Skip to main content

लॅपटॉप विषयी सल्ला हवा आहे.

लेखक नीलकांत यांनी मंगळवार, 02/12/2008 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
मला डेलच्या व्होस्ष्ट्रो (Dell Vostro) लॅपटॉप बद्दल माहिती हवी आहे. कुणी वापरला आहे का? अनुभव काय आहे? सध्या एक छान लॅपटॉप माझ्या आवाक्यात दिसतो आहे. घ्यावा का? दिसायला सुंदर आहे. माझ्या वापरासाठी मजबुत सुध्दा दिसतो. इतर कुणापेक्षा मला तो आवडला आहे. मात्र तरी सुध्दा आधी कुणी वापरला आहे का याची चौकशी करावी या हेतूने येथे धागा उघडतो आहे. कृपया आपले मत द्या. नीलकांत

यावरही 'राज'कारण सुरू

लेखक भोचक यांनी मंगळवार, 02/12/2008 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
झालं आता यावरही 'राज'कारण सुरू. मुंबईवरील ह्ल्यानंतर म्हणे शर्मिला ठाकरे यांनी एसएमएस पाठवला की यात मराठी लोकांनीच आपले प्राण दिले आणि मनसेचे कार्यकर्ते लोकांना हरप्रकारे मदत करत आहेत. बातमीत असंही म्हटलंय, हल्ल्यावेळी राज ठाकरे कुठे होते? कुठल्याही हॉस्पिटलमध्ये वा मदतकार्यात त्यांना पाहिले नाही. याच पोलिस व सैनिकांच्या जीवावर राज ठाकरे निवांत झोपतात. तुम्हाला याविषयी काय वाटतंय? http://www.latestnewsonline.net/world/amitabh-angry-over-thackeray%E2%8…

मुख्यमंत्र्यांचे संतापजनक वक्तव्य.

लेखक सुनील मोहन यांनी मंगळवार, 02/12/2008 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
शहीद मेजर संदीप उन्नीकॄष्णन यांचे घर नसते तर तिथे कुत्रेही फिरकले नसते. असे निर्बुद्ध आणि चीड आणणारे वक्तव्य केरळचे मुख्यमंत्री श्री. अच्युतानंद यांनी केले आहे. मूळचे केरळचे सुपुत्र असणारे मेजर उन्नीकॄष्णन यांच्या अंत्यसंस्काराला अच्युतानंद उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर दोन दिवसांनी ते उन्नीकॄष्णन यांच्या परिवाराला भेटण्यासाठी त्यांच्या बेंगलुरु स्थित निवासस्थानी पोहोचले. तत्पूर्वी उन्नीकॄष्णन यांच्या घराची सुरक्षारक्षक आणि श्वानपथकामार्फत तपासणी करण्यात आली होती.

अतिरेक्यांचे दफन भारतात करण्यास विरोध

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 02/12/2008 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईत २६ नोव्हे. रोजी हल्ला केल्यानंतर कमांडो कारवाईत मरण पावलेल्या अतिरेक्यांचे भारतभुमीत कुठेही दफन होऊ न देण्याचा निर्णय काही मुस्लिम संघटनानी घेतला आहे. अधिक बातमी इथे वाचता येईल. हा एक अतिशय चांगला निर्णय म्हणता येईल. पण याच बरोबर या मुस्लिम संघटनानी या समाजातील सुशिक्षित बेकार तरुण गुन्हेगारी कडे न वळता मुळ प्रवाहात कसे सामिल होतील याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपल्याला काय वाटते?

आईची विटंबना

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 02/12/2008 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईवर झालेली जखम आणि त्या जखमेच्या वेदनानी कण्हण्याच्या तिच्या किंकाळ्या ऐकून माझं मन सून्न झालं.काही लिहावसंच वाटत नाही.एक दोन लेखनं केली, पण मिपावरचा तो तिरंगा पाहून ती लेखनं सादर करायला मला मनंच होत नाही.आईने किती म्हणून जखमा सहन केल्या.कधीही तिने जर हात उचला तर आपल्या संरक्षणासाठीच उचलला.

सरकारी इतमामात मरण.

लेखक रामदास यांनी मंगळवार, 02/12/2008 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
त्या काळरात्रीची ही काही प्रकाश(?)चित्रे. आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांचे सकारी इतमामात दहन होणार नाही पण मरण मात्र सहज मिळेल सरकारी इतमामात. हे सर्व फोटो मिपा सदस्य आणि एक पत्रकार श्री उदय तानपाठक यांच्या मदतीने. (मा.

सैतानाचे मनोगत

लेखक येडा खवीस यांनी मंगळवार, 02/12/2008 09:10 या दिवशी प्रकाशित केले.
( नेहमी देव श्रेष्ठ आणि दानव वाईट हेच गृहित धरले जाते आणि त्याचं प्री-फोर्मेटेड विचारातुन आपण आपलं आध्यात्म पुढे चालवतो.. हे कितपत खरं आहे ते माहित नसतानाही सतत केवळ देव श्रेष्ठ आणि दानव वाईट याच भुमिकेत आपण रहातो त्यामुळे कधीतरी एकदा "तिकडची" बाजु काय आहे ते जाणुन घेण्याची इच्छा झाली....आणि हे सुचलं...बघा कसं वाटतय तुम्हाला, पटतय का?) जर हे मनोगत वाचल्यावर तुम्हाला मी यातुन देवांविषयी वाईट वक्तव्ये केली आहेत असं वाटलं तर मी आधिच क्षमा मागतो.

अंडे मे अंडा

लेखक कपिल काळे यांनी मंगळवार, 02/12/2008 09:02 या दिवशी प्रकाशित केले.
हायवेच्या पाप्पाजीच्या धाब्यावर खाल्लेली , ही एक निराळीच अंडाकरी आहे. पांथस्थासारख्या बल्लवाने माझ्या पाकॄ चे फोटो पिकासावर पाहून ह्यातील एखादी मिपावर टाक असे कॉम्प्लिमेंट्स दिल्याने धीर करत आहे. इथे एक सो एक सुगरणी आणि खवय्ये असताना आपण काही पाकॄ मिपावर टाकायची म्हणजे अंमळ धीराचं काम. तरीसुद्धा..... साहित्य २ कांदे फोडी चिरुन २ टॉमेटो फोडी चिरुन ३अंडी उकडून १ कच्चे फेटून तेल ( घ्याल तसे) ३-४लसूण पा़कळ्या बोटभर आले २ मिरच्या २ चमचे गरम मसाला / कांदा लसूण मसाला २ चमचे धने- जीरे पावडर १ चमचा लाल तिखट मीठ किंचीत साखर कोथिंबीर कॄती कढईत तेल गरम करा.

या १७ अनामिक बळींची माहिती त्यांच्या कुटुंबियांना कशी मिळेल?

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 02/12/2008 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या अनामिक आणि बेवारस अवस्थेत मुंबईत शवागारात पडून असलेल्या या अतिरेक्यांच्या १७ बळींचे चेहेरे त्यांच्या नातेवाईकांपर्यंत कसे पोहोचू शकतील? आणि फक्त याविषयीची बातमी प्रसिद्ध करून मटा का थांबले आहे? त्या वृत्तपत्राला (किंवा नको तेंव्हा investigative journalisitc spirit दाखविणार्‍या वाहिन्यांना) ही छायाचित्रे घेण्यास व प्रसिद्ध करण्यास काही कायद्याच्या अडचणी आहेत काय? मुंबईतील कोणी मिपा कर त्या शवागारात जाऊन त्यांच्या चेहेर्‍यांची छायाचित्रे घेऊन प्रसिद्ध करू शकतील का?