Skip to main content

चालू घडामोडी - फेब्रुवारी २०१९

लेखक वामन देशमुख यांनी शनिवार, 02/02/2019 06:45 या दिवशी प्रकाशित केले.
अर्थसंकल्प . २०१९चा लेखानुदान (अंतरिम अर्थसंकल्प) काल अर्थमंत्री श्री पियुष गोयल यांनी संसदेत सादर केला. अपेक्षेप्रमाणे लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन यात लोकप्रिय योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत. अर्थमंत्र्यांच्या भाषणाचा संपूर्ण गोषवारा इथे इंग्लिशमध्ये वाचता येईल. अर्थसंकल्पातील काही ठळक योजना: महामार्ग बांधणीसाठी अतिरिक्त तरतूद क्रीडाक्षेत्रासाठी वाढीव तरतूद असंघटित क्षेत्रातील कामगार व शेतकरी यांच्यासाठी निवृत्तीवेतन उपभोक्त्याकडे अधिक पैसे राहणार या सुखांनो या! . एक प्रकट स्वगत: मोदी सरकारने आपल्या पहिल्या कार्यकाळात केलेल्या उल्लेखनीय बाबींपैकी एक म्हणजे सामाजिक-राजकीय चर्चेचा रोख केवळ दलित-अल्पसंख्यांक-शेतकरी-ग्रामीण जनता (पहिला गट) यांवरून मध्यमवर्गीय-छोटे व्यापारी-शहरी जनता (दुसरा गट) यांच्यावर आणला. म्हणजे, सर्वसाधारणपणे, कोणत्याही लाभप्रद योजना यापूर्वी मुख्यतः पहिल्या गटापैकी काही समाजघटकांसाठी असायच्या. दुसऱ्या गटाला शासनाकडून कुठल्या विशेष लाभाची गरजच नाही असा राजकीय विचारप्रवाह होता. खरंतर, दुसऱ्या गटातील समाजघटक हे अर्थव्यवस्थेचे key driving forces (मराठी?) असतात पण त्यांच्या लाभाची भाषा बोलण्यास आणि त्यांबध्दल काही करण्यास जणू काही अघोषित मज्जाव होता. अर्थव्यवस्थेतील एक प्रमुख घटक या न्यूनगंडानं पछाडलेला होता. त्यांच्यासाठी, आरक्षण, अतिरिक्त करमाफी, मुद्रा कर्ज, इ. योजना लागू करून, हे चित्र काही प्रमाणात बदलण्याचं श्रेय मोदींच्या आधुनिक राजकीय मांडणीला द्यायला हवं. तथापि, पहिल्या गटाकडे मोदी सरकारने दुर्लक्ष केलंय असं अजिबात नव्हे.

वाचने 544962
प्रतिक्रिया 783

प्रतिक्रिया

In reply to by बाप्पू

एक जालावर फिरत असलेला विनोद माझ्यासमोर एक माणूस तावातावाने सांगत होता कि श्री मोदी चोर आहेत आणि श्री राहुल गांधी हेच आमचे खरे नेते मी त्याला म्हणालो परमेश्वर तुम्हाला श्री राहुल गांधी यांच्या सारखा मुलगा देवो आणि मला श्री मोदींसारखा. बघता बघता त्याची दातखिळी बसली ))=((

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

चालेल कि जर देशासाठी इतका त्याग करणार असेल तर बायकोला सोडलं तर त्यात काय?

In reply to by सुबोध खरे

(संपादित) विरुद्ध उरलेले 12 संसारी पंतप्रधान पीएसेम च्या माणसाकडून एक कोहार्ट स्टडी , चाय स्क्वेअर स्टडी की काय काय असते , ते एकदा करून घ्या.

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

तुमच्या विनोदवीर चा लग्ना चा प्रश्न अगोदर सोड़वायला सांगा म्हणजे गांधी कुटुंबा ने स्वकष्टाने कमवलेल्या हजारो कोटि ला वारसदार मिळेल !!!

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

उरलेले 12 संसारी पंतप्रधान हा हा हा !! संसारी पंत प्रधान ?? दुसर्याच्या बायकोला प्रेम पत्र लिहीणारे हुच्च नितीमत्ता असलेले पहीले पंत प्रधान ??

एन डी ए (मोदी सरकार) सरकारने पावणे पाच वर्षांमध्ये काय काय केले? १. गाईला आई म्हटले, बैल त्यांचा बाप झाला. लव्ह जिहाद, गोहत्या बंदी सारख्या संवेदनाशील विषयांना चिथावणी दिली. धार्मिक तेढ वाढवण्याचे काम केले. अनेक लोक 'मॉब लिंचिंग' चे बळी ठरले. भारतावर असहिष्णुतेचा ठपका बसला. अनेक विचारवंतांनी मिळालेले पुरस्कार परत केले. काहींना पाकिस्तानात जाण्याचा अविवेकी सल्ले देण्यात आले. विरोध करणाऱ्या लोकांवर देशद्रोही असल्याचा ठपका ठेवण्यात आला, मूर्खपणाचा कळस झाला. २. नोटाबंदीचा किंवा नोटा बदलीचा (५०० आणि १००० च्या नोटा) अर्थतज्ञ् व्यक्तींशी सल्ला न घेताच आततायीपणे निर्णय घेतला. निर्णय चुकीचा झाला तर चौकात फाशी द्या, असे सांगितले गेले. शब्दाला जागणे यांना मान्य नाही, हे सिद्ध झाले. १०० पेक्षा जास्त लोक बँकांच्या रांगेत राहून मरण पावले, त्यांच्या मृत्यूची जबाबदारी घेतली नाही, बँकांचे सुद्धा काही कर्मचारी दगावले गेले. काळा पैसा चलनात येणार अशी हमी दिली गेली मात्र प्रत्यक्षात 'डोंगर पोखरून उंदीर' सुद्धा मिळाला नाही. २००० ची नोट छापण्यामागचे कारण सांगण्यात अपयश आले. ५००० कोटी पेक्षा जास्त पैसा नव्या ५०० आणि २००० च्या नोटा छापण्यात व्यर्थ घालविले. देशवासियांना प्रचंड मानसिक त्रास झाला, ते वेगळेच. भारतीय अर्थव्यवस्थेची पुरती वाट लागली. अनेक लहान लहान उद्योग बंद पडले, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर वाढली. चाय-पकोडे विका असे सल्ले देऊन बेरोजगार तरुणांच्या जखमेवरती मीठ चोळले गेले. देशवासीयांच्या मनातून कायमचे उतरले! चूक मान्य केली नाही, जनतेला मूर्ख बनविण्याचे काम आजतागायत चालू आहे.

३. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता केली नाही उदा. परदेशातला काळा पैसा ९० दिवसात भारतात परत आणणार, प्रत्येकाच्या बँक खात्यात १५-१५ लाख रुपये जमा करणार, दाऊद इब्राहिमला लगेच भारतात परत आणणार, शेतकऱयांचे उत्पन्न दुप्पट करणार, स्वामिनाथन आयोगाच्या सर्व शिफारशी आमलात आणणार, तरुणांना प्रत्येक वर्षी २ कॊटी नोकऱ्या देणार (पाच वर्षात १० कोटी नोकऱ्या), शेतकऱयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी ठोस पाऊले उचलणार, प्रत्यक्षात तो 'चुनावी जुमला' होता म्हणून निर्लज्जपणे मुलाखती दिल्या. ४. राम मंदिर बांधू म्हणून निवडणुकीपूर्वी हिंदू मतदारांना शब्द दिला, आता म्हणत आहेत कि सर्वोच्च न्यायालयाची वाट पाहणार, कायदा करून राम मंदिर बांधण्याचे सर्व प्रस्थाव फेटाळण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंदिर बांधले जाईल असे घोषणापत्रात कुठेच लिहिलेले नव्हते. राम मंदिर बांधण्यासाठी एक पाऊल सुद्धा पुढे टाकले नाही. अनेक कंगोरे काढून जनतेला फसविण्याचा काम अजूनही अव्याहतपणे चालू आहे.

५. विजय माल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी सारखे अनेक लोक चौकीदाराच्या नाकावर टिच्चून बँकांचे हजारों कोटी रुपये घेऊन भारतातून फरार झाले. हे हातावर हात ठेऊन नुसते बघत बसले. बँका 'लो बॅलन्स ' च्या नावाखाली जनतेकडून त्याची भरपाई करण्याचा वेडगळ प्रयत्न करीत आहेत. 'ना खाऊंगा , ना खाणे दूंगा' हि वल्गना साफ खोटी ठरली. त्यामुळे अर्थव्यवस्थेचे पुरते वाटोळे झाले. जी डी पी, बेरोजगारीची खोटी आकडेवारी जनतेसमोर ठेऊन जनतेला मूर्ख बनविले. ६. जी एस टी ची अंमल बजावणी करण्यात नोटबंदी प्रमाणेच प्रचंड अपयश आले. व्यवस्थित पूर्वतयारी न करताच जी एस टी सुरु करण्यात आली. वेगवेगळ्या पदार्थांवरील कर प्रणाली वारंवार बदलण्यात आली, ते अजूनही चालूच आहे. व्यापारी तसेच ग्राहक या दोघांना त्यामुळे मनस्ताप सहन करावा लागला. व्यापारी वर्गाला मोठं-मोठे मोर्चे काढायला भाग पाडले. अनेक व्यापाऱ्याना व्यापार बंद करावे लागले, बहुतांश लोक व्यापारी व्यवसायातून बाहेर पडले. हे सर्व अनर्थ या सरकार मुळे झाले.

७. देशात धार्मिक विद्वेष पसरविण्याचे काम या सरकारने (भाजपच्या मंत्री आणि नेत्यांनी) केले. परधर्मीय लोकांची हेटाळणी केली गेली. रामाला कोणी दलित, कोणी आदिवासी, कोणी ब्राह्मण, कोणी मुस्लिम होता अशी निरर्थक शेरेबाजी केली. गणपतीला 'प्लास्टिक सर्जरी' चे उदाहरण असल्याची कोल्हे-कुई केली. व्यर्थ अंधश्रद्धा पसरविण्याचे काम केले. घरात गाईचे मांस असल्याच्या संशयावरून मुस्लिम लोकांच्या हत्या घडवून आणल्या. स्वयंघोषित गोरक्षकांनी देशात अक्षरशः हैदोस घातला. या सरकारने योग्य ती कारवाई न केल्याने ते चांगलेच मस्तवाल बनले. ८. बलात्काराच्या अनेक घटनांमध्ये भाजपचे नेते तसेच कार्यकर्ते सापडले मात्र तात्काळ कारवाई न करता सरकारने त्यांना पाठीशी घालण्याचे मूर्खपणाचे वर्तन केले. जनतेचा जास्त दबाव वाढल्यानंतरच कारवाईचे करण्याचा चुकीचा पायंडा पडला. कट्टर धार्मिक संघटना स्वतः च सत्तेस असल्यासारखे वागू लागले, आमचे सरकार आहे, आम्हाला कोणीही हात लावू शकणार नाही, अशा गुर्मीने बोलू लागले. स्वतः देशप्रेमी असल्याचे ढोंग करून इतर लोकांना देशद्रोही असल्याची प्रमाणपत्रे जाहीरपणे वाटू लागले. सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या लोकांना देशद्रोही म्हणू लागले, एवढी यांची पातळी घसरली कि उठसूट कोणालाही पाकिस्थानात जाऊन राहण्याचे सल्ले निर्लज्जपणे देऊ लागले.

९. 'स्मार्ट सिटी' च्या नावे दिंडोरा पिटण्यात आला, हजारों कोटी रुपये त्यासाठी मंजूर करण्यात आले, आजतागायत संपूर्ण भारतात एक सुद्धा शहर 'स्मार्ट सिटी' म्हणून उदयास आलेले नाही. १०. 'स्वछ भारत' योजना चालू केली, हातात झाडू घेऊन छायाचित्रे काढून घेतली, प्रसार माध्यमात झळकले, नंतर हि योजना कुठे गायब झाली कोणालाच कळाले नाही. लोखों - कोटी (खोटे आकडे) संडास बांधल्याचे नाटक केले गेले, प्रत्यक्षात योजनेचे तीन-तेरा वाजले. गावेच्या गावे हागणदारी मुक्त केल्याचे जाहीर केले, मीडियाने त्या गावांना भेट दिल्यावर सरकारचे पितळ उघडे पडले. गंगा साफ करण्यासाठी केंद्रात स्वतंत्र खाते तयार करण्यात आले, कोटी-कोटी रुपये मंजूर करून देण्यात आले मात्र गंगेची अवस्था 'जैसे थे' च राहिली.

११. 'स्टार्ट अप' इंडिया, 'मेक इन इंडिया', 'स्किल इंडिया' या योजनांची पुरती वाट लागलेली आहे, त्या फक्त कागदोपत्रीच अस्तित्वात आहेत. एवढी गावांत वीज पोहोचली तेवढ्या गावांत वीज पोहोचली अशा आरोळ्या ऐकण्यात आल्या तथापि प्रत्यक्षात काहीच झाले नसल्याचे सिद्ध झाले. १२. लोकांना गॅस देण्याची योजना आणली ती सुद्धा फसली. गरिबी रेषेखालील (मासिक उत्पन्न १०२० रुपये) करोडो महिलांना गॅस दिल्याचे सांगण्यात आले, गॅस धारकांची संख्या फुगवून सांगितली गेली. तो नुसताच फार्स ठरला, सिलेंडर चे दर एवढे जास्त करून ठेवले की जवळपास ९०% लोकांनी दुसरा सिलेंडर विकत घेताच आला नाही. सिलेंडरचे दर ९२० रुपयांवर (मासिक उत्पन्न १०२० रुपये) पोहोचले होते. गॅस आल्यामुळे रॉकेल मिळणे सुद्धा बंद झाले आता ती कुटुंबे सरपणावर (लाकडे, पालापाचोळा) जेवण बनवीत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.

१३. कच्चा तेलाचे जागतिक बाजारपेठेत दर एकदम कमी असताना सुद्धा प्रचंड नफा कमवून (भरमसाठ कर लादून) या सरकारने देशातील जनतेला अक्षरशः लुटले. पेट्रोलियम पदार्थ [पेट्रोलियम पदार्थ (पेट्रोल, डिझेल, गॅस इ.)] जी एस टी च्या अंतर्गत आणता आले असते मात्र या सरकारने तसे न करता करांमध्ये खूप वाढ करून जनतेला लुबाडले. पेट्रोल तर काही ठिकाणी शंभरी पार झाले होते. निवडणूक (कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड) जवळ आल्या कि दर वाढवायचे नाहीत अन निवडणुका संपल्या कि पुन्हा लुबाडणे चालू, हे सामान्य जनतेने अनुभवलेले आहे. या सरकारने यातून प्रचंड माया जमा केलेली आहे. १४. स्वायत्त संस्था (सीबीआय, ईडी इ. ) या सरकारने आपल्या मुठीत ठेवल्या आहेत. त्यांची स्वायत्तता सरकारने धुळीस मिळविली आहे. त्या संस्थाचा वापर विरोधकांना वेगवेगळ्या चौकशांत अडकविण्यात करण्यात येत आहे. हा खूप मोठा दुरुपयोग आहे. जनता सर्व बघत आहे, ती जेवढ्या तत्परतेने डोक्यावर घेते त्याच्या कितीतरी पटीने जातात जमिनीवर आपटायला कमी करीत नसते.

१५. या सरकारने राफेल डील संदर्भात जी भूमिका घेतलेली आहे ती पूर्णतः चुकीची आहे. सरकार विरोधी पक्षासोबतच देशातील जनतेला सुद्धा फसवीत आहे. एवढी कमी विमाने का घेण्याचा करार झाला? शंभर पेक्षा जास्त विमान खरेदीचा करार का मोडीत काढला? एच ए एल ही सरकारच्या अंतर्गत येणारी कंपनी असताना कंत्राट अनिल अंबानीला देण्यासाठी एवढा आटापिटा का केला? एवढी जास्त तातडीची गरज होती तरी सुद्धा आजपर्यंत एकसुद्धा विमान भारतात का पोहोचू शकलेले नाही? सरकार चौकशीला सामोरे जाण्यास का घाबरत आहे? या प्रश्नांची समाधानकारक उत्तर अजूनही सरकार देऊ शकलेले नाही. होऊ द्या ना एकदा 'दूध का दूध और पानी का पानी' कर नाही त्याला डर कशाला? सरकारने स्वतः हुन जेसीपी तर्फे ताबडतोब संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) स्थापून चौकशी करून घेणे अत्यावश्यक आहे. अन्यथा मतदार जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, हे लक्षात असू द्या!.................................

In reply to by व्ही. डी. सी.

पुढच्या वेळेस उचलेगिरी करुन छोटे छोटे टाका म्हणजे लोक वाचतील तरी !!!

In reply to by ट्रम्प

माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

In reply to by व्ही. डी. सी.

पोस्ट करताना काही विचार वैगरे करवा म्हणतो थोडा बर असत तब्येतीला..

In reply to by शलभ

व्यर्थ आणि बावळट बडबड ! भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये जास्त फरक आहेत कुठे? मोदी आणि राहुल दोन्ही नुसते बोलघेवडे आहेत, हे कधीच सिद्ध झालेले आहे! माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

In reply to by व्ही. डी. सी.

व्यर्थ आणि बावळट बडबड
स्वतःला चांगलं ओळखता. तुमचे पोस्ट्स बघूनच कळतंय कुणाला फॉलो करताय. :D

In reply to by व्ही. डी. सी.

राफेल मधे घोटाळा झाला. आता व्हिडिसी इतके पोटतिड़कीने बोलत आहे तर आपल्याला मान्य करावे लागेल, पण ते येड़ पत्रकार परिषदेत टॉयलेटपेपर येव्हढ तुकड़ जेव्हा पुरावा म्हणून फड़फड़वतं तर तेच संसदेत का नाही फड़फडवत? याचे उत्तर द्या व्हिडिसी , मी आजन्म कोंग्रेसला वोट करिन। नाहीतर तुम्हीच या आमच्याकडे

In reply to by भंकस बाबा

राफेल मध्ये घोटाळा झाला कि नाही झाला हे समजण्यासाठी किमान जेसीपी द्वारे चौकशी तरी व्हायला नको का? या सरकारमधील खोटारड्या नेत्यांवर विश्वास ठेवणे म्हणजे स्वतः च्या पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखे नाही काय? इथे प्रश्न काँगेसला मत देण्याचा नाही, भाजप आणि काँग्रेस एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे धर्मान्ध, जातीयवादी, निर्लज्ज, मानवद्रोही सरकार हटविणे सर्वांचे आद्य कर्तव्य असायला हवे!

In reply to by व्ही. डी. सी.

पहिली गोष्ट म्हणजे जेसीपी नसून जेपीसी आहे ज्याचा फुलफॉर्म जॉईंट पार्लियामेंटरी कमिटी असा आहे. तर अश्या या जेपीसीचा तुम्ही जप लावलेला आहे त्या कमिटीमध्ये कोण कोण असतात हे तुम्हाला माहित आहे का? जेपीसीमध्ये सर्वसाधारणपणे २/३ मेम्बर संसदेतील तर १/३ राज्यसभेतील असतात. तसेच त्यांची संख्या त्या त्या पक्षांच्या संसदेतील संख्येच्या प्रमाणात असते. म्हणजे जर आता जेपीसी केली तर त्यात भाजपचे नेते जास्त असणार आणि काँग्रेसचे थोड्या प्रमाणात असतील. बाकी जे आरडाओरडा करत आहेत त्या पक्षांचे तर कदाचित कोणीच असणार नाहीत. असो. तर यापूर्वी पण बरेचदा जेपीसी बसवली गेली आहे. त्यात एक प्रमुख केस आहे बोफोर्सची. जेव्हा बोफोर्सच्या घोटाळ्याची चौकशी करायला जेपीसी बसवली गेली तेव्हा त्यात काँग्रेसचे संसदेतील संख्याबळ जास्त असल्याने काँग्रेसचेच सदस्य जास्त होते. म्हणजे चोरी ज्यांनी केली तेच किंवा त्यांचेच साथीदार जेपीसीमध्ये होते. सन १९८८ च्या एका वर्तमानपत्रात आलेला हा रिपोर्ट वाचा. जेपीसी बसवूनही नंतर बोफोर्स केस कोर्टात गेलीच आणि एवढंच नव्हे तर कोर्टाने असे पण नमूद केले की राजीव गांधींनी जेपीसीचा वापर "कव्हर अप" म्हणून केला. या पार्श्वभूमीवर जेपीसी न बसवता परस्पर सुप्रीम कोर्टाकडे जाणे श्रेयस्कर का नसावे? सुप्रीम कोर्टाने निर्णय देऊनही जेपीसी असं काय शोधून काढणार आहे? भारत सरकार सोडून द्या पण फ्रांस सरकार, दासूचे मुख्य, आपले एअर चीफ यांनी सगळ्यांनी समजावून सांगूनही मंदभक्तांना का समजत नाहीये? कालच राफेलच्या सौद्यात "Pricing Negotiation Committee" चे तत्कालीन मुख्य (निवृत्त) एअर चीफ मार्शल एसबीपी सिन्हा यांनी सुद्धा PMO कडून कुठलाही दबाव नव्हता तसेच कोणा ठराविक कंपनीला फेव्हर करा वगैरे कुठलीही सूचना नव्हती असे स्पष्ट केले.तसेच रागा जी एसपी शर्मांची चिट्ठी दाखवत आहे त्यावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत की एसपी शर्मा यांचा या सौद्याशी काहीच संबंध नव्हता तर त्यांनी हे का लिहिले असावे आणि ते आता का जाहीर केले जात आहे? तसेच या सौद्यात मध्यस्थ कोण आहे त्या व्यक्तीचे वा कंपनीचे नाव तुम्हाला सांगता येईल का? गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट झालेल्या करारात मध्यस्थ का आणि कसा घेता येईल? काही महिन्यांपूर्वीच तर विरोधक ओरडत होते की सरकारने परस्पर करार केला कोणालाच मध्ये घेतले नाही किंवा विचारले नाही. मग आता का आरडाओरडा होतोय? ५९००० कोटी रुपयांच्या करारात ३०००० कोटी अनिल अंबानीला कसे देता येतील? अनिल अंबानीने Dassault Reliance Aerospace Limited नावाची कंपनी स्थापन केली यात ५१% गुंतवणूक रिलायन्स आणि ४९% दासूने केली. दासू आणि रिलायन्स मधील हा करार साधारणतः ८५० कोटी रुपयांचा आहे. कालच बातमी आली आहे की Dassault Reliance Aerospace Limited मध्ये Falcon विमानाचे भाग बनवण्याचे काम चालू झाले. Falcon विमान भारत घेत नाहीये आणि Falcon व राफेल ही दोन्ही पूर्णतः वेगळी विमाने आहेत हे स्पष्ट करतो. आता तुम्ही राफेल हा घोटाळा कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी इथे २-५ मुद्दे सांगा बघू.

VDC अरेच्या !! तुम्हाला ईतकी माहीती आहे म्हणजे पुरावा असेलच ? का Whatsapp वर आलेला Forward आहे ? ईतका तगडा पुरावा असताना हे NDA सरकार अजुन सत्त्येत कशी काय राहीली ? नसलेल्या पुराव्यावर रफालच्या नावांने तो रा गा संसदे बाहेर बोंब ठोकत असतो, असले पुरावे हाती आले असते तर आकाश पाताळ एक केल असत कॉंग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांनी !! बाकी तुम्हाला काय वाटत त्याच्यावर सरकार काय झाडाच एक पान सुद्धा पडणार नाही !!

In reply to by डँबिस००७

राहुल कैलासाला जाऊन आला , तुम्ही आलात ?नाही ना , का सांगा ? कारण तुमचा हिंदुधर्म घराणेशाहीतून आला आहे, पण राहुलचा हिंदुधर्म स्वकष्टअर्जित आहे . स्वकष्टार्जीत गोष्ट असली की मनुष्य मेहेनत घेतो.

In reply to by डँबिस००७

अरेच्या !! तुम्हाला ईतकी माहीती आहे म्हणजे पुरावा असेलच ? का Whatsapp वर आलेला Forward आहे ?..................... मे महिन्यात सत्तापालट होणार आहे आणि सर्व भंकस लोक खडी फोडायला तुरुंगात जाणार आहेत. सर्व काही पुराव्यांनुसारच होणार आहे. काळजी नसावी. हे १५ मुद्दे मी स्वतः लिहिलेले आहेत, Whatsapp चा इथे मुळीच संबंध नाही. ईतका तगडा पुरावा असताना हे NDA सरकार अजुन सत्त्येत कशी काय राहीली ? नसलेल्या पुराव्यावर रफालच्या नावांने तो रा गा संसदे बाहेर बोंब ठोकत असतो, असले पुरावे हाती आले असते तर आकाश पाताळ एक केल असत कॉंग्रेसच्या भ्रष्ट नेत्यांनी !!............... फक्त तीनच महिने बाकी आहेत, मोदी सरकारची उचलबांगडी नक्क्की होणार आहे. त्या काँग्रेसचे मला काही सांगू नका, भाजप व काँग्रेस हे सर्व एकाच माळेचे मणी आहेत. माझा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही, याची कृपया नोंद घ्यावी. मात्र हे निर्दयी सरकार उलथवून लावणे खूप-खूप गरजेचे होऊन बसले आहे. बाकी तुम्हाला काय वाटत त्याच्यावर सरकार काय झाडाच एक पान सुद्धा पडणार नाही !!..................... लोकशाहीत एक-एक मत महत्वाचे असते, हे विसरून चालणार नाही. हे धर्मान्ध, जातीयवादी, निर्लज्ज, मानवद्रोही सरकार घालविण्यास खारीचा वाटा नक्कीच उचलू, यात शंका नाही!

In reply to by व्ही. डी. सी.

काँग्रेसच्या भ्रष्टयाचाराचा भांडाफोड करू हे 20-25 बडबडत आज भाजपे सत्तेत आले आहेत , बाजपेयीं अन मोदींनी किती लोकांना तुरुंगात घातले ?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

पण संघ जातीयवादी आहे असे गेले ५० वर्षे म्हणणारे प्रणव मुखर्जी काही महिन्यांपुर्वी संघाचे कौतुक करते झाले. मध्यप्रदेशात सत्तेवर आलो तर संघावर बंदी घालू असे काँग्रेसवाले म्हणाले होते रे ब्लॅक-कॅट्या. असो. सध्या राहुलने पुन्हा राफेल प्रकरण उचलून धरले. द हिंदू ह्या वर्तमान पत्राने सगळा कागद दाखवला नाही. सोयीपुरताच दाखवला. पर्रेकरांनी जो शेरा मारला आहे तो राहूल व हिंदूने लपवला..

In reply to by माईसाहेब कुरसूंदीकर

मध्यप्रदेशात जिंकलो तर शासकीय जागेत शाखा घेण्यावर बंदी घालू , असे ते बोलले होते.

In reply to by व्ही. डी. सी.

VDC, तुम्हाला भाजपा आवडत नाही , कॉंग्रेस पसंद नाही मग तुमच अमुल्य व्होट कोणाला देणार ? महा गठबंधन ला ? त्यातही कॉंग्रेस आहेच की ! भाजपाला सशक्त असा पर्याय अजुन तरी उपलब्ध नाही ! त्यामुळे तुमचे व्होट वाया जाणार !!

In reply to by डँबिस००७

मत मुळीच वाया जातही नाही आणि जाणार सुद्धा नाही! त्या काँगेस आणि भाजप सोडून कोणालाही मत देऊ, अपक्षाला देऊ, नाहीतर 'नोटा' आहेच! लुटारू, भ्रष्टाचारी, धर्मान्ध भाजप आणि काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवणेच देशाच्या हिताचे आहे!

In reply to by व्ही. डी. सी.

मे महिन्यात सत्तापालट होणार आहे आणि सर्व भंकस लोक खडी फोडायला तुरुंगात जाणार आहेत. सर्व काही पुराव्यांनुसारच होणार आहे. काळजी नसावी आणि सत्तापालट नाही झाला तर हे थुंकलेले जाहीररीत्या गिळण्याची तयारी असू द्या म्हणजे झाले . तेव्हा गोलपोस्ट बदलू नका !

राफेल मध्ये घोटाळा झाला कि नाही झाला हे समजण्यासाठी किमान जेसीपी द्वारे चौकशी तरी व्हायला नको का? कॉंग्रेसची सत्ता असताना १० वर्षांत वायुदलाला एकही विमान विकत घेउन दिल नाही ? का ? भारताला कमजोर करण्यासाठीच ना ? मग त्पांच्यावर कोण कारवाई करणार ?

In reply to by डँबिस००७

जनतेने केली ना कारवाई, २०१४ ला सत्तेतून उचलून बाहेर केले! भाजपचे सुद्धा तसेच व्हावे असे तुम्हाला वाटत आहे काय? चौकशी व्हावी एवढी माफक अपेक्षा मतदार जनता ठेऊ शकत नाही काय?

In reply to by Blackcat (verified= न पडताळणी केलेला)

व्हीडी सी आणि काळी मांजर. राफेल मध्ये जे लोक चौकशी ची मागणी करत आहेत त्यांनी आधी सशक्त पुरावे आणावेत आणि खुशाल चौकशी ची मागणी करावी. उगाच तुम्हाला वाटते किंवा तुमच्या युवराजांना वाटते म्हणून उठसुठ प्रत्येक गोष्टीची मोदी जी चौकशी करत बसले तर सरकार कोण चालवणार?? मला देखील वाटते कि तुम्ही दोघे खुनी दरोडेखोर आणि बलात्कारी आणि अतिरेकी आहात. उद्यापासून मी हि धिंडोरा पिटत बसतो आणि तुमच्या अटकेची किंवा चौकशी ची मागणी करतो... चालेल का? BTW युवराज्यांचा विषय निघाला म्हणून आठवले.. नेमका किती कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाला त्याचा आकडा एकदाचा फायनल करा म्हणावं... प्रत्येक सभेत वेगवेगळा आकडा सांगतात. काय ते फायनल करा एकदाचा. #एक मे से दो बच्चा.

In reply to by बाप्पू

अजून एक अंधभक्त, नमोरुग्ण!!! कशाला घाबरता? होऊ दे ना 'दूध का दूध और पानी का पानी' कर नाही त्याला डर कशाला? त्या राहुल गांधींचे काही बोलू नका, सुज्ञ मतदारांची सुद्धा चौकशी व्हावी अशी इच्छा आहे ! बाकी, अतार्किक विचार व तर्कटे, अलविदा!!!

In reply to by व्ही. डी. सी.

तुम्ही मोदीभक्तावर जिभेचा पट्टा चालवताय आणि खान्ग्रेस गुलामाना साथ देताय , त्यामुळे भक्त मंडळी तुम्हाला गुलाम समजत आहेत . ममो सारखे तुम्ही पण रेनकोट घालून आंघोळ करायला शिकले क़ाय ?

In reply to by ट्रम्प

काँग्रेसला, भाजपाला साथ देण्याचा प्रश्नच नाही! गुलाम तर मोदीभक्त आहेत! यांची गुलामीतून सुटका होणे अशक्य कोटीतील गोष्ट होऊन बसली आहे! मोदीभक्त हे गुलाम आहेत हे त्यांना जोपर्यंत माहीत होत नाही तो पर्यंत ते मोदी विराधात बंड करणार नाहीत, हेच खरे! नमो सारखे तुम्ही पण रेनकोट घालून आंघोळ करायला शिकले क़ाय ?

In reply to by व्ही. डी. सी.

च्या मारी.. म्हणजे तुमच्या मताला खोडून काढणारे सर्व अंध भक्त.. आणि तुम्ही काय??? डोळस गुलाम?? मी फक्त एवढेच म्हणालो कि चौकशी करण्याआधी काहीतरी पुरावे द्या ना.. का उठसुठ प्रत्येक गोष्टी वर समिती बसवायची आणि तुम्हाला वाटते म्हणून चौकशी करायची?? पुरावे असतील तर खुशाल करा चौकशी आणि खेचा कोर्टात त्यांना... तोंड दिलेय म्हनुन उठसुठ काहीही बडबड करायाची आणि नंतर शेपट्या आत घालायच्या. BTW डिट्टो असेच करणारा खुजलीवाल तुमच्यासारख्या लोकांना cxxx बनवून दिल्लीचा मुख्यमंत्री झाला. माझ्याकडे शिला दीक्षित, वद्रा यांच्याविरुद्ध सर्व पुरावे आहेत.. इन सबकी जांच होनी चाहिये... असे म्हणणारा हरिश्चन्द्र आज त्याच शीलाच्या भोवती "शीला.... शिला कि.... " गाण्यावर पिंगा घालावा तसे काँग्रेस च्या मागे पुढे फिरत आहे. तुमच्यासारखे मोदी द्वेष करणारे लोक पुरावे मागितले कि व्हाट्सअँप फॉरवर्ड आणि झेरॉक्स च्या दुकानातली रद्दी ची कागदाचे गट्ठे (खुजलीवाल फेम ) दाखवून इंप्रेशन मारतात आणि कोर्टात न जाता इथे तिथे आपल्या नसलेली अक्कल पाजळून मीडिया समोर शायनींग मारतात..

In reply to by बाप्पू

स्वतः ला वकील समजू लागला कि काय? त्या मोदीने वात्रट बकबक बंद करावी आणि जेसीपीला ताबडतोब चौकशीचे आदेश द्यावेत हि सर्वसामान्यांची माफक अपेक्षा पूर्ण करावी, नाहीतर मतदार 'दाल में कुछ काला हैं या पुरी दाल हि काली हैं' या संभ्रमात आहे! चौकशीला सामोरा गेला तरच लोकांचा विश्वास बसेल, अन्यथा काँग्रेस सारखी गत झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवावे! जनतेला मूर्ख समजतो काय? नको तिथे तोंड उघडतो आणि पाहिजे तिथे मूग गिळून बसतो!!!

In reply to by व्ही. डी. सी.

भाजपला सवय आहे हो विरोधात बसन्याची , प्रॉब्लम तुमच्या राफेल गाँधीचा आहे . रिमोट कंट्रोल द्वारे सत्ता चालवायची सवय लागल्या मुळे तुमच्या बावळट चा तीळपापड़ होतोय . आम्ही सारखे ' तुमचे नेते रागा उर्फ राफेल ' असाच उल्लेख करणार , कारण तुम्ही सुद्धा खान्ग्रेसी गुलामा सारखे डोळ्या वर झापड़ लावून खान्ग्रेस नेत्यांची ची निष्क्रियते वर डोळेझाक करत आहात .

In reply to by ट्रम्प

काँगेसचे तुणतुणे माझ्यासमोर वाजवून काय उपयोग होणार आहे काय? एखाद्या काँगेस च्या माणसाला विचारून असल्या प्रश्नांची उत्तरे मिळावा!!!

In reply to by व्ही. डी. सी.

भाजप समर्थकानां मतिमंद , मनोरुग्न का म्हणताय ? तुम्हाला दोन्ही बाजूने समजून घ्यायची सवय आहे का ? = ) = )

In reply to by ट्रम्प

काँगेस आणि भाजप या दोन्ही पक्षांची विचारसरणी अमान्य आहे! जो पक्ष सत्तेत आहे त्या पक्षावर आणि त्यांचे समर्थन करणाऱ्या लोकांवर टीका हि होणारच, हे ओघानेच आले! घोषणापत्रात (संकल्प पत्र) दिलेली आश्वासने पाळली नाहीत, कामे न करताच कामे केल्याचे निरर्थक दावे केल्यावर, विकास कामांचे, जीडीपी चे खोटे आकडे फुगवून सांगितल्यावर, नेत्यांनी विकृत वक्तव्ये करून समाजात द्वेष भावना निर्माण केल्यावर, 'महागाई कमी कर असे सांगून सत्तेत आलेले महागाईवर नियंत्रण आणण्याचे सोडून अधिकच महागाई करण्यास कारणीभूत ठरल्यावर, 'माझा तो बाबू आणि दुसर्याचे ते कार्टे' असे नेते व कार्यकर्ते वागू लागल्यावर, नुसती 'मन कि बात' करून इतरांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्यावर मतदारांचा संताप का अनावर होणार नाही?

In reply to by व्ही. डी. सी.

काँगेसचे तुणतुणे माझ्यासमोर वाजवून काय उपयोग होणार आहे काय? एखाद्या काँगेस च्या माणसाला विचारून असल्या प्रश्नांची उत्तरे मिळावा!!! मग काय फक्त भाजपाचे तुणतुणे तुमच्या समोर वाजवावे का ? नाही म्हणजे, तुम्ही भाजपाच्या तुणतुण्याला, तुम्हाला अधिकार असल्या प्रमाणे उत्तरे देत होतात ? का अंगावर ओढुन घ्यायची सवय आहे ?

In reply to by डँबिस००७

कोणाचेही तुणतुणे ऐकण्याची अजिबात इच्छा नाही. सत्ताधारी पक्षाला मतदारांचे प्रश्न ऐकावेच लागणार! टीका का होते आहे, याचाही विचार करावा लागणार. नुसते 'जुमले बाजी' करून प्रश्न सुटत नसतात. सत्तेचा माज हा सत्ताधाऱयांना सर्वात जास्त घातक ठरतो, खोटे बोलून दिवस ढकलण्याची वृत्ती सुद्धा घातक ठरू शकते, हा आजपर्यंतचा इतिहास आहे!

In reply to by व्ही. डी. सी.

अहो ऐसा त्रागा करून क़ाय मिळणार? उलट रक्तदाब वाढवून घ्याल आपला! अजुन तुम्हाला भाजपा 2019 मधे सत्तेवर येणार आहे ते बघायचे आहे

In reply to by भंकस बाबा

दुसऱ्याच्या रक्तदाबाची चिंता नको, स्वतः चा ठीक आहे कि नाही हे जरूर तपासून घ्यावा. दिवास्वप्ने पाहायला कोणाचीही हरकत असण्याचे कारण नाही. लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत बिनधास्त भ्रमात रहा, तुमची अवस्था वाजपेयींच्या 'इंडिया शायनिंग' सारखी झाल्यास स्वतः लाच शिव्या देऊ नका म्हणजे कमविले!!!

In reply to by व्ही. डी. सी.

च्यायला !! पहिल्यांदाच मोगा च्या गरळ ओकण्याच्या एकाधिकारशाही ला तितक्याच ताकदीचे आव्हान मिळत आहे. या व्ही. डी. सी. मुळे साक्षात मोगाखान फिका वाटायला लागलाय. मिपा ची प्रगती होत आहे . . . . . . . . . . . . . . .. . . .. . . . . . . किमान गरळ ओकण्या बद्दल तरी. संपादक, शशक सारखी "गरळ ओकण्या" साठी वेगळा विभाग तयार करावा.

श्री श्री श्री व्ही सी डी आणी श्री श्री श्री ब्लॅककॅट हे मे २०१९ नंतरही ईथेच असतील हीच एक भाबडी आशा आहे.

In reply to by इरसाल

श्री श्री श्री ब्लॅककॅट ह्यांची मी गॅरेंटी घेतो, गेले अनेकानेक जन्म त्यांनी काँग्रेसच्या घरी पाणी भरण्यात वाया घालवले. २०१४ च्या वेळी काँग्रेसचा जो सुपडा साफ झाला तो महा आघातही ह्यांनी स्वतःच्या अनेक "जान / जीवांची" ची कुर्बानी देऊन पचवला !! आता श्री श्री श्री ब्लॅककॅट यांना पप्पु मध्ये एक नविन आशा पालवली आहे की येत्या २५ - ३० वर्षांत पप्पु व त्यांचे देश द्रोही नेते मंडळी पाकिस्तान , चीन सारख्या दुश्मन देशांच्या सहाय्याने भ्रष्ट काँग्रेस पक्षाला परत सत्येत आणेल आणी मग सगळीकडे भ्रष्टाचार माजुन आलबेल होईल.

Till 2044 , BJP will rule for next 50 Years. They deserve it !!

In reply to by डँबिस००७

दिवास्वप्ने पहा !!! कोण अडवतोय ? ३०४४ लिहा! हा.. हा.. हा..

ममता बॅनर्जीच्या तृणमुल काँग्रेस सरकारचे स्टींग ऑपरेशन व बाकिचे कागदपत्र शोधुन आता बातम्यात दाखवत आहेत. सिबीआय वर आ रोप लावणार्या ममता बॅनर्जीचे नक्की बारा वाजणार आहे ! ममता बॅनर्जीच्या तृणमुल काँग्रेस सरकारचे व पोलिस अधिकार्यांचे डायरेक्ट संबंध ह्या चीटफंड घोटाळ्यात सिद्ध करणारे कागदोपत्री पुरावे सिबीआय व ईतर सरकारी चौकशी एजंसीच्या हाती लागले आहेत.

देशाचे दामाद श्री रॉबर्ट वाड्राजीचे भारतातले पराक्रम कमी की काय म्हणुन आता लंडनच्या पॉश एरीयात ९-१० फ्लॅट असल्याच समोर आलेल आहे. त्या बद्दलच्या बातम्या काही मोजक्या टिव्ही वाहीन्या काल परवा दाखवत होत्या. काल भाजपाच्या प्रेस कॉन्फेरेंस मध्ये अजुन खुलासा आलेला आहे. सर्व बाजुंनी गांधी परीवारावर शिकंजा आवळला जात आहे. ह्या सर्व गोंधळात श्रीमती प्रियांका गांधी वाड्रा यांनी हे सर्व आरोप फेटाळुन लावत त्या रॉबर्ट वाड्राजीच्या मागे खंबीर पणे उभ्या आहेत अस वृत्त वाहीन्याना सांगीतल आहे. पाकिस्तानात बेनाझीर भुत्तो नावाच्या पाकिस्तानच्या पंत प्रधान होऊन गेल्या ! त्यांचे पती १०% फेम असिफ अलि झरदारी यांची ह्या निमित्त्याने आठवण झाली !!

काही मोजक्या लोकांनी आपल्या घरच्या, ऑफीसच्या व समाजाच्या (कौंटुंबिक) कलहाचा राग येथील गरीब मिपाकरांवर काढु नये. (आठवा मुन्नाभाई आणी त्यातला नवाजुद्दीन आणी सुनील दत्तचा रेस्टे. सीन.) काही नवीन मेंढरांच्या मेंबरांच्या जिभेवर तर अक्षरशः रणचंडिका धारदार शब्दशस्रास्रांच मॉल उघडुन बसलीय....... घाबल्लो ना मी !!!!!!!!

In reply to by इरसाल

हा घरचा, ऑफिसचा किंवा समाजाच्या (कौंटुंबिक) कलहाचा राग नाही, हा राग आहे भ्रष्ट सत्ताधार्यावरचा, लोकशाहीला काळिमा फासणाऱ्या, संविधानाला, संविधानिक संस्थाना मोडीत काढायला निघालेल्या भाजप नेत्यांवरचा, सत्तेच्या माजाने निर्ढावलेल्या भाजप पक्षावरचा, मोदी म्हणेल तेच खरे अशी भावना झालेल्या 'मेंढरांच्या' वरचा, मोदीने *ला गुळ आहे असे सांगितल्यावर तो गुळच आहे असे मागचा पुढचा विचार न करता छातीठोकपणे सांगणाऱ्या मंद भक्तांविरोधाचा, असा राग असू नये का?

In reply to by व्ही. डी. सी.

तुम्ही स्वतःचा पक्ष काढा कि. सर्वसामान्य जनता म्हणवणारे येतील कि तुमच्या मागे. आणा निवडून चाळीस पन्नास खासदार मग विचारा जाब सत्ताधार्यांना हा का ना का उगाच इथे मिपावर त्रागा करून काय फायदा वाळूत मुतलं ना फेस ना पाणी

In reply to by सुबोध खरे

स्वतः चा पक्ष काढणे, हे यावरचे उत्तर नाही! निर्ढावलेल्या सत्ताधाऱयांना ताळ्यावर आणण्याचे काम हे मतदारच करीत असतात! मतदार सुजाण असतो, कधी कोणाला सत्तेवर बसवायचे आणि कधी कोणाचा सत्तेचा आलेला माज उतरवायचा, हे त्यांना चांगले ठाऊक असते! जनतेला काही कालावधीपुरते मूर्ख बनविता येते, कायमस्वरूपी नव्हे!!!