Skip to main content

जि एस पी पी व्ही

लेखक कापूसकोन्ड्या यांनी रविवार, 27/10/2013 07:53 या दिवशी प्रकाशित केले.
नामांतर पुणे विद्यापिठाचे. ही लिन्क here या बातमीत सुद्धा "ज्ञानज्योती" आणि " 'क्रांतिज्योती " असा घोळ शिर्षक आणि मुख्य बातमी यात आहेच. असो नांमांतर करताना नवीन झालेले नाव संक्षिप्त केले जाते, आणि त्याचा उद्देश सफल होत नाही.

इंद्रवज्र !

लेखक सुज्ञ माणुस यांनी शनिवार, 26/10/2013 23:53 या दिवशी प्रकाशित केले.
साल्हेर किल्ल्यावरून दिसलेले इंद्रवज्र.
सकाळची वेळ, महाराष्टातील सर्वात उंच, अजस्त्र पण हिरवागार साल्हेर किल्ला, कुठे पृथ्वी संपते आणि स्वर्ग चालू होतो याची चाहूलही लागू न देणारे उंच डोंगर आणि त्यावर उतरलेले ढग, पावसाळी वातावरण, हिरवा ब्लेझर घालून सजलेली सृष्टी, पूर्ण किल्ल्यावर फक्त दोनच भटके, पूर्णतः धुके, कोवळी सूर्यकिरणे, हलका पाऊस, डोळे आणि म

रॉयल एन्फिल्ड - चौकशी

लेखक माकड यांनी शनिवार, 26/10/2013 23:09 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार!!! रॉयल एन्फिल्ड या विषयावर कोणाला माहिती असल्यास सांगणे. मी सुद्धा रॉयल एन्फिल्ड विकत घेण्याचं ठरवला आहे. तरी क्लासिक ३५०, standard ३५० किंवा thunderbird ३५० यामध्ये चांगला पर्याय सुचवावा. दैनंदिन वापरासाठी आणि tours साठी कोणते मॉडेल्स योग्य आहेत? एकंदरीच रॉयल एन्फिल्डला लागणारा maintenance, handling या बद्दल काही अनुभव असल्यास सांगावेत हि विनंती. धन्यवाद!

आनंदाने स्वीकारेन मी

लेखक फुंटी यांनी शनिवार, 26/10/2013 22:21 या दिवशी प्रकाशित केले.
कठीण आहे तू ऑनलाईन असूनही तुझ्याशी न बोलण कसं सांगू तुला मी की मी नाही दुर्लक्ष करू शकत तुझ्याकडे.. बोलण सोप्पंय ...सहज बोलू शकतो मी तुला की नाहीये माझा उद्देश तसा काही... तरीही कळत पण नाही वळत... मन वेड होऊन धावत तुझ्याकडे... माझ्या दूर होण्याने सुखी होणार असशील तू .. तरीही आनंदाने स्वीकारेन मी ते...

फटाकेमुक्त दिवाळी

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 26/10/2013 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी हा खरा तर दिपोत्सव. त्यात हे फटाके कुठून घुसले काय समजत नाही.पुर्वी दुष्ट शक्तींना जवळपास फिरकू न देण्यासाठी ढोला सारखी वाद्ये वाजवली जायची.कदाचित दिवाळी सारख्या मंगल सणामधे दुष्ट शक्ती चा वावर नको म्हणुन फटाके वाजवण्याची प्रथा आली असावी. फटाकेनिर्मितीत वापरले जाणा-या रसायनांमुळे अनेक प्रकारचे आजार संभवतात. फटाक्यांमुळे हवा आणि वातावरण दूषित होते.त्यामुळे श्वसानाचे आजार वाढतात. ध्वनीप्रदूषणाची पातळीही वाढते. मोठ्या आवाजाच्या फटाक्यांमुळे श्रवण क्षमता कमी होते.फटाके फोडल्यामुळे कार्बन मोनॉक्साईड सारखे विषारी वायू वातावरणात पसरतात.

दिवाळीच्या निमित्ताने : वर्दीतला "तो" आणि आपण.....

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी शनिवार, 26/10/2013 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो,एव्हाना सगळीकडे दिवाळी निमित्त धामधूम सुरु झाली असेल....नवीन खरेदी,फराळाची तयारी,छान छान बेत अशा उत्साह वातावरणात ओसंडून वाहतोय....एरवी महागाईने कंबरडे मोडलेले असले तरी ह्या दिवसात माणसं जमेल तशी हौसमौज करून घेतातच. उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत गणल्या जाणाऱ्या वर्गात तर दिवाळी हे मोठेच प्रस्थ असते.

सुखाच्या शोधात.....

लेखक गजानन५९ यांनी शनिवार, 26/10/2013 13:34 या दिवशी प्रकाशित केले.
सुखाच्या शोधात..... चालताना वाटेत लागतो विसावा आयुष्याच्या संघर्षातही लागतो ओलावा, नात्यांच्या या गर्दीत कोण आपला नि कोण परका मुखवट्या मागील जेव्हा कळतो खरा चेहरा, स्वतःचा शोध घेताना संपते आयुष्यही जगायचेच राहून जाते सुखाच्या शोधापरी

थरार..... एक विलक्षण अनुभव - भाग १

लेखक गजानन५९ यांनी शनिवार, 26/10/2013 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी माझे लेखन इथे टाकत आहे. येथील हि माझी पहिलीच कथा त्यामुळे प्रतिसाद कसा मिळतोय याबद्दल भरपूर भीती आहे मनात. आशा करतो कि तुम्हा सर्वाना हि कथा आवडेल. आपला गजानन अवांतर – हि कथा इतर ठिकाणी पूर्वी प्रसिध्द केली आहे, मिसळपाव आधी माहित नव्हते गेले काही महिने इथले दर्जेदार लेख आणि एकूण साहित्य वाचून इथे हि कथा टाकायचे साहस करत आहे सांभाळून घ्या इतकीच विनंती हाये. ----------------------------------------------------------------------------------------------------------- गाड्यांच्या आवाजाने सकाळी शेखरला जाग आली वैतागून त्याने मोबाईल मध्ये पहिले तर आठ वाजून गेले हो

डोंबिवली डाटाबेस.....

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 26/10/2013 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
येत्या १७ नोव्हेंबरला दिवाळी कट्टा आयोजीत करण्यात आला आहे. साधारण पणे दर ३/४ महिन्यांतून एकदा तरी एकत्र येण्याचा मानस आहे. बर्‍याच जणांची कट्ट्याला हजेरी लावायची इच्छा असते पण वेळेवर निरोप न मिळाल्यामुळे, इच्छा आणि वेळ असून देखील, प्रत्येकवेळी ते शक्य होतेच असे नाही. त्यामुळे मला असे वाटते, की आपण एक डाटाबेस तयार केला तर? त्यात मोबाईल नं. आणि इमेल आय.डी. असेल तर प्रत्येक वेळी त्यांना निरोप हमखास मिळेल. त्याची एक एक्सेल शीट तयार करू आणि मग ती वेळोवेळी अपडेट करून ग्रुप मधल्या सगळ्यांना पाठवु. सध्या सोयीसाठी म्हणून फेसबूकवर मिपा डोंबिवलीकर कट्टा बनवला आहे.

हायकू -

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 25/10/2013 19:34 या दिवशी प्रकाशित केले.
पाठमोरी तू सळसळणारी तू मनात फडा . . . भिंतीला कान कानात गोळा प्राण वाद अबोल . . . एक मनात दुसरेच जनात हेही जिणेच . . . पान पिकले मन हिरवटले नसती नशा . . . गुलाबी गाल उत्साहाची धमाल वेळ गेलेली . . .
काव्यरस