Skip to main content

अंबा आणि एकविरा देवी मंदिर- अमरावती

लेखक चिनार यांनी सोमवार, 27/08/2018 10:52 या दिवशी प्रकाशित केले.
काल अमरावतीच्या अंबा आणि एकविरा मातेच्या मंदिरात जाण्याचा योग्य आला. एकविरा मंदिरात काही खास गोष्टी आहेत. १. श्रीकृष्णाची पत्नी रुख्मिणी हिचे जन्मस्थान कौडण्यपूर हे अमरावतीपासून पन्नास किमी अंतरावर आहे. पुराणकथेप्रमाणे श्रीकृष्णाने रुख्मिणीला कौडण्यपूर येथून पळवून नेले. त्यासाठी रुख्मिणीच्या घरापासून अमरावती पर्यंत भुयार तयार केले गेले. ह्या भुयाराचे एक द्वार एकविरा मंदिराच्या जमिनीत आहे असे आम्ही लहानपणापासून ऐकत होतो. काही वर्षांपूर्वी एकविरा मंदिराचे नूतनीकरण करताना हे भुयार सापडले आहे. सध्या ते भुयार एकविरा मंदिरात बघता येते.

कॅल्शियम व फॉस्फरस : हाडांचे जिवलग साथी

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 27/08/2018 09:13 या दिवशी प्रकाशित केले.
( खनिजांचा खजिना : लेखांक ४ ) आपल्या हाडांचा गाभा हा प्रथिनरुपी असतो. त्यावर जेव्हा कॅल्शियम व फॉस्फरस या खनिजांचे थर चढवले जातात तेव्हाच हाडे खऱ्या अर्थाने बळकट होतात. या दोन्ही खनिजांचा परिचय या लेखात करून देतो. कॅल्शियम हे एक धातुरुपी खनिज आहे. आपल्या शरीरातील सर्वाधिक प्रमाणात असणारा हा धातू होय. निसर्गात तो मुख्यतः CaCO३ या रुपात चुनखडीमध्ये आढळतो. शरीरातील ९९% कॅल्शियम हाडांत साठवलेला असतो. उरलेला १ टक्का हा रक्त आणि इतर पेशीबाह्य द्रवांत असतो. तिथे तो अनेक महत्वाची कामे करतो.

वालाची उसळ

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी सोमवार, 27/08/2018 05:56 या दिवशी प्रकाशित केले.
.. डाळिंबी वा वालाची उसळ हा मराठी घराघरात होणारा पदार्थ आहे उसळ खूप चवदार बनते व ती अनेक प्रकाराने बनवली जाते पण ते वाल भिजत घालणे मोड आणणे सोलाणे ह्या प्रक्रिया खूप उटा रेट्याचा असतात परवा मंडईत गेलो असताना " वालाची डाळ " हा प्रकार समजला विकत घेतली व घरी आलो डाळ भिजत घातली ३- ४ तास भिजल्यावर ती फुगून मोठी झालेली दिसली साधारण वालाच्या आकाराची मग कांदा टोम्याटो मसाले वापरून त्याची उसळ / आमटी बनवली खूप रुचकर लागते जरूर ट्राय मारा

तांब्याश्री

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 26/08/2018 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
तांब्याश्री ऋणनिर्देश : मिपावरील सूप्रसिद्ध ( कि शीप्रसिद्ध म्हणावे ब्रे) तांब्याश्रीं पासून प्रेर्र्रना घेऊन खटपट करून जमवलेले मोकल शौचाव्य. थीमनिर्देश : अशा प्रकारच्या विषयासाठी मूळ कवीचा नामोल्लेख टाळला आहे.

अपूर्ण आयुष्याची कविता

लेखक Prakashputra यांनी शनिवार, 25/08/2018 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
दोन पेग झाल्यानंतर, जेव्हा दोन पेगचे लिमिट म्हणून तिसरा प्यायचा नव्हता, पण ग्लासात काहीतरी पाहिजे होते, म्हणून मी नुसताच सोडा ओतला तेव्हा सुचलेली कविता मी स्वतःला फसवायला खूप प्रयत्न करतो ! आणि दरवेळेला स्वतःच फसतो !! दरवेळी जिंकायचा प्रयत्न करतो, ! मग मीच जिंकतो आणि मीच हरतो !! स्पर्धा कुणाशी आहे तेच कळत नाही ! तरी उगाचच लढत बसतो !! मी शहाणा म्हणून मलाच समजावत बसतो ! मी वेडा म्हणून माझ्याशीच भांडत बसतो !! क्षुद्र आयुष्याला अर्थ द्यायचा म्हणून ! भव्य तत्वज्ञान मांडत बसतो !! शिस्तीच्या नावाखाली तिसऱ्या पेगला ! नुसता सोडा म्हणत बसतो......

तुम्हाला असं कधी होते का ? भाग - १ .......

लेखक Prakashputra यांनी शनिवार, 25/08/2018 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकदा घराबाहेर पोर्चमध्ये उभा होतो. वरती एक कोळ्याचे जाळे होते. अचानक मानेवरती एक कोळी पडला. त्याला झटकून काढायला गेलो तर तो खूप जोरात चावला. विषाची काही reaction होईल का या आधी 'आपण स्पायडर - मॅन होऊ का ? हा सुखद विचार पहिल्यांदा मनात आला' ----- तुम्हाला असं कधी होते का ? खूप उत्तेजित होऊन हि आनंदाची बातमी मी बायकोला सांगायला गेलो. आपण सुपरहीरोची बायको होणार याचा आनंद व्यक्त करण्याऐवजी तिने मला हे विचारलं कि , "ती कोळ्याची जाळी मी होऊनच कशी दिली ? " आणि "आता तरी मी जाळी साफ केलीय का ?".

अनवट किल्ले ३८ : वेताळवाडी गड (Vetalwadi gad)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 24/08/2018 12:29 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तविक गड-किल्ले म्हणजे संरक्षणासाठी उभारलेली लष्करी ठाणी. सहाजिकच सैन्याला उपयोगी पडेल आणि संरक्षणाचे काम चोख होईल हि काळजी घेणे याची प्रार्थमिकता असते. भक्कम तटबंदी, त्यातून पुढे आलेले बुरुज, चर्या, फांजी, खणखणीत महाद्वार, शेवटचा पर्याय म्हणून असलेला चोरदरवाजा. मात्र काही गडांच्या भाळी यापेक्षा जास्त भाग्य येते. त्यांचा निर्माता फक्त कोरड्या सैनिकी दृष्टीकोनाचा नसतो, तर हळव्या मनाचा कलांवंत असतो. तो गडाची रचना करताना एखादी बारादरी उभारतो, तटबंदीलाही कलात्मक रुप देतो, तटबंदीतील सज्जालाही एखादी महिरप ठेवतो.

संडास.

लेखक खटपट्या यांनी गुरुवार, 23/08/2018 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
संडास नमस्कार मंडळी, बऱ्याच दिवसांनी मिपावर लेखन करतोय. आणि पुनरागमनासाठी विषय आहे संडास. काहीलोक लेखाचं नाव वाचूनच नाकं मुरडतील. मला एक कळत नाही संडास सारख्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलायला लोक लाजतात किंवा घाबरतात का? तसं पाहायला गेल्यास संडास ही आपल्या रोजच्या जीवनातील अतिशय महत्वाची क्रिया पण त्यावर किंवा संडासच्या समस्यांवर बोलायला लोक तयार नसतात. शी!!! संडास वर मेलं काय बोलायचं!!! एकवेळ माणूस दोन दिवस उपाशी राहील पण संडासला गेल्याशिवाय राहणार आहे का? अर्धा जीव होईल त्याचा. शौचाचा त्रास असणारे कितीतरी लोक मी चिडचिड करताना पहिले आहेत.

ईजिप्त सोलोट्रीप: एक अविस्मरणीय अनुभव. भाग – १२

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 23/08/2018 18:22 या दिवशी प्रकाशित केले.
/* W3.CSS 4.13 June 2019 by Jan Egil and Borge Refsnes */ html{box-sizing:border-box}*,*:before,*:after{box-sizing:inherit} /* Extract from normalize.css by Nicolas Gallagher and Jonathan Neal git.io/normalize */ html{-ms-text-size-adjust:100%;-webkit-text-size-adjust:100%}body{margin:0} article,aside,details,figcaption,figure,footer,header,main,menu,nav,section{display:block}summary{display: