Skip to main content

मगरीचा वावर

लेखक अत्रन्गि पाउस यांनी सोमवार, 23/03/2015 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
हि बातमी वाचल्यावर विशेषत: त्यातील खालील परिच्छेद वाचून मी स्तंभित झालोय आतापर्यंत या मगरीने कोणत्याही माणसावर किंवा प्राण्यांवर हल्ला केलेला नाही.

हनी केक - मसाला मारके (Gewürzter Honig Kuchen)

लेखक मधुरा देशपांडे यांनी रविवार, 22/03/2015 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
बेकिंग आणि केक्सच्या पाककृतींचे एक पुस्तक बरेच दिवसांपासून कपाटात आहे असा साक्षात्कार शनिवारी रात्री अचानक झाला. मग बघुयात काही करता येतंय का म्हणून चाळायला सुरुवात केली आणि Gewürzter Honig Kuchen (Honey Cake) ची पाकृ वाचताना लक्षात आले की बहुतांशी सगळे साहित्य हे आपल्या भारतीय स्वयंपाकातील मुलभूत मसाले दिसताहेत. शिवाय करायला सोपी कृती. मग लगेच रविवारी हा प्रयोग करायचा हे पक्के झाले. त्यात काही बदल करता येतील का यावर विचार करून सकाळी सकाळी तयारीला सुरुवात केली. आता प्रयोग आहे, तोही बेकिंगचा म्हणजे तो अपयशी होण्याची शक्यता नाकारणे हे अतीच झाले.

माणूस ..... खलील जिब्रान

लेखक शिव कन्या यांनी रविवार, 22/03/2015 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या भटकंतीत मी एका बेटावर पोहचलो. तिथे मला एक राक्षस दिसला. त्याचे शरीर अवाढव्य होते. पायाला लोखंडी खूर होते. परंतु, त्याचे डोके मात्र माणसाचेच होते. तो, पृथ्वीवरील घनदाट जंगले, उंच उंच पर्वतं, विस्तीर्ण पठारे, समृद्ध खाणी अधाशीपणे खायचा. त्याचा तो अधाशीपणा मी बराचवेळ पहात राहिलो. शेवटी त्याला विचारले, ‘ इतके सारे खाऊन पिऊनही , तुझी तहानभूक शमतच नाही का?’ त्यावर राक्षस म्हणाला, ‘मित्रा, तसे तर माझे पोट कधीच भरले आहे! एवढेच नव्हे, तर मला या खाण्यापिण्याचाही अतोनात कंटाळा आलाय . पण, माझ्या मनात सारखी एकच भीती असते – उद्या खाण्यासाठी पृथ्वी राहणार नाही, आणि पिण्यासाठी समुद्र राहणार नाही.

भृगु संहिता फल आदेशाच्या शोधात... भटकंती?

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 22/03/2015 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
भृगु संहिता फल पत्रांच्या शोधात... मित्रांनो, आज या नववर्षाच्या सुरवातीला नाडी ग्रंथ भविष्य विषयावर पुढे शोध कार्य चालू ठेवण्याच्या निमित्ताने भृगु संहिता फल आदेश नेपाळमधे संग्रहित केले असल्याचे ऐकून होतो त्या वर अभ्यास दौरा करायला मी व जळगावच्या विवेक चौधरींनी काठमांडूची यात्रा करायला गोवा एक्सप्रेस ने जात आहोत. त्यानंतर मेरठ, सहारनपूर, गुरू वालिया, प्रताप गढ, लखनौ येथील भृगु संहिता केंद्रात जाऊन भेट वार्ता, फलादेश मिळवायचा प्रयत्न करणार आहोत.

मी उपवर तरुण असतो तर

लेखक श्रीरंग_जोशी यांनी रविवार, 22/03/2015 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
ब्राह्मण समाजातील उपवर मुलींची कमतरता आणी त्यावर उपाय हा धागा पाहिला अन विषयाची मांडणी पाहून हसूच आले. यावर आता एकाहून एक प्रतिक्रिया येणार असा विचार करत असतानाच वाटले की मांडणी कशीही असो सध्याच्या एका ज्वलंत विषयाला हात घातला आहे. जात, धर्म, समाज अन नोकरी वा व्यवसाय कुठलाही असो अनेक उपवर पुरुषांना स्वतःचे लग्न जुळवणे आव्हानात्मक होऊ लागले आहे. प्रश्न कितीही अवघड असला तरी उपाय शोधण्याचे प्रामाणिक प्रयत्न करायला हवेतच. कुठलीही समस्येवर उपाय शोधण्याची एक पद्धत म्हणजे स्वतःला त्या समस्येच्या केंद्रस्थानी ठेवून बघणे.

सोमनाथपुरा

लेखक पॉइंट ब्लँक यांनी रविवार, 22/03/2015 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
सोमनाथपुरा हे म्हैसूर जिल्हतील एक छोटेसे गाव. बेंगलोरपासून १४० किमी अंतरावर. इथे चन्ना केशवा हे होयासाला काळातील भव्य मंदीर आहे. होयसाळांचा सेनापती सोमनाथ ह्याने हे मंदिर १२६८ साली बांधले. हे मंदीर भगवान श्रीकृष्णाला समर्पित असून इथे जनार्दन, केशव आणि वेणुगोपाल ह्या तीन मुख्य देवता आहेत. त्यातील केशावाची मूर्ती गायब आहे. कुणी सुलतानाने ह्या मंदिरातील मूर्त्यांची नासधूस करून मंदिराचा विटाळ केला.

भीतीच्या भिंती ६: ‘दरी’

लेखक आतिवास यांनी रविवार, 22/03/2015 04:43 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ,, , , (विनंती : या लेखात मी ‘दरी’ शब्दांचे जे उच्चार दिले आहेत, ते वाचकांनी कृपया ग्राह्य धरू नयेत.) भारतासारख्या बहुभाषिक देशात जगण्याचा एक फायदा असा की, कुठल्याही नव्या भाषेत रूळायला आपल्याला

बोलाचीच बिर्याणी!

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 22/03/2015 00:43 या दिवशी प्रकाशित केले.
कसाबविरुद्ध खटला लढवणारे सरकारी वकील उज्ज्वल निकम ह्यांनी असे विधान केले आहे की कसाबला बिर्याणी खिलवण्यात येते अशी वदंता त्यांनीच पसरवली होती. कसाबबद्दल सहानुभूती वाटू नये म्हणून त्यांनी हे खोटे पसरवले. इतके क्रूर कृत्य केलेल्या आरोपीबद्दल लोकांना सहानुभूती वाटेल असे निकमांना का वाटावे हे एक कोडेच आहे. त्याने जे केले त्याला पुरेशी प्रसिद्धी दिली असती तर ते पुरले असते. त्याला खोट्या बिर्याणीची फोडणी द्यायची काय गरज आहे? मला वाटते असा खोटारडेपणा करणे अगदी कसाबबद्दल असले तरी खोडसाळपणाचे आहे. ह्या बिर्याणीमुळे त्या वेळच्या सरकारच्या अब्रूचा फालुदा झाला त्याला जबाबदार कोण?

संस्कृत सुभाषिते

लेखक शरद यांनी शनिवार, 21/03/2015 21:20 या दिवशी प्रकाशित केले.
आजपासून काही संस्कृत सुभाषितांचा परिचय करून देण्याचा विचार आहे. घाबरू नका. ही शाळेत शिकलात तशी "नीतीशतका"तील उपदेशात्मक नसतील. आपले मनोरंजन नक्कीच करतील याचा भरोसा देतो. मागे आपण आदीमाता व शिवशंभू यातील संवाद पाहिला होता (आठवत नाही ? ह्ररकत नाही. ही लिन्क http://www.misalpav.com/node/24338) त्यांच्याच संसारातील एक पर्व. शंकराने हालाहल कां प्राशन केले ?