Skip to main content

आयुष्याचे चतकोर.....

लेखक ज्ञानव यांनी गुरुवार, 07/11/2013 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
पाश्चिमात्यांनी अर्थक्षेत्र चार भागात विभागले आहे
  • नोकरी (EMPLOYEE)
  • स्वयंरोजगारी (SELF EMPLOYED)
  • व्यवसाय (BUSINESS OWNER)
  • गुंतवणूकदार (INVESTOR)
आपण म्हणतो
  • उत्तम शेती
  • मध्यम व्यापार
  • कनिष्ठ नोकरी
म्हणजे गुंतवणूकदार हा दोन्ही ठिकाणी सर्वोत्तम मानला जातो आणि नोकरी करणारा कनिष्ठ. पण उत्तम असो कि कनिष्ठ आपल्यापैकी प्रत्येकजण आर्थिक सुरक्षेची इच्छा बाळगतो आणि आर्थिक स्वातंत्र्याची स्वप्न पाहतो .

अजुन ही एकटा आहे

लेखक mohite jeevan यांनी गुरुवार, 07/11/2013 10:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी व खुशी पहिल्यादाच त्या बर्फाळ टेकडीवर आलो होतो,खुप चढती चढुन पाय दुखत होते.वरती टेकडीवर उचीवरुन दुरवरचा बर्फाळ भाग़ आम्ही न्यहाळत होतो.तेवढ्यात खुशीची नजर त्या बर्फाळ टेकडीच्या खाली नजर ग़ेली,आणि तिच म्हणाली,'आता आपण खाली घसरग़ुडीच करत जाऊया,' मी ही हो म्हणालो, आणि दोघांनी एकमेकाचा हात धरला व हाळुहाळु करत खाली निघालो जस जसे खाली जाऊ आमचा वेग़ वाढत होता,तरीही आम्ही हात सोडला नाही आणि जस जसे वेग़ वाढत होता कानात वार्याच आवाज येत होता,त्या वेग़ातच खुशी त्या उत्साहात ओरडत होती,वेग़ वाढतच होता आता कोठे आम्ही टेकडीच्या मध्यावर आलो होतो,बर्फाचे घर्षण स्पष्ट जाणवत होता,आता काही अंतरच राहीले होते पण आचानक

तू गेलीस मला सोडून....

लेखक वडापाव यांनी गुरुवार, 07/11/2013 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
तू गेलीस मला सोडून म्हणून मी जगायचं थांबलो नाही तू लांबवलंस मला तुझ्यापासून म्हणून मी तुझ्यापासून लांबलो नाही तरी पुढे करायचं काय ते कळेना मला माझंच मेलेलं मन मिळेना मला मन कुठेतरी हरवलं होतं, आणि काय करायचं ते वेंधळ्यासारखं मी मनातल्या मनातच ठरवलं होतं काय करायचं होतं आयुष्यात ते मला आठवेना मेंदू बधिर झाला माझा, एकही ऑर्डर पाठवेना कल्पकता मेली माझी, डोळे मिटले की तू दिसायचीस स्वप्नांनाही कंटाळलो मी, कारण त्यांतही तूच असायचीस मी हसलो, की तुझं हसू आठवायचं मी रडलो, तरी तुझं हसूच आठवायचं तुझ्या डोळ्यातली आसवं मला ना कधी बघवत होती तुझ्या हस-या चेह-याची आठवणच मला जगवत होती. तू भांडायचीस तेव्हा मी

निसर्गाला काही फरक पडत नाही!!!!!!!!!!!!!

लेखक वडापाव यांनी बुधवार, 06/11/2013 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
जन्मलो तेव्हा मला खूप अक्कल होती, कारण तेव्हा मला माहित होतं, हे जग किती घाण आहे ते. म्हणून तर आल्या आल्या रडायला लागलो. पण घाणीत राहून आपणही घाण होतो म्हणून असेल, किंवा मी रडून रडून कंटाळलो असेन, म्हणून असेल - मी रडायचा थांबलो. मग वय हळू हळू वाढत गेलं आणि अक्कल भराभरा कमी होत गेली. मग पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागली. नर्सरी म्हणू नका, शिशुवर्ग म्हणू नका, शाळा म्हणू नका, कॉलेज म्हणू नका... सगळं पालथं घातलं. आणि आत्ता कुठे, मी गमवलेल्या अकलेचा एखाद-टक्का परत मिळवल्याची जाणीव होत्येय. इथे निसर्गाचा एकच कायदा आहे, 'आपण जगायचं, दुस-याला मारायचं. सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट!!

जपू एकट्याने घडी जीवनाची...

लेखक आनंदमयी यांनी बुधवार, 06/11/2013 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
नको ओढ ती रे कुणाची,कशाची जपू एकट्याने घडी जीवनाची नको फार गुंता आता जीवनात नको अडकणे रे कुणात,कशात पुरे जाहले रोज झुरणे अवेळी पुरे जाहले आठवांचे उसासे तुझ्यासाठी मी झेलले दाह सारे आता सावरू दे मनाला जरासे कधी बंध तुटले,कळलेच नाही मला तू,तुला मी उमगलेच नाही आता ओढ अश्रूंत वाहून गेली सुखाची मनाशी चुकामूक झाली गड्या व्यर्थ हे प्रेम,सारेच खोटे क्षणांना उगा जाणिवांचे धपाटे आता ना तमा रे कुणाची,कशाची जपू एकट्याने घडी जीवनाची... © अदिती

मिस्त्री-मेहतां नी उधळलेली मुक्ताफ़ळे आणि ती चोखण्यातच धन्यता मानणारे मराठी महाभाग !

लेखक कुमारकौस्तुभ यांनी बुधवार, 06/11/2013 14:17 या दिवशी प्रकाशित केले.
सुकेतु मेहता नावाच्या या माणसाने त्याच्या MAXIMUM CITY ( BOMBAY LOST AND FOUND) या पुस्तकात THE 1992-1993 RIOTS या नावाच्या प्रकरणात खालील मुक्ताफ़ळे मराठी माणसांच्या नावाने उधळलेली आहेत. त्यातील काही भाग हा मुळ व अनुवादा सहीत खालील प्रमाणे आहे. या संपुर्ण पुस्तकात या माणसाचा मराठी माणसांविषयी असाच विकृत दृष्टीकोण भरलेला आढळतो. The Shiv Sena is made up mostly of Maharashtrian Hindus, who call themselves “sons of the soil.” The Maharashtrians were people who had been born here and were not consumed by immigrant striving:a race of clerks.

अर्थक्षेत्र.....एक उपेक्षित क्षेत्र

लेखक ज्ञानव यांनी बुधवार, 06/11/2013 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी ते मे महिना कसली नि कसली शिबिरे चालू असतात. व्यक्तिमत्व विकास शिबीर, क्रिकेट शिबीर, टेनिस शिबीर, तबला पेटी नृत्य गायन ह्याचा रतीब चालूच असतो म्हणजे पर्यायाने खेळ गायन पाककृती कलादालन (मीपवारही अर्थ दालन असावे असे वाटते.) वगैरे बरेच काही विषय पैसे देऊन हाताळले जातात. बरे पालक पण किती चोखंदळ असतात देव जाणे कारण शेजारचा जातो म्हणून माझा जातो इथपासून ते "आहो तेवढाच आम्हाला मोकळा वेळ मिळतो!!" पर्यंतची मुक्ताफळे मी पालकांकडून ऐकत आलो आहे.

नियोग ही परंपरा असलेला समाज आणि विकी डोनर सिनेमा ची गरज !

लेखक कुमारकौस्तुभ यांनी मंगळवार, 05/11/2013 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
विकी डोनर सिनेमा विकी डोनर या चित्रपटात असे पात्र दाखविले आहे की ज्याचा व्यवसाय पैसे घेउन वीर्य विकणे हा आहे. आणि त्याच्या वीर्याचा वापर अपत्यहीन जोडप्यांना मुल व्हावे यासाठी केला जातो.या चित्रपटाद्वारे एक संदेश देण्यात आला आहे की अशा प्रकारे आपले वीर्य विकणे यात काहीही गैर नाही आणि याने अपत्यहीन जोडप्यांच्या आयुष्यात मुल यायचा मार्ग मोकळा होतो आणि त्यांचे जीवन आनंदी होते.

हिंदुस्थानचे मंगळ अभियान आणि सामान्य नागरिकांचे जीवन !

लेखक मदनबाण यांनी मंगळवार, 05/11/2013 17:24 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या देशाने मंगळावर यान पाठवले आहे ही बातमी आता तुम्हा सर्वांना माहित झालीच असेल... तर सर्व प्रथम मी त्या सर्व शास्त्रज्ञ मंडळी / तंत्रज्ञ यांचे अभिनंदन करतो ज्यांनी त्यांची बुद्धीमत्ता वापरुन ही योजना साकरली आहे. - - - पण मला या निमित्त्यानी काही प्रश्न विचारावेसे वाटत आहेत, तुम्हालाही काही प्रश्न विचारावेसे वाटत असतील तर हा धागा त्यासाठीच टाकला गेलेला आहे. १) आपल्या देशाला $172 billion debt आहे जे मार्च २०१४ पर्यंत देय आहे.

आपण ग्रेट आहोतच !

लेखक सुधीर मुतालीक यांनी मंगळवार, 05/11/2013 12:18 या दिवशी प्रकाशित केले.
१५ ऑगस्ट २०१२ चे पंतप्रधान मनमोहनसिंघ यांचे भाषण मला आठवते. बहुदा विज्ञान, तंत्रज्ञान या क्षेत्रातल्या घोषणा लक्षात राहतात. कारण या दोनही क्षेत्रातल्या माझ्या देशाच्या घोडदौडीचे मला नेहमी कौतुक वाटते. १७५० साली ब्रिटन मध्ये सुरु झालेली औद्योगिक क्रांती तंत्रज्ञानाची सुरुवात मानली तर सुमारे दोनशे वर्षांनी म्हणजे सुमारे १९५० साली आपल्याकडे स्वत:च्या तंत्रज्ञानाची सुरुवात झाली. डॉ भाभा, जमशेदजी आणि नेहरू या त्रिकुटाचे प्रत्येक स्वकीयाने आभारच मानले पाहिजेत.