संघः कलियुगातील एक चमत्कार
लेखनप्रकार
संघ आणि त्याचे टिकाकार
साधारणपणे ज्या काळामधे हिंदू संघटित नव्हता विस्कळीत होता आणि तसे असणे हेच त्याच्या दुरवस्थेचे कारण आहे असे लक्षात आल्याने हिंदू समाजातला हा दोष दूर करण्यासाठी संघ संस्थापकांनी संघाची स्थापना केली. सुरुवातीच्या काळात जनतेने लगेच प्रतिसाद दिला नाही तरी हळू हळू हा विचार रुजत गेला. आज नव्वद वर्षानंतर असे लक्षात येते की हा वटवृक्ष वाढत आहे. दिवसेंदिवस संघाची वाढच होते आहे. जनमानसामधे संघाने आणि स्वयंसेवकांनी स्थान मिळवले आहे. याला महत्त्वाचे कारण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचे चारीत्र्य. एक पैच्यासुद्धा गैरव्यवहारामधे स्वयंसेवक सापडणार नाही हा लोकांच्या मनात विश्वास आहे.
आज अनेक सेवाकार्ये चालतात. नागालँड, मेघालय अशा नॉर्थ ईस्टच्या राज्यामधे सेवाकार्ये चालतात. आदिवासी भागामधेही त्या लोकांचे दु:ख दैन्य दारिद्र्य दूर करण्यासाठी हे लोक झटत आहेत. त्यांच्यावर विश्वास असल्यानेच समाज या कार्यकर्त्यांना पाठबळ देतो. आर्थिक पाठबळही देतो आहे.
समाजासाठी देशासाठी एवढ्या समर्पण भावनेने स्वतःला विसरून काम करत असतानाही विरोधकांना हे पाहवत नाही आणि कुणाच्या हत्येचे पातक संघविचारांच्या माथी मारले जाते. हा विरोधकांचा संधीसाधूपणाच म्हटला पाहीजे.
इतरही अनेक क्षेत्रामधे संघ पोचला आहे. बँकींगमधे तो आहे, शिक्षणामधे आहे. उद्योजकतेमधे आहे. अगदी शेतीमधेही तो आहे आणि ग्राहक क्षेत्रामधेही आहे.
खूपदा स्वातंत्र्य आंदोलनाच्यावेळी संघ कुठे होता असे विचारले जाते. पण गोवा जेव्हा पोर्तुगीजांच्या ताब्यात होता त्यावेळी तेव्हाच्या केंद्र सरकारची गोवामुक्तीसाठी कोणतीच हालचाल दिसेना अशा वेळी संघ स्वयंसेवकांनीच लढा उभारून गोवा मुक्त केला. त्यासाठी लाठ्या काठ्या खाल्या. जेलमधेही गेले. पण याचे कोणीच कौतुक करत नाही. तिथली जनता मात्र हे जाणून आहे. गोव्यातल्या जनतेने संघ कार्यकर्त्यांना मंत्री, मुख्यमंत्रीपदावरही बसवलेले आहे.
आज संघ विचारांचे कार्यकर्ते राजकीय क्षेत्रात आहेत. त्यांच्या हातात सत्ता आहे. पण त्या राजकीय कार्यकर्त्यांनी संघविचार बाजूला ठेवलेला नाही. इतकेच काय तर जनमानसावर इतका प्रभाव असूनही संघाने स्वतःला नेहमीच अराजकीय ठेवलेले आहे. कधी कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला स्वतःला बाधून घेतलेले नाही. माळीणची भूस्खलनाची दुर्घटना असो कलकत्त्याचा पूल कोसळणे असो किंवा केदारनाथची दुर्घटना असो. संघ कार्यकर्ते तिथे मदतीला उभे राहतातच. असा समाजाचा अनुभव आहे. प्रत्येक अडचणीच्या प्रसंगी समाजाला संघाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही.
कोणतेच क्षेत्र स्वयंसेवकांना वर्ज्य नाही. ज्यावेळी काही राजकीय नेत्यांच्या बँका ग्राहकांचा विश्वासघात करण्यात मग्न आहेत अशा वेळी स्वयंसेवकांनी मात्र अनेक पतसंस्था बँका उभारून बँकींग क्षेत्रात जनतेचा विश्वास कमावलेला आहे आणि जनतेची त्या माध्यमातून सेवा चालवली आहे.
शिक्षण क्षेत्रही स्वयंसेवकांनी काबीज केलेले आहे. इतर राजकीय नेते ज्यावेळी या क्षेत्रात येऊन शिक्षण सम्राट बनले आहेत अशा वेळी संघ स्वयंसेवक मात्र एक व्रत म्हणून शिक्षण संस्था चालवत आहेत. मोठ मोठ्या बॅका, शिक्षण क्षेत्रे ताब्यात असताना एक पैच्याही गैरव्यवहाराचा कलंक या संस्थांना लागलेला नाही. हा कलियुगातला एक चमत्कारच मानला पाहीजे. हा चमत्कार आणि स्वयंसेवकांचे विशुद्ध चारीत्र्य हीच त्यांची शक्ती आहे. विरोधकांना हेच सलते आहे. त्यातूनच संघ वारंवार टिकेचा धनी होताना दिसतो.
तरीही सर्व आरोपांना तोंड देत संघाचे सर्व उपक्रम वाढतच आहेत आणि शाखाही दिवसेंदिवस जोमाने वाढत आहेत. जनतेचा प्रचंड प्रतिसाद संघाला मिळतो आहे.
म्हणून काम करणार्याने निस्वार्थपणे काम करीत रहावे. टिकाकार टिका करत राहतीलच. त्यांची पर्वा कशाला
वाचने
84267
वाचनखूण
प्रतिक्रिया
480
In reply to लोकसभेत पूर्ण बहुमतातील भाजप by पगला गजोधर
लोकसभेत पूर्ण बहुमतातील भाजप
In reply to लोकसभेत पूर्ण बहुमतातील भाजप by श्रीगुरुजी
याबद्दल माहिती नाही. परंतु डॉ
In reply to लोकसभेत पूर्ण बहुमतातील भाजप by श्रीगुरुजी
अभ्यास वाढवा गुरुजी
In reply to अभ्यास वाढवा गुरुजी by चंपाबाई
प्रभू रामचंद्रांना पुरस्कार
हा ४०० वा
400+ प्रतिसादांबद्दल
लोकं किती फ्रॅक्चर्ड
In reply to लोकं किती फ्रॅक्चर्ड by कैलासवासी सोन्याबापु
अशा धाग्यांचे मनोरंजन मूल्य
In reply to अशा धाग्यांचे मनोरंजन मूल्य by संदीप डांगे
संदीपजी अगदीच वाया जात नाही
In reply to संदीपजी अगदीच वाया जात नाही by मारवा
नक्कीच! तुमच्या मताला सहर्ष
संघ ह्या विषयावरील आमची
In reply to संघ ह्या विषयावरील आमची by साहना
उजव्या बाजूला संघापेक्षा
In reply to उजव्या बाजूला संघापेक्षा by अनुप ढेरे
सनातनचा विषय न काढलेलाच बरा.
या धाग्यावर संघावर केले
In reply to या धाग्यावर संघावर केले by श्रीगुरुजी
अग्गोबै !
In reply to या धाग्यावर संघावर केले by श्रीगुरुजी
ह्यातील बहुतेक विधाने माझी
मजेदार धागा व चर्चा.
संघ एक चिमित्कार....
हिन्दूत्व म्हणजे काय
साहना,
सनातनवर राग का?
In reply to सनातनवर राग का? by गामा पैलवान
वेगळा विषय आहे ! पपू आठवले
साहित्य गरीब लोकां पर्यंत
In reply to साहित्य गरीब लोकां पर्यंत by सचु कुळकर्णी
का ?
You said साहित्य गरीब लोकां
In reply to You said साहित्य गरीब लोकां by सचु कुळकर्णी
म्हणजे गरीब लोकांना पुस्तके
In reply to म्हणजे गरीब लोकांना पुस्तके by साहना
Tumhala nahi kalaycha. Tari
लहानपणापासून कधीही दलित किंवा
In reply to लहानपणापासून कधीही दलित किंवा by सचु कुळकर्णी
ओके
युगायुगातील चमत्कार