तरवारीना मिळते कवितेचे म्यान
जीवघेणी तान होते कट्यारीचे पान
हरपते सारेच ऐकूनी देहभान
हवे कशास मग उसाश्यांचे भान...
तू सभोताली नीळाई होउनी
येतेस सारे आकाश झाकुनी
ऐन पावसात इंद्रधनु घेउनी
हवे कशास मग उसाश्यांचे भान
होवोनी चंद्र मन धुंद होत जाते
पायीचे नाद ताल संगीत होते
काय सय जीव घेऊनी जाते
हवे कशास मग उसाश्यांचे भान
कायांची होती वीणा...गीत अप्सरा गाते
काय चमत्कार होतो..शब्द मूका करते
भाषेवीण संवाद.....मन हिरवे रान होते
हवे कशास मग उसाश्याचे भान
तु येतेस होवोनी रानीचे पान
पावसाळी शहारा. थेंब थेंब गान
वेडावला जीव....तृप्त इंद्रधनुची कमान
हवे कशास मग उसाश्यांचे भान.
...........................विजुभाऊ सातारवी
याद्या
1489
प्रतिक्रिया
6
लेखनविषय:
मिसळपाव
क्या बात है !!
विजुभौ, १ नंबर......... एकदम
....सुंदर्..आवड्ले...!
धन्यवाद
आभार
In reply to धन्यवाद by विजुभाऊ
सुन्दर ...कविता आवडली...