Skip to main content

गोळाबेरीज

लेखक श्रीरंग यांनी शनिवार, 11/02/2012 02:32 या दिवशी प्रकाशित केले.
गोळाबेरीज या चित्रपटाबद्दल समजल्यापसूनच प्रचंड कुतुहल मनात होतं. अवघ्या महाराष्ट्राचे दैवत असलेल्या पु. लं. नी अक्षरश। (विसर्ग कसा लिहितात प्लीज सांगा कोणीतरी) जिवंत करून सोडलेल्या व्यक्ती आणी वल्ली कशा रेखाटल्या असतील? हे सर्व विविध पात्रे एका कथानकात कशी गुंफली असतील? मातब्बर कलालारांचे सैन्य आपल्या मनातल्या या व्यक्तिरेखांना कितपत न्याय देऊ शकतील? असे प्रचंड औत्सुक्य मनात घेऊनच सिनेमाग्रुहात पाय ठेवला. संपूर्ण महाराष्ट्राला मुखोद्गत असलेले पु. लं. चे लिखाण पडद्यावर उतरवण्याचा प्रयत्न म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखेच.

पंचायतसमीती.....

लेखक भीमाईचा पिपळ्या. यांनी शुक्रवार, 10/02/2012 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या वर्षी आमचा गण महीला राखीव झाला. भल्याभल्यांची तारांबळ उडाली. मागच्या पंचवार्षीकला आम्हाला जनतेने विजयी कौल दिला नव्हता. यावेळेस सौ.ला उमेदवारी मिळाली. प्रचारासाठी अधिकृत दिवस फक्त पाच. १ते५ फेब्रु. अनेक युक्त्या क्लृप्त्यानि प्रचार केला. अनेक ठक बेटले. एकेक अनुभव शेअर करण्यासारखा आहे. त्यातला एक. वडगावची प्रचार सभा आटोपून पुढच्या प्रचारसभेला निघालोच होतो तर गववाला गपक्कन गाडीत घुसला. हे प्रकार होतच असतात. त्यामुळे विषेष काही वाटले नाही. माह्याकडं १० मतं हायेत..... ते आपुन सांगु तेच करणार......... तुम्ही काळजी करु नका.....

छत्रपती शिवाजी महाराज जीवन-रहस्य : नरहर कुरुंदकर

लेखक सागर यांनी शुक्रवार, 10/02/2012 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
Kurundkar आजच नरहर कुरुंदकरांचे 'छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य' हे अवघे साठ पानांचे पुस्तक वाचून पूर्ण केले. नरहर कुरुंदकरांच्या तिसाव्या स्मृतीदिनानिमित्त या पुस्तकाचे वाचन माझ्याकडून घडावे हा एक योगच म्हणावा लागेल. मूर्ती लहान पण कीर्ती महान असे या छोट्याशा पुस्तकाचे वर्णन करता येईल.

अवलिया विचारवंत - नरहर कुरुंदकर.

लेखक राजघराणं यांनी शुक्रवार, 10/02/2012 20:35 या दिवशी प्रकाशित केले.
तीस वर्षापूर्वी एक प्रभावी वक्ता स्टेजवरच मरण पावला. तो मॅट्रीक पास झाला तेंव्हा त्याची पुस्तके बीए च्या अभ्यासक्रमासाठी लावली होती आणि बीए 'ना'पास झाला तेंव्हा एम ए चे विद्यार्थी त्याची पुस्तके अभ्यासत होते. त्यांची भाषणं जेव्हढी लोकांना चक्रावून टाकणारी असत तेव्हढाच त्यांचा म्रुत्यू ही होता. औरंगाबादेत भाषणाची सुरवात करताच रणांगणावरील योध्याप्रमाणे १० फेब्रूवारी १९८२ ला कुरुंदकर गुरुजी व्यासपिठावरच कोसळले. त्यावेळी त्यांच वय होतं पन्नास वर्ष.

सोडत धूर-चाचणी इंजिन झुक झुक करते ... (हझल)

लेखक अजय जोशी यांनी शुक्रवार, 10/02/2012 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
सोडत धूर-चाचणी इंजिन झुक झुक करते ... (हझल) सोडत धूर-चाचणी इंजिन झुक झुक करते सोसली नसे त्यांची छाती फुक फुक करते करून दाखविले, पण बघण्या कोणी नव्हते बाण सोडण्या दोरी आता चुक चुक करते घड्याळातले काटे आता थकले बहुधा म्हणून यांना त्यांना आता शुक शुक करते हातावरच्या रेषा आधी समजुन घ्या रे... नंतर म्हणू नका की, नशीब टुक टुक करते कमळावर दवबिंदू जमती चमकुन घेण्या देठ अजुनही चिखलामध्ये लुकलुक करते हत्ती इतकी माया त्याची कुठे वाढली ? निळा रंग माखून उगाचच पुक पुक करते कुणाशी नसे बांधिलकी पण सतत बोलतो खार जशी की पळत सारखी कुक कुक करते
काव्यरस

फरियाबाग ....

लेखक पियुशा यांनी शुक्रवार, 10/02/2012 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
"फरियाबाग " मागील भागात आपण भुइकोट किल्ल्याची माहीती घेतली आजच्या भागात जाणुन घेउया " फरियाबाग" या वास्तु/इमारती/महालाबद्द्ल :) या ईमारतीचा इतिहास थोड्क्यात :- हे आहे हेन्री कझेन्स या युरोपियन इसमाने, साधारण इ. स. १८८० च्या दशकात, काढलेलं फारिया बागेचं छायाचित्र. इतिहास : अहमदनगर हे शहर आताच्या आधुनिक भारतात, महाराष्ट्र राज्यात येतं. हे शहर निझामशाहीतलं सगळ्यात मोठं आणि महत्वाचं शहर होतं.

वातापिगणपतिं भजेऽहम् ॥

लेखक चैतन्य दीक्षित यांनी शुक्रवार, 10/02/2012 12:43 या दिवशी प्रकाशित केले.
#जालावर आधीच प्रकाशित केला होता हा लेख. आज संकष्ट चतुर्थीच्या निमित्त इथे देत आहे. हंसध्वनी- एक प्रसन्न असा 'ओडव-ओडव' राग. (ओडव-ओडव म्हणजे ज्याच्या आरोहात आणि अवरोहात प्रत्येकी पाच स्वर येतात असा राग) अतिशय साधा, पण तितकाच प्रसन्न राग- हंसध्वनी! हंसध्वनी हा 'बिलावल' थाटातला राग. बिलावल थाट म्हणजे सगळे स्वर शुद्ध. असं म्हणतात, की बिलावल गात चालणार्‍या त्यागराजाचा पाय एका प्रेताला लागला, आणि ते प्रेत जिवंत झाले. (त्यागराज- कर्नाटक शास्त्रीय संगीताचा आधारस्तंभ.) ह्यावरून बिलावल (कर्नाटक पद्धतीतले बिलावलचे नाव 'बिलहरी') रागाला 'संजीवन राग' असे नाव पडले.

महाभारत - भूमिकांसाठी योग्य कलाकार कोण ?

लेखक महानगरी यांनी शुक्रवार, 10/02/2012 11:23 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच पिटर ब्रूक यांचे 'महाभारत' बघायचा योग आला. त्यातील परिणामकारक दिग्दर्शन, संवाद, पटकथा व अभिनय यामुळे प्रभावित होऊन मी हा धागा काढला आहे हे मला उघड आहे. तर काथ्याकुटाचा मुद्दा असा की आपल्याकडे सध्या उपलब्ध असलेल्या कलाकारामधून हे महाभारत साकारायचे असल्यास कुणाची निवड कराल ? माझ्या मते खालील पर्याय योग्य आहेत दुर्योधन - शाहरुख खान - तो आढ्यता व असमाधान चांगले दाखवू शकतो. कर्ण - आमीर खान - तो डोळ्यांचा वापर चांगला करू शकेल युधिष्टिर - मनोज वाजपेयी भीम - ऋतिक रोशन - बांधेसूद व भक्कम व्यक्तिमत्व अर्जुन - अक्षय खन्ना कुंती - शबाना आझमी ध्रुतराष्ट्र - मिथुन चक्रवर्ती ता. का.

घायाळ चिमणी

लेखक मनमोकळि यांनी शुक्रवार, 10/02/2012 05:32 या दिवशी प्रकाशित केले.
एक घायाळ चिमणी “प्रेम” तु जवळ असतांना माझे तुझ्याकडे बघणे लाजाळू पणे.. तु जवळ नसतांना तुला पाहण्याची तळमळ.. माझा लाजाळू पणा खूप आवडायचा ... तुझ्या त्या लाजाळू चिमणी ला आज तू सोडून चाललास... तू जवळ होतास पण लांब, मी तुला लपूनछपून बघायची तू म्हणायचास तुझे डोळे माझ्या कडे बघायची तळमळ नशा.. तुझ्या त्या नशील्या चिमणीला आज तू सोडून चाललास यालाच “प्रेम” म्हणायाचय काय?

**** चांडाळ चौकडी ****

लेखक वपाडाव यांनी शुक्रवार, 10/02/2012 04:05 या दिवशी प्रकाशित केले.
परवा, राजश्री मराठीच्या तुनळीवरील पोतडीत ढुंकुन पाहताना, चित्रपटाची लिंक गवसली. म्हटले चेपु-चेपु करण्याऐवजी, क्लासिक सिनेमा आहे बघावे दोनेक तास खर्ची घालुन. _____________________________________________________________ तर मंडळी चित्रपट आहे चांडाळ चौकडी.... चित्र : आंतरजालावरुन साभार... या चित्रपटाची कथा एका गावातील काही पात्रांच्या अवतीभोवती फिरते.