ज्याचे करावे भले.....
भिकाऱ्यांच्या त्रासाने गणपतराव त्रासले होते. जेथे बघावे तेथे भिकारी. ह्या भिकाऱ्यांचे करायचे तरी काय?असा प्रश्न गणपतरावांना पडला. सकाळी ऑफिसला जायला निघाले तर नाक्यावरचा भिकारी पैसे मागायचा.त्याचे झाले कि ट्रेनमध्ये कळकट भिकारी अंगचटीला येवून पैसे मागायचे कि त्यांच्या जवळकी पेक्षा पैसे देणे गणपतरावांना प्रशस्त वाटायचे.गणपतरावांचा मूळ स्वभाव हा भिडस्त होता. लोक काय म्हणतील याची त्यांना नेहमी भीती वाटत असे. इतर माणसे जशी भिकाऱ्यांना हाकलून लावत, खर्जातला आवाज काढून त्यांच्यावर ओरडत ते काही केल्या गणपतरावांना जमत नसे. त्यामुळे ह्या भिकाऱ्यांच्या त्रासापासून त्याची सुटका काही होत नसे.
मिसळपाव
आमचा अरुणाचलमधून परतीचा प्रवास सुरु झाला.