Skip to main content

रामायण – कथा अहल्येची – न्यायासाठी संघर्ष.

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 30/03/2015 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
(श्रुती आणि स्मृती परंपरेने आपले धार्मिक ग्रंथ, वेद, उपनिषद, रामायण, महाभारतासारखे महाकाव्य एका पिढी पासून दुसर्या पिढी पर्यंत पोहचत आले आहे. सर्वच ग्रंथांमध्ये प्रक्षिप्त भाग आहेतच. रामायण ही त्याला अपवाद नाही. काळानुसार आणि प्रत्येक कालखंडाच्या परंपरेनुसार रामायणात परिवर्तन झाले असेल. बालकांडच्या ४८ व ४९ सर्गात अहल्या उद्धाराची कथा आहेत. त्या वेळी काय घडले असेल. वाल्मिकींचा रामकथा लिहिण्याच्या उद्देश्य काय होता, हे कळले तर आपण सत्य शोधू शकतो. आज काही तथाकथित बुद्धिमान रामायण, महाभारतातील गोष्टींना विकृत स्वरूपात प्रस्तुत करण्याचा प्रयत्न करतात.

गवसणी.(चारोळ्या)

लेखक प्रल्हाद दुधाळ. यांनी शुक्रवार, 27/03/2015 16:41 या दिवशी प्रकाशित केले.
गवसणी.(चारोळ्या) शिकविलेस स्वाभिमानी जगणे, माणुसकीने जिंकण्याचा ध्यास... संकटातही आई शोधेन संधी, घालेन गवसणी मी गगनास..!! प्रीती तुझी ही संजीवनी मजला, अर्थ नव्याने आला या जगण्यास.... साथीने या जीवन मंगल गाणे, घालेन गवसणी मी गगनास..!! मांडला डाव वारंवार मोडला हिरावला आलेला तोंडाशी घास... लढाई जगण्याची पुन्हा नव्याने घालेन गवसणी मी गगनास..!! माणसांना अनुभवले इतके, समृद्ध समर्थ केले जीवनास.... साथीत जगतो समरसतेने, घालेन गवसणी मी गगनास..!! ......प्रल्हाद दुधाळ

संस्कृत सुभाषिते -२

लेखक शरद यांनी शुक्रवार, 27/03/2015 11:38 या दिवशी प्रकाशित केले.
संस्कृत कवी पंडित होते. त्यांना धर्म, तत्वज्ञान, काव्यशास्त्र इ. चे चांगले ज्ञान होते. पण हल्लीच्या विद्वानांप्रमाणे ते हस्तिदंती मनोर्‍यात रहात नव्हते. सामान्य माणसाबद्दल त्यांना कणव होती. वाटसरू उगीचच लुटला जाऊं नये म्हणून एकाने दिलेली धोक्याची सुचना पहा कामिनीकायकान्तारे स्तनपर्वतदुर्गमे ! मा सन्चर मन:पान्थ ! तत्रास्ते स्मरतस्कर: !! (कांतार ...अरण्य, पान्थ ....वाटसरू, स्मरतस्कर ....मदन नावाचा चोर) असे त्यांचे (मदतनीसाचे) सल्ले आपण पुढेही पहाणार आहोतच. आज एक नवीन दिशा दाखवावयाची आहे. संस्कृत कवी व उर्दु शायर यांच्यामध्ये काही शतकांचे अंतर. पण दोघांचेही एका बाबतीत एकमत दिसून येते.

एक जिलबी पाडायचीच

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 27/03/2015 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
नेहमीच विचारजन्य, चिंतनजन्य साहित्यच का मिपा वर पोस्ट करावं म्हटलं... आज वैताग आलाय, कंटाळा आलाय, अशात काही सुचतं का बघावं म्हटलं... यमक जुळतं का बघावं म्हटलं... तर ही घ्या एक ओढून ताणून जिलबी a सगळे जसे सोडतात तशी आपण एक सोडायचीच आज काहीही झालं तरी एक जिलबी पाडायचीच कुणी म्हटलंय भावना इस्त्रीमधेच शोभतात आणि असल्या तरीही म्हटलं आज इस्त्री मोडायचीच आठवणींना चाळवायचं, भविष्याला आळवायचं कशीतरी मनावरची एक खपली काढायचीच अनेक विचार कीबोर्डवरती रेंगाळलेले होते एंटर मारून म्हटलं मी आज भिंत तोडायचीच होईल बहुदा पानिपत,

कौटुंबिक राजकारणात बैलाचा बळी!!

लेखक निमिष सोनार यांनी शुक्रवार, 27/03/2015 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
हे जग विरोधाभासाने, दांभिकतेने आणि दुटप्पीपणाने भरलेले आहे. हे जग फक्त बळीचा बकरा शोधत राहते. दोष देण्यासाठी! विशेषतः भारतीय सामाजिक आणि कौटुंबिक जीवन हे दुटप्पीपणाचे मोठे आगार आहे. जो मुलगा लग्नाआधी आई वडिलांच्या शब्दाबाहेर नसतो आणि ज्याला स्वतंत्र विचार करण्याची सवय न लावता फक्त आई वडील सांगतील तेच ऐकायची सवय लावली जाते, त्याने लग्नानंतर बायकोच्या योग्य गोष्टी ऐकल्या तर त्याला बायकोचा बैल म्हटले जाते. मग तो आधी आई वडिलांचे ऐकत होता तेव्हा तो "बैल" का नसतो? लग्नानंतरच अचानक त्याचे बैलात रूपांतर कसे होते?

अंजिराचा चिक आणि औषधोपचार

लेखक संदीप डांगे यांनी शुक्रवार, 27/03/2015 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या आवारात अंजिराचं झाड आहे. ते अगदी फाटकाला लागून आहे. त्याचा वाढायचा वेग आणि पसारा प्रचंड आहे. त्यामुळे आम्हाला ते सारखं छाटत राहावं लागतं. नाहीतर ते फाटकातून यायला जायला अडथळा करू लागतं आणि वर त्या झाडाच्या अगदी डोक्यावर विजेच्या तारा आहेत. त्यामुळे ते सरळही वाढू देऊ शकत नाही आणि आडवंही. त्याला भरपूर पाने येतात आणि कसली तरी पांढरी चिलटं भरमसाठ प्रमाणात पानांच्या खालच्या बाजूला गर्दी करतात. जणू उलट्या बाजूने बर्फवृष्टी झाली असावी सगळ्या झाडावर. ती चिलटं संध्याकाळ झाली की घरात घुसायला बघतात. ती चिलटं खूप बारीक आणि पीठासारखी अंगाला चिकटून बसणारी.

किन्नर - बृहन्नडा

लेखक अत्रन्गि पाउस यांनी गुरुवार, 26/03/2015 22:28 या दिवशी प्रकाशित केले.
किन्नर बृहन्नडा किंवा मुंबईच्या भाषेत हिजडे किंवा छक्के ... अलीकडे ह्यांचा वावर ठाण्यातील विशिष्ट भागांमध्ये फारच वाढला आहे (किंवा निदांन मला तसे वाटते आहे)... त्यांच्या बीभत्स दर्शनापलीकडे त्यांच्याकडे एक माणूस म्हणून बघण्याची आणि जाणून घेण्याची इच्छा आहे आणि म्हणून हा धागा ... १. हे लोक काही पुरुषी स्त्रिया आणि बायकी पुरुष ह्यांच्यापेक्षा किंवा सामान्य स्त्री किंवा पुरुषांपेक्षा नेमके काय वेगळे असतात ... २. ज्या स्वरुपात ते सतत लोकांसमोर येतात ते तसे का ? ३. भारता बाहेर हे लोक्स दिसत नाहीत हे कसे ? कुणी ह्यावर गंभीरपणे सत्य सांगू शकेल का ?