Skip to main content

आपण पहिला घोट कधी घेतला ?

लेखक कुंदन यांनी रविवार, 01/07/2012 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
"सत्यमेव जयते" मधली दारु बद्दल ची चर्चा वाचुन हा धागा काढण्याची प्रेरणा मिळाली. माझ्याबद्दल सांगायचे तर , आमच्या शेजारचे काका रोज प्यायचे , कधी कधी मला त्यांचा चखणा आणायला पिटाळायचे. एकदा त्यांचा ग्लास भरुन ठेवलेला होता अन ते जाग्यावर नव्हते तेंव्हा मी "पहिला घोट " घेतला होता. चव काही विशेष आवडली नाही, त्यामुळे मग कधी पुन्हा त्या वाटेला गेलो नाही. पुढे मग इंजिनियरींग करताना पहिल्यावर्षी चा निकाल लागण्यापुर्वी "निकालच" लागण्याच्या भीतीने २-३ दिवस झोप लागली नव्हती , त्यातुन सर्दी- खोकल्यामुळे जाम झालो होतो.

तडफड

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी रविवार, 01/07/2012 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
मंदीर मशीद मठांच्या समोर लागलेली लांबच लांब रांग भक्तांची लगबग, तगमग आणि लसलस, तिथल्या त्या दलालांची त्यांनी मांडलेला तो भक्तीचा बाजार त्यांच्या भोवती गर्दी करणारे लाचार पापाच्या ओ़झ्यातुन मुक्त होण्या साठी त्यांची चाललेली केवीलवाणी धडपड श्रध्देच्या पार चिंधड्या होउन जातात मनाची होते तडफड कधीकधी किळस वाटते या सगळ्याची, किव येते मला माझी स्वतःची खरोखर का देव देवळात रहातो, पेटीतल्या दक्षीणेला भाळतो आणि नवसाला देखील पावतो, देव खरच असा असतो? या विचाराने मी मात्र भांबावतो. जनतेला खुलेआम लुटणारे, निर्लज्ज व्यापारी, पुढारी, नोकरशहा, कारखानदार पोलीस तर होतेच पण सैनिकही म्हणे आजकाल करतात भ्रष्
काव्यरस

अंड

लेखक गोंधळी यांनी रविवार, 01/07/2012 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
मी तसा जन्मतः च शाकाहारी.लहानपनी मला मांसाहारी पदार्थांचा वास ही सहन होत नसे.घरात ज्यावेळी असे पदार्थ बनवले जात त्यावेळी मी वेगळा जेवत असे किंवा आधिच जेवुन घेत असे. पण कालांतरने व्यायाम शाळेत जावे असे वाटु लागले व ईतर मित्रांबरोबर मी ही जिम जॉईन केली. पहील्या दिवशी सरांनी माझी शरीरयष्टी पाहुन मला रोजचा खुराक लीहुन दिला.त्याप्रमाणे मला दुधातुन कच्च अंड रोज खावे लागणार होते.बापरे अंड खावे लागणार यामुळे मी थोडा अस्वस्थ होते पण मित्र व घरचे म्हणु लागले की अंड तर शाकाहारी असते.त्यांच्यावर विश्वास ठेवुन मी एकदा देवाचे नाव घेवुन ते कच्च अंड घातलेले दुध नाक डोळे बंद करुन अजिबात उलटी न करता कसे बस

गुरूबिन कौन बतावे बाट (दत्त संप्रदाय)

लेखक शरद यांनी रविवार, 01/07/2012 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
गुरूबिन कौन बताये बाट (दत्त संप्रदाय) दत्त संप्रदाय फक्त महाराष्ट्रातच आढळून येतो. थोडासा अपवाद म्हणजे गाणगापूरच्या आसपासचा कानडी मुलुख. पण महाराष्ट्रात तो एक प्रमुख पंथ आहे व नवीन पायंडा पहाता तो वाढीस लागला तरी आश्चर्य वाटावयाचे कारण नाही. " मी तुझ्या पाठीशी आहे " हा दिलासा बर्‍याच तरुणांना पुरेसा वाटतो असे दिसते. मुंबईतील स्वामी समर्थ यांच्या मंदिरात चांगली गर्दी असते. हे लोण इतर शहरात पसरणे सहजशक्य आहे. शिर्डीनंतर साईबाबांची मंदिरे इतर शहरात पसरू लागली आहेत, तसेच. आजच्या तरुण पिढीला याचे आकर्षण का वाटत आहे याचे विवेचन शेवटी करणार आहे. या संप्रदायाची माहिती आज करून घेऊं.

नर्गीसी कबाब

लेखक गणपा यांनी रविवार, 01/07/2012 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
काय मंडळी कशी झाली आषाढी एकादशी? साबुदाण्याची खिचडी/वडे, भगर , उपवासाची भाजी, हाणलीत की नाही? या तर मग कालच्या उपवासावर उतारा घेऊया. आजचा पदार्थ थोडा वेळ काढु आहे. पण जीभेचे चोचले पुरवायचे तर पेशंस हवेतच नाही का?

"प्रयास" वरून आठवलं....

लेखक मन यांनी शनिवार, 30/06/2012 19:45 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच प्रयास (http://www.misalpav.com/node/22102) वाचला. ओपरा विन्फ्रे बद्दलचा एक धागा आठवला .(http://www.misalpav.com/node/15853) विलक्षण आयुष्य, विलक्षण घटना. अधिक काय बोलणार. तसच लान्स आर्मस्ट्राँगही आठवला. उत्तम सायकलपटू, ऐन उमेदीच्या काळात(१९७१चा जन्म, १९९६ला कॅन्सरचे निदान झालेले) अवघड ठिकाणी कॅन्सर झालेला. त्याच्या उपचारानेही बराच अशक्तपणा येणार असे डॉक्टरांचे मत.