अमृतराय झोपडीत का गेला?
सतराव्या शतकात होऊन गेलेल्या अमृतराय नावाच्या पंतकवीसंबंधी एक चर्चा उपक्रमावर वाचनात आली.
'कटाव' ह्या काव्य प्रकाराबद्दल ते प्रसिद्ध होते असे मला त्यातून समजले.
ते असो. सांगायचा मुद्दा हा की तिथला त्यांचा कटाव वाचून त्यांची बायकोबद्दलची तक्रार समजली की सतत बडबडणारी, खाणारी आणि वेगवेगळ्या वस्तू मागत रहाणार्या कजाग पत्नीला वैतागून अमृतराय झोपडीत रहायला गेले.
ते कारण काय असेल ते असो पण त्याच्या बायडीची काय तक्रार असू शकेल हे आम्ही जाणतो! त्यातूनच त्यांच्या त्या कटावाला त्यांच्या बायडीने उत्तर दिले असते तर ते असे ;)
माझा हा घरगडी धुवे न लुगडी आठी असे वाकडी
फुंके ना शेगडी सदाच मुरडी, चर्या पहा बोकडी !!
होता दोन घडी कशी कडमडे तोंडात ह्याच्या बिडी
बाजूच्या गधडीस देखुनि रमे ऐसाच चालू गडी !!
दारु घेत सडी, सदा बडबडी लोळे पहा वरकडी
कामे टाळुन दे पडी न कळता लावून दारी कडी !!
खातो हा जसा माकडी वसवशी उलटी असे खोपडी
यालागी हकलून आज दिधले 'रंग्यास' त्या झोपडी!!
चतुरंग
याद्या
4020
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
+१
मस्त --
हा हा हा..
हा हा हा
एक नंबर
मस्त, रंगा, मस्तच रे!!!
मस्त रे
सह्ही.
+१
!
सडेतोड!
रंगाशेठ,
प्रतिसाद देणार्या सर्वांचे मनापासून आभार!
यकच नंबर
अरे यात्री,
In reply to यकच नंबर by आनंदयात्री
खरयं
In reply to अरे यात्री, by चतुरंग
शॉल्लीड !!!!
जबरी उत्तर
मूळ कटाव