शिळी जिलेबी - १
१
धीर गंभीर गाज सागराची
सोबतीला आहे बोचरा वारा
हरवून गेल्या दिशा सार्या
अन मी शोधतो आहे किनारा
२
किती ऋतू असे उन्हाळ्यात गेले
किती ऋतू तसे पावसात चिंब झाले
कळले नाही मला कधीही ते सारं
माझ्या मनात आसवांचे मेघ दाटलेले
३
डोळे पाण्याने भरून आलेले आणि
मनात आठवणींचे आभाळ दाटलेले
झाकोळून गेल्या चेहृयावर माझ्या
थर होते टोकणार्या वेदनांचे साचलेले
४
तुझ्या त्या आश्वासक शब्दांमुळे
मी स्वत:ला खूप सावरलं होतं
मन तसं भिजून आलं होतं पण
माझ्या अश्रूना मात्र मी आवरलं होतं
५
काळ वेळ कधी तशी नसतेच तशी
गुलमोहर फुलांनी बहरून यायला
मनाचंही थोडंसं असंच असतं
पुरते एक जाणी
काव्यरस
मिसळपाव
केनेथ अर्थातच केन ब्र