हल्ली एक गयाना देशातले भजन ऐकायला मिळाले.
जगन्नाथपुरी में ठाकुर भले बिराजे ।।
काहे छोडी मथुरा नगरी, काहे छोडी कांसी
झारखंड में जाय बसे है बिंद्राबन की बांसी ।।
सतयुग छोडी मथुरा नगरी, द्वापर छोडी कांसी
झारखंड में जाय बिराजे बिंद्राबन की बांसी ।।
सगळेच नीट आठवले नसेल. गाणारा फारच सुंदर गात होता. उच्चार आणि सूर ऐकून "विंडीज" मधला असेल असे वाटतंच नव्हते.
हे ऐकताना आधी साधेसुधे वाटले. नंतर रूपक लक्षात आल्यावर अंगावर काटा आला. जुन्या काळी पोटापाण्यासाठी उत्तर भारतातून थेट कॅरिबियन प्रदेशात गेलेली ही माणसे. घरी परतणे तर खूपदा अशक्यच झाले असणार. त्यांची मनस्थिती काय असेल?