मत्कविता चालली ही!
मनवनात पातलीस..
मन्मनात मधुगडबड
मन्मानस-हंसिनीस
हृत्कोमल मधुबडबड!
(मत्कविता चालते ही
आगगाडी जर धडधड
मद्रसिका का करिसि
व्यर्थ अशी ती रडरड ?)
: मिलिंद पदकी
काव्यरस
कुरुडुमळे आणि मुलबागल
कुरुडुमळे हे कोलार जिल्ह्यातील एक छोटेसे गाव, बेंगलोरपासून अवघ्या १०० किमीच्या आत. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच. कौडिण्य ऋषींनी येथे एका टेकडीवर तपश्चर्या केलली. बेंगलोरहून कोलार आणि तेथून जवळपास तीस किमी हायवेवर जायचे. मुलबागल हायवे सोडून तीन किमीवर आगे. मुलबागालहून कुरुडुमळे अवघ्या आठ किमॆवर आहे..
ह्या गावात एक गणपतीचे आणि एक सोमेश्वराचे मंदिर आहे.
गणपतीची मूर्ती अंदाजे बारा (काहि ठिकाणी चौदा लिहिले आहे) फूट उंचीची असून एका अखंड शाळिग्राम दगडात कोरली आहे. ही मूर्ती किती जुनी आहे ह्याची कुठेही नोंद नाही. चौदाव्या शतकापर्यंत हा गणपती उघड्यार होता.
ढ
ढ
आळस देत मान वर काढता आली असती
जग म्हणजे काय ते बघता आलं असतं
हुशारपणाचं ओझं जरा हलकं झालं असतं
कधी वाटतं ढ असतो तर बरं झालं असतं ||धृ||
पुस्तकांच्या उगाचच राशी जमल्या नसत्या
गणित बिणीत गोष्टी मुळीच गमल्या नसत्या
धरल्या असत्या रोज खपल्या हाता पायांवर
क्रिकेट खोखोच्या मॅचेस रोज रंगल्या असत्या
कट्ट्यावर मग गप्पा मारत बसता आलं असतं ||१||
शाळेपुरतीच नसते हुशारपणाची जोखड
नोकरीमध्ये सुद्धा होत रहाते धडपड
डिग्र्या हव्या, पोझिशन हवी, पैसे हवे नाही का!
हुशार असून वाया गेला लागायला नको शिक्का
तेंव्हा वाटत असून बरंच काही करता येत नसतं ||२||
ढ असणं कधी कधी वरदानच मुळी असतं
तुमच्याक
काव्यरस
हात झाले काळे!
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे नाव बुधवारी कोळसा खाण घोटाळ्यात आरोपी म्हणून निश्चित झाले आहे. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात २००५ मध्ये कोळसा खाणींचे वाटप झाले होते. कुमारमंगलम बिर्ला यांच्या हिंदाल्को समूहास ओडिशातील तालिबारा दोन व तीनमधील खाणींचे वितरण करण्यात आले होते. यात गैरव्यवहार झाल्याचा ठपका सीबीआयने ठेवला होता. त्यात मनमोहन सिंग यांना आरोपी करण्यात आले नव्हते. गतवर्षी ऑगस्टमध्ये सीबीआयने सादर केलेला 'क्लोजर' अहवाल न स्वीकारता न्यायालयाने मनमोहन सिंग यांचा जबाब नोंदवण्याची सूचना केली होती. या पाश्र्वभूमीवर मनमोहन यांना बुधवारी विशेष न्यायालयाने 'आरोपी' म्हणून समन्स पाठवले.
पुण्यनगरी !
पुण्यात नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. मित्रासोबत कोथरूड डेपोपासून चांदणी चौकात जायचे होते.
एका गृहस्थाला रस्ता विचारला. ते चांदणी चौकाकडे बोट दाखवून म्हणाले," तुम्ही इथून खाली जा."
समोरचा रस्ता बघून मित्राने अतिशय निरागसपणे विचारले, "मामा, रस्ता तर वर चाललाय हो ! खाली कसं जायचं?"
ते गृहस्थ चिडून म्हणाले," मला मामा बनवू नको. जायचं असेल तर जा मुकाट्याने"
आम्हा दोघांनाही कळत नव्हतं की नेमकं काय चुकलं. प्रश्न की नातं ?
काही दिवसांनी आमच्या रूमवर स्वयंपाक करायला येणाऱ्या 'मावशी' जरा उशीरा आल्या.
पासवर्ड कसे सांभाळावेत
इमेल -पासवर्ड
इमेल आणि इतर नेटवर्क साइटस यांचे पासवर्ड तसेच काहींचे सिक्यूअरटी क्वेश्चन वगैरे कुठे साठवायचे? कसे लक्षात ठेवायचे? लिहून ठेवणे योग्य होईल काय? कृपया माहितगारांनी आपले उपाय सुचवावेत.
एक संवाद - १
एक नामांकीत सॉफ्टवेअर कंपनी. संगणकावर चॅटींग सोफ्टवेअरवर चालू असलेला संवाद -
तो - हाय
ती - हेलो
तो - कधी आलीस ?
ती - आत्ताच आलीय. १५ मिनिटे झालीत. ट्राफिक जास्त होते आज.
तो - ओके, चहा झाला का?
ती - नाही जातेय आता.
तो - मीपण जातोय चहासाठी, कँटीन मध्ये येतेयस का?
ती - नाही मी जागेवरच चहा घेऊन येतेय.
तो - ठीक आहे. डब्यात काय आणलं आहेस ?
ती - कालचा उरलेला भात होता त्याला नवऱ्याने फोडणी दिली, तोच घेऊन आलेय.
तो - ओके. लकी आहेस.
ती - का ? तुला नाही का करून दिले काही बायकोने?
तो - तीचे जाउदे गं…. तुला माहीत आहे ना.
दीक्षितांचा दणका
भ्रष्ट ,अन्यायी आणि कुणालाही आपल्या पाशवी शक्तीने चिरडून टाकण्याची क्षमता असणारी सिस्टम आणि या सिस्टम विरुद्ध उभा ठाकलेला एक सर्वसामान्य माणूस. हा लढा अर्थातच खूप विषम आहे . पण सगळ्यात भारी गोष्ट ही की कधी कधी या युद्धात सर्वसामान्य माणूस पण जिंकू शकतो . प्रचलित सर्वशक्तिमान व्यवस्थेने कितीही आसुरी बळाचा वापर केला तरी . या लढ्यात रोजच्या अवघड जगण्याला पिचलेली आणि कुठल्याही कामासाठी चिरीमिरी द्यावी लागणारी जनता नेहमी व्यवस्थे विरुद्ध उभा ठाकलेल्या माणसाच्या मागे उभी राहते हा जागतिक नियम .
मिसळपाव