मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अपूर्ण आयुष्याची कविता

Prakashputra · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
दोन पेग झाल्यानंतर, जेव्हा दोन पेगचे लिमिट म्हणून तिसरा प्यायचा नव्हता, पण ग्लासात काहीतरी पाहिजे होते, म्हणून मी नुसताच सोडा ओतला तेव्हा सुचलेली कविता मी स्वतःला फसवायला खूप प्रयत्न करतो ! आणि दरवेळेला स्वतःच फसतो !! दरवेळी जिंकायचा प्रयत्न करतो, ! मग मीच जिंकतो आणि मीच हरतो !! स्पर्धा कुणाशी आहे तेच कळत नाही ! तरी उगाचच लढत बसतो !! मी शहाणा म्हणून मलाच समजावत बसतो ! मी वेडा म्हणून माझ्याशीच भांडत बसतो !! क्षुद्र आयुष्याला अर्थ द्यायचा म्हणून ! भव्य तत्वज्ञान मांडत बसतो !! शिस्तीच्या नावाखाली तिसऱ्या पेगला ! नुसता सोडा म्हणत बसतो...... !! सगळ्याचाच उबग येऊन चौथा पेग ओततो ! मग एक कविता राहते अपूर्ण अपूर्ण आयुष्याची कथा सांगत…….

वाचने 825 वाचनखूण प्रतिक्रिया 0