Skip to main content

एक शंका

लेखक माझी दुनिया यांनी सोमवार, 09/02/2009 16:37 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच सरकारने पेट्रोल, डिझेल, गॅस चे भाव कमी केले. वाहतूकदारांनी देशव्यापी संप करून सरकारला हे करायला भाग पाडले. पेट्रोल , गॅस चे भाव कमी झाल्याकारणाने रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे कमी केल्याची बातमीही वर्तमानपत्रात अलिकडेच वाचली. पण हे मुंबईच्या हद्दीबाहेर. मुंबईतल्या जनतेचे काय ? एरवी पेट्रोल-डिझेल महागले सांगून सगळ्या जीवनावश्यक वस्तूंचे भाव तातडीने वाढवणार्^यांनी पेट्रोल-डिझेल सवस्त झाल्याकडे सोयीस्कर डोळेझाक का केली ?

कार्तिकीला आक्षेप का?

लेखक अन्वय यांनी सोमवार, 09/02/2009 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिपावरील चर्चेत बहुतांशी सदस्यांना, कार्तिकी गायकवाड महाविजेती होणारच नाही. प्रथमेश किंवा आर्या या दोघांपैकी कुणीतरी एक होईल, असे वाटत होते. परंतु ऐनवेळी वेगळाच निकाल लागल्याने या सगळ्यांच्याच टोप्या उडाल्या. त्यामुळे यांचा तीळपापड होणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाने आपापल्या प्रज्ञे(?)नुसार विचार करूनच मते नोंदविली आहेत. यातील बहुतेकांचा संगीताशी संबंध केवळ शाब्दिक असावा. तिचा आवाज, त्यातील लवचिकता, संगीतातील समज, स्वरफेक, स्वराला घट्ट पकडून ठेवण्याची हातोटी, याचा कुणीही विचार केलेला दिसत नाही. प्रथमेश आणि आर्या दोघेही समजदार आहेत.

अटी शर्थी लागु

लेखक सुचेता यांनी सोमवार, 09/02/2009 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
अटी शर्थी लागु!! सुबक सुंदर मनोवेधक वाचताना जाहिरात खालील तळटीप लक्ष वेधुन घेत असते अटी शर्थी लागु!! एखाद्या आकर्षक योजनेच्या सादरीकरणात गुंतुन जत असताना आपण स्वप्ण रंजनात सांगितले जाते.. नियम शर्थी लागु!! सवलतींच्या दिलखेचक जाहिरातीत भुरळतो आपण, अन शेवटी कळते आपल्याला अगदी अटी शर्थी चार्जेस लागु!! जन्माच्या जोडीदाराशी संसाराची स्वप्ण रंगवताना हळूच कोणी अनुभवी जाणवून देते नकळत..
Taxonomy upgrade extras

सारेगमप महा विजेता - कार्तिकी गायकवाड

लेखक अज्ञात यांनी सोमवार, 09/02/2009 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
कालच रात्री सारेगमप चा शेवटला एपिसोड पाहिला. शेवटी निकाल एकदम अनपेक्षीत लागला. ह्या कार्यक्रामामधे काय काय घडले ते इथे साग्र संगित लिहिले आहे.. जरुर वाचा आणि आपल्या कॉमेंट्स पोस्ट करा. मी संपुर्ण कार्यक्रामावर काहितरी खरडलंय.. वाचा आणि कॉमेंट्स द्या.. असॉ, हे काही जरी असलं तरी कार्तिकी च्या विजयाचे महत्व कमी होत नाही.

कार्तिकी जिंकली!

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 08/02/2009 21:38 या दिवशी प्रकाशित केले.
झी मराठी च्या सारेगमप स्पर्धेत कार्तिकी गायकवाड अंतिम विजेती ठरली. कार्तिकीला मन:पूर्वक शुभेच्छा!! :)

अमृतराय झोपडीत का गेला?

लेखक चतुरंग यांनी रविवार, 08/02/2009 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
सतराव्या शतकात होऊन गेलेल्या अमृतराय नावाच्या पंतकवीसंबंधी एक चर्चा उपक्रमावर वाचनात आली. 'कटाव' ह्या काव्य प्रकाराबद्दल ते प्रसिद्ध होते असे मला त्यातून समजले. ते असो. सांगायचा मुद्दा हा की तिथला त्यांचा कटाव वाचून त्यांची बायकोबद्दलची तक्रार समजली की सतत बडबडणारी, खाणारी आणि वेगवेगळ्या वस्तू मागत रहाणार्‍या कजाग पत्नीला वैतागून अमृतराय झोपडीत रहायला गेले. ते कारण काय असेल ते असो पण त्याच्या बायडीची काय तक्रार असू शकेल हे आम्ही जाणतो!

वोह कागज की कश्ती वोह बारीश का पानी

लेखक वर्षा म्हसकर-नायर यांनी रविवार, 08/02/2009 17:47 या दिवशी प्रकाशित केले.
आई मला पि.एस्.पी. हवाय, माझ्या सगळ्या फ्रेंड्स कडे आहे तो. ''ओन्ली आय डोन्ट हॅव इट". इति माझा ६ वर्षाचा मुलगा. 'अरे पण काही महिन्यांपुर्विच आपण तूला गेमबॉय घेतला ना, तो खेळ ना " इति मी 'अग आई गेमबॉय आता आउटटेड झाला, मला पि.एस्.पी. च हवा. त्यावर वेगळे गेम्स आहेत.' इति माझा ६ वर्षीय मुलगा. इथे दुबईमधे शुक्रवार शनिवार हे जे सुट्टीचे वार असतात, तेव्हाच काय ते मुलांना एखाद्या क्लब ची वैगरे मेम्बरशीप घेउन बॅडमिंटन, टेनिस अथवा इतर तत्सम जे सोकॉल्ड साहेबी खेळ आहेत ते खेळायला घेउन जाउ शकतो. एरवी शाळा असतांना बाहेर कुठेही मैदानी खेळ खेळायला मुलांना जाता येत नाही. वेळच नसतो.

कवि भूषण

लेखक शिशिर यांनी रविवार, 08/02/2009 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
फार पूर्वी मी साधारण साहवी/सातवीत (३० वर्षा पूर्वी) जोधपूर (राजस्थान) ला शिकत असताना माझ्या हिन्दी च्या शिक्षकानी कवि भूषण ची शिवाजी महाराजा वर एक कविता (पाठ्यक्र्मात नसताना) शिकविली होती. त्यात महाराज युध्दाला निघतानाचे वर्णन आहे. आता ती कविता मला पूर्ण आठवत नाही. कवितेचा अर्थ थोडाफार आठवतो. महाराजा ची चतुरंग सेना युध्दात विजय मिळविण्यासाठी निघाली आहे. रस्त्यात लागणारे ओढे, नद्या, नाले, झाडे, दगड, सगळे त्या सैन्याच्या जोषात सामिल होउन डोलतायेत, नाचतायेत. कविता जशी आठवतेय तशी लिहितोय. चुकण्याची अगर शब्द फेर फार ची दाट शक्यता आहे.