Skip to main content

घनगड-शिवाजी ट्रेल(दुर्गपुजा)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 27/02/2012 02:47 या दिवशी प्रकाशित केले.
काल दुपारी(२५ फेब्रुवारी) बरोब्बर चारला किल्यावर निघायचं असं म्हणता म्हणता,सहा कधी वाजले कळलं नाही.बरोबर येणारा आमचा एक मैतर अयत्यावेळी इचकला.पण माझ्यासाठी शिवाजी ट्रेलचा हा वार्षिक कार्यक्रम म्हणजे पंढरीच्या वारी सारखा खरोखर पुण्याचं संचित करवुन देणारा,म्हणुन ''वन मॅन आर्मी झिंदाबाद,शिवाजी महाराज की जय'' अशी घोषणा करुन मी एकदाचा निघालो...घनगड म्हणजेच येकोल्याच्या किल्यावर...हा किल्ला पुणे- ताम्हाणी घाटातुन ६९कि.मि.वर लोणावळ्याकडे जायला जो फाटा फुटतो,तिकडनं आत १८ कि.मि.वर आहे.अता ताम्हाणीघाट अगदी आमचाच सवईचा नित्याचा ओळखिचा झालेला असल्यामुळे कित्तीही अंधार असला,तरी तोच सोबतीला असल्यासारखा असत

निराश तरुणाईचे मनोगत......

लेखक अमितसांगली यांनी रविवार, 26/02/2012 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेम, स्पर्धा नि व्यसनान, झालाय आयुष्याचा बेरंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग................... प्रेमभंगात होऊनी निराश विचलित झाल अभ्यासातील लक्ष सावरण्यासाठी नाही अजूनही दक्ष जगण्याची आस मारुनी, टाकितो हा प्रेमभंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग................... प्रत्येक गोष्टीसाठी देवाकडे धाव जलद यशाची लागली हाव कष्ट करण्याचा न राहिला ठाव अपयशाच्या भीतीने, जाहलो मी निसंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दंग................... करिअरची वाट खूप अवघड जीवघेण्या स्पर्धेत चालू धडपड प्रत्येक वेळी नवीन गडबड जिद्द अन चिकाटी विकुनी, लावितो आयुष्याला सुरुंग मन माझ झालंय आज, आत्महत्येत दं
काव्यरस

व्यसनाधीनता व उपचार........

लेखक अमितसांगली यांनी रविवार, 26/02/2012 23:28 या दिवशी प्रकाशित केले.
अनिकेत, २७ वर्षाचा इंजिनिअर...तीन वर्षापूर्वी एका चांगल्या कंपनीत नोकरीवर रुजू झाला होता. छोटस स्वतःच घर घेतलं, लग्नही झाल. पण अचानक आर्थिक मंदीमुळे नोकरीवर कुऱ्हाड कोसळली. अनिकेतला हा धक्का सहन झाला नाही व तो व्यसनाच्या आहारी गेला. कुटुंबीयांनी खूप समजावले पण काही उपयोग झाला नाही. शेवटी पालक वैतागून गावाकडे निघून आले नि बायकोही माहेरी निघून गेली. निखील, वय वर्ष २०.एक हुशार व अभ्यासू विद्यार्थी. बारावीत चांगले गुण मिळवून एका चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला होता. पहिल्यांदाच शिक्षणासाठी घरापासून दूर राहिला होता. चुकीच्या संगतीमुळे व्यसनाच्या आहारी गेला. त्यातच तो पहिल्या वर्षी नापास झाला.

कुणी सांगा ......सुख म्हणजे नक्की काय असतं ?

लेखक यशोधन वर्तक यांनी रविवार, 26/02/2012 23:07 या दिवशी प्रकाशित केले.
जगी सर्वसुखी असा कोण आहे ....? .......विचारी मना तूच शोधोनी पाहे. समर्थ रामदासांनी शेकडो वर्षांपूर्वी हे वाक्य लिहून ठेवले आहे. या वाक्यातून प्रक़्श्न निर्माण केला नसून मनुष्य स्वभावाचे वर्णन केले आहे . मोठ्या सुखांच्या मागे लागलेल्या माणसाची अवस्था नेहमी भांबावलेली असते कारण सुख मिळत नाही आणि त्याची चातकासारखी वाट बघणे असते आणि ते जेंव्हा समोर येते तेंव्हा उशिरा मिळाल्याचा खेद होत असतो . पुन्हा हे सुख कधी मिळणार या विचारात सुख खर्या अर्थाने उपभोगतच येत नाही .

दापोली इथे अमृते यांचे निसर्ग सहवास एग्रो टुरिस्म रिसोर्ट...

लेखक पुश्कर यांनी रविवार, 26/02/2012 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
दापोली पासून 5km अंतरावर गव्हे या निसर्गरम्य गावात हे ठिकाण आहे.... लाल मातीचे रस्ते , वळणदार घाट व नारळ आणि सुपारी च्या बागा यांनी नटलेले सृष्टीसौंदर्य बघत कोकणात कसे पोहोचलो हे कळलंच नाही.

मुक्तिबंध

लेखक रेशा यांनी रविवार, 26/02/2012 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
मलाही एकदा मृद्क्कण बनून गरारा वार्यावर भरारायचय खूप खूप उंच जाऊन एकदा त्या आभाळाला शिवायचं नात, मुलगी, बहिण, प्रेयसी मैत्रीण सुद्धा नाही बनायचंय हात पसरून खुल्या मनान फक्त मी म्हणून जगायचंय बांधीव उंबरा ओलांडून मला स्वत:ला ओळखायचंय मोकळा मोकळा श्वास घेऊन मनावरल मळभ पुसायचंय तो उंबरा ओलांडताना मन स्थिर ठेवायचंय खोल काही तुटेल आत तरी स्वत:ला सावरायचंय स्वैर करताना संचार जगापासून अलिप्त राहायचंय सारे सारे तुटतील आधार तरी स्वप्नांना जगवायचंय त्या स्वप्नांचा ध्यास घेऊन वेड्यासारख त्यांमागे धावायचंय सारी सारी बंधने झुगारून फक्त एकदाच स्वत:साठी जगायचंय

आवारगी .....

लेखक यशोधन वर्तक यांनी रविवार, 26/02/2012 10:01 या दिवशी प्रकाशित केले.
ये दिल ये पागल दिल मेरा क्यू बुझ गया ...आवारगी !...इस दस्त मै एक शहर था वो क्या हुवा ....आवारगी ! कल जब मुझे बेशक्ल की आवाजने चौका दिया ....मैंने कहा तू कोन हैं ..उसने कहा .....आवारगी !!!!! गुलाम आली ने ही गझल गायली आणि आवारगी प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनली . आवारगी याची व्याख्या या ठिकाणी उनाडपणा ...म्हणजे राज कपूर च्या भाषेत " आवारा हु " अशी नाही. आवारगी याचा उर्दूतील खरा अर्थ म्हणजे मनाची संभ्रमित अवस्था. आज राज कपूरच्या नातवाचा म्हणजे रणबीर कपूरचा " रॉकस्टार " सिनेमा मी स्वाती आणि आदित्य तिघंच पाहत होतो. रणबीर ने रंगवलेला जॉर्डन बघत असताना कॉलेज च्या दिवसांची आठवण आली.