Skip to main content

कसे वर्ष गेले हरवून ...!!!

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 04/01/2011 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष कसे गेले कळलेच नाही कसे दिवस जातात पटकन हरवून किती वर्ष गेली हे तरी कोठे समजले कधी .त्याला .?? जल्लोषात नवीन वर्षाचे स्वागत केले जुने वर्ष संपताना ते बिचारे हताश होऊन गेले फटाके कुणासाठी वाजले हे त्याला कळले देखील नाही हिरमुसले रुसले हलकेच निघून गेले काय दिले त्याने ? काय घेतले तुम्ही ?? काय घेतले ठाऊक नाही काय हिरावून नेले हे फक्त लक्षात राहिले त्याचा जिवाभावाचा भाऊ गेला आठवण आली की , काळीज फुटून जातेय त्याचे जगणे फक्त ढकलून दिले जाते काळोखाच्या समुद्रात विरघळून जावेसे वाटते त्याला शप्पत ...
काव्यरस

दादाजीपंतांनी सिऊबास शहाणे केले

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 04/01/2011 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, लोकप्रभातील श्री. पांडूरंग बलकवडे यांचा खालील लेख जरूर वाचावा आणि इतरांस वाचण्यास प्रवृत्त करावे. ब्रिगेडच्या अतिरेक्यांना दादोजींनी जिजाऊंचा मातोश्री असा उल्लेख करून चोख उत्तर दिले आहे. लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा ! आपल्या पुढार्‍यांइतकी नीच माणसे या पृथ्वितलावर सापडणे नाही. जयंत कुलकर्णी.

[नीळकंठेश्वर] - नव वर्ष, नवी जागा

लेखक पारा यांनी सोमवार, 03/01/2011 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा रायगडला जाण्याचा बेत रद्द झाला, आणि मी नववर्षाच्या पहिल्या शनिवारी आणि रविवारी एकटा पडलो. सगळे मित्र कुठे कुठे गेलेले होते. त्यामुळे शनिवार फारच कंटाळवाणा गेला. तेंव्हा मी असा विचार केला की किमान रविवार तरी असा काहीच न करता वाया घालवायला नको. मग मी माझ्या पुण्यातल्या मित्रांना SMS केले की सिंहगडावर जायचं का हे विचारायला, कोणीच मला फारशी उत्साहपूर्ण उत्तर दिली नाहीत. मग मी एकट्यानेच कुठेतरी जायचं ठरवलं. बरेच दिवसांपासून हे शंकराचे मंदिर मनात घोळत होते, तर मग विचार केला, की आज तिकडेच जाण्याचा बेत करावा, आणि अस्मादिकांची स्वारी एकटीच निघाली, नीळकंठेश्वराला.

शाळा

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 03/01/2011 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
शाळा हा विषयच असा आहे की कितीही लिहा कमीच पडेल. पेनातली शाई संपेल (किंवा कळफलक दाबु दाबुन बोटे दुखतील) पण शाळेच्या आठवणी संपणार नाहीत. प्रत्येकाच्या हृदयात शाळेच्या आठवणींसाठी एक वेगळ कप्पा राखुन ठेवलेला असतो. त्या १०-१२ वर्षांच्या आठवणी नेहेमीच सोनेरी रुपेरी असतात असे नाही पण अटळ, अचल, अविनाशी नक्की असतात. माझ्या आठवणीत एक नाही अनेक शाळा आहेत. पण शाळेशी खर्‍या अर्थाने बंध जुळण्याच्या काळात म्हणजे ५ वी नंतर मी ठाण्याच्या सरस्वती मध्ये होतो.

पाउलखुणा

लेखक गणेशा यांनी सोमवार, 03/01/2011 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रश्नचिन्ह .. ? आता उत्तरे ही रुसली आहेत.. सारखे सारखे तेच प्रश्न आणि तोच कंटाळलेपणा आणि मागोवा .. कश्यासाठी ...? कोणासाठी...? बहुदा एका प्रश्नमालिकेतून पुन्हा दूसर्‍या प्रश्नमालिकेत जाण्यासाठीचा अखंड प्रवास गुरफ़टलेली तर ही रात्र ही आहे .. उदयस्ताच्या रंगात न्हाऊनही कालवंडली आहे बिच्चारी माझे काय मग त्यापुढे.. अता माझी सावली ही रुसली आहे माझ्यावर माझ अस्तित्वच संपत चाललय .. पण या रात्रीच्या सोबतीनेच मी जगते आहे..