Skip to main content

जगलो जरी मी खुप.

लेखक टुकुल यांनी सोमवार, 07/12/2009 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
हि कविता माझी नसुन, माझ्या मित्राच्या काकांच्या निधनानंतर, मित्राने त्यांच्या जिवनावर केलेली कविता. जगलो जरी मी खुप परी ते जगणे नव्हते, विद्वतेचा किताब घेवुन हात कधीच थांबले होते पडलो न कुणाच्या कामी तो शब्दांचा बाजार होता, त्या बाजारातच माझ्या व्यक्तिमत्वाचा र्‍हास होता. परी न दाखवली मी कुणा नाराजी असुनी या अंतरी, माझ्या पिलांनीच माझी फसगत केली सारी, परी जीव गुंतला त्यात जरी झाले मजला परके, ह्रुदयातील सांगु मी दु:ख कुणा करावयास मन माझे हलके, जातानाही नाही सुटतील हे बंध रेशमाचे, या मायेच्या कपड्याला, शिवणारे हात विणकर्‍याचे.. जगलो जरी मी खुप.................
काव्यरस

एका बाजेची गोष्ट

लेखक मराठे यांनी सोमवार, 07/12/2009 04:47 या दिवशी प्रकाशित केले.
लहानपणी आजीकडे जायचो तेव्हाचा तिने सांगितलेला एक किस्सा. तिच्याकडे रात्री गाद्या घातल्यानंतर आजी, मामा, आई, मावशी गप्पा मारत बसायचे. खरं तर त्या गप्पा ऐकता ऐकता कधी झोप लागायची ते कळायचंही नाही. पण हा किस्सा तिने सांगितला आणि त्या रात्री माझी झोपच उडाली. ती मी ऐकलेली पहिली "भयकथा" पण ती "कथा" नव्हती.. तो तिचा अनुभव होता. आजीचं सासर उरणचं. पहिल्या बाळंतपणानंतर ती घरी आलेली होती. तिला झोपायला घरातली एक बाज दिली होती. ती बाज खूप दिवस अडगळीच्या खोलीतच पडलेली होती. रात्री कधीतरी तिला बाळाच्या रडण्याचा आवाज आला. बाळाला बघायला म्हणून ती उठली. पाहते तर बाळाच्या जवळ एक जख्ख म्हातारी बाई बसलेली.

मी आणि मनू- सॉल्लिड टीम!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 07/12/2009 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
मनस्वीला सांभाळायची आता पाच वर्षं सवय झालेय. लहानपणी रात्री दीड-दोनला आल्यानंतर ती झोपेपर्यंत पाळणा हलवत बसण्याचं कंटाळवाणं कामही न कंटाळता केलं. त्यामुळं तिच्यासोबत एकटं असण्यात भीती किंवा टेन्शन वाटण्याजोगी परिस्थिती नव्हती. तरीही, एक दिवसापेक्षा जास्त काळासाठी ही वेळ कधी आली नव्हती. ती एक वर्षाची असताना हर्षदा बारामतीला कार्यक्रमाला गेली होती, तेव्हा एक दिवस पूर्णपणे मी तिला सांभाळलं होतं. अन्यथा आमची जबाबदारी काही तासांपुरतीच. या वेळी गोव्याला जायचं होतं आणि हर्षदाला रजा नव्हती. म्हणून मी मनस्वीला घेऊन जायचं ठरवलं. आई-बाबाही रत्नागिरीहून सोबत येणार होते.

[मूल ते मा़झेच होते]

लेखक अमृतांजन यांनी रविवार, 06/12/2009 22:46 या दिवशी प्रकाशित केले.
मुळ कवी सागरलहरी ह्यांच्या ह्या अप्रतिम काव्याचे हे एक रुप चमचे ते तुझेच होते, काटेच हाती घेऊनिया.. स्वस्त नव्हतीच थाळी, म्हणे आमरस अनलिमिटेड घ्या तव मुलींशी घसट माझी, निमीत्त्य ते खाणावळी वातड सहा पोळ्या तोडतो, तिच्याकडे पाहून त्या उगीच नाही मी नोकरी, केली ती परगावी, आणिक बेचव डाळ-उसळींची, पर्वा मी केली का? तुझला आक्षेप नसे, तुच रचिला खेळ सारा, बराय हा जावईतरी, येथेच ह्याला जेवू द्या... दिन सरता डेप्युटेशनचे, दैव सारे पालटले, सुन्न मी तुझ्याच इतका, परदेसीच मला राहू द्या...
काव्यरस

ते झाड़ तोडले कोणी ?

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 06/12/2009 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
ते झाड़ तोडले कोणी ? पक्ष्यांची घरटी होती ... बहराची पालव होती .. .... ते झाड़ तोडले कोणी ? संध्याकाळी मावळतीचा निरोप घेउन आम्ही यावे ... इवल्या इवल्या पिल्लांना हे मायेचे दाणे द्यावे .. करून विसावा पुन्हा पिलाना तुझिया खान्द्यावरती द्यावे... इवले होते स्वप्ना आमुचे तोडून विस्कटले कोणी? .... ते झाड़ तोडले कोणी ? सळ सळ ऐकत तुझीच आम्ही प्रेम गूंजने करीत होतो .. मावळतीच्या पटलावरती स्वप्न उद्याचे रेखीत होतो .. प्रीत फुलांच्या वचना साठी तुलाच साक्षी ठेवीत होतो .. संकेत भेटीचा तुझ्या तळीचा असा मोडला कोणी ? ....

कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे,

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 06/12/2009 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे, वेड़े पिसे होई मन, उर माझा जळतो रे, मुरलीची तान , ऐकू येता जाई भान, सुटे कामधाम, घेते तुझ्याकडे धाव रे , तुझ्या वेणु नादामधे जीव धुंद होतो रे कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे वेड़े पिसे होई मन, उर माझा जळतो रे, रोज खेळू रास, हाच लागे ध्यास, तुझे नाम होई श्वास, उरे हाच एक छंद रे, तुझ्या पायी सोडिले मी, उभे घरदार रे , कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे वेड़े पिसे होई मन, उर माझा जळतो रे, नुरे द्वैताचे भान, होते सारी एकतान, लागे कृष्ण ध्यान, कृष्णमयी होते रे , सारीकडे कृष्ण कृष्ण, कृष्ण कृष्ण बघते रे, कान्हा तुझ्या मुरलीचा, साज असा छळतो रे वेड़े प

फूल ते माझे न होते....

लेखक सागरलहरी यांनी रविवार, 06/12/2009 22:22 या दिवशी प्रकाशित केले.
फूल ते माझे न होते, काटेच हाती घेऊ दया.. हास्य ते नव्हतेच गाली, जखमा उरातून वाहू दया मृत्युशी दोस्ती ही माझी, आहे पुराणी वेगळी मृत्यूचा आनंद लुटतो, जगणे उद्यावर राहू दया मुक्त मी केली फकीरी, साथ ही नव्हते कुणी साक्ष देण्या त्या क्षणांची, माझे कलेवर राहू दया काय नसतो देव तेथे, पाहण्या हा खेळ सारा ? असो मग 'काहीतरी', 'तेथे' उगीचच राहू दया ... रात्र सरता मैफिलीचे, रंग सारे लोपले, मात्र हा इतुकाच ठिपका, तुमच्या रुमाली राहू दया.. --- सागरलहरी २८/३/२००९

अजून एक क्रियाशील आदर्श

लेखक विकास यांनी रविवार, 06/12/2009 21:02 या दिवशी प्रकाशित केले.
हे पार्सी बाबा भारताच्या किनार्‍यावर गुजराथच्या बाजूने नक्की कधी आले ते माहीत नाही, पण त्यावेळची एक कथा आत्ता एकदम आठवली. ते त्या भागातील राजाकडे गेले आणि स्वतःच्या देशातील अत्याचारांमुळे विस्थापित झालो आहोत तेंव्हा आम्हाला येथे आश्रय मिळूंदेत म्हणून विनंती केली. राजा काहीच बोलला नाही, फक्त त्याने दुधाने काठोकाठ भरलेला पेला दाखवला. उद्देश हा की आम्ही येथे परिपूर्ण आहोत असे काहीसे दाखवणे. पण त्या समुहाचा म्होरक्या पार्सीबाबा पण हुषार - त्याने त्या दुधात तसेच न बोलता साखर घातली. अर्थात त्याने सांगितले, की आम्ही या काठोकाठ दुधाने भरलेल्या पेल्यात जशी साखर विरघळली तसेच एकरूप होऊन राहू.

बोधीवृक्षावरची बांडगुळं

लेखक शैलेन्द्र यांनी रविवार, 06/12/2009 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
लोकसत्ताच्या लोकरंग पुरवणीतील बोधीवृक्षावरची बांडगुळे लेख वाचनात आला. हे विचार प्रथमच मांडले गेलेत असे नव्हे किंवा मध्यमवर्गाला अपराधीच्या पिंजर्‍यात ऊभी करायची पद्धतही नवीन नाही.

शेझवान सॉस सोबत चिकन लॉलीपॉप

लेखक गणपा यांनी रविवार, 06/12/2009 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, इंडो-चायनिज् च्या पहिल्या भागात आपलं सहर्ष स्वागत. गेल्या बुधवारी संतोषने झक्कास व्हेज रोल आणि त्या जीवघेण्या शेझवान सॉस चा फोटो टाकला तेव्हा पासुन आमच्या जीभेचा वाहणारा नळ काही बंद होईना. काही तरी बनवुन कोंबल्या शिवाय तो बंद होणार नाही ते आम्ही तेव्हाच ताडले. तर आजचा मेन्यु बच्चे कंपनीच लाडक चिकन-लॉलीपॉप. (आम्हीही अजुन ल्हानच आहोत ;) ) आजकाल बाजारात रेडीमेड लॉलीपॉप्स मिळतात. पण आपल्या कडे अजुन सर्वत्र मिळतीलच अस नाही. त्यामुळे तुम्हाला चिकन्-विंग्जस् पासुन लॉलीपॉप कसे बनावायचे ते पण सांगतो. साहित्यः चिकन विंग्जस् .