Skip to main content

जालिय लेखनाची दखल...

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी शनिवार, 17/10/2009 21:13 या दिवशी प्रकाशित केले.
आज आंतरजालावर बरीच मराठी संस्थळं भरभराटीला येत आहेत, मराठी युनिकोडसुविधेमुळे मराठी टंकन सुलभ झाले आणि ब्लॉग्जचे पेव फुटले... त्यामुळे ज्या लोकांनी आयुष्यात आपण कधी लिहू असे कल्पिलेही नसेल असे लोक लिहू लागले, मराठी वाचन कमी झाले म्हणता म्हणता या नवीन तंत्राविष्कारामुळे मराठी वाचनच नव्हे तर लेखनही वाढते आहे. एकूणातच... एक नवीन जग आकारास येत आहे. आणि आपण आजचे नेटकर या विश्वाचे सुरूवातीचे दिवस आणि वाढ अगदी पहिल्या रांगेत बसून बघतो आहोत. तर जालिय दिवस असे सुखासमाधानात जात असताना, साधारण तीनेक आठवड्यांपूर्वी अचानक रामदासांचा व्यनि आला. एखाद्या सदस्याचे सगळे लेखन बघायचे असेल तर काय करायचे?

पुलं, निळा कोल्हा आणि.....

लेखक JAGOMOHANPYARE यांनी शनिवार, 17/10/2009 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
पिपात पडलेल्या निळ्या कोल्ह्याचे पितळ अखेर उघडे पडले आणि सगळ्या कोल्ह्यांनी त्याला राज्यपदावरून पदच्युत करून हाकलून दिले. निळा कोल्हा रानोमाळ भटकत निघाला आणि अखेर तो एका आमराईत आला. आमराईत जरा विश्रान्ती घ्यावी म्हणून तो एका डेरेदार झाडाच्या दिशेने निघाला. झाडाजवळ गेला आणि बघतो तर काय.. ! तिथे मध्यम वयाचा, चश्मा घातलेला आणि मिश्किल हसणारा एक माणूस एका चिमुरड्या मुलीबरोबर गाणे म्हणत होता.

पाळणाघरात

लेखक मनोज यांनी शनिवार, 17/10/2009 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
नको आई नको आज पाळणाघरात नको जाऊ कामाला तू राहुया घारात छान खाऊ मिळे तिथे चॉकलेट गोळी जेवायला असते तूप साखर पोळी चव तुझ्या हताची पण नसते कशात डोळ्या मध्ये पाणी आणी हूंदका घाशात खेळायला खेळन्या काऊ आन चिऊ निजायला असते उशी मऊ मऊ ऊब तुझ्या कुशीची पण नसते कशात डोळ्या मध्ये पाणी आणी हूंदका घाशात गोष्टी राजा-राणीच्या असतात छान पावसाच्या गान्यात हारवते भान गोडी त तुझ्या अंगाईची पण नसते कशात डोळ्या मध्ये पाणी आणी हूंदका घाशात नाही आई तुला मी त्रास देनार सांगशील ते सारे ऐकनार दंगा केला तर रागव तू मला खोडी केली तर सांग बाबाला नको आई नको आज पाळणाघरात नको जाऊ कामाला तू राहुया घारात
काव्यरस

आपण शब्दांचे दिवे तेवते ठेवूया!

लेखक अविनाश ओगले यांनी शुक्रवार, 16/10/2009 19:10 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा! आपण शब्दांचे दिवे तेवते ठेवूया! आपण बोलूया एकमेकांशी शब्दानं शब्द वाढू दे. आपण लिहूया एकमेकाला आपण वाचूया एकमेकाला शिष्ठ शांततेच्या कोषातून आपण बाहेर येऊया... आपण शब्दांचे दिवे तेवते ठेवूया! आपण ओळख दाखवत नाही एकमेकाला आपल्याला विश्वास नाही एकमेकांबद्दल आपल्याला भीती वाटते एकमेकांची एका प्रचंड ताणाखाली वावरत असतो आपण आणि मग अंधारच अंधार दाटत राहतो सभोवताली... सहज आपुलकीनं बोललो दोन शब्द एकमेकांशी तर विरुन जाईल अंधार लख्ख उजाडेल सारीकडं... `स्नेहा'च्या प्रकाशात आपण आनंदानं राहूया... आपण शब्दांचे दिवे तेवते ठेवूया! -अविनाश ओगले

सदुभाऊ

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 16/10/2009 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
`राजकारण असंच असत... माणसांचा वापर करून घेणारेच इथे जास्त. हे माहित असूनही मी हे करतोय.. खाज म्हणा हवं तर... काय मिळतं म्हणाल, तर... समाधान... ते सगळ्यात मोठंय्‌' ... सदुभाऊ बोलत होते, आणि आतून त्यांची बायको कुत्सित हुंकार देत होती... "कसलं समाधान?... घरचं खाऊन लष्कारच्या भाकऱ्या भाजायचे नस्ते उद्योग!' ती आतूनच म्हणाली, आणि सदुभाऊंनी मला जोरदार टाळी दिली. "वयनी.. पण तुम्हाला नवऱ्याचा अभिमानच वाटत असणार'... मी मुद्दामच म्हणालो... "अज्जिबात नाही.. मी खमकी आहे, म्हणून चाल्लयं...

गाणे आनंदाचे ... !

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 16/10/2009 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
तेज दिपांचे उजळुन आले दिप मनींचे झणी प्रकाशले.. तेजाळल्या त्या ज्योतींमधुनी ओज तयांचे ओसंडूनी न्हाले..!! दिपवाळीच्या आनंदामध्ये आर्त मनांचे विरुनी गेले.. सुख-दु:खाच्या गंधासह मम आयुष्य सुखे गंधावून गेले..!! गाणे मनातले ओठी आले दिपावलीसह फुलून गेले.. सुमन सुगंधी दिपावलीचे दिपांसवे जिवनी दरवळले..!! कानी निनादती तेच तराणे सदैव एक ते आनंदी गाणे.. आले दिन सौख्याचे आले सवे घेवुनी समृद्धीचे मेळे..!! दिपावली शुभचिंतन ! विशाल.
काव्यरस