Skip to main content

एक शांत क्षण

लेखक ई-पूर्वाई यांनी मंगळवार, 26/02/2013 14:03 या दिवशी प्रकाशित केले.
या साऱ्या कोलाहालाचा फक्त ‘समय’ एकटाच ‘गवाह’ आहे, ’Technology’ च्या महापुरात बुडाला जनप्रवाह आहे. ‘T.V’ च्या त्या अखंड भट्टीत संस्कारांची वानवा आहे, अन ‘internet’ च्या मायाजालाचा मोह हर मानवा आहे. घरच्यांपेक्षा ‘Facebook – friends’ शी बोलणाऱ्यांची वाहवा आहे, आणि सदैव ‘messengers’ वर ‘chat’ करणारा आजचा जमाना नवा आहे. या साऱ्या जंजाळात हरवला माणुसकी चा गारवा आहे, अन ५००+ ‘FB friends’ असले तरी एकटेपणा जीवा आहे. या प्रचंड कल्लोळातून एक तरी शांत क्षण हवा आहे, आपसांतल्या उदासीनतेवर तीच एक ‘दवा’ आहे.

मतदान पध्दत

लेखक NiluMP यांनी मंगळवार, 26/02/2013 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
देशाचे प्रतिनिधित्व राजकारनी करतात हे मान्य पण मतदान करून नेता निवडून देणे ही पध्दत चुक की बरोबर. माझया मते चुक आहे कारण १ मतदान पध्दतीमुळे व्होटबॅंक ही समस्या निर्माण झाली २ व्होटबॅंकमुळे शहरे बकाल झाली आणि अनैतिक धंदे वाढले ३ अनअधिकृत बांधकामे वाढून भ्रष्टाचार वाढला ४ राजकीय घराणेशाही जोर धरू लागली ५ कायदा आणि सुव्यवस्था हतबल झाली तसेच, टिव्हीवरील रिअल्टी शो आणि मतदान यातील फरक टिव्हीवरील रिअल्टी शोमध्ये आपण प्रथम परर्फामन्स पाहतो आणि मग मतदान करतो आणि मतदान प्रक्रियेत आपण प्रथम मतदान करतो जेथे परर्फामन्सची काहीच गॅंरंटी नसते तुम्हाला काय वाटते?

मी बाई होते म्हणुनी .. भाग -०४

लेखक ५० फक्त यांनी मंगळवार, 26/02/2013 07:48 या दिवशी प्रकाशित केले.
मी बाई होते म्हणुनी .. भाग -०१ http://www.misalpav.com/node/23333 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०२ http://www.misalpav.com/node/23439 मी बाई होते म्हणुनी .. भाग -०3 http://www.misalpav.com/node/23664 तिच्या नजरेतली शांतता थोडीशी विस्कटलेली होती. किंचित गर्वानं भारलेला तिचा आवाज मला ऐकु आला ' क्षत्रिय' ....

असेही...

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 26/02/2013 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार सकाळ! मुलांच्या क्लासेसची वेळ! मी न्याहरीसाठी बटाटेवडे करायला घेतलेले. त्यामुळे माझी सकाळ सोलणे, तळणे अन घोळण्यात आकंठ बुडालेली. "माझी बॅग"," माझे शुज?"," वॉटर बॉटल", अश्या आरोळ्या क्षणाक्षणाच्या अंतराने इंटेन्स होत होत्या. आम्ही दोघे किल्ला लढवण्यात गुंग. अन बघता बघता हे तिघेही बाहेर पडले. मी अजुनही वडे तळत असल्याने ते बाहेर पडल्याचे समजलेच नाही. पण मग घरातली किलबील ( हो! अस म्हणाव लागत. कितीही कलकलाट अन शब्दाशब्दाला वाद फुटत असला तरी मुल जे काही करतात त्याला किलबील अन किती गोऽऽड! असच म्हणायच असत.) बंद झाल्याच जाणवल.

दाग अच्छे होते हैं

लेखक चिखल्या यांनी मंगळवार, 26/02/2013 03:07 या दिवशी प्रकाशित केले.
मला चिखल आवडतो. दाग अच्छे होते हैं जाहिरात पण आवडते. चिखलातले कमळ देवाला चालते पण चिखल चालत नाही. मला देव(आनंद), कमळ आणि भाजपा तिन्ही आवडत नाही. कुंभार चिखलापासून भांडे बनवतो. कुंभाराचे चाक आणि बैलगाडीचे चाक दोन्ही सारखेच वाटतात मला, भांडे फुटतात पण चिखल फुटत नाही. पण माठात पाणी साठवता येते, चिखलात पाणी साठवता येत नाही, डबक्यात पाणी आणि चिखल दोन्ही साठतो, पण लोक डबक्यातले पाणी पीत नाहीत . डबक्यातले पाणी प्राणी पितात असे आई म्हणते. बाबा मला डुक्कर म्हणतात. पण मी माठातले पाणी पितो. आई माठात वाळा टाकते. वाळा वाळलेला नसतो, ओलाच असतो. पण डबक्यात घाण असते आणि चिखलसुद्धा...

आयटीच्या गोष्टी - ऑनसाईट (१)

लेखक धन्या यांनी रविवार, 24/02/2013 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
आयटीच्या गोष्टी - नमन आयटीच्या गोष्टी - ऑन द बेंच शिक्षण संपलेलं असतं. नोकरीलाही आता जवळपास दोन वर्ष होत आलेली असतात. इथे आता कामात मन लागत नसतं, डोळ्यांना तिकडचे वेध लागलेले असतात. मॅनेजरला तसं आडून आडून सुचवणं चालू असतं. मनात आशा निराशेचा हिंदोळा झुलत असतो. कारण, आयटीत नोकरीला लागल्यानंतर अगदी पहिल्या दिवसापासून ज्या गोष्टीसाठी देव पाण्यात बुडवून ठेवलेले असतात ती गोष्ट वास्तवात उतरण्याची वेळ आलेली असते.

विचारणा व तोड सुचवा

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 24/02/2013 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र हो व विशेषतः स्मार्ट मोबाईल व टॅब वापरणाऱ्यांनो, मी एल जी इ 400 स्मार्टफोन वापरतो. त्यात ‘मल्टीलिंग की बोर्ड’ हे ऎंड्रॉईड बेस्ड ऎप वापरून मराठीत ‘इन्सक्रिप्ट’ पद्धतीने लेखन करतो. पण जाड बोटांनी बारीक चौकोनी कीज दाबताना 10 पैकी 4 वेळा नको ती अक्षरे दाबली जातात. मोठ्या आकारात इतर कंपन्यांचे टॅब घेऊन त्यावर टाईप करायला सोईस्कर होते. पण त्यात गैरसोय अशी की ज्ञ, श्री, क्ष अशी युक्ताक्षरे व प्र त्र अशी जोडाक्षरे तुटक्या प्रकाराने दिसतात व विरस होतो. शिवाय ह्रस्व वेलांटी पुढील अक्षरावर पडते. जसे शशकिांत. मित्रांनो, आपण यावर काही तोड सुचवावीत.

प्रश्न !

लेखक मदनबाण यांनी रविवार, 24/02/2013 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
मेणबत्या पेटवणार्‍यांनो तुम्ही हातात मशाल कधी धरणार ? चिमुरड्यांवर होणारे बलात्कार अजुन किती काळ पाहणार ? स्फोटात लोक हल्ली रोजच मरतात,ती ब्रेकिंग न्युज असते आपण त्यात तसे मेलो नाही,यातच का आपण धन्यता मानणार ? भ्रष्टाचाराने संपुर्ण देश आपला गांजला असा राजकारण्यांच्या पंगतीत आता धुतला तांदुळ शोधणार कसा ? देशाच्या सिमेवर जवानांची क्रुरपणे मुंडकी छाटली जातात तरी सुद्धा आपण त्यांना फक्त इशारेच देत राहणार ? मंगळावर यान पाठवायचे म्हणुन मिशन आखणार पण गरिबाला घास देण्यासाठी प्रयत्न कधी करणार ? कोट्यावधींच्या देशात आता माणसाला नाही किंमत चार जण जसे जगातात तसे तुम्हीपण का जगणार ? जग

पावसाला बोलवायला हवे आता

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शनिवार, 23/02/2013 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाला बोलवायला हवे आता ------- तुझ्यासोबत पहिल्या पावसात भिजतांना तुझ्या पैंजणांची नादनक्षी मनावर कोरली होतीस त्या नक्षीतल्या कुयऱ्यांच्या चक्रव्युहात अभिमन्यु झाला होता माझा... ------- अंगणातला पारिजातकही आता फारच काकुळतीला आला आहे तुला आठवतं? पावसाची रिपरिप चालू झाल्यानंतर इवलेसे थेंब निथळणाऱ्या पारिजातकाजवळ तुझ्या ओढणीखाली ते तुझ्या सुगंधी श्वासात भिजणे . . खरचं पावसाला बोलवायला हवे आता ------- कोसळणाऱ्या धारांमध्ये खिडकीतुन हात बाहेर काढून ओंजळीतले छोटेसे तळे तुझ्या मेहंदीभरल्या हातात ओतल्यावर फक्त निखळ आनंद उरायचा माझ्या हातात --------- कुठे दडलाय तो कुणास ठाऊक? --------- नखशिखांत भिजल्
काव्यरस