छान फोटो व वर्णन
कॅलास मंदिराबद्दलची मला असलेली माहिती -
या मंदिराची रुपरेखा आखणा-यांनी त्याचे प्रोटो टाईप करुन एका कुंडात बुडवुन ठेवलेले होते. त्या कुंडात रंगमिश्रित पाणि भरलेले होते. त्या कुंडातील पाणी एका विशिष्ट मोजमापाच्या भांड्याने काढुन घेतले जाई. तेंव्हा त्या प्रोटोटाईप चा जो काही भाग दिसेल तेवढाच भाग त्या डोंगरा-च्या वरच्या बाजुने कोरणे किंवा खोदणे सुरु होई. तेवढा भाग झाला की पुन्हा त्याच विशिष्ट भांड्याने पाणि काढले जाई व पुढ्चा - म्हणजे खालचा भाग कोरला किंवा खोदला जाई.
अर्थात ही अनेक थेरीं पॅकी एक आहे, जर बांधकाम १-२ पिढ्या चाललं असेल तर असं झालं असण्याची शक्यता कमी वाटते, परंतु माझ्या मते हीच थेरी सर्वात जास्त योग्य आहे.
त्या काळातील बरीच अखंड दगडातील बांधकामे या पद्धतीने केलेली असावीत असे म्हणले जाते. यावर एक खुप सुंदर तेलगु चित्रपट आहे, फार पुर्वी दुरदर्शन वर पाहिला होता, ज्यात शिल्पकार वडिल व मुलाच्या संघर्षाची कहाणि होती.
हर्षद
काय डेंजर काम केलंय राव त्या कैलास मंदिरावर... कितीतरी सूक्ष्म आणि ढोबळ गोष्टींवर आपण सहजच नजर फिरवतो. पण नीट पाहता लक्षात येतं की ती गोष्ट तेथे असण्यामागे निश्चित असं एक कारण आहे. कैलास मंदिराच्या उत्तरेकडे महाभारतातील तर दक्षिणेकडे रामायणातले ठळक प्रसंग कोरलेले आहेत.
मंदिराच्या सभोवतालच्या कातळीत एका ठिकाणी तीन देवींच्या दगडात कोरलेल्या मूर्ती आहेत. त्या गंगा, सरस्वती आणि यमुनेच्या आहेत असं मागाहून कळलं. प्रत्येक नदीच्या पायाखाली तिचं वाहन आहे व मध्यभागी गंगा तर दोन्ही बाजूला सरस्वती आणि यमुना आहेत. गंगेची मूर्ती सरळ तर बाकी दोन नद्यांच्या मूर्ती कमरेत वाकलेल्या आहेत. कारण गंगा नदी इतर कोणत्याही नदीत विलीन होत नाही पण बाकी दोन्ही होतात. अशा कितीतरी गोष्टी असतील राव तिथं.
अजिंठ्याकडे जाताना अन्वा म्हणून गाव लागतं, मुख्य रस्त्यापासून उजवीकडे ९-१० किमी अंतरावर. तिथे १२ व्या शतकातलं शिवाचं लहानसच पण सुंदर असं मंदिर बघण्याजोगं आहे. अगदी अर्ध्या तासात उरकण्यासारखं आहे ते. जात असाल तिकडे तर चुकवू नका...
भारी समर्थ
नेमकं कुठं वाचलंय ते आता नक्की आठवत नाही पण बहुतेक ना.सं. इनामदारांच्या शहेनशाह मध्ये असावं, किंवा इकडेतिकडे वाचलेल्याची सरमिसळ समजा-
दख्खनेत मोहिमेवर असताना एकदा औरंगजेबाचा डेरा वेरूळजवळच्या (वेरूळच्या परिसरातच औरंगजेबाच्या गुरूची कबर आहे, मोठी पाहाण्यासारखी मशीद आहे आणि औरंगजेबही खुल्दाबादेच्या वेशीवर (अहाहा!! काय आठवणी तरी तिज्यायला - इथूनच पुढे म्हैसमाळकडे एक रोड जातो - प्रेयसीसुलभतारूण्यजनित हट्टामुळे अनेक वार्या घडल्या आहेत - वर सकाळचे निरभ्र आकाश, हळूहळू चेहेरा दाखवणारे गगनराज, खालच्या गावात आरवणार्या कोंबड्यांचा आवाज ऐकू येत असे एवढी शांतता आणि खालच्या झोपड्यांतून वर आलेल्या धुरांच्या रेषा, कुठल्यातरी खडकावर तो खालचा नजारा पाहात बसलेले ते जोडपे - च्यायला गेले ते दिवस!!! ) कयामतची वाट पाहात विसावला आहे ) माळरानावर पडला. त्याकाळचे औरंगजेबाचे हिंदू अंगवस्त्र म्हणा किंवा बायको म्हणा - तिच्या आग्रहावरून औरंगजेब वेरूळचे कैलास लेणे पाहायला आला. अशी आख्यायिका (त्याकाळी) सांगण्यात येत असे (हे भटभिक्षुकांचेच कसब!) की कैलास लेण्यात जी महादेवाची पिंड आहे त्या पिंडीकडे काही क्षण पाहात राहिले तर त्यात माणसाला त्याचा पुढचा जन्म दिसू लागतो. तर त्या वेरूळच्या पिंडीसमोर औरंगजेब जाऊन उभा राहिला आणि पाहू लागला. पिंडीमध्ये त्याला डुक्कर (सुव्वर!!) दिसले. शिव्यांची लाखोली वाहात लालेलाल होऊन औरंगजेब मुक्कामी पळाला आणि त्याने सगळे कैलास लेणे फोडून टाकण्याचा हुकूम सोडला. त्यांच्या बापाला फुटतंय ते! घोटीव फत्तरच ते. तरी काही मूर्त्या फोडण्यात आल्या. बाकीच्यांवर चुना थापण्यात आला आणि राहिलेल्या ठिकाणी गवत, लाकडे टाकून ती जागाच दग्ध करण्यात आली.
जाता जाता अजिंठ्याबद्दल:
हे जॉन स्मिथ या इंग्रज अधिकार्याने अजिंठा लेणी जगासमोर आणण्यापूर्वीचे. वाघाची (अजूनही अजिंठा लेणीसमोरच वाघूर नावाची नदी वाहाते) शिकार करताकरता तहानलेला जॉन स्मिथ अजिंठ्याच्या आजच्या व्ह्यू पॉईंटवरून खाली पाहात असताना त्याला एका लेणीचे प्रवेशद्वार दिसले. खाली उतरून पुन्हा आत गेला तेव्हा गचपनात झाकून गेलेल्या इतर लेण्याही दिसून आल्या. त्यापैकी कांहीचा तर अजिंठा भागातील मेंढपळांनी शेळ्या-मेंढ्यांचा कोंडवाडा म्हणूनही वापर केला होता आणि आत शेळ्या, मेंढ्या, लेंड्या दिसून आल्या!
अवांतर: लातूरच्या डॉ. पंडितराव देशमुखांची वेरूळ-अजिंठा ( की खजुराहो सुध्दा?? ) लेणीच्या निर्मितीकाळादरम्यानच्या घडामोडीवर लिहीलेली एक खूपच सुंदर कादंबरी आहे - हॅण्डमेड कागदावर छापलेली तुम्ही काढलेल्या सुंदर छायाचित्रांसारखीच सुंदर छायाचित्रे आहेत त्यात - वर्णन (उदा. आकस्मिक वेळी माती किंवा धातूच्या भांड्याचा वापर न करता मांस शिजवणे ), नावे (रक्कस, बब्बस), भाषेचा बाजही जब्बरदस्स्त!! मिळाली कुठे तर एकदा जरूर वाचाच.
अतिअवांतर: खुल्दाबाद (काही वेळा रत्नपूर) रोडवरच कागजीपुरा नावाचे एक खेडे लागते. या खेड्यात त्या काळी प्रशासनिक कामासाठी लागणारा कागद वापरला जात असे. अजूनही काही लोक तो धंदा करतात. त्या कागदाला अजूनही विदेशातून मागणी आहे आणि तो फार महाग आहे - कारण सगळी प्रक्रिया मनुष्यबळ वापरून हाताने केली जाते.
बाकी पैठणी साड्यांचेही तकलादू कारखाने याच रोडवर उभे आहेत - ते मिपाकरणींना माहित नसतील अशी शक्यता नाही ! आणि मिपाकर लोक ते माहित असूनही तिथे जायची हिंमत करतील अशी शक्यता नाही!
तुम्ही पाहिलेत का?
फटू जबराट!
धन्यवाद यशवंत.
माझ्या माहितीप्रमाणे, दख्खन मोहिमेत वर्षानुवर्षे खर्ची करुनही मराठे हरत नाहीत, नाना कॢप्त्या करुनही सिवा हाती लागत नाही या जाणीवेने औरंगजेब पिसाळला होता, त्यातच आलेल्या साथीच्या रोगाने हजारो सैनिक मेले. औरंगजेबाचीही तब्येत खराब झाली होती आणि तो अत्यंत वैतागलेला होता. त्याला औषध लागु पडत नव्हते. मनःशांती मिळावी म्हणुन अनेक प्रयत्न झाले, विशेष यश आले नाही. शेवटी कुठेतरी मन रमेल म्हणुन "गुंफा" दाखवायला त्याला घेउन गेले (बहुदा रबिया उर दुर्रानी या त्याच्या बायकोने). असे म्हणतात तोपर्यंत लेणी अत्यंत सुस्थितित होती, देवगिरीवरुन त्यांची काळजी घेण्यासाठी पैसा पुरवला जाई (मुस्लिम अधिपत्याखाली असतांना सुद्धा). रंगरंगोटी शाबुत होती आणी शिवलिंगाची पुजा देखिल चाले. लेण्याच्या मागच्या भागात एक कोरलेला पोपट होता म्हणे, त्याचे डोळे अत्यंत विलक्षण अश्या रत्नांचे होते. त्या डोळ्यात माणसाला त्याचा पुढला जन्म दिसायचा. आणि त्यात औरंगजेबाला डुक्कर दिसले. झालें .. औरंगजेब पुन्हा पिसाळला. काफिरांचे बुत तोडायला हजार पाथरवट बोलावले गेले. नंतर आख्ख्या लेण्यात भुस्सा, गोवर्या आणि गवत भरुन पेटवुन देण्यात आले. पाथरवटांनी मुर्त्या तोडल्या आणि आगीने रंग जाळला. शतकांनी जपलेले वैभव हरामखोर औरंग्याने काही दिवसात होत्याचे नव्हते करुन टाकले. आजही अद्वितीय अशी वाटणारी लेणी तिच्या मुळ स्वरुपात काय असेल याची फक्त कल्पनाच आपण करु शकतो.
-(खिन्न)
आंद्या
बाकी खुल्ताबादच्या रस्त्यावर पैठणींची दुकाने नसुन "हिमरु शालींची" आहेत. हिमरु सिल्क ला औरंगाबाद सिल्क असेही म्हटले जाते.
MTDC चे गाईड माहिती सांगण्यातच इतका वेळ घालवतात कि.. लेण्या बघण्यासाठी वेळच उरत नाही.......
आणि ते लेण्या सुद्धा विशिष्टच दाखवतात, सगळ्या नाही
म्हणून मग आम्ही गाईड ला सोडून सरळ लेण्या बघत सुटलो.......
(इतिहास काय मिपाकर सांगतीलच हा विश्वास होताच)
पण आता हि माहिती वाचताना खूप आनंद होतोय.....
(मिपाकरांनी विश्वासघात केला नाही ;))
पाथरवटांनी मुर्त्या तोडल्या आणि आगीने रंग जाळला
खरच इतकी विकृती कुठेही पाहिलेली नव्हती.....
कुठे गजाननाची सोंड तुटलेली आहे.....\
कित्येक मुर्त्यांची तर डोकी सुद्धा छाटलेली आहेत.....
एकही हत्तीची सोंड शाबूत नाहीये....
सगळी शिल्प आपली भग्न केलेली.....
खूप राग येतो....... हे सगळं बघताना....
शहाजहान ने म्हणे ताजमहाल बांधनारयांचे हात तोडून टाकलेले..... का तर अशी कलाकृती परत उभी राहू नये म्हणून
किती हि विकृती.....
आणि आपण गोडवे गातो... त्यांच्या प्रेमाचे...............
बाकी खुल्ताबादच्या रस्त्यावर पैठणींची दुकाने नसुन "हिमरु शालींची" आहेत.
या ठासून केलेल्या विधानामागं मला तीन शक्यता दिसतात.
१. तुमचं लग्न झालेलं आहे.
२. बेटर हाफही मिपावर आहे.
किंवा मग -
३. तुम्ही औरंगाबादचे असूनही बरेच दिवस त्या रस्त्याकडे फिरकलेला नाहीत !
अहो तिथं जागोजागी पाट्या लावलेल्या आहेत पैठणी साडी सेल म्हणून -मशीनी ठेवलेल्या आहेत पैठण्या विणणार्या.
हां, तिथं त्या रस्त्यावरच्या कारखान्यात तयार होणारी पैठणी ही खरी पैठणी नव्हेच असे म्हणणे असेल तर वेगळे.
महिला मंडळानं आनंदयात्रीं च्या या विधानावर विश्वास ठेऊ नये.
विशेष सूचना: वेरूळ रोडला पैठण्या मिळतातच मिळतात त्या पण अस्सल असतात आणि ते लोक चार-सहा हजारानं कमी भावात देतात.
( अस्सल पैठण्या, कागजीपुर्यातल्या कागदांचे व्यापारी ) यशवंत पैठणकर
आमची शाखा फक्त वेरूळ रोडवरच आहे.
अतिशय सुंदर.
वेरूळची ही कोरीव लेणी वेगवेगळ्या राजवटीत खोदली गेली. सुरुवातीची बौद्ध लेणी ही कलचुरी राजवटीत खोदली गेली. नंतर कर्नाटकाहून आलेल्या राष्ट्रकूट राजवटीत कैलास लेण्याचे बांधकाम झाले. म्हणूनच दक्षिण भारतीय शैलीचा प्रभाव येथे जाणवतो. लेण्यासमोरील स्तंभ हा इजिप्तमधील मंदिरासमोर असलेल्या ओबेलिस्कशी साध्यर्म्य दाखवतो. जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा. नंतरच्या जैन लेण्या ९ व्या व १० व्या शतकात खोदल्या गेल्या. विशेष म्हणजे कोणत्याही राजवटीने आधीच्या लेण्यांना कुठलाही धक्का लावला नाही. विध्वंस झाला तो मात्र नंतरच्या इस्लामिक राजवटींमध्येच.
फक्त माहिती आणि इतिहास , विषयाला फाटा न फोडणाऱ्या प्रतिक्रिया......आणि फालतू विषयावर चर्चा करण्यात वेळ न घालवता खरी अस्सल माहिती देणारे मिपाकर बघून डोळे पाणावले ...... ;)
प्रतिक्रिया
वेरूळचा इतिहास आणि
छान
उत्कृष्ट फोटो
अप्रतिम फोटू..
व्वा! सुंदर फोटो आणि चांगले
छान
डेंजर काम...
एका ठिकाणी तीन देवींच्या
मस्त!
नेमकं कुठं वाचलंय ते आता
धन्यवाद यशवंत
MTDC चे गाईड माहिती
बाकी खुल्ताबादच्या रस्त्यावर
बरं
कागजीपुर्याचा इतिहास कुणी
सुरेख फोटो स्पा
@यशवंत एकनाथ,आनंदयात्री,भारी समर्थ,अनि स्पा
संपुर्ण लेखमाला आवडली.