Skip to main content

दुलई.......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 03/03/2015 15:31 या दिवशी प्रकाशित केले.
परवा दोशी फाऊंडेशनच्या नाट्यमहोत्सवाला जाण्याचा योग आला. त्यात शेवटच्या दिवशी नासिरुद्दीन शाह, रत्ना शाह व हिबा शहा यांनी सादर केलेल्या इस्मत चुगताईंच्या कथाकथनाचा कायम लक्षात राहील असा कार्यक्रम झाला. या तिघांनी त्या कथा त्यांच्या अभिनयाची जोड देऊन इतक्या बहारदारपणे सादर केल्या की बस ! अर्थात नासिरुद्दीन शाहच्या दिग्दर्शनाचा त्यात मोठा वाटा होता हे नाकारण्यात अर्थ नाही. पण सगळ्यात मोठा वाटा होता त्या कथांचाच. आता खाली मी इस्मतआपाची एक कथा मराठीत अनुवाद करणार आहे ती त्यांनी १९४२ साली लिहिली. बाई मोठ्या हिंमतवान, समाजावर ढोंगीपणासाठी हलक्या फुलक्या विनोदाने टीकेचे आसूड ओढत.

आम आदमी पक्षातील दुही......

लेखक निनाद जोशी यांनी मंगळवार, 03/03/2015 14:00 या दिवशी प्रकाशित केले.
आम आदमी पक्ष एक फार मोठा विजय मिळवून दिल्लीच्या गादीवर बसला. श्रीयुत केजरीवाल हे गाजावाजा करत मुख्यमंत्री झाले. परंतु लगेचच ह्या पक्षाला ग्रहण लागेल असे वाटू लागले आहे. पक्षाचे मुख्य रणनीतीकार समजले जाणारे योगेंद्र यादव आणि उच्चशिक्षित, यादव ह्यांच्या इतकेच महत्वाचे असलेले प्रशांत भूषण ह्यांना पक्षातून काढले जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. असे झाल्यास आप मध्ये मोठी फुट पडण्याचा संभव आहे. असे घडल्यास आप दिल्ली नीट सांभाळू शकेल असे वाटते का??? का पुन्हा मागील प्रसंगाप्रमाणे केजारीवालांना मुख्यमंत्री पद सोडावे लागेल.

कॅपिटल गेन- काथ्याकुटातून माहिती हवी.

लेखक चौकटराजा यांनी मंगळवार, 03/03/2015 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझा फ्लॅट विकण्याच्या बेतात आहे. तो मी १९८८ मधे एक लाख ५ हजाराला घेतला. त्यांची इंडेक्सेशन प्रमाणे आता किंमत साधारण ७ लाख होते आहे. पण तो २४ लाखाला विकला जात आहे. म्हण्जे मला २४ वजा ७ बरोबर १७ लाख रूपये ३ वर्षासाठी ६ टक्के दराने बॉन्ड मधे गुंतवावे लागतील तर माझा २० टक्के कॅपिटल गेन टॅक्स वाचेल. आता माझा प्रश्न असा की... अ) जर मी काही सुधारणा या जागेत केली असेल तर त्याच्या सुधारणा खर्चाची इन्डेक्स कॉस्ट मी ७ लाखात भर टाकून १७ लाखास समजा १५ लाखापर्यंत खाली आणू इच्छित असेन तर ही किंमत कोण ठरवणार?. माझ्या माहिती प्रमाणे ही किमतीचे सर्टीफिकेशन सी ए देतात पण ते चूक आहे.

विज्ञान कथा: "शापित श्वास!"

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 03/03/2015 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
पृथ्वीवरचा निसर्ग-बिंदू वेगाने आकाशात चालला होता. तो काळोख्या अनंत आकाशात एका अज्ञात ठिकाणी खूप दूरवर पोहोचल्यावर त्यापासून पाच बिंदू वेगळे झाले- पृथ्वी, अग्नी, वायू, पाणी आणि आकाश! ही पंचमहाभूते एका महत्त्वाच्या चर्चेसाठी आणि निर्णय घेण्यासाठी एकत्र आले होते. ते पाचही बिंदू तरंगत होते. अग्नी ने हसतच बोलायला सुरुवात केली, म्हणाला, "कमाल आहे माणसांची! पृथ्वी च्या अंताबद्दल त्यांनी चित्रपट बनवून देखील टाकला. २०१२. पण ते वर्ष उलटून गेले आणि त्याप्रमाणे झालेच नाही. बिचारी माणसे, त्यांना वाटत आहे की विज्ञानामुळे आपण निसर्गावर सुद्धा मात केली आणि निसर्ग आपला अंत कसा करेल हे सुद्धा आपण ठरवू.

थ्रील.....!!!!!

लेखक एक एकटा एकटाच यांनी सोमवार, 02/03/2015 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी काही काही आठवणी आपला कधीच पिच्छा सोडत नाहीत. अगदी सावलीसारख्या आपल्याशी जोडल्या गेल्या असतात. अशीच एक आठवण माझ्याही आठवणीत आहे. जी आजही मला रात्रीची झोपू देत नाही. आजही ती रात्र माझ्यासमोर अगदी जशीच्या तशी उभी आहे. आजही तो झाला प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो. माझ नाव अमोल परब. गोष्ट तशी साधारण दहा बारा वर्षापूर्वीची. मी नुकताच बी.ई. पास आऊट झालो होतो. ते ही फर्स्ट क्लास विथ डिक्टिंशन. भरीसभर म्हणून मुंबई युनिर्व्हसिटीमधुन तिसराही आलो होतो. घरच्यांच्या आणि खासकरून बाबांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. ते फार खुश झाले होते.

वरुणदेवाचे पहिले दर्शन.....

लेखक निनाद जोशी यांनी सोमवार, 02/03/2015 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
परवा यावर्षी पहिल्यांदा वरुण देवाने दर्शन दिले. त्या आधी हि तो आला होता. पण का कुणास ठाऊक एखादा पोस्टमन जसा हळूच दरवाज्यातून पत्र टाकून दुसऱ्या घराकडे वळतो , तसाच तो आला आणि आपल्या जलधारांची छोटीशी पिशवी रिती करून गेला. सकाळी जेव्हा उठलो तेव्हा जाणवल कि काहीतरी वेगळ वाटतंय. जीवाची होणारी तगमग , अंगाची होणारी लाही लाही अचानक कमी झाली होती .हवेत एक प्रकारची प्रसन्नता आली होती. बाहेर येऊन बघतो तर सर्व अंगणभर पाणी !!!! म्हणतल हे केव्हा झालं ???? काही न कळवता ,काही संकेत न देता पाहुणा आला अन गेला ही !!!! असं का केल असावं त्याने ?

“माझी जडण घडण”

लेखक सुचिकांत यांनी सोमवार, 02/03/2015 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझे वडील इतिहास आणि गणिताचे शिक्षक आहेत. पण इंग्रजी व्याकरणावर सुद्धा त्यांची चांगली पकड आहे. मी शाळेत असताना त्यांनी माझ्याकडून active voice - passive voice, affirmative, negative हे सगळे प्रकार पक्के करून घेतले होते, आणि त्यांनी शिकवलेल्या इंग्रजीचा मला आयुष्यभर फायदा झाला. अभियांत्रिकी डिप्लोमा झाल्यावर, माझ्याकडे नोकरी नव्हती. घरात किती दिवस बसून काढणार? काहीतरी करायला हवं म्हणून हात पाय मारायला सुरुवात केली. मोजून १७ ठिकाणी कॉलसेंटरच्या मुलाखती दिल्या. प्रत्येक ठिकाणी शेवटच्या HR मुलाखती पर्यंत गेलो, आणि HR ने हे सांगून मला नकार दिला कि, तुमच्या इंग्रजी भाषेवर मातृभाषेचा प्रभाव आहे.

फन एंड फ़ेअर

लेखक अद्द्या यांनी सोमवार, 02/03/2015 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
हा एक लई भारी प्रकार असतो . गेली कित्येक वर्षे गेलो नवतो . मला वाटतं , ६-७वीत असेन. शेवटचा अशा कोणत्या गोष्टीला गेलो असेन कोणाबरोबर ते. . गावात दर वर्षी उन्हाळ्यात आधी सर्कस आणि मग फन फ़ेअर , काही ना काही येतच . नोवेंबर डिसेंबर पर्यंत डेरा असतो या लोकांचा गावात . घरी लहान बहिण या दोन्ही पैकी एकी कडे जाण्याबद्दल मला विचारून विचारून कंटाळून रडून शेवटी माझा नाद सोडून द्यायची . प्रत्येक वेळी तिला म्हणायचो . मोठी झालीस आता . लहान मुलांचे नाद सोड . पण तरीही त्यादिवशी पोचलो तिथे . काय आहे . बहिणीला नकार देणे सोप्प असतं हो . पण समोर एक अति गोड प्रकारात मोडणारी मुलगी थांबली अहे.

विज्ञान कथा: "अपूर्ण स्वप्न"

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 02/03/2015 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
शंभू शेवाळे हा माझा परम मित्र. पुण्यात असतो. मी मुंबईला बँकेत नोकरीला लागलो आणि मध्यमवर्गीय मानसिकतेतून आपला संसार सांभाळायला लागलो. माझी पत्नी घर सांभाळते आणि मला आठ महिन्यांचा मुलगा आहे. शंभू लहानपणापासून संशोधक वृत्तीचा. त्या वृत्तीमुळेच तो आज मोबाईल अॅप्लीकेशन बनवणार्‍या एका कंपनी चा मालक बनला आहे. अजूनही तो स्वतः अनेक अॅप बनवत असतो. मला लहानपणापासून अंतराळवीर बनण्याचे स्वप्न होते. आकाशातल्या ग्रहतार्‍यांचे खूप आकर्षण वाटे. अर्थात परिस्थिती मुळे स्वप्न पूर्ण होवू शकले नाही.