मुख्यमंत्र्यांचे संतापजनक वक्तव्य.
शहीद मेजर संदीप उन्नीकॄष्णन यांचे घर नसते तर तिथे कुत्रेही फिरकले नसते.
असे निर्बुद्ध आणि चीड आणणारे वक्तव्य केरळचे मुख्यमंत्री श्री. अच्युतानंद यांनी केले आहे.
मूळचे केरळचे सुपुत्र असणारे मेजर उन्नीकॄष्णन यांच्या अंत्यसंस्काराला अच्युतानंद उपस्थित राहिले नव्हते. त्यानंतर दोन दिवसांनी ते उन्नीकॄष्णन यांच्या परिवाराला भेटण्यासाठी त्यांच्या बेंगलुरु स्थित निवासस्थानी पोहोचले.
तत्पूर्वी उन्नीकॄष्णन यांच्या घराची सुरक्षारक्षक आणि श्वानपथकामार्फत तपासणी करण्यात आली होती. कदाचित याच मुळे मे.उन्नीकॄष्णन यांच्या वडीलांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्यास नकार दिला होता.
यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री महोदयांनी वरील प्रमाणे वक्तव्य केले असे सकाळ मधे म्हटले आहे.
राजकारणी लोकांनी जरा विचार करून, संयत प्रतिक्रिया दिल्या पाहिजेत. उन्नीकॄष्णन यांच्या वडीलांची मानसिक स्थिती लक्षात घेता त्यांनी कठोर शब्द वापरले असतील .ज्या बापाचा तरूण मुलगा देशासाठी शहीद झालाय त्याला दु:खावेग आवरता आला नसेल तर ते स्वाभाविकच आहे. पण केरळ च्या मुख्यमंत्रीपदावर असलेल्या व्यक्तीने अशा प्रकारचे
माणुसकीहीन वक्तव्य करणे हे निषेधार्ह आहे.
म्हणूनच केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंद यांचा जाहीर निषेध.
वाचने
3570
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
केरळचे
In reply to केरळचे by घाशीराम कोतवाल १.२
अगदी मनातले बोललात
या फडतूस माणसाची कुत्रा होण्याची तरी लायकी आहे का ?
नालायक व्यक्तीच्या हाती सत्ता.....
केरलच्या मुख्यमन्त्र्याचे वक्तव्य
निषेध!!!
शहीद मेजर
In reply to शहीद मेजर by विसोबा खेचर
सही अपुर्ण राहिली
निदान
हकालपट्टी करावी
अरे बापरे
In reply to अरे बापरे by कपिल काळे
सहमत
आजोबा तुम्ही मुख्यमंत्री नसता तर........
बॅनर - मुंबई
त्या वेडझव्याच्या...
सत्तर ऐंशी