इतका का फुगवलाय?
का मोठ्ठे प्रतिसाद द्यायचा नाद लागलाय मित्रा ? ;)
बाकी कंटेटं बद्दल आपल काय म्हणणं नाय. :)
21 Jul 2011 - 3:50 pm | पाषाणभेद
त्यांची एंटर की एकदा दाबली की सतत आत जात असेल त्यामुळे असे होत असेल!
;-)
21 Jul 2011 - 5:35 pm | वपाडाव
त्यांचं एंटरचं बटन / कळ दुरुस्त करुन घ्यावे लागेल.........
नाहीतर गुडघेदुखीचा ससेमिरा पाठी लागायचा.... ;)
21 Jul 2011 - 5:44 pm | अजातशत्रु
एंटरचं बटन आणि गुडघेदुखी याचा सबंध काय ते कळले नाही?
जरा विस्कटून सागां की..
गुडघेदुखी चा सबंध अती सेक्सशी आहे हे एका धाग्यातील प्रतिसादा वरुन समजले आहे,
त्यामुळे जरा भीती वाटतेय ;)
ते खरे आहे काय?
21 Jul 2011 - 6:29 pm | वपाडाव
आता कळालं का?
का पराने वर म्हटल्याप्रमाणे आपण आहात का दाखवता ?
21 Jul 2011 - 7:31 pm | अजातशत्रु
कळालं आत्ता कळालं मालक :)
आता मनावर घेतलंच पाहिजे ;)
सोडा हो त्याना बडबड करायची सवय आहे ते मात्र मी मनावर घेत नाही
कध्धीच..
.
.
{भजीपाव } :p
21 Jul 2011 - 3:51 pm | अजातशत्रु
मोठ्ठे प्रतिसाद द्यायचा नाद लागलाय ;)
संपादन करता आले तर करतो, थांबा
.
.
.
.
.
{नादखुळा}
21 Jul 2011 - 3:54 pm | सुनील
गणप्याने बूच मारले आहे. सबब, संपादन आता अशक्य!
21 Jul 2011 - 3:29 pm | रणजित चितळे
लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत,
फाळणी पुर्व का फाळणी नंतरच्या कराचीत साहेब ते जरा स्पष्ट करा.
21 Jul 2011 - 3:54 pm | सोत्रि
कधीच्याही कराचीतले असुद्याकी रणजीतसाहेब, सद्य स्थितीत 'मूळ' हे परदेशी होत नाही का? ;)
- (पुर्ण स्वदेशी) सोकाजी
21 Jul 2011 - 4:03 pm | अजातशत्रु
तेच ते ;)
अवांतर: प्रतिसाद बारीक केले आहेत
21 Jul 2011 - 4:08 pm | गणपा
छ्या राव. लगेच 'खुळानाद' सोडुन दिलात. ;)
पण तरी हबिणंदन.
21 Jul 2011 - 4:12 pm | अजातशत्रु
फाळणी पुर्व...
अधुन मधुन आजोळाची आठवण येते त्यांना ;)
मग त्या बद्दल काहि बोलले तरि (काहि) लोकं नावं ठेवतात..
अवांतर: गणपासेठ कधी कधी मित्रांचे ऐकावे म्हणून आपलं ;)
22 Jul 2011 - 6:28 pm | sagarparadkar
हेच म्हणतो .... खाली सविस्तर प्रतिसाद दिला आहेच ....
22 Jul 2011 - 6:27 pm | sagarparadkar
>> लाल कृष्ण अडवाणि कराचीचे आहेत,
मला आपल्या प्रतिसादातील रोख कळला नाही, तसंच मी लालकृष्ण अडवानींचा समर्थकही नाही. फक्त एकच सांगावेसे वाटते, की त्यांचा जन्म कराचीत झाला तेव्हा कराची शहर भारतातच होते. पुढे गांधे-नेहरूंच्या आणि कोंग्रेसच्या कर्तबगारीमुळे ते 'परदेशात' गेले.
चाचा कितीही प्रतिवाद करोत, पण हे सत्य आहे.
सत्ता सोडावी लागणार हे दिसू लागताच असाच फाळणीचा प्रयोग द. आफ्रिकेच्या बोथा राजवटीने करून पाहिला, तेव्हा झुलू नेते मंगोसुथू बुथ्लेझी ह्यांना भडकावून दिले, पण डॉ. नेल्सन मंडेला ह्यांनी ही धूर्त चाल वेळीच ओळ्खून मंगोसुथूशी बातचीत करून द. आफ्रीकेची संभाव्य फाळणी टाळली.
आता थत्ते चाचा म्हणतील की डॉ. मंडेला हे गांधींना मानत असत. तर ते पूर्ण खरं आहे पण त्याच बरोबर हेही तितकंच खरं आहे की फालतू आदर्शवादाचा अतिरेक करून त्यांनी व्यावहारीकतेकडे दुर्लक्ष मुळीच केले नाही.
21 Jul 2011 - 3:32 pm | रणजित चितळे
http://www.janataparty.org/sonia.html हेच ते संकेत स्थळ
In 1992, Sonia had revived her citizenship of Italy under Article 17 of the Italian Citizenship Law [Act 91 of 1992]. Rahul and Priyanka were born Italian citizens because Sonia was Italian when she gave birth to them[Italian law based on jure sanguinis]. (see Annexure-19) Hence, they continue be Italians since they have never renounced their citizenship upon becoming 21 years old. Both, Rahul and Priyanaka have been traveling abroad on Italian passports. They may now acquire Venezuela passports too, since Rahul Gandhi’s wife, Veronica, is a Venezuelan. (See annexure- 20) That means one more foreign bahu for us tolerant Indians. The Maino-Gandhis are certainly getting Indian society globalised in their own selfish way.
21 Jul 2011 - 3:38 pm | सुनील
फारच मौलीक माहिती!! पण ती इथे देऊन व्यर्थ घालवण्यापेक्षा निवडणूक आयोगाला द्या अशी विनंती!!!
21 Jul 2011 - 3:54 pm | अजातशत्रु
+१
21 Jul 2011 - 4:05 pm | रणजित चितळे
न्यायालय (न्यायालयात प्रविष्ट आहे पिआयएल सध्या) व आयोग दोन्ही गोष्टी आहेत.
21 Jul 2011 - 4:19 pm | भारी समर्थ
समाजाच्या जीवनमानावर काडीचाही फरक न पाडणार्या, तरीही राजकीय मौजमजेची बहार उडवून देणार्या विचाराच्या बातमीसकट त्यावरील प्रतिक्रियांनीही मनाचा विरंगुळा केला.
अवांतर: बाकी लालकृष्ण आडवाणींसारखे पोलादी व मुत्सद्दी (संदर्भ: कंदाहार) तसेच धर्मनिरपेक्ष (संदर्भ: जिना स्तुती) व्यक्तिमत्व देशाला एक नवीच दिशा प्राप्त करून देतील याबद्दल कोणतेच दुमत नाही. त्यांच्या जन्मस्थानाचा मुद्दा येथे लागू होतो काय?
अतिअवांतर: निष्क्रियतेवरून आबांचा राजीनामा मागणारे कमळवाले गुजरातमध्ये दांडीच्या मिठाच्या गुळण्या करून घसा साफ करत असल्याच्या बातम्या हल्लीच कानावर आल्यात.
(अवांतर आणि अतिअवांतरसाठी) आमचे सुकोबाराय म्हणतात:
दुसर्याच्या डोळ्यातले। खुपे मज कुसळ।
माझ्या डोळ्यातले मुसळ। गेले मसणात*॥
*याच्याऐवजी जो सुचेल तो पर्यायी शब्द घालावा.
भारी समर्थ
22 Jul 2011 - 12:16 pm | इरसाल
परंतु जे लाचार काँग्रेसवाले भारताचा भावी पंतप्रधान म्हणून ज्याच्याकडे पाहात आहेत त्याच्याच जन्माला आणि पर्यायाने पंचाला तू हात घातलास.
तात्या नकळत तुम्हीही कोणाच्यातरी पंच्याला पक्षी लेंग्याला किंवा साडीला (खालचा प्रतिसाद वाचून ) हात घातलात त्याचे काय ?
21 Jul 2011 - 5:05 pm | प्रियाली
एक कत्रिना आणि बाकी सर्व षंढांची चर्चा-प्रतिसाद बघून ड्वाळे पाणावले. ;)
21 Jul 2011 - 9:44 pm | श्रावण मोडक
हां... या खऱ्या प्रियाली.
नाही तर आयडी हॅक झाला की काय अशी शंका येत होती... ;)
22 Jul 2011 - 10:36 am | भारी समर्थ
खालीलपैकी नेमका कोणत्या अर्थाने षंढ शब्द वापरला आहेस तायडे?
षंढ...
Adjective(2)
(R)(H )(E) हिजडा, षंढ - पुरूषवेषधारी नपुंसक "हिजड्यांच्या शिक्षणासाठी शासन प्रयत्न करत आहे"
(R)(H )(E) नपुंसक, षंढ, बुळा, नामर्द - संभोगविषयक दुबळेपणा असलेला "नपुंसक माणूस संतती उत्पन्न करण्यास असमर्थ असतो"
स्त्रोत: http://www.cfilt.iitb.ac.in/wordnet/webmwn/wn.php
संदर्भासहित स्पष्टीकरण दिल्यास आमच्या बालबुद्धीलाही समजेल.
--
भारी समर्थ
22 Jul 2011 - 11:30 am | योगप्रभू
मायभूमीला सर्व लेकरे समान असतात. तिथे भेद नाही.
प्रतिसादाद्वारे चर्चेत सहभागी होणार्या प्रत्येकाचे स्वागतच आहे :)
22 Jul 2011 - 10:31 pm | पंगा
मुळात '(मायभूमीची) सर्व लेकरे षंढ आहेत' हेच जर गृहीतक घेतले, तर (मायभूमीला) सर्व लेकरे व्याख्येनेच समान झाली. भेदाचा प्रश्न येतोच कुठे?
Quod Erat Demonstrandum!
22 Jul 2011 - 1:00 pm | प्यारे१
प्रतिसाद ज्यांनी दिला आहे ते 'सगळे षंढ' आहेत याबाबत आपला काही 'वैयक्तिक अनुभव' वगैरे .........
नाही. सहज विचारलं. चर्चा -प्रतिसादात माझे नाव आहे आणि माझी तुमची ओळख(देखील) नाही म्हणून आपलं विचारलं.
(ह.घ्या./ घे. न./ कसेही.)
22 Jul 2011 - 7:03 pm | sagarparadkar
प्राजू ताईंनी आपल्या कवितेत वापरला म्हणून ह्यांनीपण हा शब्द कुठेतरी वापरायचाच असा निर्धार केला असावा ... :)
पण प्राजूताईंनी तो शब्द योग्य तिथेच वापरलाय हे त्या सोयीस्कररीत्या विसरताहेत ...
भयालीदेवींच्या पुढील भयकथेत आता 'षंढ' नायक असणार की काय?
22 Jul 2011 - 10:40 pm | पंगा
('षंढ'चे जाऊ द्या, पण) मुळात प्राजूताईंच्या कवितेतदेखील 'भाडखाऊ' हा शब्द कोठेतरी वापरायचाच, अशा निर्धाराने वापरल्यासारखा वाटतो. नव्हे, तो तसाच वापरला गेला असावा, अशी आमची अटकळ - जवळपास खात्री - आहे. (अन्यथा त्या शब्दाचे त्या संदर्भातील औचित्य - अर्थाच्या दृष्टीने - समजत नाही.)
(अर्थात, हे कशाचेही - किंवा कोणाचेही - समर्थन नाही. केवळ तुलनात्मक उदाहरण दिले, इतकेच.)
21 Jul 2011 - 9:55 pm | चिरोटा
छान माहिती. अर्धी एशियन असली तरी कात्रिना खरी राष्ट्रीय बाण्याची आहे. 'षंढ' भारतिय नागरिक आपल्याला पाठींबा देणार नाहीत हे ओळखूनच तिने वक्तव्य मागे घेतले असावे,
कात्रिनाच्या स्पष्टोक्तिला लाख लाख सलाम.
चिरोटा राउत्.-कार्यकारी संपादक- कामना
22 Jul 2011 - 9:07 pm | फारएन्ड
माफी मागताना कतरिना ने एका जुन्या जोकप्रमाणे "मी शब्द मागे घेते, राहुल गांधी अर्धे भारतीय नाहीत" असे म्हणून बघायचे होते. बर्याच राजकीय प्रतिक्रियाबहाद्दरांना कळायला बराच वेळ लागला असता :)
22 Jul 2011 - 9:18 pm | रेवती
हा हा हा....
त्यांना उशिरा समजल्यानंतर पुम्हा माफी मागताना खूपच गोंधळ झाला असता आणि राहूल गांधी हे अर्धे....
एवढ्यानंतर थांबावं लागलं असतं आणि नंतर तिला अगदी सल्लूनंही आपलं म्हटलं नसतं. देश सोडून जाण्यापेक्षा यापुढं गप्प बसलेलं बरं.;)
23 Jul 2011 - 7:23 pm | आत्मशून्य
हा हा हा ..........
23 Jul 2011 - 1:27 am | डावखुरा
रामदेव बाबांच्या पाठीशी होतो अगदी तसेच...
23 Jul 2011 - 7:18 pm | विजुभाऊ
नवा लेख ल्ह्या आता कोणीतरी
धम्या, तात्या आणि कॅतरीन्या.
27 Jul 2011 - 5:57 am | नरेशकुमार
ह्या एकाच पोस्ट मध्ये अनंत* माहीती कळाली आहे.
.
* अनंत म्हनजे खुपखुप जास्त...म्हनजे जवळ्जवळ infinity.
.