Skip to main content

नसबंदी

लेखक राजेश घासकडवी यांनी सोमवार, 16/05/2011 08:10 या दिवशी प्रकाशित केले.
मर्दपणाचा ताठा मिरवित गुर्मित धुमसत धुंद जवानी उभारून झेंडा मस्तीचा दाहिदिशा फिरलो मनमानी रांडानी खिडक्यांतुन तिरप्या खुणाविले मजला डोळ्यांनी शालिन नजरा झुकल्या,उठल्या अस्फुटशा होकारांनी आसुसलेल्या वक्षांवर किति हात फिरवले आसुसलेले सीत्कारांना कितीक मादक, आत्म्याचे होकार दिलेले नाही पाहिली काळी माती नाही नाती कुठे बांधली घुसवत अन् हल वखवखलेला बेदरकारी बिजे उधळली आता बघतो चौरस गोंडस कुटुम्बलेले कितीक, छोट्या दो चिमण्यांना कडी घेउनी शिस्तित चालत रेषा कोत्या इंग्लिश मिडियम फॉरिन वारी खुराक अन् बी कॉम्प्लेक्सचे फेसबुकावर पडती फोटो भरतनाट्यचे अन मुंजीचे गोजिरवाणी स्वप्ने माझी घ
काव्यरस

'अविस्मरणीय' उटी कोडाई

लेखक स्मिता. यांनी रविवार, 15/05/2011 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वसूचना: या लेखातले सर्व अनुभव १००% सत्य घटना असून त्यात काल्पनिक असे काहीही नाही. त्यात काही काल्पनिक वाटल्यास ते आमचे दुर्दैव समजावे. ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ कधी कधी असे अनुभव येतात की वाटते एखाद्या गोष्टीचा विचार करताना जर ती अयोग्य, चुकीची किंवा करू नये अशी वाटत असल्यास ती न केलेलीच उत्तम! तसा माझा शकुन-अपशकुन, दैवी संकेत, इ. गोष्टींवर विश्वास नाही पण जिथे आपलं मनच नाही म्हणतं तिथे उगाच शहाणपणा करूच नये.

‘बालगंधर्व’ आणि आमचं शंकेखोर मन

लेखक चिंतातुर जंतू यांनी रविवार, 15/05/2011 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वपीठिका: नटरंग आणि आमचं शंके़खोर मन ‘बालगंधर्व’ चित्रपट पाहून भारून गेलेले अनेक लोक भेटले आणि तशी अनेक परीक्षणं विविध ठिकाणी वाचली. चित्रपट पाहून आमच्या शंकेखोर मनात आलेल्या काही शंकांचं निरसन तरीही झालेलं नाही, म्हणून रसिक मायबाप वगैरे समस्त मराठीजनांची क्षमा मागून आमच्या त्या शंका इथे दिलेल्या आहेत: संगीत आणि तेही विशिष्ट काळातलं, विशिष्ट जातकुळीचं संगीत (पक्षी: बालगंधर्व आणि त्यांच्या काळातलं नाट्यसंगीत) हाच ज्याचा आत्मा आहे अशा चित्रपटात एकता कपूरच्या टिनपाट टी.व्ही.

थेंबे-थेंबे

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 15/05/2011 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
एक थेंब टपकला तिच्या करूण डोळ्यातून बोच रुतवून गेला हताशलेल्या काळजामधून एक थेंब गळला थबथबलेल्या कपाळावरून आशा रुजवून गेला भेगाळलेल्या जमिनीतून एक थेंब प्रवेशला शिंपल्याच्या ओठांमधून बोच छुपवायला लपला चंदेरी टोपडे पांघरून एक थेंब चुकार दमला पोहून पोहून शर्यतीमधून हरला अडला बंद दार बघून एक थेंब निसटला अभेद्य आवरणामधून मिलनाचा सांगावा आला वाट पहाणाऱ्या फ़ळातून एक थेंब पसरवला गोलाकार कळकटामधून चंदेरी साज झळालला पात्राच्या अंगांगावरून एक थेंब मोहरला आसुसलेल्या जमिनीमधून तृप्त सुगंध महकला उन्हा्ळलेल्या झळांमधून थेंब थेंब जमवला अनुभुतीच्या ओळींमधून शब्दसाज जर भावला द्या दाद प्रतिस

तुझे भास होते

लेखक क्रान्ति यांनी रविवार, 15/05/2011 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
कधी चांदण्याला तुझी आस होती कधी श्रावणाला तुझे ध्यास होते मला मात्र जन्मांतरी सोबतीला तुझे स्वप्न होते, तुझे भास होते निजेच्या क्षणी जोजवाया मनाला तुझे शब्द होते, तुझे सूर होते पहाटे जशी जाग आली, उशाला तुझे स्वप्न होते, तुझे भास होते गळा हुंदका दाटता सावराया तुझा स्पर्श होता, तुझे हास्य होते जरा एकटे वाटता साथ द्याया तुझे स्वप्न होते, तुझे भास होते फुलांना तजेला, कळ्यांच्या खळ्यांना हसू वाटणारा तुझा गंध होता झर्‍याला खळाळून लोभावणारे तुझे स्वप्न होते, तुझे भास होते समेला जशी दाद उस्फूर्त यावी तसा या जिवाला तुझा छंद होता दिली साथ आयुष्यगीतास ज्यांनी, तुझे स्वप्न होते, तुझे भास होते
काव्यरस

जैतापुर प्रकल्पाचा गुंता

लेखक शंकर पु. देव यांनी रविवार, 15/05/2011 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
कोणताही प्रकल्प एखाद्या ठिकाणचे लोक सहजासहजी स्वीकारत नाहीत. स्थानिक लोकांचे त्यांच्या राहत्या ठिकाणशी एवढे जवळचे संबंध व नाती निर्माण झाली की, सहजासहजी स्थनिक रहीवाशी आपली जमिन व घरेदारे आणि शेतीवाडी देण्यास तयार होत नाहीत. यामुळेच महाराष्ट्रात कुठेही गेलात तरी एखाद्या प्रकल्पाबाबत लोकांनी विरोध केला नाही, असे घडलेले नाही. सेझ विरोधात रायगडमध्ये शेतक-यांनी लढा दिला आणि जमिन संपादन करणे अशक्य केले. यामुळेच सरकारला सेझची योजना गुंडाळून ठेवावी लागली. प्रकल्पामुळे जनता विस्थापीत होते आणि एकदा विस्थापीत झाली की, मग या प्रकल्पग्रस्तांना किंवा धरणग्रस्तांचा वाली कुणीच रहात नाही.

बालगंधर्व, आम्ही तुम्हाला पाहिलं!

लेखक समीरसूर यांनी रविवार, 15/05/2011 02:00 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यातल्या दिवसेंदिवस असह्य होत जाणार्‍या वाहनवरातीतून कसेबसे रस्ता काढत आम्ही आठ वाजता सिटी प्राईडला पोहोचलो. 'बालगंधर्व'चे खूप कौतुक ऐकून होतो; त्यामुळे हा चित्रपट पाहणं क्रमप्राप्त होतं. शिवाय 'नटरंग'मुळे रवी जाधव काय ताकदीचे दिग्दर्शक आहेत हे लक्षात आलं होतंच. आगाऊ तिकिट काढून देखील अगदी कोपर्‍यातली तिकिटे मिळाली होती. स्थानापन्न झालो. पुढील सव्वादोन तास अक्षरश: मंतरलेल्या अवस्थेत चित्रपट पाहिला. कशाकशाचं तोंड भरून कौतुक करावं? शब्दात कसं पकडायचं ते गारुड?

' चहा '

लेखक विदेश यांनी रविवार, 15/05/2011 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
एक वर्ग ' चहा प्या ' म्हणणारा आहे. चहाने सकाळी लवकर पोट साफ व रिकामे होते, असे तो वर्ग सांगतो. शिवाय चहा पिल्याने ताजेतवाने वाटून तरतरीहि येते , असे त्या वर्गाकडून म्हटले जाते ! दुसरा वर्ग ' चहा कधीही पिऊ नये ' म्हणणारा आहे. काही माणसे अमक्या बुवा, महाराजाने सांगितले, म्हणून ' आम्ही चहा पिण्याचे कायमचे सोडून दिले (-काही नुकसान झाले नसल्याचा , अनुभव पाठीशी असला तरीही ! ) ' , असे सांगतात ! .सामान्य माणूस जास्त खोलात न जाता , ' कुणी काहीही म्हणो, मी चहा पिणार '- म्हणत ; जमेल तितक्या वेळा चहा पितो .