Skip to main content

वारूळ

लेखक पेशवा यांनी गुरुवार, 19/07/2012 या दिवशी प्रकाशित केले.
पावलांचे मुंगळे निघाले त्या वारुळातील योगी मंत्रामागून मंत्र उसवत राहील तर नागवे होणाऱ्या शरीराची कुठली असेल पोळणारी जात? मांडी घालून म्हणता येतात सहिष्णू शब्दरचना त्याच वेळी निराकार जनावर वेटोळे (? ) घालून रचत असते जहरोत्तम द्वंद्वगीत... सहज मनाच्या गाभाऱ्यातील समईची जखम रुंदावायला लागली की एखादी पालखी हमखास येते भोयांच्या खांद्यावरून अनेक समाप्तीच्या कथा पायउतार होतात पाठ वळवून, ती धून ऐकण्यासाठी देवळे मिटून घेतात शयनगृहाचे दरवाजे असहायपणे हेलकावे घेत राहते बाहेर कडी एक... दोन... तीन अस्वस्थ कोपऱ्यातील एखादे पिवळे वय स्वतःची कुरवाळू लागते.. ती भूक, नागडी नसते... सर्व विझायला लागले की वाटांवर कुलुपे कशी लागतात? रांगेतले सर्वजण एकाच खिडकीकडे पायांना मिठी घालून सरपटत राहतात... एक एक अवयव खाटीक वेगळा करतो वाहणारा स्राव आढेवेढे घेत नाही.. पाणलोटात जिवाच्या आकांताने मदत मागणाऱ्या कुणाची एक डॉक्युमेंट्री... रीळ गुंडाळले जाते... जाणिवा देखील ह्या साऱ्यांच्या मागे एक वेडसर दिवा तटस्थपणे फडफडत असतो.... -पूर्वप्रकाशित
लेखनविषय:

वाचने 2881
प्रतिक्रिया 20

प्रतिक्रिया

In reply to by अत्रुप्त आत्मा

हा अक्खा श्रावण हि कविता (किंवा जे काहि आहे ते) समजुन घेण्यात घालवावी म्हणतो. अर्धवटराव

हे जे काय आहे ते वाचून डॉक्यात एक वेडसर दिवा फडफडला.

In reply to by परिकथेतील राजकुमार

त्यासाठी वारुळातल्या सगळ्या मुंग्या एकत्र कराव्या लागतील, त्या कशा कराव्या याबद्दल मार्गदर्शन करावे.

भोयांच्या खांद्यावरून अनेक समाप्तीच्या कथा पायउतार होतात पाठ वळवून, ती धून ऐकण्यासाठी देवळे मिटून घेतात शयनगृहाचे दरवाजे असहायपणे हेलकावे घेत राहते बाहेर कडी
माणसाला माणूस न मानणार्‍या दांभिक धर्मांधतेवर कडाडून प्रहार करणार्‍या ओळी..
अस्वस्थ कोपऱ्यातील एखादे पिवळे वय स्वतःची कुरवाळू लागते..
व्वाह ! नवथर तारुण्याची सामाजिक सांस्कृतिक बंधनांनी होणारी कुचंबणा आणि त्यामुळे आत्मस्खलनासाठी केलेल्या प्रयत्नांतील व्याकुळता कवीने अत्यंत मार्मिकरीत्या दाखवली आहे.
सर्व विझायला लागले की वाटांवर कुलुपे कशी लागतात? रांगेतले सर्वजण एकाच खिडकीकडे पायांना मिठी घालून सरपटत राहतात... एक एक अवयव खाटीक वेगळा करतो वाहणारा स्राव आढेवेढे घेत नाही..
मानवी जीवनाच्या असहाय्यतेवर याहून जास्त परीणामकारक भाष्य करणार्‍या ओळी वाचनात आल्या नाहीत.
पाणलोटात जिवाच्या आकांताने मदत मागणाऱ्या कुणाची एक डॉक्युमेंट्री... रीळ गुंडाळले जाते... जाणिवा देखील
कळले का? समाजाच्या, आणि त्याचवेळी मिडीयाच्या व्यावसायिक, माणुसकी-हिनत्त्वावर दोनच ओळींत ताशेरे ओढले आहेत कवीने.. अत्यंत थरारक कविता..

In reply to by चिगो

आमचे श्रावणमासी श्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद. अर्धवटराव

शरदिनीताई परतल्या असं वाटलं :-)

मुंग्या आल्या.... हा अक्खा श्रावण हि कविता (किंवा जे काहि आहे ते) समजुन घेण्यात घालवावी म्हणतो. वाचल्यावर असं वाटलं की मुंग्या चावल्या... झक मारत प्रतिसाद द्यायला लावतात प्रतिसाद द्यायला लावतात! हे जे काय आहे ते वाचून डॉक्यात एक वेडसर दिवा फडफडला मस्त कविता ! आवडली ! रसग्रहण करा…तोबताबड त्यासाठी वारुळातल्या सगळ्या मुंग्या एकत्र कराव्या लागतील, त्या कशा कराव्या याबद्दल मार्गदर्शन करावे. माणसाला माणूस न मानणार्‍या दांभिक धर्मांधतेवर कडाडून प्रहार करणार्‍या ओळी.. व्वाह ! नवथर तारुण्याची सामाजिक सांस्कृतिक बंधनांनी होणारी कुचंबणा आणि त्यामुळे आत्मस्खलनासाठी केलेल्या प्रयत्नांतील व्याकुळता कवीने अत्यंत मार्मिकरीत्या दाखवली आहे मानवी जीवनाच्या असहाय्यतेवर याहून जास्त परीणामकारक भाष्य करणार्‍या ओळी वाचनात आल्या नाहीत. कळले का? समाजाच्या, आणि त्याचवेळी मिडीयाच्या व्यावसायिक, माणुसकी-हिनत्त्वावर दोनच ओळींत ताशेरे ओढले आहेत कवीने.. अत्यंत थरारक कविता.. चिगो...आपके रसग्रहण से हम चिंब चिंब भिगो आमचे श्रावणमासी श्रम वाचवल्याबद्दल धन्यवाद. अरे देवा!!!