लेखकसत्यजित...यांनी शुक्रवार, 06/04/2018 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
कधी हसणे,कधी रुसणे..हजारो बाज गझलेचे...
तुला सांगू किती नखरे? किती अंदाज गझलेचे!
तिने नजरेत बाणांचा निशाणा बांधला आहे
कशी टाळू नजर! डोळे..निशाणेबाज गझलेचे!
लेखकJayant Naikयांनी शुक्रवार, 06/04/2018 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
फेब्रुवारी १९९८ मधील काळवीट मारल्याची घटना . ५ एप्रिल २०१८ मध्ये जोधपुर कोर्टाचा निकाल. सलमान एका खटल्यामध्ये दोषी ठरला. आता परत अपील .. हायकोर्ट आणि नंतर सुप्रीम कोर्ट.अजून २० वर्षे सहज जाणार. २० वर्षे गेलेलीच आहेत !
असे हे सलमानखान या न्याय व्यवस्थेवर काय चेटूक करतो आहे कुणास ठाऊक ? एखाद्या सामान्य माणसा विरुद्ध असा खटला इतकी वर्षे चालला असता का?
“Justice delayed is justice denied” वगैरे फक्त पुस्तकात छापायला राखीव ठेवलेली वाक्ये आहेत का ?
या खटल्याशी संबंधित लोकांना या सलमान मुळे मिळणारी प्रसिद्धी हवी हवीशी वाटते म्हणून इतकी वर्षे हा खटला चालू आहे का ?
नक्की कसले चेटूक आहे हे ?
लेखकदुर्गविहारीयांनी शुक्रवार, 06/04/2018 11:28 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिक जिल्ह्याच्या उत्तरेला साल्हेरजवळच्या सेलबारी-डोलबारीच्या उत्तुंग रांगा पुर्वेकडे पसरत जातात अन् मालेगावच्या उत्तरेला तुरळक पसरलेल्या गाळणा टेकड्यांच्या रुपाने भेटतात. अशाच एका विखुरलेल्या टेकडीवर कंक्राळे किल्ला उभा आहे. गाळणा गडाचा सोबती म्हणून ओळखला जाणारा कंक्राळा किल्ला नाशिक जिल्ह्यात मालेगाव तालुक्यात आहे. मालेगावहुन २० कि.मी. अंतरावर कंक्राळा गाव आहे. अवशेष संपन्न गाळणा ईतिहास राखून आहे, मात्र काहीसा दुर्लक्षित कंक्राळ्याला फारसे दुर्गप्रेमी भेट देत नाहीत.
लेखकयुयुत्सुयांनी शुक्रवार, 06/04/2018 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
मी आत्तापर्यंत जे काही किडुकमिडुक शिक्षण घेतले त्यात "असंबद्ध विचारांचा प्रतिवाद" या विषयाचा समावेश नव्हता त्यामुळे माझ्यामध्ये एक फार मोठे न्यून राहीले आहे याची मला जाणीव आहे.
माझे अनेक हितचिंतक व नातेवाईक व्यवसायाने डॉक्टर आहेत. त्यांनी कधीच मला माझ्या "delusions of grandeur " विषयी सांगितले नाही याचे मला आश्चर्य वाटते आणि आता तर राग आला आहे. त्यांच्यावर कोणत्या कायद्या अंतर्गत दावा दाखल करता येईल का, याचा शोध घेत आहे.
नुकतेच बहुधा विकीपिडीयावर भारत हे सर्वात कमी आय० क्यु० असेलेल्या राष्ट्रांपैकी एक आहे असे वाचले.
लेखकमूखदूर्बळयांनी शुक्रवार, 06/04/2018 06:44 या दिवशी प्रकाशित केले.
(सलमान भाई चे तुरुंगातील आज रात्रीचे गाणे)
केव्हा तरी पहाटे निसटून निज गेली
सुजले रडून डोळे रडवून रात गेली
कळले मला न केव्हा सुटली गोळी जराशी
कळले मला न तेंव्हा सोडोनी 'साथ' गेली
सांगू तरी कसे मी वय माझें झाले लग्नाचे
उसवून शर्ट माझा फसवून कैफ गेली
उरलें कर्णात काही ते नाद का ळविटाचे
आवाज काजव्याचे, डसून डांस गेली
दिसल्या मला न तेंव्हा माझ्याच दंत पंक्ति
मग आस जामीनाची सूचवून रात गेली
लेखकस्पार्टाकसयांनी गुरुवार, 05/04/2018 23:29 या दिवशी प्रकाशित केले.
रात्रीचे आठ वाजून गेले होते. सांताक्रूजच्या त्या पबमध्ये बर्यापैकी गर्दी होती. अर्थात त्यात तरुणाईचा जास्तं भरणा होता. जवळपास प्रत्येकजण आपल्या पार्टनर बरोबर किंवा मित्रं-मैत्रिणींच्या ग्रूपबरोबर तिथे आलेला होता. पबच्या एका बाजूला असलेल्या डान्सफ्लोअरवर अनेकजण बेधुंदपणे नाचत होते. पबचा डीजेही तरुणाईची नस बरोबर ओळखून एकापाठोपाठ एक गाणी वाजवत होता आणि त्याला दाद देत प्रत्येकजण मनसोक्तं थिरकत होता. काहीजण आरामात ड्रिंक्स आणि खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत होते आणि मधूनच उठून डान्सफ्लोअरवर एखादी चक्कर टाकत होते. वातावरणात वेगळाच उत्साह आणि सळसळता जोश भरुन राहीला होता.
लेखकपरशुराम सोंडगेयांनी गुरुवार, 05/04/2018 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ सकाळचं उन्हं चटकतं होतं. रायबानं दोन तीन पोती कांदयाची आणली होती. रातचं त्यानं कोठयावर आणून ठेवली होती.आज आठडयाचा बाजार.आठ दिवसा पासून त्यानं कांद काढून ठेवलं होतं. तसचं चांगलं चांगलं निवडून ठेवलं होतं. लालजरीत कांदं.. चमकत होतं. लयचं प्यूअर कांदा आला होता. बरं ते पोसला भी चांगला होता.खाताडाचा जोर होता. आंवदा त्यानं कारखान्याची गाडी बंद केली.. शेतातच डोकं लावलं होतं.दोघ नवरा बायको आणि एकुतली एक पोरगी. सारचं शेतात राबत होतं. उषीची शाळा म्हणजे नावला साळा. परीक्षा बीरीक्षा असली की त्यावढया पुरतं साळात जायचं. नाहीतर सारख रानातच खपायचं. मास्तरं भी चांगलेत.
लेखकपरशुराम सोंडगेयांनी गुरुवार, 05/04/2018 23:18 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ सकाळचं उन्हं चटकतं होतं. रायबानं दोन तीन पोती कांदयाची आणली होती. रातचं त्यानं कोठयावर आणून ठेवली होती.आज आठडयाचा बाजार.आठ दिवसा पासून त्यानं कांद काढून ठेवलं होतं. तसचं चांगलं चांगलं निवडून ठेवलं होतं. लालजरीत कांदं.. चमकत होतं. लयचं प्यूअर कांदा आला होता. बरं ते पोसला भी चांगला होता.खाताडाचा जोर होता. आंवदा त्यानं कारखान्याची गाडी बंद केली.. शेतातच डोकं लावलं होतं.दोघ नवरा बायको आणि एकुतली एक पोरगी. सारचं शेतात राबत होतं. उषीची शाळा म्हणजे नावला साळा. परीक्षा बीरीक्षा असली की त्यावढया पुरतं साळात जायचं. नाहीतर सारख रानातच खपायचं. मास्तरं भी चांगलेत.
लेखकमाहितगारयांनी गुरुवार, 05/04/2018 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
* लेखात मांडलेले काही विचार तर्कसुसंगत असले, आणि लेखनाचा उद्धेश चांगला असला तरीही गैरसमज करून घेण्यास वेळा लागत नाही, त्यामुळे दोन्ही टोकांच्या व्यक्तींना काही मांडणी अवघड जाऊ शकतात. ज्यांच्या भावना वगैरे दुखावणारा नाहीत, आणि विचाराला विचाराने प्रतिवादावर विश्वास असेल अशांनीच पुढे वाचण्याचा विचार करावा इतरांनी टाळावे हि नम्र विनंती .