Skip to main content

उत्सव -शतशब्द कथा

लेखक जेपी यांनी शनिवार, 12/10/2013 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या' घरी आज बरीच वर्दळ होती ,एरवी कुणी फिरकतही नसे . पाहटेच आलेला 'तिचा' भाऊ आणि धाकटा दीर लोकामध्ये या घटनेच धार्मिक महत्व आणि पूर्वी याचा कसा उत्सव व्हायचा यावर चर्चा करत पुढची तयारी करत होते . 'तिची' ओटी भरण्यासाठी बायकांची झुंबड उडाली होती. आठ दिवसापूर्वी चेत्रागौरीला 'तिच्या' घरी कुणी हि बाई फिरकली नव्ह्ती. घरामध्ये 'तिचा' वेडा नवरा कधी नव्हे तो शहाण्या सारखा शांत बसला होता . 'तिच्या' शेजारी बसलेली 'तिची' भावजयी 'तिची' तुलना लक्ष्मिशी करत होती , धाकट्या जावेला 'तिच्या' नशिबाचा हेवा वाटत होता . असे उत्सवी वातावरण असताना ती मात्र जीवनात पहिल्यादाच मिळालेला शालू पांघरून शांत

देवी शारदेचे स्वरूप

लेखक मीराताई यांनी शनिवार, 12/10/2013 00:56 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशोत्सवाची धामधूम संपली. आता नवरात्रीची सुरु झाली. नवरात्रीचा संदर्भ प्रभू रामचंद्राच्या चरित्रातील रावणवध व लंकाविजयाशी जोडला जातो, पण तो प्रामुख्याने जोडला जातो तो देवीमहात्म्याशी. ब्रह्मा-विष्णू-महेश या तीन देवांप्रमाणे दुर्गा-लक्ष्मी-सरस्वती या तीन देवतांकडे आपल्या जीवनातील महत्त्वाच्या क्षेत्रांचे कारकत्व जोडले गेले आहे. देवी दुर्गेची उमा, सती, पार्वती, काली, चंडी अशी अनेक रूपे, त्या त्या वेळी तिने केलेले मोठया, बलाढय राक्षसांचे निर्दालन किंवा घोर कठोर तपश्चर्या यांच्या कित्येक कथा-पुराणांतून वर्णन केल्या आहेत.

दुर्गे दुर्घट भारी... एक विचार.

लेखक प्यारे१ यांनी शुक्रवार, 11/10/2013 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
गणेश विसर्जन झालं की पितृपक्ष येतो. तो संपला की लगेच प्रतिपदेला घटस्थापना होते नि आपण देवीची उपासना सुरु करतो. देवीच्या उपासनेची सुरुवात कधी झाली, का झाली, कशी झाली ह्याबाबत मला माहिती नाही. इतिहासकारांचा विषय आहे तो. असो. पुराणांमध्ये कुठंतरी सांगितल्याप्रमाणं महिषासुर नावाचा राक्षस प्रचंड मातला होता नि त्यानं सगळ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली.

विकासाची भारतीय संकल्पना-३

लेखक विटेकर यांनी गुरुवार, 10/10/2013 15:20 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्क्यात अशा प्रकारचे "एकात्म सुख" ही सुखाची भारतीय संकल्पना आहे ! अशा प्रकारचे एकात्म सुख घेण्यासाठी जीवनाचा काही एक सुसुत्र पाया असणे भाग आहे. एक विशिष्ट जीवन पद्धती असणे भाग आहे. एक अशी जीवनपद्धती, ज्यामध्ये शरीर ,मन, बुद्धी आणि आत्मा यांच्या सुखाचा परिपाक असू शकेल. अशा जीवनपद्ध्तीचा पाया म्हणजेच चार आश्रम ! धर्म,अर्थ,काम आणि मोक्ष या चार पुरुषारार्थाच्या प्राप्तीसाठी चार आश्रमांच्य पायावर आधारलेली सुखी जीवनाची बैठक ! मागे आपण पाहिल्याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचा अतिरेक सुखापासून वंचित करतो , तसेच कोणत्याही गोष्टिचा अभाव देखील मनुष्यास सुखापासून वंचितच करतो.

वन्दे मातरम का नाही??

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी गुरुवार, 10/10/2013 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रहो... २-३ दिवसापुर्वी श्री शरद पोन्क्शे यान्च्या व्याख्यानाला जायचा योग आला होता. अतिशय तळमळीने त्यानी जन गण मन आणि वन्दे मातरम मधला फरक आणि त्यामागचे भयानक राजकारण समोर आणले. ऐकुन रक्त खवळले आहे. नेहरु आणि गान्धी घराणे देशाचे मातेरे करण्यात पहिल्यापासून अग्रेसर आहेच...आई भवानीने सर्व दानवान्चा नाश करण्याची शक्ति आमच्या बाहूत निर्माण करावी हीच प्रार्थना.... बातमीचि लिन्क खाली डकवली आहे..... http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan/---/arti…

गुंता

लेखक सार्थबोध यांनी गुरुवार, 10/10/2013 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
का उदास, आज वाटे मला श्वास श्वासात, जीव हा कोंदला ll १ ll हृद्य आठवांचा, काय हा उमाळा नेत्रातूनी अश्रूंचा, हाय तोल गेला ll २ ll विराण स्मृती, करिती मनी गलबला का दिशा नित्य, गवसेना पाखराला ll ३ ll जुनाच गुंता, न सोडवी मनाला मिळे संकेत, असा नव्या वादळाला ll ४ ll अडकलो पुन्हा, जुन्या कड्या कपारीला बुजेना चिरा, जो जो मी सांधला ll ५ ll मागतो आधार, फिरुनी त्या अंबराला मज दाखवी, नव्याने निरभ्र चांदण्याला ll ६ ll - सार्थबोध

चल परत नव्याने सुरू करू सारे

लेखक पल्लवी मिंड यांनी गुरुवार, 10/10/2013 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
चल परत नव्याने सुरू करू सारे ओळख नव्हती कधीच आपली असे पुन्हा भेटू डोळ्यात येईलच पाणी माझ्या त्या अश्रुं समेच आपले अहं पण विरघळून टाकू खूप पहिले आपण हिशोबचे जगणे त्या पल्ल्याड जाऊन फक्त आपल्यासाठी जगू असेल अजूनही अल्लड बालपण आपल्यातही त्या निरागस पणाची थोडी चव चाखून पाहू चल बरोबर मिळून चालू जरासे हृदयातील स्वप्नापर्यंत पर्यन्त असेच आपण पोहोचू आयुष्यात असणारच वळणे थोडीशी गहिरी त्यातूनच आपल्या प्रेमाचा अर्थही नव्याने उमजू

वैष्णोदेवी, काश्मीर ट्रीप साठी मार्गदर्शन करा.

लेखक प्रमोद देर्देकर यांनी गुरुवार, 10/10/2013 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो, या वर्षी जाने.२०१४ ला मी वैष्णोदेवी काश्मीर, वाघा बोर्डर, ताज महल इकडे जायचे ठरवत करीत आहे. वेग वेगळ्याtours कंपनी मध्ये चौकशी करत आहे पण tours च्या किमतीमध्ये बरीच तफावत आढळली. मी इथेउन फोनेवरून काश्मिरच्याच एका Aalaa Tours Travels शी व्यव्याहार करीत आहे.
या आधी कोणी अशा tours ला जावून आलेले असतील तर त्यांना विनंती कि मला योग्य माहिती द्यावी.
दुसरे असे के इतक्या लांब आपण जातो आणि आजूबाजूची काही ठिकाणे/ स्थळे माहित नसल्यामुळे बघायची राहून जातात.

ओदिशा - ६ : पिपली आणि कोणार्क

लेखक सुधीर कांदळकर यांनी गुरुवार, 10/10/2013 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
ओदिशा - १ ओदिशा - २ ओदिशा - ३ ओदिशा - ४ ओदिशा - ५ २१-११-२०१२. सकाळी पाचच्या आधीच फटफटले होते. मी घरून येतांना विजेवरची चहाची किटली सोबत घेतली होती. एक चहा करून प्यालो. हवामान मुंबईसारखेच. त्यामुळे गार पाण्याने अंघोळ केली.